अध्यात्म देव पूजा धार्मिक विधी

पूजा किंवा विधी करताना देव तांदुळावरच का मांडतात?

2 उत्तरे
2 answers

पूजा किंवा विधी करताना देव तांदुळावरच का मांडतात?

0





तांदुळाला पूर्ण अन्न गृहित धरले जात.

तांदूळ हा अन्नातील महत्त्वाचा घटक आहे.

कुंकुमाने रंगविलेले शुभ्र तांदूळ म्हणजेच अक्षता.

अक्षतेतले धान्य सुपीकपणाचे प्रतीक समजले जाते. कोणताही पदार्थ वापरत असताना त्याची उपलब्धता हे पण एक कारण असते. तांदूळ आपणास सहज उपलब्ध होतात.

अखंड तांदळाचे दाणे घे‌ऊन त्यांस तेल व कुंकू किंवा हळद लावून सावलीत वाळवून तयार करण्यात येतात त्या अक्षता, किंवा अक्षदा. यांचा रंग हळदकुंकू लावल्यामुळे पिवळा वा लाल होतो.

भात खाल्ल्याशिवाय काही लोकांचे जेवण पूर्ण होत नाही. तसेच कोणत्याही कार्यात अक्षतांशिवाय ती पूजा पुर्णत्वास पोहोचत नाही.

अक्षता ह्या अखंड तांदुळाच्या असतात.

अगोदर गव्हाचा पण वापर होत असे. पण गहू वापरल्यावर काही तांत्रिक अडचणी येत होत्या जसे की फोटो हलणे, मूर्ती हलणे. त्यामुळे गव्हापेक्षा तांदूळ उत्तम.

आंध्र प्रदेश मध्ये काही ठिकाणी विविध डाळी पण वापरतात.

तांदुळाच्या रंग पांढरा असल्यामुळे तांदळाला हळद लावून पिवळसर रंग करणे, कुंकू लावून लालसर रंग व खाण्याचे विविध रंग वापर करून विविध रंगांचे तांदूळ तयार करता येतात. यामुळे पूजा विधी ही आकर्षक होते . पूजा विधी ही आकर्षक झाल्यामुळे मनाला प्रसन्न वाटते. पूजा मांडणी ही पण एक उत्तम कला आहे.

तांदुळाचे वैशिष्ट्य. रेल्वे ट्रॅक वर गीट्टी का टाकतात ?[1] . तोच वापर , तेच तत्त्व इथे तांदूळ वापरून पूजाविधीमध्ये केला जातो. तांदळावर देवाच्या प्रतिमा , मूर्ती , फोटो ठेवल्यावर त्या सहसा हलत सरकत नाहीत. किंचित नकळत धक्का जरी लागला तरी तांदुळ एकमेकात सरकून फोटो , मुर्ती , पडत नाही . पूजा विधी करत असताना फोटो , मूर्ती यांना जर धक्का लागला तर ….. आणि ते जर पडले तर …. आपल्याच मनाला अपशकुन वाटतो. हे टाळण्यासाठी तांदळाच्या एकात एक गच्च बसण्याच्या या गुणधर्माचा उत्तम उपयोग केला जातो.
उत्तर लिहिले · 30/5/2022
कर्म · 53710
0

पूजा किंवा विधी करताना देव तांदुळावरच का मांडतात याची काही कारणे खालीलप्रमाणे आहेत:

  • शुद्धता आणि पवित्रता: तांदूळ हे शुद्ध आणि पवित्र मानले जातात. ते नैसर्गिक आणिprocess केलेले नसल्यामुळे, ते नकारात्मक ऊर्जा शोषून घेत नाहीत.
  • समृद्धीचे प्रतीक: तांदूळ हे समृद्धी आणि संपन्नतेचे प्रतीक आहे. देवी-देवतांना तांदळावर स्थापित करणे म्हणजे घरात सकारात्मक ऊर्जा आणि आशीर्वाद आमंत्रित करणे.
  • आधार: तांदूळ देवाला आधार देतो. मूर्ती किंवा कलश तांदळावर ठेवल्याने ते स्थिर राहतात.
  • ऊर्जा সঞ্চारण: तांदळामध्ये ऊर्जा आकर्षित करण्याची आणि प्रक्षेपित करण्याची क्षमता असते.
  • नैसर्गिकरित्या उपलब्ध: तांदूळ भारतात सहज उपलब्ध होतो आणि तो स्वस्त देखील आहे.

या कारणांमुळे, पूजा किंवा विधी करताना देव तांदुळावर मांडले जातात.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 1440

Related Questions

निवृत्ती नाथ दिंडी शास्र?
वारकरी संप्रदायाचा आचारधर्म स्पष्ट करा?
मोक्षावर टीप लिहा?
विभूती ही नेहमीच प्रतिमारूप असते म्हणजे काय?
भगवान शंकर यांना भोळा सांब का म्हणतात?
माळकरी माणसाने नॉनव्हेज हॉटेल मध्ये जॉब करावा का?
आपल्याला गौतम बुद्ध आणि स्वामी विवेकानंद यांच्यात काय साम्य आढळते?