2 उत्तरे
2
answers
अरुण सरनाईक यांच्याबद्दल माहिती द्या?
4
Answer link
आज २१ जुन रुबाबदार मराठी नायक अरुण सरनाईक यांचा स्मृतिदिन.
कोल्हापूरच्या मातीत जन्मून मोठा नावलौकिक मिळवणारे रांगडे नायक म्हणुन त्यांची अोळख आहे.
४ ऑक्टोबर, १९३५ रोजी जन्मलेल्या अरूणचे . वडील महाराष्ट्र कोकिळ शंकरराव सरनाईक. बलवंत संगीत नाटकमंडळीमुळे महाराष्ट्रभरात त्यांचं नाव झालं होतं. चुलते निवृत्तीबुवा सरनाईक शास्त्रीय गायक होते. भजनसम्राट म्हणून त्यांचा नावलौकिक होता. त्यामुळे अभिनयाबरोबरच अरुण सरनाईकांना घरातूनच गायनाचा वारसा मिळाला होता. ते उत्तम तबलावादक होते. खर्जातल्या आवाजाची उपजत देणगी त्यांना मिळाली होती.
शालेय आणि कॉलेज जीवनातच कलेकडे वळले. १९६० च्या दरम्यान गोविंदराव टेंबे यांच्या जयदेव नाटकात त्यांना गायक नट म्हणून पहिल्यांदा संधी मिळाली. मो. ग. रांगणेकर यांच्या 'भटाला दिली ओसरी' हे त्यांचं पहिलं लोकप्रिय नाटक. सरनाईकांसाठी अनंत माने यांच्यामुळे दरवाजे खुले झाले.
__________________________
माहिती सेवा ग्रूप पेठवडगांव
__________________________
त्यांनी दिग्दर्शित केलेल्या शाहीर परशुराम हा सरनाईक यांचा पहिला सिनेमा. यात त्यांनी परशुरामाच्या मुलाची भूमिका केली. अनंत मानेंच्या सुमारे १५ सिनेमांमधे त्यांनी भूमिका केल्या. केला इशारा जाता जाता, अशीच एक रात्र होती, सवाल माझा ऐका, सांगू कशी मी, गळगौळण, डोंगरची मैना, पाहुणी, एक गाव बारा भानगडी, पाच रंगाची पाच पाखरं, तोतया आमदार ही त्यातल्या काही सिनेमांची नावं. २५ वर्षांच्या कालावधीत त्यांनी सुमारे पाऊणशे सिनेमे आणि २५ नाटकांमधे भूमिका केल्या.डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित सिंहासन' मधील मुख्यमंत्री आजही लोकप्रिय आहे. ते उत्तम गायक होते."घरकुल' या चित्रपटासाठी सी. रामचंद्र यांनी त्यांच्याकडून "पप्पा सांगा कुणाचे' हे अजरामर गीत गाऊन घेतले.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=1010496519348271&id=100011637976439

जयश्री गडकर आणि अरुण सरनाईक हे कधीकाळी मराठी निर्माते, दिग्दर्शकांसाठी चलनी नाणं होतं. व्यावसायिक रंगभूमीवर नानावटी खटल्यावर आधारित अपराध मीच केला हे मधुसूदन कालेलकर यांनी लिहिलेलं नाटक खूप गाजलं. त्यात सरनाईक यांची प्रमुख भूमिका होती.
वयाच्या अवघ्या ४९ वर्षी त्यांचा अपघाती मृत्यू झाला.
कोल्हापूरहून पुण्याला जात असताना पुणे- बंगळूर महामार्गावर किणीजवळ कार अपघातात ते, त्यांची बायको अनिता, इंजिनियर झालेला मुलगा संजय ठार झाले. तेव्हा त्यांची मुलगी मिरज मेडिकल कॉलेजमधे शिकत होती. तारीख होती २१ जून १९८४.
नसिरुद्दीन शाह आणि स्मिता पाटील यांच्याबरोबर सितम सिनेमात त्यांना भूमिका मिळाली होती. आणखी दोन हिंदी सिनेमांचं चित्रिकरण सुरू होणार होतं. हिंदीतल्या तीन सिनेमांच्या ऑफर्स त्यांना आलेल्या होत्या. मात्र त्यांच्या मृत्यूनं पुढचा सगळा अभिनयाचा प्रवासच थांबवला.
माहिती सेवा ग्रूप पेठवडगांवतर्फे त्यांना भावपुर्ण श्रध्दांजली.
कोल्हापूरच्या मातीत जन्मून मोठा नावलौकिक मिळवणारे रांगडे नायक म्हणुन त्यांची अोळख आहे.
