
व्यापारीकरण
0
Answer link
शेतीच्या व्यापारीकरणाचे परिणाम:
- उत्पादनात वाढ: व्यापारीकरणामुळे शेतकरी अधिक उत्पादनक्षम आणि नफा केंद्रित बनतो.
- नवीन तंत्रज्ञानाचा वापर: शेतीत नवीन तंत्रज्ञान आणि पद्धतींचा वापर वाढतो.
- बाजारावर आधारित शेती: शेती आता स्थानिक गरजांपेक्षा जागतिक बाजारपेठेवर अधिक अवलंबून असते.
- ग्रामीण भागातील बदल: ग्रामीण भागातील सामाजिक आणि आर्थिक संरचनेत बदल होतो.
- पर्यावरणावर परिणाम: रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा वापर वाढल्याने पर्यावरणावर नकारात्मक परिणाम होतो.
- गरिबी आणि असमानता: लहान शेतकरी आणि भूमिहीन শ্রমিক अधिक गरीब होण्याची शक्यता असते.
0
Answer link
शेतीच्या व्यापारी करण्याचे परिणाम लिहा .?
ब्रिटिशांखालोखाल भारतीय जमीनदार, सावकार व दलाल यांना व्यापारीकरणाचा फायदा मिळाला. जरी शेतकरी शेतावर राबत असले, तरी पैशाच्या जोरावर जमीन, अवजारे, बियाणे, खते, इत्यादी उत्पादन-साधनांवर ताबा होता तो मुख्यतः वरिष्ठवर्गीय धनिकांचाच. असहाय शेतकऱ्यावर ते विशिष्ट पिके काढण्याची सक्ती करत असत. उदाहरणार्थ, अमेरिकन यादवी युद्धाच्या काळात ब्रिटिश उद्योगांना अमेरिकन कापसाचा तुटवडा जाणवू लागला, तेव्हा दख्खनच्या शेतकऱ्यांना कापूस पिकवणे भाग पडू लागले आणि नफा मात्र प्रामुख्याने जमीनदार सावकार-दलाल यांच्या खिशात जाऊ लागला.
शेतीच्या व्यापारीकरणाचा भारतीय शेतकऱ्यांना फारसा लाभ होऊ शकला नाही. महसूल भरणा आणि कर्जफेड यांसाठी रोख पैसा मिळावा म्हणून शेतकऱ्यांना आपला माल बाजारात विकावा लागे. कापणीनंतर जेव्हा शेतकरी मालाची विक्री करत असत तेव्हा किमती घसरलेल्या असत. पुढे पाच- सहा महिन्यांत आपली भूक भागवण्यासाठी शेतकऱ्यावरच धान्य विकत घेण्याची पाळी येई. तेव्हा मात्र मालाच्या किमती वाढलेल्या असत. अशा रितीने शेतकऱ्याला नुकसानीचा व्यवहार सोसावा लागत असे. मुळातच विशिष्ट पिके त्यांनी मनापासून काढलेली नसत. व्यापारीकरण त्यांच्यावर लादलेलेच होते.
3
Answer link
शेतीचे व्यापारीकरण - पूर्वी शेतकरी प्रामुख्याने अन्नधान्य पिकवत असत. हे अन्नधान्य त्यांना घरच्या वापरासाठी व गावाची गरज भागवत असे. कापूस, नीळ, तंबाखू, चहापान आदी नगदी पिकांना इंग्रज सरकार प्रोत्साहन देऊ लागले. अन्नधान्याच्या लागवडीपेक्षा नफा मिळवून व्यापारी पिकावर भर दिला जाऊ लागला, त्या वेळी 'शेतीचे व्यापारीकरण' असे म्हणतात.
इंग्रजांच्या आर्थिक धोरणाने भारतात झालेला बदल म्हणजे शेतीचे व्यापारीकरण होय. कंपनी सरकारच्या आगमणाने भारतातील स्वयंपूर्ण शेती समूळ नष्ट झाली. कालखंड जसजसा पुढे जाऊ लागला तसतसा शेतीवर व्यापारी प्रभाव पडू लागला. पूर्वीसारखी परंपरागत पिके, उत्पादने बंद झाली.
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही