भारतीय गणिततज्ञ कोण?
आर्यभट :
आर्यभट ह्यांना भारतातील पहिले गणितज्ञ मानले जाते. ५ व्या शतकात त्यांनी हा सिद्धांत मांडला होता की पृथ्वी गोल आहे, आणि ती सूर्याभोवती परिक्रमा घालते. त्यांनी हे देखील सांगितले होते की, हे करताना पृथ्वीला ३६५ दिवसांचा कालावधी लागतो.
त्यांच्याच नवे भारताचा पहिला उपग्रह आर्यभट ह्याचे नावं देण्यात आले होते.
श्रीनिवास रामानुजन :
महान गणितज्ञ म्हणून ख्याती असलेले श्रीनिवास रामानुजन ह्यांनी एकेकाळी त्यांची शाळा सोडली होती. ते शाळेत असताना जेव्हा ते इंग्रजी ह्या विषयात नापास झाले तेव्हा त्यांनी त्यांची शाळा तिथेच सोडली. ह्यानंतर त्यांनी गणितात आपली रुची ओळखली आणि त्याच्या आधारे जगभर प्रसिद्धी मिळविली.
त्यांनी गणिताचे १२० थेरम्स दिले. ज्यासाठी केंब्रिज विश्वविद्यालयातून त्यांना निमंत्रण पाठविण्यात आले. त्यांनी अॅनालिटिकल थिअरी ऑफ नंबर्स, एलिप्टिकल फंक्शन आणि इनफाइनाइट सिरिज वर बरचसं काम केलं.
शकुंतला देवी :
भारताची पहिली आणि सर्वात प्रसिद्ध महिला गणितज्ञ शकुंतला देवी. त्यांना ‘मानवी कॉम्पुटर’ देखील म्हटले जाते. कारण त्या कॅलक्यूलेटर न वापरता गणिताचे मोठ-मोठे कॅलक्यूलेशन्स करायच्या. ६ वर्षांच्या वयात त्यांनी भारतातील मोठ-मोठ्या विश्वविद्यालयांमध्ये आपल्या कौशल्याचे नमुने सादर केले होते.
त्यांचे नवे अनेक वर्ल्ड रेकॉर्ड आहेत. त्यांनी जगातील सर्वात गतिमान कॉम्पुटर येण्याआधी ५० सेकंदात २०१ चा २३ वा रूट काढून आणि हा रेकॉर्ड आपल्या नावे केला होता.
सी आर राव :
सी आर राव ह्यांना आपण सर्व जाणतो, ते त्यांच्या ‘थिअरी ऑफ इस्टीमेशन’ ह्यासाठी प्रसिद्ध आहेत.
सी आर राव ह्यांचा जन्म कर्नाटक राज्यात झाला, ते १० बहीण-भावांमध्ये ८ वे होते. आंध्र विश्वविद्यालयात त्यांनी गणितात एम.ए ची पदवी घेतली. आणि त्यानंतर कोलकोता येथील विश्वविद्यालयातून स्टॅटेस्टीक्स मध्ये देखील एम.ए. पदवीत गोल्ड मिळवले.
त्यांनी एकूण १४ पुस्तकं लिहिली. तसेच मोठ्या जर्नल्समध्ये त्यांचे ३५० रिसर्च पेपर छापून आले आहेत. त्यांची काही पुस्तकं युरोपियन, चीनी आणि जपानी भाषेत भाषांतरीत करण्यात आली आहेत. तर १८ देशांच्या विश्वविद्यालयांनी त्यांनी डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानित केले आहे.
सी एस शेषाद्री :
सी एस शेषाद्री ह्यांनी अलजेब्रिक जीओमेट्रीमध्ये खूप काम केले आहे. मद्रास विश्वविद्यालयातून गणित ह्या विषयात पदवी घेतल्यानंतर त्यांनी बॉम्बे विश्वविद्यालयातून पीएचडी पूर्ण केलं. ह्याव्यतिरिक्त त्यांनी शेषाद्री कॉन्सटेंट आणि नराईशम-शेषाद्री कॉन्सटेंट ह्यांचा शोध देखील लावला आहे. ह्यासाठी त्यांना २००९ साली पद्मभूषण ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
भारतीय गणिततज्ञ वर्गवारीत
बौधयाना (७०० B.C.)
आपस्तम्ब (६०० B.C.)
पाणिनी (५०० B.C.)
ऊमास्वाति (१५० B.C.)
पहिला आर्यभट्ट (४७६- ५५० A.D.)
वराहमिहिर (ca. ५०५-५५८)
ब्रह्मगुप्त (ca. ५९८-६७०)
गोविंदस्वामि (ca. ८००-८५०)
महावीर (महवीराचार्य) (८५०)
प्रुथुदाकस्वामि (८५०)
श्रिधर (९००)
मन्जुल (९३०)
आर्यभट्ट II (९५०)
प्रशस्तिधर (इ.स. ९५८)
हलायुध (इ.स. ९७५)
जयदेव (इ.स. १०००)
श्रिपति (इ.स. १०३९)
हेमचन्द्र सुरी (इ.स. १०८९)
भास्कराचार्य(भास्कर) (इ.स. १११४-११८५)
कांगदेव (इ.स. १२०५)
माधव (संगमग्राम) (१३४०-१४२५)
नारायम पंडित (इ.स. १३५०)
परमेश्वर (१३६०-१४५५)
निळकंठ सोमयजि (१४५५-१५५५)
शंकर वरीआर (१५००-१५६०)
नारायण (१५००-१५७५)
ज्येष्ठदेव (इ.स. १५५०)
अच्युत पिसरति (१५५०-१६२१)
पुतुमान सोमयाजी (१६६०-१७४०)
जगन्नाथ पंडित (इ.स. १७००)
शंकर वर्मन (इ.स. १८००)
भारतामध्ये अनेक महान गणितज्ञ होऊन गेले, त्यापैकी काही प्रमुख गणितज्ञांची नावे खालीलप्रमाणे आहेत:
-
आर्यभट्ट:
आर्यभट्ट हे प्राचीन भारतामधील एक महान गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ होते. त्यांनी 'आर्यभटीय' नावाचा ग्रंथ लिहिला, ज्यात गणित आणि खगोलशास्त्रातील अनेक महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत.
उदाहरणे: पाय (π) ची किंमत आणि त्रिकोणमिती (Trigonometry)
-
ब्रह्मगुप्त:
ब्रह्मगुप्त हे एक भारतीय गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ होते. त्यांनी 'ब्रह्मस्फुट सिद्धांत' नावाचा ग्रंथ लिहिला, ज्यात शून्य (zero) आणि ऋण संख्या (negative numbers) यांचा वापर केला गेला आहे.
-
भास्कर II (भास्कराचार्य):
भास्कर II हे 12 व्या शतकातील एक भारतीय गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ होते. त्यांनी 'सिद्धांत शिरोमणी' नावाचा ग्रंथ लिहिला, ज्यामध्ये लीलावती (गणित), बीजगणित, ग्रहगणित आणि गोलध्याय यांसारख्या विषयांचा समावेश आहे.
-
श्रीनिवास रामानुजन:
श्रीनिवास रामानुजन हे आधुनिक भारतातील एक महान गणितज्ञ होते. त्यांनी संख्या सिद्धांत, अनंत मालिका आणि गणितीय विश्लेषण यांसारख्या क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले.