Topic icon

१८५७ चा उठाव

0

सन १८५७ च्या उठावाचे महत्त्व खालीलप्रमाणे:

राजकीय महत्त्व:
  • ब्रिटिश सत्तेला आव्हान: या उठावाने भारतातील ब्रिटिश सत्तेला जोरदार आव्हान दिले. जरी हा उठाव अयशस्वी झाला, तरी त्याने ब्रिटिश प्रशासनाला हादरवून सोडले.
  • राष्ट्रवादाची प्रेरणा: या उठावामुळे भारतीयांमध्ये राष्ट्रवादाची भावना जागृत झाली. लोकांना एकत्र येऊन आपल्या देशासाठी लढण्याची प्रेरणा मिळाली.
  • कंपनी राजवट समाप्त: उठावानंतर ब्रिटिश सरकारने ईस्ट इंडिया कंपनीकडून भारताचा कारभार स्वतःच्या हाती घेतला.
सामाजिक महत्त्व:
  • सामूहिक एकता: या उठावात हिंदू आणि मुस्लिम नागरिक खांद्याला खांदा लावून लढले, ज्यामुळे सामाजिक एकतेचे दर्शन झाले.
  • जातीय भेदभावाला विरोध: उठावात सर्व जाती-धर्माचे लोक सामील झाल्याने जातीय भेदभावाला विरोध दर्शवला गेला.
लष्करी महत्त्व:
  • लष्करी सुधारणा: उठावानंतर ब्रिटिश सैन्यात सुधारणा करण्यात आल्या. भारतीय सैनिकांची संख्या कमी करण्यात आली आणि महत्त्वाच्या पदांवर फक्त ब्रिटिश अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली.
  • शस्त्रास्त्रांचे आधुनिकीकरण: ब्रिटिश सैन्याने अधिक आधुनिक शस्त्रे वापरण्यास सुरुवात केली, ज्यामुळे त्यांची ताकद वाढली.
इतर महत्त्व:
  • नवीन धोरणे: ब्रिटिश सरकारने भारतीयांसाठी काही नवीन धोरणे आणली, ज्यामुळे प्रशासनात सुधारणा झाली.
  • ऐतिहासिक महत्त्व: हा उठाव भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे, ज्याने पुढील पिढ्यांना स्वातंत्र्य लढ्यात भाग घेण्यास प्रोत्साहित केले.
उत्तर लिहिले · 28/3/2025
कर्म · 980
0
१८५७ च्या युद्धातील इंग्रजांच्या विजयाची कारणे खालीलप्रमाणे आहेत:

इंग्रजांच्या विजयाची कारणे:

  • प्रभावी नेतृत्व: इंग्रजांकडे लॉर्ड कॅनिंगसारखे (Lord Canning) अनुभवी गव्हर्नर-जनरल (Governor-General) होते आणि त्यांच्याकडे सर कॉलिन कॅम्पबेल (Sir Colin Campbell), सर ह्यू रोज (Sir Hugh Rose) यांसारख्या कुशल सेनानी होते. यांच्या नेतृत्वाखाली इंग्रजांनीstrategically (തന്ത്രज्ञानाने) महत्त्वाची ठिकाणे जिंकली.
  • चांगले सैन्य आणि शस्त्रे: ईस्ट इंडिया कंपनीकडे (East India Company) शिस्तबद्ध आणि प्रशिक्षित सैन्य होते. त्यांच्याकडे आधुनिक शस्त्रे होती, जी त्यांनी विद्रोहींविरुद्ध प्रभावीपणे वापरली.
  • एकात्मतेचा अभाव: भारतीयांमध्ये एकजूट नव्हती. अनेक राजे आणि जमीनदार इंग्रजांना साथ देत होते, त्यामुळे ब्रिटिशांना भारतातील अंतर्गत परिस्थितीचा फायदा झाला.
  • संपर्क आणि दळणवळण: इंग्रजांनी रेल्वे आणि टेलिग्राफ (telegraph) सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून जलद संवाद आणि सैन्य तसेच सामग्रीची वाहतूक केली.
  • आर्थिक श्रेष्ठता: ब्रिटिशांकडे मजबूत आर्थिक पाठबळ होते. त्यामुळे त्यांना युद्धासाठी लागणारा खर्च भागवणे सोपे होते.
  • शिस्त आणि समन्वय: ब्रिटिश सैन्यात उत्तम शिस्त होती आणि त्यांच्यात समन्वय चांगला होता. विद्रोहींमध्ये समन्वयाचा अभाव होता.
उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 980
0
१८५७ च्या उठावाचे आकलन

