भारतीय इतिहास इतिहास

सम्राट अशोकाने कोणकोणती कामे केली?

2 उत्तरे
2 answers

सम्राट अशोकाने कोणकोणती कामे केली?

6
अनेकांच्या मतानुसार, सम्राट अशोक हे जगातील सर्वात महान सम्राट होते. सम्राट अशोकांना भारताच्या इतिहासात ही सर्वात महान व शक्तिशाली सम्राट म्हणून स्थान दिले आहे. प्राचीन भारताच्या परंपरेत चक्रवर्ती सम्राटांची पदवी ज्यांनी जनमानसावर तसेच भारताच्या मोठ्या भूभागावर राज्य केले अशाच महान सम्राटांना दिली जाते. सम्राट अशोकांना ‘चक्रवर्ती सम्राट’ असे म्हणतात, चक्रवर्ती सम्राट म्हणजे ‘सम्राटांचा सम्राट’. जगाच्या इतिहासात असे अनेक सम्राट होउन गेले ज्यांचे उल्लेख प्राचीन ग्रंथांमध्ये आहेत परंतु त्यांच्या अस्तित्वाबाबतची साशंकता आहे. असे मानतात की प्राचीन चक्रवर्ती सम्राटांच्या पंक्तीतील सम्राट अशोक हेच असे पहिले आणि शेवटचे महान चक्रवर्ती सम्राट झाले त्यानंतर कोणीही त्या तोडीचा राज्यकर्ता भारतात झाला नाही. सम्राट अशोकांनी अखंड भारताच्या बहुतांशी भागावर राज्य केले. आजचा पाकिस्तान, अफगाणिस्तान पूर्वेकडे बांग्लादेश ते दक्षिणेकडे केरळ पर्यंत तसेच नेपाळ, भूतान इराण, ताजिकिस्तान आणि तुर्कमेनिस्तान या देशांमध्ये अशोकांच्या साम्राज्याच्या सीमा होत्या. अत्यंत शूर असे सम्राट अशोक आपल्या आयुष्यात एक ही युद्ध हरले नाहीत. कलिंगाच्या युद्धातील महासंहारानंतर कलिंग काबीज झाला, जे कोणत्याही मौर्य राज्यकर्त्यास पूर्वी जमले नव्हते. त्यांच्या राज्याचे केंद्रस्थान ज्याला बिहार म्हणतात तो मगध होता, व आज पटणा म्हणून ओळखली जाणारी पाटलीपुत्र ही त्यांची राजधानी होती. काही इतिहासकारांच्या मते यात साशंकता आहे. कलिंगाच्या युद्धात झालेल्या मनुष्यहानी पाहून त्यांनी प्रचलित वैदिक परंपरा झुगारून हिंसेचा त्याग केला आणि मानवतावादी बौद्ध धर्माचा स्वीकार केला व नंतरच्या आयुष्यात त्यांनी स्वतःला बौद्ध धर्माच्या प्रसारास समर्पित केले. सम्राट अशोकांनी बौद्ध धर्म संपूर्ण आशिया खंडात तसेच इतर प्रत्येक खंडात पसरवला होता. अशोकांच्या संदर्भातील अनेक शिलालेख भारताच्या काना कोपऱ्यात सापडतात त्यामुळे अशोकांबाबतची उपलब्ध ऐतिहासिक माहिती भारताच्या प्राचीन काळातल्या कोणत्याही ऐतिहासिक व्यक्तीपेक्षा अधिक आहे. सम्राट अशोक सत्य, अहिंसा, प्रेम, सहिष्णूता आणि शाकाहारी जीवनप्रणीली यांचे थोर पुरस्कर्ते होते म्हणूनच एक अतिशय परोपकारी प्रशासक अशीच इतिहासात त्यांची ओळख झाली आहे. अशोकाने आपल्या प्रजाजनांना व प्रशासकीय अधिकाऱ्यांना आपल्या शीलालेखातून काही राजाज्ञा दिलेल्या आहेत. अशोकाचे शिलालेख हे मौर्य इतिहासाचे महत्त्वाचे साधन म्हणून ओळखले जाते. सर्वप्रथम ब्रिटिश अभ्यासक जेम्स प्रिन्सेप यांना अशोकाचे शिलालेख वाचता आले. ते अनेक भाषांचे अभ्यासक होते. अशोकाचे शिलालेख हे ब्राह्ममी,खरोष्टी आणि अरेमाइक या तीन लिपींमध्ये आढळलेले आहेत. त्यातील अनेक अभिलेख हे ब्राम्ही लिपीतील असून ते जेम्स प्रिन्सेप यांनी वाचले, त्यातूनच या चक्रवर्ती सम्राटाच्या आयुष्याची आणि एकूणच मौर्य साम्राज्या विषयीची सखोल माहिती हीअभ्यासकांना मिळालेली आहे अशोकाने आपल्या शिलालेखामध्ये स्वतःला 'देवानाम प्रिय' असे संबोधले आहे. कलिंग युद्ध कलिंग युद्धानंतर त्याचे झालेले मनपरिवर्तन, त्याने स्वीकार केलेल्या बौद्धधर्म, बौद्ध धर्माची तत्वे आणि एकूणच धर्मप्रसाराचे कार्य महामात्र यांची नेमणूक या सर्व घटनांचा उल्लेख हा शिलालेखात आलेला आहे. सम्राट अशोक हा या काळातील भारतातील पहिला चक्रवर्ती राजा होय सम्राट याचा अर्थ ज्याचा रथ घोडा चारी दिशांना कुणीही अडवू शकत नाही असा पराक्रमी शासक व विजेता होय सम्राट अशोकाने प्रशासकीय संदर्भाने अनेक महत्त्वपूर्ण बदल केले प्रशासनामध्ये महामांत्रा हे पद निर्माण करून धर्मप्रसाराला उत्तेजन दिले आपल्या मुलांनादेखील धर्मप्रसारासाठी त्यांनी देशाबाहेर जाण्यासाठी प्रेरणा दिली प्रजा कल्याणाचे हेतूने अनेक उपक्रम हाती घेतले अनेक ठिकाणी धर्मशाळा बांधल्या रस्त्याच्या दुतर्फा झाडी लावून लोकांना आवश्यक त्या सुविधा देण्याचा प्रयत्न केला.
उत्तर लिहिले · 7/10/2021
कर्म · 3740
0

