अन्न
फळ
धान्य
वनस्पतीच्या बिया म्हणजे धान्य, कडधान्य, फळांतील बिया यांमध्ये वनस्पतीचा जीव असतो, मग धान्य, कडधान्य हे शाकाहारी अन्न कसे काय?
2 उत्तरे
2
answers
वनस्पतीच्या बिया म्हणजे धान्य, कडधान्य, फळांतील बिया यांमध्ये वनस्पतीचा जीव असतो, मग धान्य, कडधान्य हे शाकाहारी अन्न कसे काय?
4
Answer link
खरं आहे धान्य, कडधान्य फळातील बिया ,या मध्ये वनस्पतीचा जीव असतो. धान्य ,कडधान्ये फळातील व काही शेंगा मधील सुकलेल्या बिया आहे त्या नैसर्गिक अवस्थेत खाऊन मानव पोटातील अग्नी मध्ये शिजवू शकत नाही. त्या साठी त्यावर काही प्रकीया करावी लागते. मानवाने सतत अभ्यास निरीक्षण संशोधन करून अग्नी चा शोध लागल्यानंतर ज्वारी ,बाजरी ,गहू इत्यादी धान्य जे लवकर शिजू शकत नाही त्याचे पीठ करून बाहेरील अग्नी मध्ये भाजून ,तांदूळ शिजवून, कडधान्ये यांच्या डाळी तयार करुन शिजवून किंवा कडधान्ये यांना मोड आणून शिजवून खाण्यास सुरुवात केली . आणि आज मानवाने तेच अन्न म्हणून स्वीकारले आहे . निसर्गात मुबलक मिळते व खाल्यावर लगेच भूक लागत नाही. शरीर कुपोषित दिसत नाही आकर्षक दिसते हे एक त्यामागील कारण असावे असे मला वाटते .
0
Answer link
वनस्पतींच्या बिया, जसे धान्य, कडधान्ये आणि फळांतील बिया, ह्या शाकाहारी अन्नाचा भाग आहेत कारण:
- वनस्पतीचा जीव: बियांमध्ये नक्कीच वनस्पतीचा जीव असतो, परंतु तो सुप्त अवस्थेत (dormant) असतो. आपण जेव्हा धान्य किंवा कडधान्ये खातो, तेव्हा तो जीव जिवंत आणि सक्रिय नसतो.
- प्राण्यांची हत्या नाही: शाकाहारी अन्नामध्ये प्राण्यांची हत्या किंवा त्यांना कोणतीही इजा न पोहोचवता मिळवलेल्या अन्नाचा समावेश होतो. बिया खाणे हे या व्याख्येत बसते, कारण बिया काढण्यासाठी झाडाला मारले जात नाही.
- नैसर्गिकरित्या मिळणारे अन्न: बिया हे वनस्पतींपासून नैसर्गिकरित्या मिळणारे अन्न आहे. फळे आणि भाज्यांप्रमाणेच, बिया देखील वनस्पतींच्या वाढीचा आणि पुनरुत्पादनाचा एक भाग आहेत.
त्यामुळे, जरी बियांमध्ये वनस्पतीचा जीव असला तरी, ते शाकाहारी अन्न मानले जातात कारण ते प्राण्यांना मारून मिळवले जात नाही.