3 उत्तरे
3
answers
शेतीचे व्यापारीकरण म्हणजे काय?
3
Answer link
शेतीचे व्यापारीकरण - पूर्वी शेतकरी प्रामुख्याने अन्नधान्य पिकवत असत. हे अन्नधान्य त्यांना घरच्या वापरासाठी व गावाची गरज भागवत असे. कापूस, नीळ, तंबाखू, चहापान आदी नगदी पिकांना इंग्रज सरकार प्रोत्साहन देऊ लागले. अन्नधान्याच्या लागवडीपेक्षा नफा मिळवून व्यापारी पिकावर भर दिला जाऊ लागला, त्या वेळी 'शेतीचे व्यापारीकरण' असे म्हणतात.
इंग्रजांच्या आर्थिक धोरणाने भारतात झालेला बदल म्हणजे शेतीचे व्यापारीकरण होय. कंपनी सरकारच्या आगमणाने भारतातील स्वयंपूर्ण शेती समूळ नष्ट झाली. कालखंड जसजसा पुढे जाऊ लागला तसतसा शेतीवर व्यापारी प्रभाव पडू लागला. पूर्वीसारखी परंपरागत पिके, उत्पादने बंद झाली.
1
Answer link
व्यापाराचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून शेती करणे, घरच्या वा गावच्या वापरा पुरते नव्हे तर बाजारपेठेत विकून नफा मिळवण्यासाठी शेतमालाचे उत्पादन करणे म्हणजेच शेतीचे व्यापारीकरण होय. भांडवलशाही उद्दिष्टांनी नगदी पिके काढण्यावर या प्रक्रियेत भर दिला जातो. ब्रिटिश कालखंडापूर्वी भारतात अत्यंत छोट्या प्रमाणावर बाजारपेठेसाठी उत्पादन केले जात असे, पण ब्रिटिशांच्या अंमलाखाली मोठ्या प्रमाणावर शेतीचे व्यापारीकरण घडून आले.
0
Answer link
शेतीचे व्यापारीकरण म्हणजे शेतीमालाचे उत्पादन केवळ स्वतःच्या उपयोगासाठी न करता, बाजारात विकून नफा मिळवण्याच्या उद्देशाने करणे होय.
व्यापारीकरणामुळे काय होते:
- उत्पादनात वाढ होते, कारण शेतकरी अधिक नफा मिळवण्यासाठी प्रयत्न करतात.
- नवीन तंत्रज्ञान आणि पद्धतींचा वापर वाढतो.
- शेतमालाची गुणवत्ता सुधारते.
- शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढते.
उदाहरण: पूर्वी शेतकरी फक्त स्वतःच्या कुटुंबासाठी धान्य पिकवत असत, पण आता ते जास्त उत्पादन करून ते बाजारात विकतात आणि पैसे कमावतात. ह्यालाच शेतीचे व्यापारीकरण म्हणतात.