Topic icon

मोक्ष

0

मोक्ष:

मोक्ष, ज्याला मुक्ती किंवा निर्वाण देखील म्हणतात, हा हिंदू, जैन आणि बौद्ध धर्मातील एक महत्त्वाचा आणि अंतिम उद्देश आहे. हे जीवन आणि मृत्यूच्या चक्रातून (संसार) कायमस्वरूपी सुटका मिळवणे आहे. मोक्ष म्हणजे दु:ख आणि पुनर्जन्मातून मुक्ती.

विविध अर्थ:

  • हिंदू धर्म: मोक्ष म्हणजे आत्मज्ञान. आत्मा (स्वतः) आणि ब्रह्म (विश्वाचा आत्मा) यांच्यातील संबंध ओळखणे.
  • जैन धर्म: मोक्ष म्हणजे कर्म आणि आसक्तीतून मुक्ती.
  • बौद्ध धर्म: मोक्ष म्हणजे निर्वाण, तृष्णा आणि अहंकाराचा नाश.

मोक्षाचा मार्ग:

मोक्ष प्राप्त करण्याचे मार्ग धर्मांनुसार बदलतात:
  • ज्ञान मार्ग: ज्ञानाद्वारे सत्य समजून घेणे.
  • भक्ती मार्ग: देवावर प्रेम आणि समर्पण करणे.
  • कर्म मार्ग: चांगले कर्म करणे आणि स्वार्थ त्यागणे.
  • राज योग: योगा आणि ध्यानाद्वारे चित्त शुद्ध करणे.

महत्व:

मोक्ष हा अंतिम ध्येय आहे कारण तो दु:खाचा अंत करतो आणि शाश्वत आनंद देतो.

अधिक माहितीसाठी:

उत्तर लिहिले · 11/6/2025
कर्म · 1420
0
हिंदू धर्मातील सर्वात श्रेष्ठ अंतिम ध्येय मोक्ष आहे, जो पुरुषार्थांपैकी एक आहे.

पुरुषार्थ म्हणजे काय?

पुरुषार्थ म्हणजे मानवी जीवनातील चार ध्येये:
  • धर्म (Duty)
  • अर्थ (Wealth)
  • काम (Desire)
  • मोक्ष (Liberation)

मोक्ष म्हणजे काय?

मोक्ष म्हणजे जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती. हे अंतिम ध्येय आहे, ज्यामध्ये आत्मा परमাত্ম्यामध्ये विलीन होतो.

मोक्ष कसा प्राप्त करायचा?

मोक्ष प्राप्त करण्यासाठी अनेक मार्ग आहेत, जसे की:
  • ज्ञानयोग (मार्ग ज्ञानाचा)
  • भक्तियोग (भक्तीचा मार्ग)
  • कर्मयोग (कर्माचा मार्ग)
  • राजयोग (योगाचा मार्ग)

संदर्भ:

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 1420
14
वरील सरांनी खुप छान उत्तर दिले आहे.
मोक्ष सहज मिळत नाही. मोक्ष प्राप्त करण्याचे दोन मार्ग आहेत.
पहिला मार्ग ज्ञान आणि दुसरा मार्ग भक्ति होय. कलियुगात भक्तिद्वारे मनुष्य सहज मोक्ष प्राप्त करून भवसागर तरुण जाऊ शकतो.
सच्चिदानंद भगवान श्रीकृष्ण जे परब्रह्म आहे. तेच सर्वप्रथम पुरूष आहे. भगवान श्रीकृष्ण आणि राधारानी हे गोलोकधाम मध्ये राहतात. म्हणजे तेच परमधाम आहे. मोक्ष प्राप्त झाल्यानंतर आत्मा गोलोकधाम ला जाते आणि परम आनंदाला प्राप्त होते.
भगवान श्रीकृष्ण पासून अक्षरब्रम्हाची उत्पत्ती होते. अक्षरब्रम्हापासुन अव्याकृतब्रम्ह ची उत्पत्ती होते. अव्याकृतब्रम्ह च्या मनातुन ज्योतीस्वरुप आणि सुमंगला शक्तीची उत्पत्ती होते. सुमंगला शक्ति ज्योतीस्वरुपला प्रेरणा देते की तुम्ही सृष्टी ची रचना करावी. ज्योतीस्वरुप पासुन मोहसागरची उत्पत्ती होते. मोहसागरात करोडो सुवर्ण अंड्याची निर्मीती होते. करोडो वर्षांनंतर त्या सुवर्ण अंड्यातुन महाविष्णू ची उत्पत्ती होते. करोडो महाविष्णू ची उत्पत्ती होते. त्यातील एका महाविष्णू ला समजुन घेतले की बाकीचे सर्व तसेच आहे. महाविष्णू ला आदिनारायण, कारोणदकशायी विष्णु , तसेच क्षर पुरूष म्हणतात. एका महाविष्णू पासुन अनंत ब्रम्हांड ची उत्पत्ती होते. त्यातील एका ब्रम्हांडला समजुन घेतले की बाकीचे सर्व तसेच आहे. एका ब्रम्हांड मध्ये एक विराट स्वरुप असते. तर बाकीच्या ब्रम्हांड मध्ये दुसरे विराट पुरूष असतात आणि बाकिच्या सुवर्ण अंड्यातून बाकीचे महाविष्णू.
एका ब्रम्हांड मध्ये एक विराट पुरूष. एका विराट पुरूष मध्ये 14 लोक असतात. सर्वात खाली गर्भोदकशायी विष्णु असतात जे जीवन प्रदान करतात. गर्भोदकशायी विष्णु पाताल मध्ये राहतात.
त्यावर 6 लोक आहेत. आणि पृथ्वीच्या वर 7 लोक आहेत.
गर्भोदकशायी विष्णु च्या नाभीकमळातुन ब्रम्हाची उत्पत्ती होते. सर्वात वर सतलोक आहे. जिथे ब्रम्हा विष्णू महेश राहतात. क्षीरोदकशाही विष्णु अवतार घेतात. भगवान श्रीकृष्णाचे गुण अवतार क्षीरोदकशायी विष्णु, कारोणकदकशायी विष्णु, गर्भोकदशायी विष्णु होय.

क्षर से परे अक्षर, अक्षरं से परे अक्षरारतीत.
अक्षरारतीत परब्रह्म सच्चिदानंद भगवान श्रीकृष्ण होय. यांची भक्ति तुम्हाला मोक्ष प्राप्त करून देऊ शकते.

भागवत पुराण, ब्रम्हसंहिता मध्ये तुम्हाला याची माहिती मिळु शकते. मनाने लिहिलं यामुळे मला क्षमा करा. त्यांचे ज्ञान मोठे आहे पण माझं ज्ञान लहान आहे.

उत्तर लिहिले · 31/12/2018
कर्म · 44255
1
मोक्ष

मोक्ष म्हणजे ब्रम्हप्राप्ति आणि संसाररूपी बंधाची निवृत्ती यास मोक्ष असे म्हणतात.

संदर्भ : विचार सागर रहस्य ग्रंथ

उत्तर लिहिले · 3/7/2018
कर्म · 1835
13
जन्म आणि मृत्यू हे अटळ गोष्ट आहे, या मध्ये कोणी हि वाचले नाही, ज्याचा जन्म झाला त्याची मृत्यू पण निश्चित आहे, एक ना एक दिवस त्याचा जन्म होतो व मृत्यू होतो हाच प्रकृतीचा नियम आहे, जर तुमाला जन्मा नंतर व मृत्यू च्या आधी परमानंद उपभोगायचा असेल तर या दोन्ही मधला जो कालावधी आहे तो परमार्था मध्ये घाला, दानधर्म करा, गर्जुवंत व गरिबांना जास्तीतजास्त मदत करा, मुक्या प्राण्यावर दया करा, सद्भभावना व सद्वविचार करा, मनामध्ये कोणत्या हि प्रकारचे वाईट विचार अनु नकात, ज्या मुळे तुमी नंतर दुखावले जाल कारण निसर्गाचा एक नियम आहे कि "जसे आपण दुसर्याबरोबर वागतो, किंवा काही काही गोष्टी करतो तसेच आपल्या सोबत घडते"
याचा विचार हमेशा आपण केला पाहिजे, जो आनंद कशामध्ये तो आनंद परमार्था मध्ये आहे, गोरगरिबांना मदत करण्यामध्ये आहे, मुक्या प्राण्यांना जपण्यात आहे, आई बाबा याची सेवा करण्यात आहे, आणि ज्यांनी आई बाबा जाणले त्यांना कोणत्या हि अडचणीला सामोरे जावे लागत नाही त्या मुळे जन्म आणि मृत्यू या चक्रव्हीवा मध्ये वेळ न घालता चालू घडी कशी छान सुंदर बनवता येइल या कडे लक्ष केंद्रित करा
                  ,,,,,,,,,,,,,,,,,धन्यवाद,,,,,,,,,,,,,,,
उत्तर लिहिले · 22/11/2017
कर्म · 12270