१८५७ चा उठाव: आकलन

१८५७ चा उठाव हा भारताच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. या उठावामुळे भारतातील ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीच्या राजवटीला मोठा धक्का बसला. या उठावाचे स्वरूप, कारणे, परिणाम आणि महत्त्व यांबद्दल अनेक मतभेद आहेत, तरीही काही प्रमुख गोष्टी खालीलप्रमाणे मांडता येतील:

  1. उठावाची कारणे:

    • राजकीय कारणे: ब्रिटीश धोरणांमुळे भारतीय राज्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. लॉर्ड डलहौसीच्या 'साम्राज्यवादी' धोरणाने अनेक राज्ये खालसा केली.

    • आर्थिक कारणे: ब्रिटीश शासनाने शेती आणि व्यापारावर नियंत्रण ठेवल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थाModeled ढासळली. शेतकऱ्यांवर अन्यायकारक कर लादले गेले.

    • सामाजिक आणि धार्मिक कारणे: ब्रिटीशांनी भारतीय समाजातील रूढी आणि परंपरांमध्ये हस्तक्षेप केल्यामुळे लोकांमध्ये नाराजी होती. ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या कार्यामुळे धर्मांतर वाढले, ज्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्या.

    • लष्करी कारणे: भारतीय सैनिकांना ब्रिटीश सैनिकांपेक्षा कमी दर्जाची वागणूक मिळत होती. नवीन एनफिल्ड रायफलमध्ये वापरल्या जाणाऱ्या काडतुसांना लावलेले तेल हिंदू आणि मुस्लिम सैनिकांच्या धार्मिक भावनांना ठेच पोहोचवणारे होते.

  2. उठावाचे स्वरूप:

    • हा उठाव केवळ 'शिपायांचे बंड' नव्हता, तर यात सामान्य नागरिक, शेतकरी आणि जमीनदारांनीही भाग घेतला.

    • उठावाचे नेतृत्व विविध स्तरांवर झाले; उदा. दिल्लीत बहादूर शाह जफर, कानपूरमध्ये नानासाहेब पेशवे, झाशीमध्ये राणी लक्ष्मीबाई.

  3. उठावाचे परिणाम:

    • ईस्ट इंडिया कंपनीची राजवट संपुष्टात आली आणि भारतावर थेट ब्रिटीश सरकारचे नियंत्रण आले.

    • भारतीय प्रशासनात बदल करण्यात आले. भारतीयांना प्रशासनात अधिक प्रतिनिधित्व देण्यास सुरुवात झाली.

    • ब्रिटीश धोरणांमध्ये बदल करण्यात आले, ज्यामुळे भारतीयांच्या धार्मिक आणि सामाजिक भावनांचा आदर राखला गेला.

  4. उठावाचे महत्त्व:

    • या उठावामुळे भारतीयांमध्ये राष्ट्रवादाची भावना जागृत झाली.

    • हा उठाव भारतीय स्वातंत्र्यलढ्यासाठी एक प्रेरणा ठरला.

Disclaimer: ह्या माहितीची अचूकता पडताळण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न केला आहे, परंतु काही त्रुटी आढळल्यास आम्ही दिलगीर आहोत.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 980
1
बिहारपासून राजपूतान्यापर्यंत इंग्रज छावण्यातील हिंदी सैनिकांनी बंडाचे निशाण उभारले. लखनी, अलाहाबाद, कानपूर, बनारस, बरेली, झाशी या ठिकाणी उठावास प्रारंभ झाला. पुढे हे लोण दक्षिण भारतातही पसरले नागपूर, सातारा, कोल्हापूर, नरगुंद अशा ठिकाणी उठाव झाले. * लक्याचे नेतृत्व : बहादुरशहाचे नेतृत्व मान्य करून नानासाहेब पेशवे, झाशीची राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे इ. नी लढ्याचे नेतृत्व केले. बीमोड इंग्रजांनीही उठावाचा बीमोड साम, दाम, दंड, भेद या नीतीप्रमाणे केला. नानासाहेब व बेगम हजरत महल यांनी नेपाळमध्ये आश्रय घेतला, तर तात्या टोपे दहा महिने इंग्रजांशी लढत राहिले; पण फित्रीमुळे त्यांना फासावार जावे लागले. सन १८०८ च्या अखेरीपर्यंत इंग्रजांनी हा लढा कठोरपणे दडपून टाकला.
उत्तर लिहिले · 12/12/2021
कर्म · 121765
1