४ ऑक्टोबर, १९३५ रोजी जन्मलेल्या अरूणचे . वडील महाराष्ट्र कोकिळ शंकरराव सरनाईक. बलवंत संगीत नाटकमंडळीमुळे महाराष्ट्रभरात त्यांचं नाव झालं होतं. चुलते निवृत्तीबुवा सरनाईक शास्त्रीय गायक होते. भजनसम्राट म्हणून त्यांचा नावलौकिक होता. त्यामुळे अभिनयाबरोबरच अरुण सरनाईकांना घरातूनच गायनाचा वारसा मिळाला होता. ते उत्तम तबलावादक होते. खर्जातल्या आवाजाची उपजत देणगी त्यांना मिळाली होती.
शालेय आणि कॉलेज जीवनातच कलेकडे वळले. १९६० च्या दरम्यान गोविंदराव टेंबे यांच्या जयदेव नाटकात त्यांना गायक नट म्हणून पहिल्यांदा संधी मिळाली. मो. ग. रांगणेकर यांच्या 'भटाला दिली ओसरी' हे त्यांचं पहिलं लोकप्रिय नाटक. सरनाईकांसाठी अनंत माने यांच्यामुळे दरवाजे खुले झाले.
__________________________
माहिती सेवा ग्रूप पेठवडगांव
__________________________
त्यांनी दिग्दर्शित केलेल्या शाहीर परशुराम हा सरनाईक यांचा पहिला सिनेमा. यात त्यांनी परशुरामाच्या मुलाची भूमिका केली. अनंत मानेंच्या सुमारे १५ सिनेमांमधे त्यांनी भूमिका केल्या. केला इशारा जाता जाता, अशीच एक रात्र होती, सवाल माझा ऐका, सांगू कशी मी, गळगौळण, डोंगरची मैना, पाहुणी, एक गाव बारा भानगडी, पाच रंगाची पाच पाखरं, तोतया आमदार ही त्यातल्या काही सिनेमांची नावं. २५ वर्षांच्या कालावधीत त्यांनी सुमारे पाऊणशे सिनेमे आणि २५ नाटकांमधे भूमिका केल्या.डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित सिंहासन' मधील मुख्यमंत्री आजही लोकप्रिय आहे. ते उत्तम गायक होते."घरकुल' या चित्रपटासाठी सी. रामचंद्र यांनी त्यांच्याकडून "पप्पा सांगा कुणाचे' हे अजरामर गीत गाऊन घेतले.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=1010496519348271&id=100011637976439

जयश्री गडकर आणि अरुण सरनाईक हे कधीकाळी मराठी निर्माते, दिग्दर्शकांसाठी चलनी नाणं होतं. व्यावसायिक रंगभूमीवर नानावटी खटल्यावर आधारित अपराध मीच केला हे मधुसूदन कालेलकर यांनी लिहिलेलं नाटक खूप गाजलं. त्यात सरनाईक यांची प्रमुख भूमिका होती.
वयाच्या अवघ्या ४९ वर्षी त्यांचा अपघाती मृत्यू झाला.
कोल्हापूरहून पुण्याला जात असताना पुणे- बंगळूर महामार्गावर किणीजवळ कार अपघातात ते, त्यांची बायको अनिता, इंजिनियर झालेला मुलगा संजय ठार झाले. तेव्हा त्यांची मुलगी मिरज मेडिकल कॉलेजमधे शिकत होती. तारीख होती २१ जून १९८४.
नसिरुद्दीन शाह आणि स्मिता पाटील यांच्याबरोबर सितम सिनेमात त्यांना भूमिका मिळाली होती. आणखी दोन हिंदी सिनेमांचं चित्रिकरण सुरू होणार होतं. हिंदीतल्या तीन सिनेमांच्या ऑफर्स त्यांना आलेल्या होत्या. मात्र त्यांच्या मृत्यूनं पुढचा सगळा अभिनयाचा प्रवासच थांबवला.
माहिती सेवा ग्रूप पेठवडगांवतर्फे त्यांना भावपुर्ण श्रध्दांजली.
0
Answer link
अरुण सरनाईक (१९३५ - १६ ऑक्टोबर १९८४) हे एक मराठी चित्रपट अभिनेते होते. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले. त्यांचे काही प्रसिद्ध चित्रपट खालीलप्रमाणे:
- सिंहासन (१९७९)
- एक गाव एक पानवठा (१९८०)
- लक्ष्मी (१९७८)
- Tambdi Maati (१९६९)
- Bangarwadi (१९९५)
अरुण सरनाईक यांच्या विषयी अधिक माहिती:
IMDb
IMDb