3 उत्तरे
3
answers
संत साहित्य म्हणजे काय?
3
Answer link
संत साहित्य आणि मराठी भाषा यांचा संबंध कधीही न तुटणारा आहे. कारण मराठी भाषेच्या प्रारंभ काळातील संताची ग्रंथ अभंग निर्मिती ही समजा जीवनातील परिवर्तनाच्या प्रेरणेने झालेली आहे. ही साहित्य निर्मिती करताना देवता आणि उपासना ही उर्जास्थाने महत्वाची आहेत सतांची मुख्य देवता म्हणजे पंढरपूरचा श्री विठठल किंवा पांडुरंग होय. विठठलाच्या रामकृष्ण हरी या नामघोषामध्ये संपूर्ण महाराष्ट्र न्हावून निघाला आहे. मज विठू पलवितो किंवा बोलविता धनी वेगळाच या उक्तीवरून मध्ययुगात संपूर्ण महाराष्ट्र भक्ती साधनेत लीन झालेला आढळतो. या पार्श्वभूमीनुसार आपणास मध्ययुगीन काळातील भक्ती चे स्वरूप आणि वैशिष्ट्ये याची सविस्तर मांडणी करावयाची आहे. नवनिर्माणशील साहित्याचा त्या काळातील समाज, जीवन, परंपरा, धर्म, कला आणि संस्कृतीशी जवहचा संबंध असतो संत साहित्य हे तत्कालीन सामाजिक धर्माची व्यवसायांची बंधने गळून पडली त्या विठठल देवतेच्या भक्तीत मध्ये युगीन काळातील ज्ञानदेवापासून संत तुकारामा पर्यंतचे संत एकरूप झालेले आढळतात. या संताच्या भक्तीचा त्यांच्या वाड्:मय निर्मितीचा आणि जीवन पध्दतीचा शोध घेण्यापूर्वी ज्या देवतेचे हे संत उपेक्षित होते त्या पंढरपूरच्या विठठलाची थोडी पूर्वपिठीका मांडणे आवश्यक वाटते...
पंढरपूरचे प्राचीन काळातील पौडूंकपूर असे नाव होते. श्री. विठठल पंढरपूरला कधी नामरूप पावले? त्या मागची अनेक कारणे सांगितली जातात. 1 कृष्ण आणि राधा यांना द्वारकेत एकांत क्षणी पाहून रुक्मिणीचा राग अनावर झाला रुक्मिणी
भीमा नदीकाठी दिंडोर वनात रुसून बसली. तिला समजवण्यासाठी कृष्ण गोप वनात येथे आला.
2 पौंड्रकपूर येथे भक्त पुंडलीक आपल्या आई वडीलांच्या सेवेत मग्न असताना कृष्णाचे
नामस्मरण करत असे त्याच्या भक्तीला प्रसन्न होवून कृष्णाने पुडलीकाचे भेटीसाठी येथे आगमन झाले.
सर्व संतांनी यास दुजोरा दिलेला आहे.
"युगे अठ्ठावीस | विटेवरी उभा | वमांगी रखुमाई | दिसे दिव्य भोभा || "
असे आजही मानले जाते. द्वापार युगाच्या शेवटी आणि अभिमन्यूच्या नातवाचे हाती इंद्रप्रस्थाची सत्ता सोपवल्यानंतर श्री कृष्णाने कलीयुगास प्रारंभ लवकरच होईन असे भागवत पुरानात म्हटले आहे. या युगामध्ये 'भक्ती' हेच मोक्षाचे प्रमुख साधन राहील असेही मानले आहे. त्यानुसार मध्ययुगीन काळात पंढरपुरचा विठठल आणि त्याची भक्ती हेच या काळातील वेगळेपण ठरते. असे असले तरी श्री विठठल आणि कृष्णाचे झालेले दैवतीकरण महत्वाचे आहे. कृष्ण पुंडलिक भेटीसाठी जरी आलेले असले तरी पुंडलिकाने उभे राहण्यासाठी भिरकावलेली विट आणि कटीवर हात ठेवून युगानुयुगे विटेवर उभी राहिलेली विठठलाची सावळी मुर्ती आजही भक्तांना आकर्षीत करते आहे. संत ज्ञानदेवापूर्वी या मूर्तीचे तीर्थस्थळाचे महत्व असेलही पण ज्ञानदेवांनी भागवत धर्माचे केलेले पुनरज्जीवन या मुळे या देवतेचे महत्व वाढले "ज्ञानदेवांच्या काळापूर्वीच जनमानसाने स्वीकारलेली पुडलिकाची कथा ही ऐतिहासीक नसून ती विठठलाची शुद्ध पौराणिक प्रकृतीची अवतरण कथा आहे" डॉ. रा. ची. ढेरे यांचे मतानुसार श्री विठठलाचे
महत्व ज्ञानदेवापूर्वी लोकमानसात वाढलेले असावे. श्री. विठठल भक्ताच्या नावभक्तीतील कल्पवेल आहे. श्री विलाविषयी सर्व संताचे ठिकाणी अच्छा भाग आहे.
