Topic icon

शरीरक्रियाशास्त्र

0

शरीरात योग्य नियंत्रण राखण्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी:

1. संतुलित आहार:
  • योग्य प्रमाणात प्रथिने, कर्बोदके, आणि स्निग्ध पदार्थ असावेत.
  • ताजी फळे आणि भाज्या भरपूर खाव्यात.
  • प्रक्रिया केलेले अन्न टाळावे.
2. नियमित व्यायाम:
  • दररोज किमान 30 मिनिटे व्यायाम करावा.
  • योगा, धावणे, किंवा जलतरण यांसारख्या ऍक्टिव्हिटीज कराव्यात.
3. पुरेशी झोप:
  • दररोज रात्री 7-8 तास झोप घेणे आवश्यक आहे.
4. ताण व्यवस्थापन:
  • ध्यान आणि श्वासोच्छ्वास व्यायाम करावा.
  • नियमित विश्रांती घ्यावी.
5. नियमित तपासणी:
  • डॉक्टरांकडून नियमित आरोग्य तपासणी करून घ्यावी.
  • वयाच्या अनुसार आवश्यक टेस्ट कराव्यात.
6. पुरेसे पाणी प्या:
  • दिवसभर पुरेसे पाणी प्यावे, ज्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते.
7. धूम्रपान आणि मद्यपान टाळा:
  • धूम्रपान आणि मद्यपान आरोग्यासाठी हानिकारक आहे, त्यामुळे ते टाळावे.

हे काही उपाय आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमच्या शरीरावर योग्य नियंत्रण ठेवू शकता.

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 1440
2





तोंडाला पाणी

चिकन, मटण, मासे अशी नुसती नावं ऐकली तरी तोंडाला पाणी सुटतं. पावसाळ्यातल्या पिकनिकमध्ये तर गरमागरम नॉनव्हेज हवंच. पण ते खाताना त्याचे फायदे-तोटेही लक्षात घ्यायला हवेत.
 
चिकन, मटण, मासे अशी नुसती नावं ऐकली तरी तोंडाला पाणी सुटतं. पावसाळ्यातल्या पिकनिकमध्ये तर गरमागरम नॉनव्हेज हवंच. पण ते खाताना त्याचे फायदे-तोटेही लक्षात घ्यायला हवेत.
पावसाळा आला म्हणजे मस्त गरमागरम भजीसोबतच पावसाळी पिकनिक आणि झक्क मांसाहाराचे बेत शिजू लागतात. शाकाहार तसा पचायला हलका. पण त्यात प्रथिनांचं प्रमाण जास्त नसतं. मांसाहार पचायला जड असला तरी त्यातून आपल्याला प्रथिनं, लोह, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्त्व मिळतात. पण त्यात चोथा अर्थात फायबर नसतं. मांसाहारात प्रथिनं असल्यामुळे लहान मुलं, आजारी माणसं यांना पचेल त्या प्रमाणातच तो द्यावा लागतो. त्यामुळे तब्येत सुधारायला खूप मदत होते. जखमा भरणं, शक्ती येणं, झीज भरून निघणं हे मांसाहारामुळे सहज शक्य होतं; पण त्यासाठी काही पथ्य पाळणं गरजेचं आहे. अंडी, मासे, मांस हे ताजे आणि स्वच्छ असावेत. मांसाहारात किडनी, लिव्हर, ब्रेन शक्यतो टाळावं. त्याचप्रमाणे अंड्यातील पिवळ्या भागात चरबीचं प्रमाण जास्त असतं, तेही घेणं टाळावं. कोंबडीची कातडी, कलेजी, भेजा यांत स्निग्धांश जास्त असतो. त्यामुळे त्यावरही लगाम असू द्यावा.


त्र्यंबकेश्वरमध्ये पुरोहितांच्या दोन गटांत तुंबळ हाणामारी; गावठी कट्टा, काडतुसे जप्त
मासे जरुर घ्या. माशांपासून उत्तम प्रथिनं आणि कमी स्निग्धांश मिळतो. माशांचं तेल स्मरणशक्ती वाढवतं, त्वचेला तजेलदारपणा आणणं, हृदयरोग कमी करणं यासाठी उपयोगी पडतं. बांगडा, ट्यूना या माशांतील ‘ओमेगा ३’ हे फॅटिअॅसिड अत्यंत उपयुक्त आहे; पण मासा तळून खाऊ नये. भाजून, ग्रिल करून, बेक करून घ्यावा. कोळंबी, खेकडे, तिसऱ्या या प्रकारच्या माशांत ‘ओमेगा ३’ कमी असतं. कोलेस्टेरॉल जास्त असतं. म्हणून हे मासे वरचेवर घेणं टाळावं.

