पाणी पिणे आरोग्य

माणसाने दररोज किती लिटर पाणी प्यावे?

2 उत्तरे
2 answers

माणसाने दररोज किती लिटर पाणी प्यावे?

3
शारीरिक कष्टाची कामे करत असलेल्या व्यक्तींना दिवसाला दोन ते अडीच लिटर पाण्याची गरज असते. उन्हाळ्यात शरीराला स्वतःहून पाणी हवे असते, मात्र, अन्य ऋतूमध्ये पाणी आठवणीने प्यावे लागते. श्रमिक, गर्भवती स्त्रिया, स्तनपान देणाऱ्या माता यांनी पाणी अधिक प्यावे. वाढत्या वयानुसार शरीरातील पाणी कमी होते.

पाण्याची गरज
खेळाडू व व्यायाम करणाऱ्यांनी प्रत्येक तासाच्या व्यायामाला अतिरिक्त पाणी प्यायला हवे.
उन्हामध्ये प्रवास करणारे वा अधिक श्रमाचे काम करणाऱ्या श्रमिकांनी पाण्यासह लिंबू-मीठ-साखरेचे पाणीही घ्यावे.

पाणी गार हवे की गरम?
आपण गार पाणी पितो, तेव्हा घशामधील तहान कमी होते. गार पाणी हे आतड्यात खूप लवकर शोषले जाते. म्हणूनच तहान भागल्याची संवेदना साध्या पाण्यापेक्षा गार पाण्याने अधिक लवकर जाणवते. फ्रीजमधील खूप थंड पाणी मात्र आरोग्यास तितकेसे हितकारक नाही. यात थोडे साधे पाणी मिळवून माठातल्या पाण्याच्या तापमानाला हे पाणी आणून मग घ्यावे. ज्यांना वरच्यावर कफ होतो, सर्दी-खोकला किंवा दम्याचा त्रास आहे, अशांनी मात्र गार पाणी न पिता साधे किंवा कोमट पाणी प्यावे. आम्लपित्त, लघवीची तक्रार असलेल्यांनी गार पाणी प्यायल्यास चालू शकते. स्थूल व्यक्ती, अपचन, पोटात गॅस होणे, अजीर्ण, आमवात, कंबरदुखी, टी. बी., कफाचे विकार, घशाचे विकार असे त्रास असणाऱ्यांनी कोमट पाणी प्यायची सवय ठेवावी. पाणी हा आपल्या शरीरातील चयापचय क्रियांमध्ये सहभागी असणारा महत्त्वाचा रासायनिक घटक आहे. परंतु, एका निरोगी माणसाने दिवसभरात किती पाणी प्यावे याबाबत अनेक गैरसमज आहेत. मात्र, आहारतज्ज्ञ दिवसभरात किमान आठ ग्लास पाणी प्यावे असे सांगत असतात
आपण पाणी पित असतोच पण चहा, कॉफी, थंड पेये, सोडा आणि निरनिराळ्या प्रकारचे रसही पीत असतो. त्यातूनही आपल्या पोटात पाण्याचा अंश जात असतो. त्यांचा हिशोब केला असता दिवसभरामध्ये १२ ते १५ ग्लास आपल्या पोटात जात असतात.

पाणी कसे हवे?


अर्थातच शुद्ध हवे. आजकाल घरोघरी फिल्टर आले आहेत. त्यामुळे स्वच्छ पाण्याची चिंता कमी झाली आहे. पाणी जंतुविरहीत करायचे असल्यास प्रथम पांढऱ्या स्वच्छ फडक्‍यातून गाळून घेणे. नंतर हे पाणी गरम करण्यास ठेवणे. पाण्याला उकळी आल्यानंतर पुढे दहा मिनिट हे पाणी उकळू द्यावे व त्यानंतर गॅस बंद करून झाकून ठेवावे. हे पाणी सर्वाधिक शुद्ध असते. त्यावर निर्धास्तपणे विसंबून राहता येते.

उत्तर लिहिले · 7/12/2019
कर्म · 34235
0

माणसाने दररोज किती लिटर पाणी प्यावे हे अनेक गोष्टींवर अवलंबून असते, जसे की वय, लिंग, आरोग्य, शारीरिक हालचाल आणि हवामान.

सर्वसाधारणपणे, प्रौढ व्यक्तीला दररोज 2 ते 3 लिटर पाणी पिण्याची शिफारस केली जाते.

तसेच, खालील गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे:

  • जर तुम्ही जास्त शारीरिक हालचाल करत असाल, तर तुम्हाला जास्त पाणी पिण्याची गरज आहे.
  • जर हवामान उष्ण असेल, तर तुम्हाला जास्त पाणी पिण्याची गरज आहे.
  • जर तुम्हाला काही वैद्यकीय समस्या असतील, तर तुमच्या डॉक्टरांशी बोलून तुम्ही किती पाणी प्यावे हे निश्चित करा.

पुरेसे पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत, त्यापैकी काही खालीलप्रमाणे आहेत:

  • शरीरातील तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
  • पचनक्रिया सुधारते.
  • त्वचा निरोगी राहते.
  • शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते.

टीप: जर तुम्हाला तहान लागली असेल, तर नक्कीच पाणी प्या.

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 980

Related Questions

पायाच्या अंगठ्याचा कोपरा दुखत आहे, ते बरे होण्यासाठी कोणते लिक्विड ऑइंटमेंट (liquid ointment) त्यावर सोडावे?
इलायचीचे फायदे काय?
इलायचीचे फायदे काय आहेत?
शिर्डीमध्ये मोफत उपचार केले जातात का, काही माहिती मिळणार का?
कुत्रा चावल्यावर काय खावे?
शरीरातील साखर वाढल्यास कोणती लक्षणे दिसतात?
ब्रह्मचर्य पालन केल्यास किती दिवसात फरक दिसतो व कशाप्रकारे हालचाली दिसतात?