2 उत्तरे
2
answers
तहान का लागते?
3
Answer link
20/09/2020...
आपण तहानलेलो असतो, त्या वेळात आपल्याला पाणी पिण्यासाठी नाही मिळालं तर तहानेने आपला जीव व्याकुळ होतो. पण आपल्याला तहान लागते तरी का? माणसाच्या शरीरात दिवसातून किमान आठ लिटर तरी पाणी गेलं पाहिजे, असं आपण नेहमी आरोग्यतज्ज्ञांकडून ऐकत असतो. पाण्याशिवाय आपण तीन दिवसांपेक्षा जास्त दिवस जिवंत राहू शकत नाही. पाणी हे आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाचा घटक असते.
आपल्याला तहान लागते, याचा अर्थ असा होतो की, आपल्या शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते आहे. त्यामुळे शरीरातील द्रव्य साठा पूर्वरत आणण्यासाठी शरीराकडून आपल्याला दिलेली ही सूचना असते. आपल्या रक्तातील मिठाच्या पातळीत बदल झाला की आपल्याला तहान लागते. आपल्या शरीरात रक्त आणि मिठाचे एक विशिष्ट प्रमाण ठरलेले असते. जेव्हा या ठरलेल्या प्रमाणात रक्ताच्या तुलनेत मिठाच्या प्रमाणाची जास्त वाढ होते तेव्हा त्याचा परिणाम म्हणजेच तहान लागते.
आपल्या मेंदूमध्ये एक भाग असा असतो ज्याला ‘थर्स्ट सेंटर’असं म्हणतात. हा भाग तेव्हाच कार्य करतो जेव्हा रक्तालील मिठाचं प्रमाण वाढतं. जेव्हा हा बदल होतो तेव्हा मेंदूतला हा भाग ही बदलाची सूचना आपल्या घशापर्यंत पोहोचवते. मेंदू आणि घशाची या एकत्र सूचनेमुळे आपल्याला तहान लागते.
आपण तहानलेलो असतो, त्या वेळात आपल्याला पाणी पिण्यासाठी नाही मिळालं तर तहानेने आपला जीव व्याकुळ होतो. पण आपल्याला तहान लागते तरी का? माणसाच्या शरीरात दिवसातून किमान आठ लिटर तरी पाणी गेलं पाहिजे, असं आपण नेहमी आरोग्यतज्ज्ञांकडून ऐकत असतो. पाण्याशिवाय आपण तीन दिवसांपेक्षा जास्त दिवस जिवंत राहू शकत नाही. पाणी हे आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाचा घटक असते.
आपल्याला तहान लागते, याचा अर्थ असा होतो की, आपल्या शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते आहे. त्यामुळे शरीरातील द्रव्य साठा पूर्वरत आणण्यासाठी शरीराकडून आपल्याला दिलेली ही सूचना असते. आपल्या रक्तातील मिठाच्या पातळीत बदल झाला की आपल्याला तहान लागते. आपल्या शरीरात रक्त आणि मिठाचे एक विशिष्ट प्रमाण ठरलेले असते. जेव्हा या ठरलेल्या प्रमाणात रक्ताच्या तुलनेत मिठाच्या प्रमाणाची जास्त वाढ होते तेव्हा त्याचा परिणाम म्हणजेच तहान लागते.
आपल्या मेंदूमध्ये एक भाग असा असतो ज्याला ‘थर्स्ट सेंटर’असं म्हणतात. हा भाग तेव्हाच कार्य करतो जेव्हा रक्तालील मिठाचं प्रमाण वाढतं. जेव्हा हा बदल होतो तेव्हा मेंदूतला हा भाग ही बदलाची सूचना आपल्या घशापर्यंत पोहोचवते. मेंदू आणि घशाची या एकत्र सूचनेमुळे आपल्याला तहान लागते.
0
Answer link
तहान लागण्याची काही मुख्य कारणे खालीलप्रमाणे आहेत:
- शरीरातील पाण्याची पातळी कमी होणे: जेव्हा शरीरात पाण्याची पातळी कमी होते, तेव्हा मेंदूतील हायपोथॅलॅमस नावाचा भाग सक्रिय होतो आणि तहान लागण्याची भावना निर्माण होते.
- electrolytes असंतुलन: शरीरातील electrolytes (सोडियम, पोटॅशियम, क्लोराईड) असंतुलित झाल्यास तहान लागू शकते.
- काही विशिष्ट पदार्थ आणि पेये: जास्त मीठ असलेले पदार्थ खाल्ल्याने किंवा काही विशिष्ट पेये प्यायल्याने तहान लागते.
- शारीरिक हालचाल: व्यायाम किंवा शारीरिक श्रमामुळे शरीरातील पाणी कमी होते आणि त्यामुळे तहान लागते.
- रोग आणि औषधे: काही रोग जसे की मधुमेह आणि काही औषधांमुळे तहान लागू शकते.
तहान लागणे हे शरीराचे एक महत्वाचे संकेत आहे, जे पाण्याची गरज दर्शवते.