ज्ञानदेव ते तुकाराम या संताच्या काळातील महाराष्ट्रातील संप्रदाय आणि सामाजीक, राजकीय परस्थिती समजावून घेणे महत्वाचे वाटते तत्काळाचा विचार केल्यास या काळात महाराष्ट्रात नाम महानुभाव, सूफी दत्त भागवत, जैन असे संप्रदाय आपल्या परिने जनमानसावर प्रभाव पाडून आपल्या संप्रदायाचे महत्व होते. विविध संप्रदय आणि समाजातील जनमानसाचे अज्ञान यांची नाड़ी ओळखून ज्ञानदेवानी नाथ आणि भागवत संप्रदयायाची संप्रदायांचे एकत्रीकरण करुण वारकरी संप्रदायाचे केले.
"महाराष्ट्रातील भक्ती संप्रदाय अत्यंत प्रभावशाली मानला जातो. विविध संप्रदाय आणि समाज यांचे नाते वस्त्राच्या उभ्या आठव्या धाग्या प्रमाणे मानले जाते महाराष्ट्रातील लोक समुह आणि देवदेवतायांचा विचार केला तर कोणत्याही देवतेविषयी मानसाच्या मनात श्रद्धाभाव आढळतो हे कार्य सतानी केलेले आहे. सत्तानी कललीबादमय निर्मिती करताना कधीही बाळगला नाही. ज्ञानदेव पूर्वकालखंडात मरगळलेल्या भक्ती संप्रदायाला सुवर्णकाळ कसा कशामुळे प्राप्त झाला ? समजावून घेणे महत्वाचे आहे. संत ज्ञानदेवानी संस्कृत मध्ये आढळून पडलेले ज्ञान देशी भाषेतून भावार्थदिपीकेच्या रूपाने व्यक्त करून सर्व सामान्य मानसाला समजेन अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या रूपाने निरुपण करुण सर्वसामान्य माणसाला ज्ञानाचा अधिकार बहाल केला संत नामदेवांनी येथ जाती अप्रमाण | माणून आठरापगड जातीतील सर्वसाधारण लोकांना एकत्र करून भागवत धर्माचा विस्तार केला. प्रत्येकाला देवाविषयी नक्तीविषयी, अमंगनिर्मितीविषयी अधिकार होते. त्यामुळे काळातील सामाजीक परिस्थिती आणि आपणास आलेला अनुभव आपनावर होत असलेला अन्याय, अत्याचार, आपल्या व्यथा वेदना अभंगाद्वारे मांडून आपल्या भावनांना वाट करुण दिली. या संतांचे ठिकाणी जातीच्या चौकटी नव्हत्या. उचनिचतेच्या भिती नव्हत्या किया स्त्री-पुरुष असा मेदनावही नव्हता समाजाने अव्हेरलेल्या स्त्री-पुरुषानीविठठलाचे नागरगरण करावे आपले दुःख दिदवलास सागुण आपले मन मोकळे करावे किंवा आपनास अशा परिस्थितीस जन्मास घालून विठठलाने आपल्यावर अन्याय केला म्हणून विठठलास दोषही दयावा अशी माय भावनाची वेगळी माडणी यात दिसते यावेळी अध्यात्मीक क्षेत्रातील एकात्मता आपणास स्पष्टपणे जाणवत असली तरी महाराष्ट्रातील चातुर्य व्यवस्थेची चौकट आणि महाराष्ट्रावर सतत होत असलेली मुस्लीग आकमणे या मुळे समजाची होत असलेली होरपळ संत प्रभोधनाशीवाय रोखू शकत नव्हते.
