संस्कृती अध्यात्म वेद धर्म

चार वेदांची विस्तारपूर्वक माहिती द्या?

3 उत्तरे
3 answers

चार वेदांची विस्तारपूर्वक माहिती द्या?

12
जे जगात नाही ते वेदांत आहे असे म्हणतात. वेद हे भारतीय धर्माचे व संस्कृतीचे मूलाधार ग्रंथ.'मन्त्रब्राह्मणयोर्वेदनामधेयम्' अशी वेदाची व्याख्या करता येईल. जगातील पहिले साहित्य वेद. वेद हे मानवसृष्टीच्या आधी परमेश्वराने मानवाच्या कल्याणासाठी निर्माण केले आणि म्हणूनच ते अनादी आहेत अशी वैदिकांची धारणा आहे. ऋग्वेद,यजुर्वेद,सामवेद आणि अथर्ववेद यांना वेद अथवा संहिता असे म्हटले जाते.या वेदांचे संहिता, आरण्यके, ब्राह्मणे आणि उपनिषदे असे चार उपविभाग आहेत. यापैकी उपनिषदे ही वेदांच्या शेवटी येतात म्हणून त्यांना 'वेदान्त' असे म्हटले जाते. वेद बंगल्यावर आधारलेले संस्कृती म्हणजे वैदिक संस्कृती होय वेद हे आपले सर्वाधिक प्राचीन साहित्य मानले जाते वेदांची निर्मिती अनेक ऋषींनी केली वेदांमधील काही सुप्त हे स्त्रियांनी रचलेल्या आहेत वैदिक मारण्याची भाषा संस्कृत ही होती वैदिक लागणे अत्यंत समृद्ध आहे ऋग्वेदात यातील मूळ ग्रंथ मानला जातो तो काव्यरूप आहे ऋग्वेदा सह यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद असे चार वेद आहेत या चार वेदांच्या ग्रंथांना संहिता असे म्हणतात विविध म्हणजे जाणणे त्यापासून वेध ही संज्ञा तयार झाली त्याचा अर्थ ज्ञान असा होतो मौखिक पटना च्या आधारे वेदांचे जतन केले गेले वेदांना श्रुती असे म्हणतात पुरुषांनी बनलेला वेद म्हणजे ऋग्वेद होय ऋचा म्हणजे स्तुती करण्यासाठी रचलेले पद्य अनेक ऋचा एकत्र गुंफून एखाद्या देवतेची स्तुती करण्यासाठी तयार केलेल्या काव्याला सुप्त असे म्हणतात ऋग्वेद संहितेमध्ये विविध देवतांची स्तुती करणारी सूक्त आहेत यजुर्वेद संहितेमध्ये यज्ञात म्हटले जाणारे मंत्र आहेत यज्ञविधी मध्ये कोणत्या मंत्राचे पठण केव्हा आणि कसे करावे याचे मार्गदर्शन या संहितेमध्ये केलेले आहे त्यात असणारी मंत्र आणि गद्यात दिलेले त्याचे स्पष्टीकरण अशी या समितीची रचना आहे तर सांग वेदांमध्ये यज्ञ विधीच्या वेळी तालासुरात मंत्र गायन केले जात असे ते गायन कसे करावे याचे मार्गदर्शन यामुळेच संहितेमध्ये केलेला आहे भारतीय संहितेच्या निर्मितीमध्ये सामवेद याचा मोठा वाटा आहे तर अथर्ववेदाच्या संहितेला अथर्व ऋषींचे नाव देण्यात आले अथर्व वेदांमध्ये दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टींना महत्त्व दिलेले आढळते आयुष्यात येणाऱ्या संकटावर दुःखांवर कशा पद्धतीने उपाय करायचे हे त्यामध्ये सांगितले आहेत तसेच अनेक औषधी वनस्पतींची माहिती त्यात दिलेली आहे राजाने राज्य कसे करावे याचेही मार्गदर्शन त्यामध्ये केलेले आहे त्यांच्या नंतर ब्राह्मणग्रंथ उपनिषदे याची रचना केली गेली त्यांचाही समावेश यामध्ये केला जातो यज्ञविधी मध्ये वेदांचा वापर कसा करावा हे सांगणाऱ्या ग्रंथांना ब्राह्मण्य ग्रंथ म्हणतात प्रत्येक वेदाचे स्वतंत्र ब्राह्मणग्रंथ आहेत तर आरण्यक यहे अरण्यात जाऊन एकाग्रचित्ताने केलेली चिंतन अरण्यक ग्रंथामध्ये मांडलेले आहे यज्ञ विधी पार पाडत असताना कोणत्याही प्रकारची चूक होऊ नये याची खबरदारी घेतलेली दिसते तर उपनिषद म्हणजे गुरूजवळ बसून मिळवलेले ज्ञान होय जन्म-मृत्यू सारख्या घटनांबद्दल अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये येत असतात त्या प्रश्नांची उत्तरे सहज मिळत नाहीत अशा गहन प्रश्नांवर उपनिषदांमध्ये चर्चा केलेली आहे चार वेद ब्राह्मण ग्रंथ आरण्यके आणि उपनिषदे रचण्यास सुमारे पंधराशे वर्षांचा कालावधी लागला त्या कालावधीत वेदकालीन संस्कृतीत अनेक बदल होत गेले त्या बदलांचा आणि वेदकालीन लोकजीवनाचा अभ्यास करण्यासाठी वैदिक वांग्मय हे महत्त्वाचे साधन आहे