१८५७ च्या उठावाचे परिणाम
ब्रिटिश शासनाचे ठाम मत झाले होते की, १८५७ चा उठाव मोगल राज्याच्या पुनस्र्थापनेसाठीचा मुस्लीम उठाव होता.




ज्या ब्रिटिशांनी १८५७ च्या उठावादरम्यान व १८७१ पर्यंत मुसलमानांना शत्रू मानून त्यांचे दमन केले होते, त्यांनीच १८७१ च्या हंटर आयोग अहवालानंतर भारतीय मुसलमानांची साथ घेण्याचे ठरविले. या प्रयत्नांना सर सय्यद अहमद खान यांच्यामुळे गती मिळाली..

मागच्या लेखात (३/८) सांगितल्याप्रमाणे ब्रिटिश राज्याचे व त्यांनी आणलेल्या पाश्चात्त्य संस्कृतीचे मुसलमान हे कडवे विरोधक बनले तर त्यास ईश्वरी वरदान मानून हिंदू हे ब्रिटिशांचे मित्र बनले. परंतु १८५७ चा उठाव झाला नि त्यानंतरच्या काळात ब्रिटिशांचे मुसलमान हे मित्र तर हिंदू कडवे विरोधक बनले. असे का झाले?


ब्रिटिश शासनाचे ठाम मत झाले होते की, १८ब्रिटिश शासनाचे ठाम मत झाले होते की, १८५७ चा उठाव मोगल राज्याच्या पुनस्र्थापनेसाठीचा मुस्लीम उठाव होता. ५७ चा उठाव मोगल राज्याच्या पुनस्र्थापनेसाठीचा मुस्लीम उठाव होता. पंतप्रधान लॉर्ड पाल्मरस्टनपासून तो जिल्हा पातळीवरील अधिकाऱ्यांपर्यंत सर्व जण त्याच निष्कर्षांस आले होते. न्यायालयात बादशाह बहादूरशाहवर राजद्रोहाचा खटला भरण्यात आला. त्याला शासनाने आधीच शिक्षा-माफी जाहीर केली होती. न्यायालयात भरपूर पुरावे सादर करण्यात आले. हे ‘मुस्लीम कारस्थान’ होते हा ठाम निष्कर्ष मांडून तो सिद्ध करण्यासाठी अ‍ॅडव्होकेट जनरल हैरॉट यांच्या भाषणातील ४३ पृष्ठे खर्च झाली आहेत. शेवटच्या निष्कर्षांत्मक परिच्छेदात म्हटले होते, ‘यावरून हेच सिद्ध होते की, १८५७ ची भयानक आपत्ती मुस्लीम कारस्थानाची परिणती होती.. त्यांनीच हिंदूंना उठावासाठी उद्युक्त केले होते.. भुलवून उठावात भाग घ्यायला लावले होते.. यासाठीचे न्यायालयासमोर पुरावे आहेत.. आपण फसलो आहोत हे हिंदूंना लवकरच कळलेही होते.’

ब्रिटिश शासनाचा हा अधिकृत निष्कर्ष चूक असो की बरोबर, पण ते याच निष्कर्षांला आले होते व उठावासाठी मुसलमानांना जबाबदार धरीत होते, याबद्दल इतिहासकारांचे एकमत आहे. बिपन चंद्र प्रभृती तीन इतिहासकारांनी लिहिलेल्या व ‘नॅशनल बुक ट्रस्ट’तर्फे प्रसिद्ध झालेल्या पुस्तकात म्हटले आहे, ‘१८५७ चे बंड मोडून काढल्यानंतर ब्रिटिशांनी मुसलमानांना विशेष धारेवर धरले होते. बंडाच्या व त्यानंतरच्या थोडय़ाच अवधीत एकटय़ा दिल्लीमध्ये २७००० मुसलमानांची ब्रिटिशांनी कत्तल केली.. पुढे कित्येक वर्षे ब्रिटिश सरकार मुसलमानांकडे संशयाच्या नजरेने पाहत होते.’ भारत सरकारतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या ‘स्वातंत्र्य लढय़ाच्या इतिहासा’त डॉ. ताराचंद यांनी म्हटले आहे : ‘या उठावात मुस्लिमांना ब्रिटिश राज्याचे शत्रू मानण्यात आले’, तर पाकिस्तान शासनातर्फे प्रकाशित केलेल्या ‘स्वातंत्र्य लढय़ाच्या इतिहासा’त डॉ. आय. एच. कुरेशी यांनी म्हटले आहे, ‘ब्रिटिशांनी सूड घेण्यासाठी मुस्लिमांना निवडून बाजूला काढले.. शिक्षा म्हणून त्यांना भारी किंमत मोजावी लागली.. हिंदूंचा सहभाग मात्र केवळ ‘तात्पुरती दिशाभूल’ मानण्यात आला.’ मार्क्‍सवादी इतिहासकार अमरीश मिश्रा यांनी २००८ साली ‘वॉर ऑफ सिव्हिलायझेशन्स : १८५७’ या नावाचे २१०० पृष्ठांचे दोन खंड लिहिले आहेत. त्यात म्हटले आहे की, त्या उठावात उत्तर प्रदेशातील १८ जिल्ह्य़ांत प्रत्येकी ३०,००० उलेमा व मदरशांतील विद्यार्थी ठार करण्यात आले होते. ‘१८५७ चा उठाव जिहाद असल्यामुळे संपूर्ण उत्तर प्रदेशातील ५६ जिल्ह्य़ांत उलेमा ब्रिटिशांविरुद्ध लढले.’

ब्रिटिश पंतप्रधानांनी आदेश काढला होता, ‘(मुस्लीम संस्कृतीचे प्रतीक असलेली) दिल्ली भारताच्या नकाशावरून नष्ट करण्यात यावी.’ भारतातील काही ब्रिटिश अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून दिल्ली नष्ट करू दिली नाही. परंतु लाल किल्ला ७० टक्के पाडून टाकण्यात आला. काही मशिदी लिलावात हिंदूंनी विकत घेतल्या. बहादूरशाहला माफी दिली असली तरी मोगल घराण्यातील २९ राजपुत्रांना फासावर चढविण्यात आले.

भावनिक वा राष्ट्रीय दृष्टीतून कुणाला काय वाटते यापेक्षा ब्रिटिश शासनाच्या भूमिकेतून या उठावाचे स्वरूप कोणते होते, हे महत्त्वाचे होते. कारण शासनाला काय वाटते यावरून त्यांचे हिंदू-मुस्लीमविषयक पुढील धोरण ठरणार होते. त्यांनी उठाव का केला व पुढे उठाव करू नये म्हणून कोणते उपाय योजावेत, याचा शोध घेण्यासाठी शासनाने ‘१८७० मध्य’ या विषयाचे अभ्यासक सर विल्यम हंटर यांचा आयोग नेमला. त्यांनी अभ्यास करून १८७१ मध्ये अहवाल सादर केला. तो त्याच वर्षी ‘द इंडियन मुसलमान्स’ नावाने ग्रंथरूपाने प्रसिद्ध झाला. धर्म, धर्मराज्य, धर्मयुद्ध वगैरे मूलभूत संकल्पनांची चर्चा करून हंटर यांनी अशी शिफारस केली की, मुस्लीम समाजाला बंडखोर ठरवून व त्यांना कठोर शिक्षा करून येथे आपल्याला शांततेने राज्य करता येणार नाही. त्यासाठी मुस्लीम समाजाचे समाधान करून त्यांना आपल्या बाजूने वळवून घेतले पाहिजे. यासाठी त्यांच्यात शिक्षणाचा प्रसार केला पाहिजे, त्यांची आर्थिक सुधारणा केली पाहिजे; यासाठी त्यांना विशेष सोयी-सवलती दिल्या पाहिजेत, शासनाने त्यांच्या या शिफारशी स्वीकारल्या. ते मुस्लीम समाजाचे हितचिंतक बनले. डॉ. नितीश सेनगुप्ता यांनी म्हटल्याप्रमाणे, ‘खरोखर तो (अहवाल) ग्रंथ ब्रिटिशांच्या धोरणातील परिवर्तन बिंदू ठरला. या धोरणाने १८० अंशाचे वळण घेतले.’

