Topic icon

गणितज्ञ

4
असे म्हटलं जाते की, "गणित हे विज्ञानाचे साधन आहे'. गणिताशिवाय आपण कोणतेच वैज्ञानिक संशोधन पूर्ण करू शकत नाही. जगाला शुन्याची देणगी देणार्या भारत देशात प्राचीन काळापासूनच गणिताचा अभ्यास होत आला आहे. नुकताच जगभरात ‘वर्ल्ड पाय डे’ साजरा झाला. ‘पाय’ची किंमत हा प्रकार गणित शिकलेल्या प्रत्येकाला माहिती असेलच. त्यावरूनच हा ‘पाय दिवस’ साजरा केला जातो. यानिमित्त भारतातील काही प्रसिद्ध प्राचीन आणि अर्वाचीन गणितज्ज्ञांची माहिती...
*🔹प आर्यभट*
 :इसवी सन 476 ते 550 हा आर्यभटांचा काळ. ते एक महान गणितज्ज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ होते. अवघ्या 23 व्या वर्षीच त्यांनी ‘आर्यभटीय’ हा ग्रंथ लिहिला. त्यामध्ये गणिताची अनेक सूत्रे व सिद्धांत मांडलेले आहेत. त्यांचा ‘आर्यसिद्धांत’ हा ग्रंथही प्रसिद्ध आहे.
╔══╗
╚══╝
▄ █ ▄ █ ▄ ▄ █ ▄ █ ▄ █
_*❗माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव*❗_
*♦प ब्रह्मगुप्त* : इसवी सन 598 ते668 हा ब्रह्मगुप्त यांचा काळ.त्यांनी गणित विषयावर ‘ब्रह्मस्फुट सिद्धांत’ हा ग्रंथ लिहिला. गणितीय क्रियांमध्ये शुन्याचा वापर करणारे ते पहिले गणितज्ज्ञ होते, असे मानले जाते. त्यांच्या ग्रंथांमधून अनेक गणितीय सूत्रे व सिद्धांत पाहायला मिळतात, जे आधुनिक काळात अत्यंत महत्त्वाचे ठरले.
*🔹प भास्कराचार्य-1 :* इसवी सनाच्या सातव्या शतकातील भास्कराचार्यांच्या जीवनाविषयी कमी माहिती उपलब्ध आहे. मात्र, ते एक मराठीगणितज्ज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ होते असे काहींचे मत आहे.त्यांनीच शुन्याचा वापर करून भारतीय दशमान पद्धती अधिक रूढ केली, असे मानले जाते. भास्कराचार्य आणि ब्रह्मगुप्त यांनी भारतीय गणितशास्त्राला मोठे योगदान दिले.
*♦प भास्कराचार्य-2 :* बाराव्या शतकातील हे भास्कराचार्य कर्नाटकातील होते, असे म्हटले जाते. त्यांनीच प्रसिद्ध ‘सिद्धांत शिरोमणी’ हा गणित विषयावरील ग्रंथ लिहिला. त्याचा एक भाग म्हणजे ‘लीलावती’. पाश्चात्यांच्या अनेक शोधांपूर्वीच भास्कराचार्यांनी महत्त्वाचे सिद्धांत मांडलेले होते. 
http://bit.ly/3vxMUy2
*🔸श्रीनिवास रामानुजन*
 :रामानुजन यांना गणित विषयाचा मोठाच ध्यास होता व त्यामुळे शालेय जीवनात त्यांचे अन्य विषयांकडे दुर्लक्ष होत असे. त्यांनी गणिताचे 120 सिद्धांतमांडले. त्यांची गणित विषयातील मोलाची कामगिरी पाहून केम्ब्रिज विद्यापीठाने त्यांना आमंत्रित केले होते. ‘अॅनालिटिकल थिअरी ऑफ नंबर्स’,‘एलिप्टिकल फंक्शन’ आणि ‘इनफायनाईट सिरिज’वर त्यांनी महत्त्वाचे काम केले.
*♦प शकुंतला देवी*
 :या भारतातील आजपर्यंतच्या सर्वात प्रसिद्ध महिला गणितज्ज्ञ आहेत. त्यांना ‘मानवकॉम्प्युटर’ही म्हटले जाई. अत्यंत किचकट गणिती क्रियाही त्या कॅल्क्युलेटर शिवाय करून दाखवत. वयाच्या केवळ सहाव्या वर्षीच त्यांनी आपल्या गणिताच्या ज्ञानाने लोकांना दीपवून टाकले होते. त्यांच्या नावावर अनेक विक्रम आहेत. जगातील सर्वात वेगवान संगणकाच्या आधीच अवघ्या 50 सेकंदांमध्ये त्यांनी 201 चे 23 वे मूळ काढून दाखवले होते. 
*♦प सी.आर. राव ः* ‘थेअरी ऑफ इस्टिमेशन’साठी राव यांची ख्याती आहे. कर्नाटकात त्यांचा जन्म झाला आणि आंध्र विद्यापीठातून त्यांनी गणितात पदव्युत्तर पदवी संपादन केली. कोलकता विद्यापीठातून त्यांनी स्टॅटिस्टिक्समधील एम.ए. पदवी सुवर्णपदकासह मिळवली. त्यांनी 14 पुस्तके लिहिली असून मोठ्या नियतकालिकांमध्ये त्यांचे 350 रिसर्च पेपर प्रसिेत.
माहिती सेवा ग्रूप ग्रूप पेठवडगाव 
 *🔹प सी.एस. शेषरावरी* :शेषाद्री यांनी अल्जेब्रीक जॉमिट्रीमध्ये बरेच योगदान दिले. मद्रास विद्यापीठात त्यांनी गणित विषय घेऊन पदवी घेतली. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून त्यांनी पीएच.डी. केली. शेषाद्री कॉन्सटेंट आणि नराईशम-शेषाद्री कॉन्सटेंट हे त्यांचे संशोधन कार्य. 2009 मध्ये त्यांना ‘पद्मभूषण’ने सन्मानित करण्यात आले.
------------------------------------------
९८९०८७५४९८
_*✍माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव*_
8
गणित हा तसा तर खूप रोचक विषय आहे पण तो ज्याला कळाला त्यासाठीचं तो रोचक ठरतो हे दुर्दैव आहे. पण ज्यांना हा विषय समजला त्यांच्या बुद्धिमत्तेला विशेष दर्जा प्राप्त असतो असेच म्हणावे लागेल. आपल्या देशाला देखील गणितज्ञांचा वारसा लाभला आहे. ज्यांनी आपल्या देशालाच नाही तर जगाला गणिताचे धडे दिले. आज त्याच गणितज्ञांचे स्मरण आपण करणार आहोत.

आर्यभट :

आर्यभट ह्यांना भारतातील पहिले गणितज्ञ मानले जाते. ५ व्या शतकात त्यांनी हा सिद्धांत मांडला होता की पृथ्वी गोल आहे, आणि ती सूर्याभोवती परिक्रमा घालते. त्यांनी हे देखील सांगितले होते की, हे करताना पृथ्वीला ३६५ दिवसांचा कालावधी लागतो.

त्यांच्याच नवे भारताचा पहिला उपग्रह आर्यभट ह्याचे नावं देण्यात आले होते.

श्रीनिवास रामानुजन :

महान गणितज्ञ म्हणून ख्याती असलेले श्रीनिवास रामानुजन ह्यांनी एकेकाळी त्यांची शाळा सोडली होती. ते शाळेत असताना जेव्हा ते इंग्रजी ह्या विषयात नापास झाले तेव्हा त्यांनी त्यांची शाळा तिथेच सोडली. ह्यानंतर त्यांनी गणितात आपली रुची ओळखली आणि त्याच्या आधारे जगभर प्रसिद्धी मिळविली.

त्यांनी गणिताचे १२० थेरम्स दिले. ज्यासाठी केंब्रिज विश्वविद्यालयातून त्यांना निमंत्रण पाठविण्यात आले. त्यांनी अॅनालिटिकल थिअरी ऑफ नंबर्स, एलिप्टिकल फंक्शन आणि इनफाइनाइट सिरिज वर बरचसं काम केलं.

शकुंतला देवी :

भारताची पहिली आणि सर्वात प्रसिद्ध महिला गणितज्ञ शकुंतला देवी. त्यांना ‘मानवी कॉम्पुटर’ देखील म्हटले जाते. कारण त्या कॅलक्यूलेटर न वापरता गणिताचे मोठ-मोठे कॅलक्यूलेशन्स करायच्या. ६ वर्षांच्या वयात त्यांनी भारतातील मोठ-मोठ्या विश्वविद्यालयांमध्ये आपल्या कौशल्याचे नमुने सादर केले होते.

त्यांचे नवे अनेक वर्ल्ड रेकॉर्ड आहेत. त्यांनी जगातील सर्वात गतिमान कॉम्पुटर येण्याआधी ५० सेकंदात २०१ चा २३ वा रूट काढून आणि हा रेकॉर्ड आपल्या नावे केला होता.