चार वेद

1. ऋग्वेद

ऋग्वेद हा चार वेदांपैकी एक असून त्याची रचना चार वेदांमध्ये सर्वप्रथम झाली आहे असे समजण्यात येते. (उरलेले तीन वेद - यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद.) ऋग्वेद हा प्राचीन भारतीय वैदिक संस्कृतीतील सर्वात जुना आणि पवित्र समजला जाणारा ग्रंथ आहे. हा वेद ब्रह्मदेवाने लिहिला आहे, अशी समजूत आहे. ब्रह्मदेव निद्रेत असताना त्यांच्या तोंडातून तीन वेद निघाले.त्यापैकी एक म्हणजे ऋग्वेद.

ऋग्वेद संस्कृत वाङ्‌मयातील पहिला ग्रंथ आहे. ऋग्वेदामध्ये एकूण १० मंडले व १०२८ सूक्ते आहेत. निसर्गातील विविध शक्तींना देवता मानले आहे. त्यांची स्तुती गाणारी कवने ऋग्वेदात आहे. ऋग्वेदातील प्रत्येक कडव्यास 'ऋचा' म्हणतात. ऋग्वेद रचनेचा काल इ.स.पू. ६००० पूर्वीच्या सुमाराचा असावा असा अंदाज आहे. ऋग्वेदाच्या मांडणीची व्यवस्था महर्षी व्यास यांनी पाहिली.

ऋग्वेदातीला सूक्तांचे कर्ते ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य या तीनही वर्णांचे लोक आहेत. ऋग्वेदामध्ये पाठभेद नाहीत. 'अग्निमीळे पुरोहितम्' हा ऋग्वेदातील पहिला मंत्र असून अग्निसूक्ताने ऋग्वेदाचा प्रारंभ होतो.

पाणिनीच्या काळात ऋग्वेदाचा अर्थ समजण्यासाठी पदे, क्रम इत्यादी व्यवस्था निर्माण झाली. ती पदे न फिरवता तशीच म्हंटली जावीत या साठी जटापाठ आणि घनपाठ म्हणण्याची पद्धत सु्रू झाली.

ऋग्वेद हा स्तुतिपर असून पद्यमय आहे. ऋग्वेदाच्या १०व्या मंडलातल्या पुरुषसूक्तात तीनही वेदांचा उल्लेख आहे. श्रीसूक्त हे देवीच्या वर्णनपर असलेले प्रसिद्ध सूक्त ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलात आहे.

2. यजुर्वेद

यजुर्वेद या शब्दाचा अर्थ (संस्कृत:- यजुस् + वेदः = यजुर्वेदः) असा होतो. हा हिंदुंच्या चार वेदांपैकी दुसरा वेद आहे. वेदांची रचना ख्रिस्तपूर्व ६००० पूर्वीच्या काळात झाली, असा एक मतप्रवाह आहे.या विषयी विविध अभ्यासकात मतमतांतरे प्रचलित आहेत. यजुर्वेद संहितेत वैदिक काळातील यज्ञात आहुती देण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मंत्रांचा समावेश आहे. त्यांच्या प्रस्तुतीकरण व वापराच्या पद्धतीत ब्राह्मणग्रंथ व श्रौतसूत्रे यांनी मोलाची भर घातली. यज्ञसंस्थेचा तपशीलवार विचार या संहितेने मांडला आहे.धनुर्वेद हा यजुर्वेदाचा उपवेद मानला जातो.हा यजुर्वेद ब्रह्मदेवाने लिहीला आहे.ब्रह्मदेव निद्रेत असताना त्यांच्या तोंडातून तीन वेद निघाले.