या धोरणबदलाला साथ देणारे, किंबहुना यासाठी त्यांना प्रवृत्त करणारे, एक थोर विचारवंत व नेते मुस्लीम समाजातून पुढे आले, त्यांचे नाव सर सय्यद अहमद खान (१८१७- १८९८). उठावाच्या काळात ते शासकीय सेवेत जिल्हा न्यायाधीश होते. हा उठाव त्यांना मान्य नव्हता. मुस्लिमांचे खरे हित व कल्याण ब्रिटिशांना विरोध करण्यात नसून त्यांच्याशी मैत्री करून व राजनिष्ठ बनून त्यांच्याकडून अधिकाधिक लाभ पदरात पाडून घेण्यात आहे, हे त्यांनी ओळखले होते. यासाठीच त्यांनी इंग्रजी शिक्षण पद्धतीचा पुरस्कार केला. इंग्रजी विद्या व विज्ञान शिकून, इंग्रजांची आधुनिक राजविद्या आत्मसात करून मुस्लीम समाजाने आपली उन्नती करून घ्यावी, यासाठी त्यांनी शासनाच्या मदतीने १८७५ ला अलिगड कॉलेजची स्थापना केली. नंतरच्या काळात तेथे विद्यापीठ स्थापन झालेल्या शिक्षण संस्थांतून इंग्रजीशिक्षित मुस्लीम तरुणांची एक पिढी निर्माण झाली. नव्या विचारांचे राजकीय नेते, पक्ष उदय पावले. या शिक्षण कार्यासाठी सर सय्यद यांना मुस्लीम समाजातील शिक्षणमहर्षी व ‘आधुनिक मुस्लीम भारताचे पिता’ म्हणून सार्थ गौरविले जाते. त्या काळात मुस्लीम समाजाचा इंग्रजी शिक्षण व त्यातून येणाऱ्या पाश्चात्त्य संस्कृतीला एवढा विरोध होता की, भारतातील ६० मान्यवर धर्मपंडितांनी व मक्केच्या धर्मप्रमुखानेही सर सय्यद यांच्याविरुद्ध धर्मादेश काढले. मक्केच्या धर्मप्रमुखाने त्यांना ठार मारण्याचा धर्मादेश काढला होता. भारतीय मुस्लिमांकडूनही त्यांना ठार मारण्याच्या धमक्या येत होत्या. सर हंटर यांच्या शिफारशीनुसार १८७१ नंतर शासन हे मुसलमानांच्या बाजूने झाले असल्यामुळे सर सय्यद यांच्या कार्याला यश मिळून मुस्लीम समाजात आधुनिक शिक्षणाचा पाया घातला गेला. त्यामुळे मुस्लीम समाजाचा पाश्चात्त्य संस्कृतीस असलेला विरोध कमी होत गेला. त्या प्रमाणात हिंदू व मुसलमान समाजाच्या आधुनिकतेतील अंतरही कमी होत गेले.