सी आर राव :

सी आर राव ह्यांना आपण सर्व जाणतो, ते त्यांच्या ‘थिअरी ऑफ इस्टीमेशन’ ह्यासाठी प्रसिद्ध आहेत.

सी आर राव ह्यांचा जन्म कर्नाटक राज्यात झाला, ते १० बहीण-भावांमध्ये ८ वे होते. आंध्र विश्वविद्यालयात त्यांनी गणितात एम.ए ची पदवी घेतली. आणि त्यानंतर कोलकोता येथील विश्वविद्यालयातून स्टॅटेस्टीक्स मध्ये देखील एम.ए. पदवीत गोल्ड मिळवले.

त्यांनी एकूण १४ पुस्तकं लिहिली. तसेच मोठ्या जर्नल्समध्ये त्यांचे ३५० रिसर्च पेपर छापून आले आहेत. त्यांची काही पुस्तकं युरोपियन, चीनी आणि जपानी भाषेत भाषांतरीत करण्यात आली आहेत. तर १८ देशांच्या विश्वविद्यालयांनी त्यांनी डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानित केले आहे.

सी एस शेषाद्री :

सी एस शेषाद्री ह्यांनी अलजेब्रिक जीओमेट्रीमध्ये खूप काम केले आहे. मद्रास विश्वविद्यालयातून गणित ह्या विषयात पदवी घेतल्यानंतर त्यांनी बॉम्बे विश्वविद्यालयातून पीएचडी पूर्ण केलं. ह्याव्यतिरिक्त त्यांनी शेषाद्री कॉन्सटेंट आणि नराईशम-शेषाद्री कॉन्सटेंट ह्यांचा शोध देखील लावला आहे. ह्यासाठी त्यांना २००९ साली पद्मभूषण ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

भारतीय गणिततज्ञ वर्गवारीत

बौधयाना (७०० B.C.)
आपस्तम्ब (६०० B.C.)
पाणिनी (५०० B.C.)
ऊमास्वाति (१५० B.C.)
पहिला आर्यभट्ट (४७६- ५५० A.D.)
वराहमिहिर (ca. ५०५-५५८)
ब्रह्मगुप्त (ca. ५९८-६७०)
गोविंदस्वामि (ca. ८००-८५०)
महावीर (महवीराचार्य) (८५०)
प्रुथुदाकस्वामि (८५०)
श्रिधर (९००)
मन्जुल (९३०)
आर्यभट्ट II (९५०)
प्रशस्तिधर (इ.स. ९५८)
हलायुध (इ.स. ९७५)
जयदेव (इ.स. १०००)
श्रिपति (इ.स. १०३९)
हेमचन्द्र सुरी (इ.स. १०८९)
भास्कराचार्य(भास्कर) (इ.स. १११४-११८५)
कांगदेव (इ.स. १२०५)
माधव (संगमग्राम) (१३४०-१४२५)
नारायम पंडित (इ.स. १३५०)
परमेश्वर (१३६०-१४५५)
निळकंठ सोमयजि (१४५५-१५५५)
शंकर वरीआर (१५००-१५६०)
नारायण (१५००-१५७५)
ज्येष्ठदेव (इ.स. १५५०)
अच्युत पिसरति (१५५०-१६२१)
पुतुमान सोमयाजी (१६६०-१७४०)
जगन्नाथ पंडित (इ.स. १७००)
शंकर वर्मन (इ.स. १८००)
उत्तर लिहिले · 13/6/2020
कर्म · 6740
2
*⭕ आपल्या देशातील प्रसिद्ध गणितज्ज ⭕*

❏ जगाला शुन्याची देणगी देणार्या भारत देशात प्राचीन काळापासूनच गणिताचा अभ्यास होत आला आहे. नुकताच जगभरात ‘वर्ल्ड पाय डे’ साजरा झाला. ‘पाय’ची किंमत हा प्रकार गणित शिकलेल्या प्रत्येकाला माहिती असेलच. त्यावरूनच हा ‘पाय दिवस’ साजरा केला जातो. यानिमित्त भारतातील काही प्रसिद्ध प्राचीन आणि अर्वाचीन गणितज्ज्ञांची माहिती...
*🔹प आर्यभट*
:इसवी सन 476 ते 550 हा आर्यभटांचा काळ. ते एक महान गणितज्ज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ होते. अवघ्या 23 व्या वर्षीच त्यांनी ‘आर्यभटीय’ हा ग्रंथ लिहिला. त्यामध्ये गणिताची अनेक सूत्रे व सिद्धांत मांडलेले आहेत. त्यांचा ‘आर्यसिद्धांत’ हा ग्रंथही प्रसिद्ध आहे.

