अंधश्रद्धा अध्यात्म पूजा धार्मिक विधी

त्र्यंबकेश्वर (नाशिक) येथे होत असलेले कालसर्प दोष, नारायण नागबली वगैरे विधी हे काय आहे व ते करायला पाहिजे का?

3 उत्तरे
3 answers

त्र्यंबकेश्वर (नाशिक) येथे होत असलेले कालसर्प दोष, नारायण नागबली वगैरे विधी हे काय आहे व ते करायला पाहिजे का?

9
हे विधी काय आहेत
१ नारायणबली : ‘दुर्मरणाने मेलेल्या किंवा आत्महत्या केलेल्या माणसाचे क्रियाकर्मांतर न झाल्यामुळे त्याची प्रेतत्वनिवृत्ती झाली नसेल, तर त्याच्या लिंगदेहाला गती न मिळाल्यामुळे तो भटकत रहातो. असा लिंगदेह कुलाच्या संततीला प्रतिबंध करतो. तसेच कोणत्याही प्रकारे वंशजांना त्रास देतो. अशा लिंगदेहाला गती देण्यासाठी नारायणबली करावा असे सुचवले जाते
२ नागबली: घराण्यात पूर्वी कोणत्याही पूर्वजाकडून नागाची हत्या झाली असल्यास त्या नागाला गती न मिळाल्यामुळे तो कुलाच्या संततीला प्रतिबंध करतो. तसेच अन्य प्रकारे वंशजांना त्रास देतो. या दोषाच्या निवारणासाठी हा विधी करतात.
नारायणबली व नागबली हे एकाच कामनेसाठी सांगितले असल्याने दोन्ही विधी बरोबर करण्याची प्रथा आहे. नारायण-नागबली असे या विधीचे जोडनाव यामुळेच रूढ झाले आहे.
३. कालसर्प योग : कुंडलीत सर्व ग्रह राहू केतू यांच्या मध्ये येत असतील तर तो काल सर्प योग मानतात.

तुमचा पुढचा प्रश्न , हे विधी करावेत का? माझा या विषयावर अभ्यास नाही. ते  लाभकारक ठरत असतील असं मला वाटत नाही.

तुम्ही कुठल्या अडचणीत असाल तर बाहेर पडण्यासाठी अनेक मार्ग असतात, ते मार्गाचा अवलंब करा, मनोबल वाढवण्यासाठी तुम्ही नामस्मरण, पूजा अर्चना करू शकता.


उत्तर लिहिले · 3/1/2019
कर्म · 99520
3
 तुम्हाला मी केलेल्या एका ढोबळ Survey चे अनुमान सांगतो. मी बोललेल्या शंभर लोकां पैकी ७० ते ८० टक्के लोकांनी केवळ घाबरून त्रंबकेश्वर ची वारी या पूजे साठी केली आणि त्यातील ९० टक्के लोकांना नंतर असे वाटले कि ते त्यांनी उगाच केले. तिथे गेल्यावर येणारे अनुभव (पाचशे लोक एकाचवेळी बाजूबाजूला गर्दीत बसून केलेल्या पूजा, कोणाचा कोणाला मेळ नाही,  आजूबाजूला असणाऱ्या घाणीचे साम्राज्य, प्रत्येक गोष्टीत काढले जाणारे हजारोंनि रुपये, तेथील बाजारीकरण...यादी फार मोठी आहे ) हे सगळे खरंतर तुम्हाला आतून सांगत असते कि हे काही खरं नाही, पण भीती हि गोष्ट अशी आहे कि माणूस म्हणतो उद्या कोणी म्हणायला नको कि हि पूजा केली नाही म्हणून नुकसान झाले. पूजा करून किती लोकांना खरंच फायदा झाला हे गणित छापा काट्यामध्ये छापा किती वेळा पडेल असेच आहे. ज्योतिषाचा आणि तेथील लोकांचा संपूर्ण व्यवसायच असा लोकांना घाबरवून चालत आहे. तुम्ही त्याला बळी पडू नका.

देवावर विश्वास असेल तर तुमच्या आवडत्या मंदिरात जाऊन मनापासून कळकळून विनंती करा. देव आहे कि नाही कोणाला माहिती नाही पण तो असेल तर ती विनंती पोचेल, तो असला तरी तो खरंच आपल्याला materialistic गोष्टीसाठी मदत करतो का? करत असेल तर कधी करतो आणि कधी नाही हे लॉजिक आपल्याला माहिती नाही पण तुमची case त्या लॉजिक मध्ये बसणारी असेल तर तुम्हाला मदत मिळेल. त्यासाठी खर्च करून अमुक ठिकाणी जायला पाहिजे असे नाही.

आता सगळ्यात शेवटी आणि महत्वाचे, ज्या पत्रिके वरून तुम्हाला सांगितले आहे कि अमुक योग आहेत आणि अमुक पूजा करा हे तरी खरे आहे का? आजतागायत ते कधीहि सिद्ध झालेले नाही. त्याउलट ते कसे खरे नाही हे आम्ही स्वतः शास्त्रोक्त प्रयोग करून, हजारो पत्रिका घेऊन सिद्ध केलेले आहे. जर ग्रह पत्रिका हेच खरे नसेल तर त्यात असणारे घाबरावणरे योग पण खरे नाहीत. तेव्हा तुम्ही हि भीती मनातून पूर्ण काढून टाका. इथे मी दिलेली इतर उत्तरे बघा, माझा  ज्योतिष शास्त्र खरे आहे का नाही हा इथे दिलेला विडिओ बघा. तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील.

उत्तर लिहिले · 20/11/2022
कर्म · 530
0
त्र्यंबकेश्वर, नाशिक येथे कालसर्प दोष, नारायण नागबली इत्यादी विधी केले जातात. त्याबद्दलची माहिती आणि ते करायला पाहिजेत का, याबद्दल काही माहिती खालीलप्रमाणे:

कालसर्प दोष:

  • कालसर्प दोष म्हणजे जेव्हा कुंडलीमध्ये सर्व ग्रह राहु आणि केतू यांच्या दरम्यान येतात, तेव्हा हा दोष निर्माण होतो.
  • असे मानले जाते की या दोषामुळे व्यक्तीला जीवनात अनेक अडचणी येतात, जसे की आरोग्य समस्या, आर्थिक नुकसान आणि वैवाहिक जीवनात समस्या.
  • त्र्यंबकेश्वर हे कालसर्प दोषाच्या निवारणासाठी प्रसिद्ध आहे.

नारायण नागबली:

  • नारायण नागबली विधी पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी केला जातो.
  • असे मानले जाते की जेव्हा कुटुंबातील सदस्यांचा मृत्यू होतो आणि त्यांची योग्य प्रकारे अंत्यसंस्कार क्रिया केली जात नाही, तेव्हा पितृदोष निर्माण होतो.
  • या दोषामुळे कुटुंबात अशांती आणि प्रगतीमध्ये अडथळे येतात.
  • नारायण नागबली विधी त्र्यंबकेश्वरमध्ये विशेषतः केला जातो, ज्यामुळे पितृदोषातून मुक्ती मिळते, अशी मान्यता आहे.

हे विधी करायला पाहिजेत का?

  • हे विधी करायचे की नाही, हे ज्या व्यक्तीला दोष आहे असे वाटते त्यांच्या श्रद्धेवर अवलंबून असते.
  • ज्योतिषशास्त्रानुसार, जर कुंडलीमध्ये दोष असेल आणि त्याचे निवारण करणे आवश्यक असेल, तर हे विधी केले जाऊ शकतात.
  • परंतु, हे विधी करणे अनिवार्य नाही. ते पूर्णपणे तुमच्या इच्छेवर आणि श्रद्धेवर अवलंबून असते.

अधिक माहितीसाठी:

* त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट: www.trimbakeshwar.org

Disclaimer: येथे दिलेली माहिती धार्मिक आणि ज्योतिषीय मान्यतेवर आधारित आहे. त्यामुळे, कोणताही विधी करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घेणे उचित राहील.

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 1220

Related Questions

विड्याच्या पानांना देवपूजेत महत्त्व का आहे?
कुलदैवताच्या आरत्या कधी लावतात?
गणपती पाण्यात विसर्जित का करतात?
वटपौर्णिमेला वडाचे झाड आणि केवळ वडाची फांदी यांच्या पूजनातील भेद कोणता आहे?
पूजा किंवा विधी करताना देव तांदुळावरच का मांडतात?
पूजा झाल्यानंतर ब्राह्मणाला सर्व शिधा (सामान) का दिले जाते?
औक्षण का व कसे करावे? यामागे काय शास्त्र आहे?