आयुष्य अध्यात्म रूढी परंपरा पूजा मोक्ष

मनुष्याला मरणानंतर मोक्ष मिळतो म्हणजे त्याचा पुनर्जन्म होत नाही हे खरे आहे का?

3 उत्तरे
3 answers

मनुष्याला मरणानंतर मोक्ष मिळतो म्हणजे त्याचा पुनर्जन्म होत नाही हे खरे आहे का?

14
वरील सरांनी खुप छान उत्तर दिले आहे.
मोक्ष सहज मिळत नाही. मोक्ष प्राप्त करण्याचे दोन मार्ग आहेत.
पहिला मार्ग ज्ञान आणि दुसरा मार्ग भक्ति होय. कलियुगात भक्तिद्वारे मनुष्य सहज मोक्ष प्राप्त करून भवसागर तरुण जाऊ शकतो.
सच्चिदानंद भगवान श्रीकृष्ण जे परब्रह्म आहे. तेच सर्वप्रथम पुरूष आहे. भगवान श्रीकृष्ण आणि राधारानी हे गोलोकधाम मध्ये राहतात. म्हणजे तेच परमधाम आहे. मोक्ष प्राप्त झाल्यानंतर आत्मा गोलोकधाम ला जाते आणि परम आनंदाला प्राप्त होते.
भगवान श्रीकृष्ण पासून अक्षरब्रम्हाची उत्पत्ती होते. अक्षरब्रम्हापासुन अव्याकृतब्रम्ह ची उत्पत्ती होते. अव्याकृतब्रम्ह च्या मनातुन ज्योतीस्वरुप आणि सुमंगला शक्तीची उत्पत्ती होते. सुमंगला शक्ति ज्योतीस्वरुपला प्रेरणा देते की तुम्ही सृष्टी ची रचना करावी. ज्योतीस्वरुप पासुन मोहसागरची उत्पत्ती होते. मोहसागरात करोडो सुवर्ण अंड्याची निर्मीती होते. करोडो वर्षांनंतर त्या सुवर्ण अंड्यातुन महाविष्णू ची उत्पत्ती होते. करोडो महाविष्णू ची उत्पत्ती होते. त्यातील एका महाविष्णू ला समजुन घेतले की बाकीचे सर्व तसेच आहे. महाविष्णू ला आदिनारायण, कारोणदकशायी विष्णु , तसेच क्षर पुरूष म्हणतात. एका महाविष्णू पासुन अनंत ब्रम्हांड ची उत्पत्ती होते. त्यातील एका ब्रम्हांडला समजुन घेतले की बाकीचे सर्व तसेच आहे. एका ब्रम्हांड मध्ये एक विराट स्वरुप असते. तर बाकीच्या ब्रम्हांड मध्ये दुसरे विराट पुरूष असतात आणि बाकिच्या सुवर्ण अंड्यातून बाकीचे महाविष्णू.
एका ब्रम्हांड मध्ये एक विराट पुरूष. एका विराट पुरूष मध्ये 14 लोक असतात. सर्वात खाली गर्भोदकशायी विष्णु असतात जे जीवन प्रदान करतात. गर्भोदकशायी विष्णु पाताल मध्ये राहतात.
त्यावर 6 लोक आहेत. आणि पृथ्वीच्या वर 7 लोक आहेत.
गर्भोदकशायी विष्णु च्या नाभीकमळातुन ब्रम्हाची उत्पत्ती होते. सर्वात वर सतलोक आहे. जिथे ब्रम्हा विष्णू महेश राहतात. क्षीरोदकशाही विष्णु अवतार घेतात. भगवान श्रीकृष्णाचे गुण अवतार क्षीरोदकशायी विष्णु, कारोणकदकशायी विष्णु, गर्भोकदशायी विष्णु होय.

क्षर से परे अक्षर, अक्षरं से परे अक्षरारतीत.
अक्षरारतीत परब्रह्म सच्चिदानंद भगवान श्रीकृष्ण होय. यांची भक्ति तुम्हाला मोक्ष प्राप्त करून देऊ शकते.

भागवत पुराण, ब्रम्हसंहिता मध्ये तुम्हाला याची माहिती मिळु शकते. मनाने लिहिलं यामुळे मला क्षमा करा. त्यांचे ज्ञान मोठे आहे पण माझं ज्ञान लहान आहे.

उत्तर लिहिले · 31/12/2018
कर्म · 44255
5
हिंदू मान्यतेनुसार प्रत्येक जीव हा परमेश्वराचा अंश आहे। तो मोहामुळे भ्रमित होऊन व्यक्त जिवाच्या रुपात येतो। त्याला ज्या वेळी या गोष्टीचे न्यांन होते तेव्हा तो यातून , शरीराच्या jail मधून बाहेर पडन्य्याचा प्रयत्न करतो। ज्यावेळी या
आपला आयुष्याचा मूळ उद्देश परमानंद, परमेश्वर आहे असे समजते, त्यादृष्टीने प्रयत्न केले जातात त्यावेळी त्या मार्गाने तो जाऊ लागतो।  तो अश्या प्रकारे प्रगती करत जातो तेव्हाच मोक्ष मिळतो। पण हे इतके सोपे नसते।। यात कधी कधी लोक भारक्ततात, काही  ची प्रगती होत असते पण जीवन संपते। अस्या वेळी त्याचे पुनरागमान म्हणजेच जन्म होतो।
उत्तर लिहिले · 31/12/2018
कर्म · 15400
0

तुमच्या प्रश्नाचे उत्तर काही विचार आणि समजुतींवर अवलंबून असते. मोक्ष आणि पुनर्जन्म याबद्दल काही गोष्टी खालीलप्रमाणे:

  1. मोक्ष:

    मोक्ष म्हणजे जीवन-मरणाच्या चक्रातून मुक्ती. जेव्हा एखाद्या व्यक्तीला मोक्ष मिळतो, तेव्हा त्याचा पुनर्जन्म होत नाही, असे मानले जाते.

  2. पुनर्जन्म:

    हिंदू, बौद्ध आणि जैन धर्मांमध्ये पुनर्जन्मावर विश्वास ठेवला जातो. यानुसार, मृत्यूनंतर आत्मा नवीन शरीर धारण करतो. हे चक्र तोपर्यंत सुरू राहते, जोपर्यंत मोक्ष मिळत नाही.

  3. विविध विचार:

    याबद्दल अनेक मतभेद आहेत. काही लोकांचे म्हणणे आहे की मोक्ष मिळवल्यानंतर आत्मा पूर्णपणे विलीन होतो, तर काहीजण याला आत्म्याची अंतिम मुक्ती मानतात.

अधिक माहितीसाठी, आपण धार्मिक ग्रंथ आणि आध्यात्मिक Gurूंनी दिलेली माहिती वाचू शकता.

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 1420

Related Questions

मोक्षावर टीप लिहा?
हिंदू धर्माचे सर्वात श्रेष्ठ अंतिम ध्येय कोणता पुरुषार्थ आहे?
मोक्ष म्हणजे काय?
जन्म आणि मृत्युच्या चक्रातून बाहेर कसे पडावे?