2 उत्तरे
2
answers
जल प्रदूषण म्हणजे काय?
1
Answer link

जलप्रदूषण म्हणजे पाण्याच्या स्रोतांचे प्रदूषण. जलप्रदूषण ही एक मानव निर्मित समस्या आहे.
हवा - पाणी -अन्न या माणसाच्या तीन गरजांपैकी पाणी हि दुसऱ्या क्रमांकाची गरज आहे. आपल्याला पाणी स्वच्छ आणि शुध्द मिळणे हे आरोग्याच्या द्रुष्टीने खुपच महत्त्वाचे आहे. प्रदुषित पाण्यामुळे पोटाचे विकार आणि इतर बरेचसे रोग होतात. पाणी प्रदुषित होण्याची अनेक कारणे आहेत आणि याला सर्वस्वी आपणच जबाबदार आहोत.
ही सर्व जगाला भेडसावणारी पर्यावरणीय गंभीर समस्या आहे. जल प्रदूषणामुळे पाण्यात विशिष्ट गुणधर्मांचे पदार्थ अशा प्रमाणात मिसळले जातात की, त्यामुळे पाण्याच्या नैसर्गिक गुणवत्तेत बदल होऊन ते वापरण्यास अयोग्य ठरते. जल प्रदूषणामुळे सजीवांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतात किंवा पाण्याची चव बिघडते, ते घाणेरडे दिसते वा दुर्गंधीयुक्त होते. मानवी कृती आणि अन्य कारणांमुळे पाण्याच्या नैसर्गिक गुणवत्तेत प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे बदल होतात आणि पाणी कोणत्याही कारणासाठी वापरण्यास अयोग्य ठरते. या पाण्याला प्रदूषित जल म्हणतात. पाण्याचे प्राकृतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म बदलल्याने मानव व जलीय सजीवांवर अपायकारक परिणाम करणारी जल प्रदूषण ही प्रक्रिया आहे. नैसर्गिक पाण्यात एखादा बाह्य पदार्थ अथवा उष्णता यांची भर पडल्यास ते पाणी प्रदूषित होऊन त्याचा मानव, इतर प्राणी आणि जलीय जीव यांना अपाय होतो. जगातील बहुतेक देशांत जल प्रदूषण ही गंभीर समस्या बनली आहे. कॅनडा, चीन, भारत, जपान, रशिया, अमेरिका इ. देशांत ही समस्या तीव्रतेने जाणवते.
जल प्रदूषणाची निरिक्षण:
औद्योगिक वसाहती व कारखान्यांतील रासायनिक पदार्थ कोणत्याही प्रक्रियेविना नदी/नाले व इतर जलस्रोतांमध्ये सोडले जातात.
नदीत कपडे/गुरे धुणे,अंघोळ करणे, भांडी घासणे यामुळे जलप्रदूषण होते.
रासायनिक प्रक्रिया केलेले पाणी पाण्यात मिसळल्याने पाण्यातील मासे मृत पावल्याने पाणी मोठ्या प्रमाणात दूषित होते.
जल प्रदूषणाला शहरीकरण, आणि शहरातील अपुरे सांडपाणी व्यवस्थापन हे महत्वाचे कारण आहे. तसेच रोजच्या वापरातील शरीर स्वच्छता आणि घराची स्वच्छता यासाठी वापरण्यात येणारी विविध रसायने यांचा महत्वाचा भाग आहे.
0
Answer link
जल प्रदूषण म्हणजे काय?
जल प्रदूषण म्हणजे पाण्याच्या नैसर्गिक गुणधर्मांमध्ये मानवी हस्तक्षेपामुळे होणारा बदल. यामुळे पाणी पिण्यायोग्य तसेच शेती, उद्योग आणि इतर उपयोगांसाठी असुरक्षित होते.
- व्याख्या: पाण्यात विषारी पदार्थ मिसळल्याने पाण्याची गुणवत्ता घटते आणि ते वापरण्यासाठी अयोग्य होते, याला जल प्रदूषण म्हणतात.
- कारणे: कारखान्यांतील रासायनिक कचरा, सांडपाणी, शेतीमधील रासायनिक खते आणि कीटकनाशके, प्लास्टिक कचरा, आणि नैसर्गिक आपत्ती (पूर, त्सुनामी) इत्यादी जल प्रदूषणाचे मुख्य कारणे आहेत.
- परिणाम: जल प्रदूषणामुळे मानवी आरोग्य धोक्यात येते. दूषित पाणी प्यायल्याने अनेक रोग होऊ शकतात. जलीय जीवनावर विपरीत परिणाम होतो आणि परिसंस्थेचे संतुलन बिघडते.
जल प्रदूषण कमी करण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया करणे, रासायनिक खतांचा वापर कमी करणे, प्लास्टिकचा वापर टाळणे आणि जलस्रोतांचे संरक्षण करणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी: