2 उत्तरे
2
answers
वाचनाने मनुष्य घडतो यावर निबंध लेखन कसे करावे?
14
Answer link
वाचनाने मनुष्य घडतो..
वाचन केल्याने खरंच माणूस घडतो का??
हो घडतो.. पण प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाची पुस्तके हे प्रसिद्ध झालेली नसतात.. म्हणून, वाचनाने कोणी किती घडलं आणि घडवलं हे सांगणे मात्र कठीण..!
माणूस घडणे म्हणजे तुमच्या शब्दात जर श्रीमंत होणे असेल तर, तुम्ही ही व्याख्या चुकीची करत आहात..
वाचन केल्याने माणूस घडतो.. तो ते त्याच्या मानसिक बदलाने..
आता पहा ना!! नुकतंच प्रकाशित झालेलं नितीन थोरात यांचे खुशबू हे पुस्तक आहे.. त्यात एक वैश्य आणि एक लेखक यांचा संवाद नितीन थोरात अनुभवाने मांडतात.. त्यातील एक संवाद.. (वैश्याने विचारलेला एक प्रश्न.. राईटर घर कैसा होता है रे??)
खूप काही सांगून जाते, या प्रश्नाने.. देहविक्री करून पोट तर यांना भरता येते.. पण घर कुटुंब यांचं सुख मात्र त्यांना मिळत नाही.. तेव्हा घर कसं असतं.. हे तिच्या मनात सतत टोचत असावं..

अश्या काहीशा हृदयद्रावक प्रसंग वाचल्यावर वैश्य जातीच्या स्त्रियांच्या प्रति इज्जत वाढते.. कुठेतरी त्यांच्याबद्दल ही जी कटुता, तिरस्कार घृणा वाटत होती ती अश्या पुस्तकातून नाहीशी होते.. खरं तर त्यांची घृणा करण्यापेक्षा अश्या रेड लाईट गोष्टींना वाव देणाऱ्या लोकांची(यात स्त्री पुरुष दोन्हीही आहेत) घृणा करावी..
मी खूप वाचन केले आहे, करते आहे आणि वाचन करतच राहणार.. यातून भरपूर शिकली आहे.. कोणतीही गोष्ट माहीत नसताना कुणावरही दोष टाकणे किंवा दोष देणे, हे अत्यंत गैर आहे.. हे सुद्धा वाचनातूनच शिकले..
तुम्ही स्वतःला नास्तिक समजता का?? मी आहे नास्तिक.. पण देवांसाठी नाही तर मनुष्यांसाठी..
देवांची पुस्तके, पुराण, गीता, अध्याय, पोथी वाचले आहेत आणि वाचते आहे.. नवनाथ अध्याय मी वाचलेत.. भगवद्गीता अर्धी वाचली आहे.. पुढे वाचन चालू आहे.. श्लोक आणि बालोपासना तर लहानपणीच वाचून झालेत.. जर मी नास्तिक आहे तर मी हे का वाचते..?? आपण एखाद्या गोष्टीचे विरोध करतो तेव्हा काय म्हणून विरोध करतो.. आवडत नाही म्हणून.. स्वतःच्या मनात आधीपासूनच संशय आणि चुकीच्या गोष्टीचे घर बनवून ठेवले तर प्रत्येक गोष्ट तुम्हाला वाईटच दिसेल.. जर तुम्हाला या बद्दल ज्ञानच नाही तर कशाच्या जोरावर तुम्ही विरोध करत आहात..!! आम्ही देवदर्शन अगदी सुखाने करतो.. फारसे होत नाही.. पण जेव्हा जातो तेव्हा उत्साहाने जातो.. घरात संध्याकाळचे निरांजन ही देवघरात लावतो.. सणा सुदीला गोडधोड बनवून देवाला गोडाचे पदार्थ दाखवून आम्ही प्रसाद म्हणून खातो.. नास्तिक असून हे सर्व का करते..?? तर ईश्वराच्या नावाने शारीरिक/मानसिक/ आर्थिक फसवणूक करतात ती मला पटत नाही.. 