3. सामवेद

सामवेद हा प्राचीन हिंदू संस्कृतीतील चार वेदांपैकी तिसऱ्या क्रमांकाचा वेद आहे. साम म्हणजे 'गायन' आणि वेद म्हणजे 'ज्ञान' होय.हा वेद ब्रह्मदेवाने लिहिला आहे, असे मानले जाते.

4. अथर्ववेद

अथर्ववेद हा चार प्रमुख वेदांपैकी एक आहे. हा ग्रंथ चार वेदांपैकी सगळ्यात शेवटी म्हणजे इ.स.पूर्व ६००० या काळात लिहिला गेल्याचे मानले जाते. आयुर्वेद हा अथर्ववेदाचा उपवेद आहे.आयुर्वेद हा विष्णु अवतार धन्वंतरी यांनी आयुर्वेदाची रचना केली. अथर्ववेदात तत्त्वज्ञानाबरोबर जीवनातील अडचणी, औषधी वनस्पती आणि संकटावरील उपायांचीही माहिती आहे. समाजातील सर्व थरांमध्ये, तसेच भारतातील सर्व धर्मांमध्ये अथर्ववेदीय उपासनांचा प्रचार आजही दिसतो.

सविस्तर माहिती साठी येथे क्लिक करा

उत्तर लिहिले · 1/8/2020
कर्म · 44255
0
ऋचांनी बनलेला वेळ म्हणजे हा.
उत्तर लिहिले · 10/11/2021
कर्म · 0
0

चार वेदांची माहिती खालीलप्रमाणे:

  • ऋग्वेद:
  • हा सर्वात प्राचीन वेद आहे. 'ऋक्' म्हणजे स्तुती करणे. ऋग्वेदात अनेक देवतांची स्तुतीper आहे. यात एकूण १०२८ स्तोत्रे आहेत, ज्यांना 'सूक्त' म्हणतात. हे सूक्त विविध ऋषींनी लिहिले आहेत. ऋग्वेदातurgur निसर्गातील देव-देवता जसे की अग्नी, इंद्र, वरुण, सूर्य, इत्यादींचे वर्णन आहे.
    अधिक माहितीसाठी हे पहा.

  • सामवेद:
  • 'साम' म्हणजे गाणे किंवा संगीत. सामवेदात ऋग्वेदातील मंत्रांना चालीमध्ये गायिले जाते. भारतीय संगीताचा उगम सामवेदात आहे, असे मानले जाते. यात १८७५ मंत्र आहेत.
    अधिक माहितीसाठी हे पहा.

  • यजुर्वेद:
  • 'यजु:' म्हणजे यज्ञ. यजुर्वेदात यज्ञाच्या वेळी बोलायचे मंत्र आणि करायच्या विधींचे वर्णन आहे. हा वेद गद्य आणि पद्य अशा दोन्ही प्रकारात आहे.
    अधिक माहितीसाठी हे पहा.

  • अथर्ववेद:
  • अथर्ववेदात जादू, तंत्र-मंत्र, आणि आयुर्वेद (औषधोपचार) इत्यादी गोष्टींविषयी माहिती आहे. यात रोग निवारण, शत्रुनाश, दीर्घायुष्य यासाठीचे मंत्र आहेत.
    अधिक माहितीसाठी हे पहा.

प्रत्येक वेदाचे स्वतःचे ब्राह्मण, आरण्यक आणि उपनिषद् आहेत, ज्यात वेदांतील ज्ञानाची विस्तृत चर्चा आहे.

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 1440

Related Questions

वेद म्हणजे काय? (वर्ग ६)
सामवेदाच्या संहितेत किती श्लोक आहेत?
वेदांमधील आद्य ग्रंथ कोणता आहे?
सर्वात प्राचीन वेद कोणता?
आर्य यांनी लिहिलेला पहिला वेद कोणता आहे?
वेद म्हणजे काय?
चार वेदांचा अंश घेऊन कोणता वेद निर्माण झाला?