मुस्लीम समाजाच्या उन्नतीसाठी सर सय्यद यांना शासनाप्रमाणेच हिंदू समाजाचीही मदत हवी होती. अलीगड कॉलेज दोन्ही समाजांसाठी राहणार होते. तेथे संस्कृत विषयही शिकविला जात असे. हिंदू व मुस्लीम ऐक्याविषयी व ते एकराष्ट्र असल्याविषयी १८८३-८४ या काळात त्यांनी संयुक्त सभांत अनेक भाषणे दिली. गुरुदासपूर येथील भाषणात ते म्हणाले, ‘अनेक शतकांपासून भारतात राहणाऱ्या आपल्या हिंदू व मुस्लीम राष्ट्रांच्या पूर्वजांचे नाव व कीर्ती आपण विस्मृतीत जाऊ देता कामा नये.. अल्लाच्या कृपेने भारतात दोन राष्ट्रे (कौम) राहत आहेत. त्यांची घरे शेजारीशेजारी आहेत.. दोघेही तीच हवा घेतात.. एकाच्या सहकार्याशिवाय दुसरा जगू शकत नाही’, दुसऱ्या जालंदर येथील भाषणात ते म्हणाले, ‘पवित्र संस्कृत भाषेमध्ये अनेक शास्त्रांचे ज्ञान आहे.. हिंदू व मुस्लीम हे भारताच्या सुंदर चेहऱ्याचे दोन डोळे आहेत.’ अन्य एका भाषणात ते म्हणाले, ‘आर्य लोकांना ज्या अर्थी हिंदू मानण्यात येते, त्याअर्थी मुस्लिमांनादेखील हिंदू, म्हणजेच हिंदुस्थानचे रहिवासी, म्हणण्यात यावे.’ एका भाषणात तर त्यांनी तक्रारच केली, ‘माझ्या मते हिंदू हा शब्द विशिष्ट धर्माला संबोधणारा नाही. उलट या देशात राहणाऱ्या प्रत्येकाला हिंदू म्हणवून घेण्याचा हक्क आहे. म्हणून मला दु:ख वाटते की, मी हिंदुस्थानात राहत असूनसुद्धा तुम्ही मला हिंदू मानत नाही.’

पाटणा येथील भाषणात तर ते म्हणाले, ‘हिंदू व मुसलमानांनी परस्परांच्या चालीरीती स्वीकारल्या आहेत. आपण एक राष्ट्र आहोत.. मी वारंवार सांगितले आहे की, भारत ही एका वधूसारखी आहे, जिला हिंदू व मुस्लीम हे दोन सुंदर व तेजस्वी डोळे आहेत. ते जर परस्परांशी भांडतील तर ती सुंदर वधू कुरूप बनेल.’.. लाहोर येथील भाषणात तर यापुढेही जाऊन ते म्हणाले, ‘मी हिंदू व मुस्लीम हे माझे दोन डोळे मानतो. सामान्यत: लोक उजवा व डावा असे दोन डोळे मानतात. पण मी हिंदू व मुस्लीम हे दोघे मिळून माझा एकच व तोच डोळा मानतो.. माझ्या दृष्टीने कोणाचा धर्म कोणता आहे ही गोष्ट गैरलागू आहे.’ अशी ऐक्याची व एकराष्ट्रीयत्वाची भावना अन्य कोणी क्वचितच व्यक्त केली असेल.

अर्थात, ब्रिटिश शासन व हिंदू यांच्यातील नवे संबंध काँग्रेसच्या स्थापनेनंतर ठरणार होते.


उत्तर लिहिले · 11/12/2021
कर्म · 121765
2
1757–1857 या शंभर वर्षाच्या कालखंडात कंपनी सरकारने आपला प्रचंड साम्राज्यविस्तार केला. कंपनीच्या धोरणामुळे प्रजा संस्थानिक जहांगीरदार जमीनदार असंतुष्ट झाले. राजकीय आर्थिक सामाजिक धार्मिक व लष्करी क्षेत्रातील असंतोषामधून 1857 चा उठाव घडून आला.


1857 च्या उठावाची कारणे 


1) 1857 च्या उठावाची राजकीय कारणे :- 
i) कंपनीचे साम्राज्यवादी धोरण :-
ब्रिटिश केवळ व्यापारासाठी भारतात आले होते. व्यापाराच्या माध्यमातून आर्थिक फायदा मिळवणे हा त्यांचा मूळ उद्देश होता.

भारतात राजकीय अस्थिरता व आर्थिक दुर्बलतेचा फायदा घेऊन कंपनीने भारतीय राज्याच्या राज्यकारभारात हस्तक्षेप सुरू करुन सत्ता विस्तारला प्रारंभ केला.

ब्रिटिशांनी लॉर्ड वेलस्वी, लॉर्ड हेस्टिंग्ज व लॉर्ड डलहौसी या गव्हर्नर जनरल यांच्या कारकिर्दीत विस्तार केला.



ii) तैनाती फौजेचे दुष्परिणाम :-
लॉर्ड वेलस्वीने लष्करीदृष्ट्या कमकुवत असलेल्या संस्थानांना तैनाती फौजेची पध्दत लागू करून त्यांना आपल्या वर्चस्वाखाली आणले.



iii) डलहौसी चे संस्थाने खालसा धोरण:-
लॉर्ड डलहौसीने साम्राज्यवादी आक्रमक धोरण अवलंबून कोणत्या ना कोणत्या कारणास्तव भारतातील स्थानिक राज्ये खालसा करून ब्रिटिश साम्राज्यास जोडून टाकली.



iv) दत्तक वारसा नामंजूर :- 
नि:संतान राजाला आपला उत्तराधिकारी म्हणून घेण्याची आज्ञा दिली नाही.

निपुत्रिक राजाला दत्तक पुत्र घेण्याची कंपनी सरकारने मंजुरीची अट 1844 मध्येच घातली होती. परंतु त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होत नव्हती.

डलहौसी ने याचाच फायदा घेऊन सातारा, जैतपुर-संभलपूर, बहागत, उदयपूर, झाशी इत्यादी संस्थाने खालसा केली.



v) पदव्या, तनखे बंद केले :- 
राजेरजवाड्यांना पदव्या व तनखे इंग्रज सरकारने दिले होते ते वंश परंपरागत नसल्याच्या कारणावरून डलहौसीने बंद केले.

पदव्या काढून घेतल्या यामध्ये दत्तकपुत्र नानासाहेब पेशवाही होता.

डलहौसीच्या या धोरणामुळे संस्थानिक, जहागिरदार, वतनदार संतप्त झाले.



2) 1857 च्या उठावाची सामाजिक कारणे :-
ब्रिटिश लोक हे स्वतःला भारतीयापेक्षा उच्च समजत होते.

केवळ आपलीच संस्कृती श्रेष्ठ माणून भारतीय संस्कृतीला व भारतीय लोकांना रानटी असे संबोधले.

सतीबंदी कायदा, विधवा पुनर्विवाह कायदा, बालविवाह प्रतिबंधक कायदा हे कायदे परंपरागत भारतीय समजला आपल्या संस्कृतीवरील आक्रमण वाटले.



3) 1857 च्या उठावाची धार्मिक कारणे :-
1806 मध्ये लष्कराच्या मद्रास छावणीतील शिपायांना गंध लावण्यास व दाढी वाढवण्यास बंदी घातली.

1813 च्या कायद्याने इंग्लंडमधील कोणत्याही व्यक्तीला धर्मप्रसारसाठी भारतात येण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले.

सती प्रतिबंधक कायदा, विधवा पुनर्विवाह, बालविवाह प्रतिबंधक कायदा यासारख्या सामाजिक सुधारणा म्हणजेच भारतीय संस्कृती व धर्म नष्ट करण्याचा प्रयत्न आहे अशी भावना भारतीयांमध्ये निर्माण झाली.

1842 साली ब्रम्हदेशाच्या युद्धात हिंदू शिपायांना सक्तीने पाठविण्यात आले.



4) 1857 च्या उठावाची आर्थिक कारणे :-
कंपनीने भारतात राज्य स्थापन केल्यानंतर आर्थिक शोषण करण्यावरच आपले लक्ष केंद्रीत केले होते.

भारतातून कच्चा माल इंग्लडला घेऊन जाणे व त्यावर आधारित पक्का माल तयार करून भारतात आणून विकणे. त्यामुळे भारतातील उद्योगधंदे नष्ट झाले.

हस्त व्यवसायांचा ऱ्हास झाला.

शेतकरी वर्गात रयतवारी, महालवरी, कायमधारा इ. सदोष महसुल पद्धतीमुळे असंतोष पसरला.



5) 1857 च्या उठावाची लष्करी कारणे:-
ब्रिटिश लष्करातील हिंदी शिपायांचे वेतन युरोपियन शिपायांच्या तुलनेत फार कमी होते. तसेच युरोपियन शिपायांना लवकर बढती मिळत होती.

भारतीय शिपायांना गंध लावण्यास व दाढी वाढविण्यास बंदी घातली.

भारतीय सैन्य हे नेहमी युद्धात समोर असायचे.



6) 1857 च्या उठावाची तात्कालीन कारणे :-
i) - काडतुस प्रकरण 
ब्रिटिश लष्करात असलेल्या रॉयल एन्फिल्ड रायफली च्या काडतुसांना गाईची व डुकराची चरबीचे आवरण असत. काडतुसाचा वरचा भाग तोंडाने कापून काढावा लागत होता.

गाय हिंदूना पवित्र व डुक्कर मुस्लिमांना निषिद्ध असल्याने भारतीय शिपायांनी ही कडतुसे वापरण्यास नकार दिला.



1857 चा उठाव :-


31 मे 1857 ही उठावाची पूर्वनियोजित तारीख होती.

1857 च्या उठावात क्रांतीचे प्रतिक 'लाल कमळाचे फुल' व 'चपाती' होते.

1857 च्या उठावाचा प्रसिध्द नारा 'चलो दिल्ली' होता.

29 मार्च 1857 रोजी बराकपूर छावणीत मंगल पांडे या भारतीय शिपायांने मेजर ह्युसन या ब्रिटिश अधिकाऱ्यांवर गोळी झाडली व नियोजित तारखेपूर्वीस उठावाला सुरुवात केली. परिणामी 34 वी. एन. आय. रेजिमेंट भंग करण्यात आली.

चरबी लावलेल्या काडतुसांचा वापर करण्यास नकार देणाऱ्या सैनिकांवर शिस्तभंगाचा आरोप ठेवुन शिक्षा देण्यात आली. 

8 एप्रिल 1857 रोजी मंगल पांडेस फाशी देण्यात आली.

1858 च्या उठावातील मंगल पांडे हा पहिला हुतात्मा ठरला.











:

उत्तर लिहिले · 3/12/2021
कर्म · 121765
0
१८५७ च्या उठावाची (१८५७ चा सिपाही विद्रोह) कारणे खालीलप्रमाणे आहेत:
  • राजकीय कारणे:
    • लॉर्ड डलहौसीचे धोरण: लॉर्ड डलहौसीने 'साम्राज्यवादी धोरण' अवलंबले आणि अनेक राज्ये खालसा केली. विकाpedia

    • दत्तक वारसा नामंजूर: ज्या राजांना स्वतःचे पुत्र नव्हते त्यांचे दत्तक वारस नामंजूर केले गेले. एडुवार्ता

    • ब्रिटिश प्रशासनावरील असंतोष: ब्रिटीश प्रशासनाच्या अन्यायकारक धोरणांमुळे भारतीय राज्यकर्ते आणि जनता त्रस्त होती.

  • आर्थिक कारणे:
    • शेती आणि उद्योगधंद्यांचे नुकसान: ब्रिटीश धोरणांमुळे भारतीय शेती आणि उद्योगधंदेmodelete उद्ध्वस्त झाले. एडुवार्ता

    • जमीन महसूल: जमिनीवर जास्त कर लावल्यामुळे शेतकरी गरीब झाले.

    • व्यापार आणि हस्तकला: ब्रिटीश धोरणांमुळे भारतीय व्यापार आणि हस्तकला धोक्यात आली.

  • सामाजिक आणि धार्मिक कारणे:
    • जातीभेद: ब्रिटीश अधिकारी भारतीयांशी तुच्छतेने वागत असत.

    • धार्मिक हस्तक्षेप: ख्रिश्चन मिशनऱ्यांनी धर्मांतरण करण्यास सुरुवात केली, त्यामुळे लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला. एडुवार्ता

    • सती प्रथा आणि बालविवाह: सती प्रथा आणि बालविवाह यांसारख्या सामाजिक रूढींवर बंदी घातल्याने काही लोकांमध्ये नाराजी पसरली.

  • लष्करी कारणे:
    • सैनिकांमधील असंतोष: भारतीय सैनिकांना कमी पगार मिळत होता आणि त्यांना बढतीची संधी कमी होती.

    • नवीन बंदुका: नवीन एनफिल्ड बंदुकांसाठी वापरल्या जाणाऱ्या काडतुसांमध्ये गायीची चरबी वापरली जात आहे अशी अफवा पसरली, ज्यामुळे हिंदू आणि मुस्लिम सैनिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या. एडुवार्ता

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 980