देव देवतांची काही पुस्तके, पोथी अवश्य वाचा.. हे सुद्धा एक मेडिटेशनच आहे.. एका जागी बसून सर्व इंद्रिये एकत्र आणून मन शांती करण्याचा उत्तम पर्याय आहे.. यांचे महत्त्व देखील पुस्तकातूनच कळले..
माझा कल प्राचीन त्याहून प्राचीन काळातील देव देवतांवर माहिती काढण्याचा आहे..
कोणतीही गोष्ट वाचा, समजून घ्या, अभ्यास करा आणि मग विरोध करा किंवा समर्थन करा.. यासाठी तुम्ही पात्र असाल..
माझे पप्पा नेहमी म्हणायचे.. "वाचाल तर वाचाल.."
तेव्हा हे वाक्य मनोरंजन म्हणून बोलायची.. आता या वाक्याचा अर्थ इतका गूढ आणि मौल्यवान असेल हे समजलं..
वाचन केल्याने माणूस घडतो.. आणि खरंच घडतो.. थोडासा का होईना!! आपल्यात बदल दिसून येतो..
तर वाचत रहा.. लिहीत रहा.. आणि आंनदी रहा..
@जान्हवी जाधव
नववर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप वाचनमयी शुभेच्छा💐🙏🏻
0
Answer link
वाचनाने मनुष्य घडतो यावर निबंध:
“ Man is made by reading. ”
वाचन हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. वाचनामुळे ज्ञान मिळते, मनोरंजन होते आणि जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. म्हणूनच, वाचनाने मनुष्य घडतो असे म्हटले जाते.
वाचनाचे महत्त्व:
- ज्ञानवृद्धी: वाचनामुळे आपल्याला नवीन गोष्टींची माहिती मिळते. इतिहास, विज्ञान, कला आणि साहित्य अशा विविध विषयांवरचे ज्ञान आपण वाचनातून मिळवू शकतो.
- भाषा विकास: वाचनामुळे आपली भाषा सुधारते. नवीन शब्द आणि वाक्यरचना आपल्याला माहीत होतात, ज्यामुळे आपले विचार अधिक स्पष्टपणे मांडता येतात.
- विचारशक्तीचा विकास: वाचनामुळे आपल्या विचारशक्तीला चालना मिळते. आपण विविध कल्पनांवर विचार करतो आणि आपले मत तयार करतो.
- संवेदनशीलता: वाचनामुळे आपल्यामध्ये संवेदनशीलता वाढते. आपण इतरांच्या भावना आणि अनुभवांशी जोडले जातो.
- मनोरंजन: वाचन हे मनोरंजनाचे एक उत्तम साधन आहे. पुस्तके वाचताना आपण काल्पनिक जगात रमून जातो आणि ताण विसरून जातो.
वाचनाने मनुष्य कसा घडतो:
- ज्ञान आणि माहिती: वाचनामुळे माणसाला जगाची माहिती मिळते. वेगवेगळ्या संस्कृती, इतिहास आणि विज्ञानाबद्दल ज्ञान प्राप्त होते.
- व्यक्तिमत्त्व विकास: वाचनामुळे माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. चांगले विचार आणि आदर्शValues आत्मसात करण्याची प्रेरणा मिळते.
- सर्जनशीलता: वाचनामुळे माणसाच्या मनात नवीन कल्पना येतात. त्यामुळे तो अधिक सर्जनशील बनतो.
- समस्या निराकरण: वाचनामुळे माणसाला समस्या सोडवण्याची क्षमता वाढते. तो अधिक विचारपूर्वक आणि तर्कशुद्ध पद्धतीने विचार करू शकतो.
- आत्मविश्वास: वाचनामुळे माणसाचा आत्मविश्वास वाढतो. त्याला नवीन गोष्टी शिकण्याची आणि जगात काहीतरी करण्याची प्रेरणा मिळते.
थोडक्यात, वाचन हे मानवी जीवनातील एक महत्त्वपूर्ण घटक आहे. वाचनामुळे माणसाला ज्ञान, कौशल्ये आणि अनुभव मिळतात, ज्यामुळे तो एक चांगला माणूस बनतो. त्यामुळे प्रत्येकाने नियमित वाचन केले पाहिजे.
" वाचाल तर वाचाल "