संत साहित्यातील मक्तीचे स्वरुप :- सलानी आपल्या जीवनाचा आणि साहित्याचा वापर परमार्थ क्षेत्रातील परिर्वतनाराठी कला. सामाजीक जिवनापरही याचा प्रभाव पहला सतानी भामक क्षेत्रात प्रामुख्याने कार्य केले जाती, वर्ण व्यवस्थेची चौकट क्षीण करून समता एकता स्थापीत करण्याचा त्यानी प्रयत्न केला. भक्तीचा सोपा मार्ग समाजास दाखवला. कर्मकांडास दूर सारुण साध्या सोप्या भाषेत सर्वजनसुलभ परमेश्वर आराधणेमा आणि ईश्वरी उपासणेची रीत समाजात रुजवली संतांनी समाजासमोर मांडलेला भक्तीमार्ग भवताना प्रपंचापासून दूर नेणारा नव्हता. सतारात राहून परमार्थ करावा असेव भक्तीसाघर्ण सत्यता निती परमार्थ महत्वाचे होते. जातीव्यवस्थेच्या चौकटी बोघट केल्यामुळे भक्ती करण्याचा अधिकार सर्वांना आहे. चारित्र्यसपन्न जीवन जगण्यासाठी परमार्था शिवाय पर्याय नाही हे पटवून दिले. भागवत संप्रदयामध्ये स्त्रीयांनाही मानाचे स्थान दिले. हीन पतीत जातीत जाण्यास येवूनही त्यांना भक्ताये उच्च स्थान प्राप्त झाले.
देव एकच आहे ही कल्पना प्रथम संतानी माडली परमार्थामध्ये एकेश्वरी मार्गाचा अवलंब कल्यामुळे भागवत संप्रदायाचे समाजात बळकट स्थिती निर्माण झाली गायलेकराप्रगाण देव आणि भक्त यांचा संबंध निर्माण झाला पढरपूरचा विठठल भक्तांच्या हाकला पावून येता ही पादती निर्माण झाली सामान्य मानसामर्यंत ज्ञान जाये म्हणून संतांनी सोपा आचार धर्म सांगितला. लोकांच्या भाषेत संतांनी आपले अगंग रचले. आपले अनुभव आणि परमेश्वर भेटीची तळमळ अभंगातून व्यक्त केली किर्तन प्रवचन या माध्यमातून मानवी जिवनातील परिपूर्ण ज्ञान संतांनी ज्ञान समाजात प्रसारीत केले. त्यामुळे भागवत संप्रदायाची वाढझपाटयानी झाली
हिंदू संस्कृतीमध्ये मोक्ष किंवा जिवनाचा उध्दार या संकल्पनांना अत्यंत महत्वाचे स्थान आहे. भगवान विष्णुनी डापार युगाच्या अंत:काळी कलयुग प्रारंभावे सूचक विधान केले होते. डामार युगातील कृष्णअवतार समाप्ती आणि नवयुगाचा प्रारंभ या दोन भिन्न टोकाना एकत्र आणणारा दुवा फक्त एकच होता आणि म्हणजे "भक्ती" मार्ग होय भक्ती मार्गाचा किंवा परमेश्वर आराधनेचा सन्मार्ग आणि त्याचा प्रचार व प्रसार करण्यासाठी संत ज्ञानेश्वरापासून संत तुकारामापर्यंत सर्व संतांनी या मार्गाचे पटवून दिले प्रत्येक संतांचा काळ वेगळा. सामाजिक राजकिय परिस्थिती जरी वेगळी असली तरी प्रत्येक संताने समन्वयाची भुमिका घेतली. कोणत्याही संप्रदायाबरोबर टोकावे बाद केले नाहीत उलट आपल्यामध्ये काही पंचांना सामावून घेतले कभी एखादया संप्रदायाच्या माध्यमामधून सन्मागधि कार्य पार पाडले इस च्या तेराव्या शतकाच्या उत्तरार्वामध्ये महाराष्ट्रात नाथ महानुभाव भागवत जैन सुफी संप्रदाय धर्म प्रसाराचे काम करत होते. संत ज्ञानेश्वरांनी नाथ संप्रदायातील महिनीनाथ यांचेकडून निवृत्ती नाधानी अनुग्रह घ्यावा असे सूचित करुण नाथ आणि भागवत संप्रदयाचे एकत्रिकरण केले. सत नामदेवानी संप्रदायाचा विस्तार करताना येथे जाती प्रमाण मानून अठरा पगड जातितौल सताना एकत्र करुण पंजाब पर्यंत धर्म प्रसार केला. संत एकनावानी काळानुसार दत्त संप्रदाय आणि सुफी संप्रदायातील जनार्धन स्थानिकडून अनुग्रह घेवून समाजात कार्य केले. संत तुकारामांनी संतारातील सरोटोलपट आपल्या अनुभवातून कथन करुन मोक्ष प्राप्तीसाठी परमाशिवाय दुसरे साधन नाही है उनकावून सांगितले.