सम्राट अशोकाने अनेक महत्त्वपूर्ण कामे केली, त्यापैकी काही प्रमुख कामे खालीलप्रमाणे आहेत:

  1. कलिंग युद्धानंतर धोरण बदल:

    कलिंगच्या युद्धानंतर झालेल्या मोठ्या नरसंहाराने त्याचे मन बदलले आणि त्याने हिंसक मार्गाचा त्याग करून धम्माचा (धर्माचा) मार्ग स्वीकारला.

  2. बौद्ध धर्माचा प्रसार:

    अशोकाने बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि त्या धर्माचा प्रसार करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या. त्याने आपल्या मुला-मुलींना (महेंद्र आणि संघमित्रा) श्रीलंकेला बौद्ध धर्मप्रसारासाठी पाठवले.

    अधिक माहितीसाठी:

  3. स्तंभ आणि शिलालेख:

    अशोकाने आपल्या संदेशांचा प्रसार करण्यासाठी अनेक स्तंभ आणि शिलालेख तयार केले. हे शिलालेख ब्राह्मी लिपीत आहेत आणि धम्माच्या तत्त्वांचे मार्गदर्शन करतात.

    अधिक माहितीसाठी:

  4. लोकोपयोगी कामे:

    अशोकाने लोकांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून विहिरी आणि तलाव बांधले. तसेच, प्रवाशांसाठी रस्त्यांच्या कडेला झाडे लावली आणि धर्मशाळा बांधल्या.

  5. प्राणी आणि पक्ष्यांसाठी सोय:

    अशोकाने प्राणी आणि पक्ष्यांसाठी दवाखाने उघडले आणि त्यांच्यासाठी आवश्यक सोयीसुविधा निर्माण केल्या.

या कामांमुळे सम्राट अशोक इतिहासात एक महान आणि लोकोपकारी शासक म्हणून ओळखले जातात.

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 1080

Related Questions

जालियनवाला बाग घटने विषयी माहिती लिहा.
सम्राट कनिष्क माहिती?
बहामनी राज्याचा न्हास का झाला?
केसरी हे वृत्तपत्र कोणी काढले?
बहमनी राज्याचा ऱ्हास का झाला?
खेडा सत्याग्रह महात्मा गांधीजींनी कोणत्या राज्यात घडून आणला?
भारतीय रेल्वेचे जनक कोण?