भारताचा इतिहास १८५७ चा उठाव इतिहास

१८५७ च्या उठावाचे नेतृत्व करणाऱ्यांपैकी कोणी नेपाळमध्ये आश्रय घेतला?

3 उत्तरे
3 answers

१८५७ च्या उठावाचे नेतृत्व करणाऱ्यांपैकी कोणी नेपाळमध्ये आश्रय घेतला?

1
बिहारपासून राजपूतान्यापर्यंत इंग्रज छावण्यातील हिंदी सैनिकांनी बंडाचे निशाण उभारले. लखनी, अलाहाबाद, कानपूर, बनारस, बरेली, झाशी या ठिकाणी उठावास प्रारंभ झाला. पुढे हे लोण दक्षिण भारतातही पसरले नागपूर, सातारा, कोल्हापूर, नरगुंद अशा ठिकाणी उठाव झाले. * लक्याचे नेतृत्व : बहादुरशहाचे नेतृत्व मान्य करून नानासाहेब पेशवे, झाशीची राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे इ. नी लढ्याचे नेतृत्व केले. बीमोड इंग्रजांनीही उठावाचा बीमोड साम, दाम, दंड, भेद या नीतीप्रमाणे केला. नानासाहेब व बेगम हजरत महल यांनी नेपाळमध्ये आश्रय घेतला, तर तात्या टोपे दहा महिने इंग्रजांशी लढत राहिले; पण फित्रीमुळे त्यांना फासावार जावे लागले. सन १८०८ च्या अखेरीपर्यंत इंग्रजांनी हा लढा कठोरपणे दडपून टाकला.
उत्तर लिहिले · 12/12/2021
कर्म · 121765
0
ढजझमत
उत्तर लिहिले · 16/12/2021
कर्म · 0
0
१८५७ च्या उठावाचे नेतृत्व करणाऱ्यांपैकी ज्या नेत्यांनी नेपाळमध्ये आश्रय घेतला त्यांची नावे खालीलप्रमाणे:
  • नानासाहेब पेशवे:

    नानासाहेब पेशवे हे मराठा साम्राज्याचे पेशवे बाजीराव दुसरे यांचे दत्तक पुत्र होते. त्यांनी कानपूरमध्ये उठावाचे नेतृत्व केले. ब्रिटिश सैन्याकडून पराभव झाल्यानंतर ते नेपाळमध्ये पळून गेले.

  • बेगम हजरत महल:

    बेगम हजरत महल अवध (आजचे उत्तर प्रदेश) च्या नवाबाची पत्नी होती. तिने आपल्या अल्पवयीन मुलाला गादीवर बसवून इंग्रजांविरुद्ध लखनौमध्ये उठाव केला. पराभव झाल्यानंतर तिने नेपाळमध्ये आश्रय घेतला, जिथे तिचा मृत्यू झाला.

या दोन प्रमुख व्यक्तींनी १८५७ च्या उठावानंतर नेपाळमध्ये आश्रय घेतला.
उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 980

Related Questions

सन १८५७ च्या उठावाचे महत्त्व थोडक्यात लिहा?
१८५७ च्या युद्धातील इंग्रजांच्या विजयाची कारणे स्पष्ट करा?
1857 च्या उठावाचे तुम्हाला झालेले आकलन तुम्ही कसे मांडाल?
१८५७ च्या उठावाचे परिणाम कोणते झाले?
1857 चा उठावा कारण लिह?
1857 च्या उठावाची सविस्तर कारणे पष्ट करा?
1857 च्या उठावाची कारणे काय होती?