पर्यावरण वृक्षारोपण

झाडं लावणं आणि जगवणं?

2 उत्तरे
2 answers

झाडं लावणं आणि जगवणं?

3

अनेकांना झाडं लावायची हौस तर असते पण जागाच नसते. तर काहींना खूप जागा असूनही त्या जागेत काय लावावं हेच सुचत नाही. तर अनेकांना लावलेल्या झाडांना वाढवणं जमत नाही. पण झाड म्हणजे असा जीव आहे जो अगदी सहज वाढतो. त्यासाठी खूप श्रम करायची किंवा वेळ द्यायची गरज नाही. आपल्या जागेचा विचार करून झाड लावून येता-जाता, आपली कामं करता-करता त्यांच्याकडे लक्ष देता येतं. दिवसभराच्या धावपळीतून विरंगुळा म्हणून झाडांमध्ये मन रमवून त्यांची थोडी काळजी घेता येते. प्रेमाच्या, आपलेपणाच्या थोड्याशा शिडकाव्यानं झाडं बहरतात, आपलं अंगण फुलवतात आणि कोणाला तरी जगवण्याचा आनंद ते आपल्या ओंजळीत टाकतात.

१)बर्‍याच लोकांना भीती असते की, आपल्या अंगणात झाडं लावली तर त्यांची मुळं घराच्या भिंतींना कमजोर करतील. मग त्यावर अत्यंत सोपा उपाय आहे. जर जागा कमी असेल तर फक्त अशीच झाडं लावा ज्यांची मुळं खोलवर जातील; पण इकडे-तिकडे पसरणार नाहीत. उदाहरणार्थ- अशोकाचं झाड.
२) लावलेल्या झाडांना नियमित पाणी घालणं शक्य होत नसेल, तर जिथं आपण झाडं लावली आहे तिथं चूळ भरावी, नुसत्या पाण्यानं हात धुताना झाडांच्या कुंडीत धुवावे, चेहर्‍यावर पाणी मारताना झाडाच्या ठिकाणी जाऊन पाणी मारलं तर आपलंही काम होतं आणि झाडालाही पाणी मिळतं.
३)पिण्याचे पाणी भरण्यापूर्वी बरेच जण आदल्या दिवशी भरलेल्या पाण्याला शिळं झालं म्हणून फेकून देतात. मग तेच पाणी आपण झाडांना घातलं, तर झाडांना वेगळं पाणी घालण्याची गरजच उरणार नाही.
४) ज्यांच्या घरासमोर झाड लावण्यासाठी थोडीही जागा नाही त्यांनी खिडकीत कुंडीमध्ये जाई, गुलाब यासारखी झाडं आणि वेली लावावीत आणि घराच्या सोयीप्रमाणे या वेली त्यांना घरावर चढवताही येतील.
५) फुलझाडं लावताना ती प्रखर उन्हात किंवा अगदी सावलीत लावू नये. ती अशा ठिकाणी लावावीत ज्या ठिकाणी सकाळचे कोवळे किरण त्यांना मिळतील व दुपारच्या उन्हाच्या झळाही त्यांना लागणार नाहीत.
६) कुंडीत लावलेल्या आपल्या फुलझाडांना किंवा वेलींना आपण खूप जपतो; पण उन्हाळ्याच्या व दिवाळीच्या सुट्टीत आपण बाहेर जातो तेव्हा ती झाडे-वेली पोरकीच होतात. त्यामुळे विश्‍वासू शेजार्‍याला रोज पाणी घालण्याची विनंती करून जाता येईल, अथवा पाणीसाठवणीच्या भांड्यातून सलाईनच्या छोट्या पाइपद्वारे कुंडीमध्ये ठिबक सिंचनाची व्यवस्था करता येईल. थेंबाचे प्रमाण खूप मंद ठेवावे. ज्यामुळे झाडांच्या कुंडीतला मातीचा ओलावा कायम राहील.
७) झाडाची वाढ झाली की फांद्या घराच्या खिडक्यांची काचाही फोडतात. त्याचप्रमाणे फुलझाडेही वेडीवाकडी व कुरूप दिसू लागतात. त्यासाठी झाडांची वेळोवेळी छाटणी करणं आवश्यक असतं. छाटणीमुळे झाड चांगल्या प्रकारे वाढण्यास मदत होते.
८) झाडांवर रोग पसरू नये म्हणून झाडावर अधूनमधून औषधफवारणी करावी.
९) जागा किती आहे हे पाहूनच कोणते झाड लावावं हे ठरवावं, नाहीतर कमी जागेत मोठी किंवा खूप झाडे लावली तर त्यांचे पोषण व्यवस्थित होऊ शकणार नाही.
अशा प्रकारे थोडं नियोजन केलं, थोडी काळजी घेतली तर आपल्याला जीवदान देणार्‍या झाडांना सहज जगवता येतं.
उत्तर लिहिले · 2/9/2021
कर्म · 121765
0
झाडं लावणं आणि जगवणं ह्या दोन्ही गोष्टी पर्यावरणासाठी खूप महत्त्वाच्या आहेत.

झाडं लावणं:

  • योग्य जागा निवडणे: झाडं लावण्यासाठी योग्य जागा निवडणे आवश्यक आहे. त्या जागेवर पुरेसा सूर्यप्रकाश, पाणी आणि मातीची गुणवत्ता चांगली असावी.
  • खड्डा खोदणे: झाड लावण्यासाठी योग्य आकाराचा खड्डा खणणे आवश्यक आहे. खड्डा झाडाच्या मुळांच्या आकारापेक्षा दुप्पट असावा.
  • झाड लावणे: झाड खड्ड्यात सरळ ठेवा आणि मातीने व्यवस्थित झाका.
  • पाणी देणे: झाड लावल्यानंतर त्याला नियमितपणे पाणी देणे आवश्यक आहे.

झाडं जगवणं:

  • नियमित पाणी देणे: झाडांना नियमितपणे पाणी देणे आवश्यक आहे, खासकरून उन्हाळ्याच्या दिवसात.
  • खत देणे: झाडांना वेळोवेळी खत देणे आवश्यक आहे, ज्यामुळे त्यांची वाढ चांगली होते.
  • कीटक आणि रोगांपासून संरक्षण: झाडांना कीटक आणि रोगांपासून वाचवण्यासाठी योग्य उपाययोजना करणे आवश्यक आहे.
  • छाटणी करणे: झाडांची नियमित छाटणी करणे आवश्यक आहे, ज्यामुळे त्यांची वाढ व्यवस्थित होते.

झाडं लावण्याचे फायदे:

  • पर्यावरण संरक्षण: झाडं कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि ऑक्सिजन बाहेर टाकतात, ज्यामुळे हवा शुद्ध राहते.
  • पावसाचे प्रमाण वाढवते: झाडं जमिनीतील पाणी धरून ठेवतात, ज्यामुळे पावसाचे प्रमाण वाढते.
  • जमिनीची धूप थांबवते: झाडं जमिनीला घट्ट धरून ठेवतात, ज्यामुळे जमिनीची धूप थांबते.
  • नैसर्गिक सौंदर्य: झाडं आपल्या परिसराला नैसर्गिक सौंदर्य प्रदान करतात.

झाडं लावणं आणि जगवणं हे एक सामाजिक कार्य आहे. आपण सर्वांनी मिळून झाडं लावली पाहिजेत आणि त्यांचे संगोपन केले पाहिजे, जेणेकरून आपले भविष्य सुरक्षित राहील.

अधिक माहितीसाठी:

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 1040

Related Questions

प्लास्टिक कचऱ्याची राख झाडांच्या आळ्यात खत म्हणून टाकली तर चालेल का?
एका गोगलगाईची तक्रार कुणी व का केली असावी?
पयाावरणीय समस्या स्पष्ट करा.?
भारतात कोणकोणते अभयारण्य आहेत?
हवा हे संसाधन सर्वत्र विपुल प्रमाणात आढळते, चूक की बरोबर?
कोणते उत्पादन वनातून मिळते?
वायु हमारे जीवनासाठी अत्यंत आवश्यक आहे?