मांसाहारासाठी रस्सा करताना खोबरं, तीळ, शेंगदाणे, तेल, मसाल्यांचा भरपूर वापर केला जातो. पण त्यामुळे आम्लपित्ताचा त्रास होऊ शकतो. मांसाहाराबरोबर नेहमी कच्चं सॅलड भरपूर खावं किंवा पालेभाजी घ्यावी. उदा. मटण पालक. रेडमीट, अंड्याचा पिवळा भाग, सॉसेजेस सलामी, चिकन स्कीन यांत सॅच्युरेटेड फॅट्स भरपूर असतात. त्यामुळे रक्तात कोलेस्टेरॉलचं प्रमाण जास्त असणाऱ्यांनी, स्थूल व्यक्तींनी ते अजिबात घेऊ नये.
वाढीच्या वयातील मुलं, आजारातून बरं होण्यासाठी रुग्णांना, खेळाडूंना मांसाहार निश्चितपणे द्यावा; पण त्यातली सर्व पथ्य सांभाळूनच! अंड्याचा पांढरा भाग, चिकन, स्कीन काढलेले मासे याला शाकाहारातील पर्याय म्हणजे दूध, कडधान्यं, डाळी, तेलबिया, वेगवेगळी तेलं, काळे चणे, राजमा, गडद हिरव्या रंगांच्या पालेभाज्या इ. आहे. मांसाहार शक्यतो दिवसा करावा. रात्रीच्या जेवणात फार मसालेदार आणि जड पदार्थ घेणं टाळावं.

उत्तर लिहिले · 8/12/2021
कर्म · 121765
0

गारवा अनेक कारणांमुळे थरथरतो, त्यापैकी काही मुख्य कारणे खालीलप्रमाणे आहेत:

  • तापमान: जेव्हा वातावरणातील तापमान खूप कमी होते, तेव्हा थंडीमुळे गारवा थरथरतो.
  • शरीराची प्रतिक्रिया: आपले शरीर तापमान संतुलित ठेवण्याचा प्रयत्न करते. जेव्हा थंडी लागते, तेव्हा शरीर स्नायूंना जलद गतीने आकुंचन आणि प्रसरण करायला लावते. यामुळे उष्णता निर्माण होते आणि शरीर गरम राहण्यास मदत होते. या प्रक्रियेत गारवा थरथरतो.
  • रोग: काहीवेळा थंडी वाजून येणे हे एखाद्या रोगाचे लक्षण असू शकते, जसे की ताप, सर्दी किंवा इन्फ्लूएंझा.
  • भय: भीतीमुळे किंवा तणावामुळे देखील काहीवेळा गारवा थरथरतो.

थोडक्यात, गारवा थरथरण्याचे मुख्य कारण म्हणजे शरीराचे तापमान राखण्याचा प्रयत्न करणे.

अधिक माहितीसाठी आपण खालील लिंकवर क्लिक करू शकता:

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 1440
2
खूप खेळल्याने, धावल्याने व्यायाम होतो. शरीरातील स्नायुंचे मोठ्या प्रमाणावर आकुंचन-प्रसरण होते. स्नायुंचे कार्य वाढते. साहजिकच या भौतिक श्रमांमुळे उष्णता निर्माण होते. अशा परिस्थितीत शरीराचे तापमान ठरावीक पातळीवर स्थिर राहण्यासाठी शरीरातून उष्णता बाहेर टाकण्याची आवश्यकता असते. व्यायामामुळे निर्माण झालेल्या उष्णतेच्या परिणामाने त्वचेखालचा रक्तप्रवाह वाढतो. त्यामुळे त्वचेचे तापमान हवेच्या तापमानापेक्षा जास्त होते व काही उष्णता वातावरणात सोडली जाते; परंतु उष्णतेतील या मार्गाने होणारी घट अल्प प्रमाणातच असते. व्यायामानंतर निर्माण होणारी उष्णता शरीराबाहेर टाकण्याचा महत्त्वाचा मार्ग घाम हाच होय. खूप व्यायाम केल्यानंतर घाम येण्याचे प्रमाण वाढते व त्याबरोबरच घामाचे बाष्पीभवन होण्याचेही प्रमाण वाढते. शरीरातील वाढलेली उष्णता व मेंदूतील प्रेरणा या दोहोंमुळे व्यायामानंतर आपल्याला खूप घाम येतो. विश्रांती घेतल्यावर हळूहळू घाम येण्याचे प्रमाण कमी होते. अशा प्रकारे घाम आल्याने शरीरात निर्माण झालेली उष्णता शरीराबाहेर टाकली जाते व शरीराचे तापमान सामान्य पातळीत राहते. त्यामुळेच खूप व्यायाम केल्यावर घाम येतो. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये घाम आणखीनच येतो व हिवाळ्यात तेवढाच व्यायाम करून घाम कमी येतो, याचा अनुभव तुम्ही घेतला असेल.
उत्तर लिहिले · 15/11/2020
कर्म · 39105
0