*♦प ब्रह्मगुप्त : इसवी सन 598 ते668 हा ब्रह्मगुप्त यांचा काळ.त्यांनी गणित विषयावर ‘ब्रह्मस्फुट सिद्धांत’ हा ग्रंथ लिहिला. गणितीय क्रियांमध्ये शुन्याचा वापर करणारे ते पहिले गणितज्ज्ञ होते, असे मानले जाते. त्यांच्या ग्रंथांमधून अनेक गणितीय सूत्रे व सिद्धांत पाहायला मिळतात, जे आधुनिक काळात अत्यंत महत्त्वाचे ठरले.
*🔹प भास्कराचार्य-1 :* इसवी सनाच्या सातव्या शतकातील भास्कराचार्यांच्या जीवनाविषयी कमी माहिती उपलब्ध आहे. मात्र, ते एक मराठीगणितज्ज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ होते असे काहींचे मत आहे.त्यांनीच शुन्याचा वापर करून भारतीय दशमान पद्धती अधिक रूढ केली, असे मानले जाते. भास्कराचार्य आणि ब्रह्मगुप्त यांनी भारतीय गणितशास्त्राला मोठे योगदान दिले.
*♦प भास्कराचार्य-2 : बाराव्या शतकातील हे भास्कराचार्य कर्नाटकातील होते, असे म्हटले जाते. त्यांनीच प्रसिद्ध ‘सिद्धांत शिरोमणी’ हा गणित विषयावरील ग्रंथ लिहिला. त्याचा एक भाग म्हणजे ‘लीलावती’. पाश्चात्यांच्या अनेक शोधांपूर्वीच भास्कराचार्यांनी महत्त्वाचे सिद्धांत मांडलेले होते. प *🔸श्रीनिवास रामानुजन*
:रामानुजन यांना गणित विषयाचा मोठाच ध्यास होता व त्यामुळे शालेय जीवनात त्यांचे अन्य विषयांकडे दुर्लक्ष होत असे. त्यांनी गणिताचे 120 सिद्धांतमांडले. त्यांची गणित विषयातील मोलाची कामगिरी पाहून केम्ब्रिज विद्यापीठाने त्यांना आमंत्रित केले होते. ‘अॅनालिटिकल थिअरी ऑफ नंबर्स’,‘एलिप्टिकल फंक्शन’ आणि ‘इनफायनाईट सिरिज’वर त्यांनी महत्त्वाचे काम केले.
*♦प शकुंतला देवी*
:या भारतातील आजपर्यंतच्या सर्वात प्रसिद्ध महिला गणितज्ज्ञ आहेत. त्यांना ‘मानवकॉम्प्युटर’ही म्हटले जाई. अत्यंत किचकट गणिती क्रियाही त्या कॅल्क्युलेटर शिवाय करून दाखवत. वयाच्या केवळ सहाव्या वर्षीच त्यांनी आपल्या गणिताच्या ज्ञानाने लोकांना दीपवून टाकले होते. त्यांच्या नावावर अनेक विक्रम आहेत. जगातील सर्वात वेगवान संगणकाच्या आधीच अवघ्या 50 सेकंदांमध्ये त्यांनी 201 चे 23 वे मूळ काढून दाखवले होते.
*♦प सी.आर. राव ः* ‘थेअरी ऑफ इस्टिमेशन’साठी राव यांची ख्याती आहे. कर्नाटकात त्यांचा जन्म झाला आणि आंध्र विद्यापीठातून त्यांनी गणितात पदव्युत्तर पदवी संपादन केली. कोलकता विद्यापीठातून त्यांनी स्टॅटिस्टिक्समधील एम.ए. पदवी सुवर्णपदकासह मिळवली. त्यांनी 14 पुस्तके लिहिली असून मोठ्या नियतकालिकांमध्ये त्यांचे 350 रिसर्च पेपर प्रसिेत.
माहिती सेवा ग्रूप  ग्रूप  पेठवडगाव
*🔹प सी.एस. शेषरावरी* :शेषाद्री यांनी अल्जेब्रीक जॉमिट्रीमध्ये बरेच योगदान दिले. मद्रास विद्यापीठात त्यांनी गणित विषय घेऊन पदवी घेतली. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून त्यांनी पीएच.डी. केली. शेषाद्री कॉन्सटेंट आणि नराईशम-शेषाद्री कॉन्सटेंट हे त्यांचे संशोधन कार्य. 2009 मध्ये त्यांना ‘पद्मभूषण’ने सन्मानित करण्यात आले.