या सर्व संताचे मुख्य दैवत होते श्री विठठल भक्तांसाठी "वैकुठीचे देव आपरणीवरी" अशी कल्पना संतांनी केली पुंडलिका तुवा बरचे केले भीमाकाठी देव आणिले | या धारणेने भागवत धर्मातील तळ्याने आपढ़ी कार्तिकेला पंढरपुराला यावे. पाई वारी करावी. गळ्यामध्ये तुळशीमाळ घालावी. एकादशी व्रत करावे. मुखाने रामकृष्ण हरी हा नामघोष करावा की साधना जणू काही चालताना पायाखाली मुंगीहि येनार नाही ही अधिकवृत्ती या संप्रदायाने जोपासली.
"भागवत संप्रदाय हा आरंभापासून विश्ववादी आहे आणि विश्वातील सर्व लोकाना या अविनाशी शातीचा मार्ग दाखविण्या करिता आध्यात्मिक सुख प्राप्त करुण देनारी अहिंसा सत्यादि नैतिक ताचे याचे प्रतिपादन तो करत आला आहे. "3 (श.दा. पेंडसेभसा भाषण विवठलाच्या भक्तीत सर्व संत रममान होते. आपले जगणे आपले कर्म या विषयी हितगुज करत जन्मास घातल्याचे दुःख ही
व्यक्त करत आपले सकट परमेश्वर दूर करण म्हणून धावा करत
"पतीत पावन नाम ऐकूनी आलो भी द्वारा | पतीत पावन न होती म्हणूनी जातो माधारा ॥4
(म.वा.इ.डॉ.श.गो.पू. 603 भागवत संप्रदाय सर्वव्यापी बनला तो जनतेचा भागवत धर्म बनला मराठी भाषेला अग्रस्थान देवून ऐन मुस्लीम राजवटीही समाजाला आधार देण्याचे बहुमुल्य कार्य या संतांनी केले. संताचे वादमय सताच्या रचना अजरामर ठरख्या संपूर्ण समाजजीवनास या भागवत धर्माने व्यापले. त्यामुळे इतर
संत साहित्याचे सामाजिक योगदान
संप्रदायाची वाढ होऊ शकली नाही. भागवत संप्रदायाने समानता आणि बंधुभाव श्रेष्ठ मानला राहणिमान साधे निश्चित केले. वैयक्तिक स्वच्छतेला प्राधान्य दिले. पांढरे स्वच्छ अंगावर परिधान केले. दररोज अंघोळ करावी. कपाळी चंदनी टिळा लावावा. गळ्यामध्ये तुळशिची माळ घलावी. वर्षातून दोनदा पंढरिची वारी करावी आषाढीस सर्व संत एकत्र येवून संबंधात वाढ होत असे मैखिक परंपरेने चालत आलेले सामाजिक दाखले देवून परमार्थ विकास करावा. मराठी भाषेचा वापर करुण सर्वसामान्य मानसांना समजेन असे उदाहरणे दाखले, दृष्टांत देवून ज्ञानाची वृध्दी करावी.
सतांना समाजातील वर्ण व्यवस्था आणि जाती व्यवस्था कर्मकांड, भोळसट धर्म कल्पना नाहिशा करुण ब्राम्हण्यवादाला समाजातून हदपार करावयाचे होते. मुस्लीम सत्ता, मुस्लीमांच्या संस्कृती,उर्दु फारशी भाषेशी मुकाबला आणि मुस्लीमांच्या Aationalकृती समन्वयाशी समाजाची नाळ जोडावयाची होती.
0
Answer link
संत साहित्य:
संत साहित्य म्हणजे संतांनी समाजाला उद्देशून केलेले लेखन. हे लेखन प्रामुख्याने भक्ति, वैराग्य, नीती आणि अध्यात्म या विषयांवर आधारित असते.
संत साहित्याची वैशिष्ट्ये:
- सोप्या भाषेत अध्यात्माचे ज्ञान
- समाजाला नीतिमत्तेचा मार्ग दाखवणे
- भक्ति आणि वैराग्याचे महत्त्व सांगणे
- जातिभेद आणि अंधश्रद्धा यांवर प्रहार
काही प्रमुख संत आणि त्यांचे साहित्य:
- संत ज्ञानेश्वर: ज्ञानेश्वरी, अमृतानुभव
- संत तुकाराम: तुकाराम गाथा
- संत नामदेव: नामदेव गाथा
- संत एकनाथ: भागवत, भारूड
- संत जनाबाई: अभंग
संत साहित्याने समाजाला एक नवी दिशा दिली. आजही हे साहित्य आपल्याला प्रेरणा देते आणि मार्गदर्शन करते.