नाडीचे ठोके पडण्याचे मुख्य कारण म्हणजे हृदय (heart) रक्तवाहिन्यांमधून (blood vessels) रक्त पुढे ढकलते.

हृदय आणि रक्तवाहिन्या:
  • हृदय एक पंपसारखे काम करते. ते लयबद्धपणे आकुंचन (contract) आणि प्रसरण (relax) पावते.
  • जेव्हा हृदय आकुंचन पावते, तेव्हा ते रक्त महाधमनीमध्ये (aorta) जोरदारपणे ढकलते.
  • महाधमनी आणि इतर रक्तवाहिन्या लवचिक (elastic) असल्यामुळे, त्या रक्ताच्या दाबाने थोड्याशा প্রসারतात (expand).
  • जेव्हा हृदय शिথিল होते, तेव्हा रक्तवाहिन्या पुन्हा त्यांच्या मूळ आकारात येतात.
नाडीचा ठोका:
  • रक्तवाहिन्यांच्या या आकुंचन आणि प्रसरणामुळे नाडीचा ठोका जाणवतो.
  • हा ठोका विशेषत: मनगट, मान आणि घोट्याजवळ सहजपणे जाणवतो, जिथे रक्तवाहिन्या त्वचेच्या जवळ असतात.
  • नाडीचा ठोका आपल्या हृदयाच्या गतीशी जुळलेला असतो.
नाडीचे महत्त्व:
  • नाडीचे ठोके मोजून आपण हृदय गती (heart rate) तपासू शकतो.
  • नाडीच्या ठोक्यांमधील अनियमितता काही आरोग्य समस्यांचे संकेत देऊ शकते.

संदर्भ: अमेरिकन हार्ट असोसिएशन

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 1440
3
20/09/2020...

आपण तहानलेलो असतो, त्या वेळात आपल्याला पाणी पिण्यासाठी नाही मिळालं तर तहानेने आपला जीव व्याकुळ होतो. पण आपल्याला तहान लागते तरी का? माणसाच्या शरीरात दिवसातून किमान आठ लिटर तरी पाणी गेलं पाहिजे, असं आपण नेहमी आरोग्यतज्ज्ञांकडून ऐकत असतो. पाण्याशिवाय आपण तीन दिवसांपेक्षा जास्त दिवस जिवंत राहू शकत नाही. पाणी हे आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाचा घटक असते.

आपल्याला तहान लागते, याचा अर्थ असा होतो की, आपल्या शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते आहे. त्यामुळे शरीरातील द्रव्य साठा पूर्वरत आणण्यासाठी शरीराकडून आपल्याला दिलेली ही सूचना असते. आपल्या रक्तातील मिठाच्या पातळीत बदल झाला की आपल्याला तहान लागते. आपल्या शरीरात रक्त आणि मिठाचे एक विशिष्ट प्रमाण ठरलेले असते. जेव्हा या ठरलेल्या प्रमाणात रक्ताच्या तुलनेत मिठाच्या प्रमाणाची जास्त वाढ होते तेव्हा त्याचा परिणाम म्हणजेच तहान लागते.

आपल्या मेंदूमध्ये एक भाग असा असतो ज्याला ‘थर्स्ट सेंटर’असं म्हणतात. हा भाग तेव्हाच कार्य करतो जेव्हा रक्तालील मिठाचं प्रमाण वाढतं. जेव्हा हा बदल होतो तेव्हा मेंदूतला हा भाग ही बदलाची सूचना आपल्या घशापर्यंत पोहोचवते. मेंदू आणि घशाची या एकत्र सूचनेमुळे आपल्याला तहान लागते.
उत्तर लिहिले · 20/9/2020
कर्म · 14865