3 उत्तरे
3
answers
पारशी धर्माचा धर्मग्रंथ कोणता?
8
Answer link
अवेस्ता हा अग्निपूजक असलेल्या पारशी धर्माचा ग्रंथ आहे. इराण (पर्शिया) आणि आजूबाजूचा प्रदेश यात त्यांचे वास्तव्य होते. इराणचा शब्दशः अर्थ आहे आर्यांची भूमी . वांशिक दृष्ट्या आर्य आणि पर्शियन अगदी जवळचे होते.
प्राचीन काळी म्हणजे ७००० ते ८०००० वर्षांपूर्वी इराणी लोक व वैदिक आर्य एकत्र राहत होते. या वेळी दोन्ही समाजाच आचरण सारखच असाव. या हा काळ वेदांचा रचनाकाल होय. याच काळात कधीतरी झरतुष्ट्र या आजच्या पारसी धर्माचा संस्थापक, प्रेषिताचा जन्म झाला. त्याला परमेश्वराने (याला पारसी लोक अहुर मज्दा म्हणतात) दशर्न देऊन नवीन धर्माची मूलतत्त्वे सांगितली व उपदेश केला. त्या नंतर झरतुष्ट्राने नवीन झरतुष्ट्रीय (पारसी) धर्माचा प्रचार आणि प्रसार केला. या धर्माचा उपदेश त्यांनी गाथांमध्ये लिहून ठेवला. गाथांची मूळ भाषा व वेदकालीन संस्कृत यांत अतिशय साम्य आहे. या नंतर हजारो वर्षे इराणी लोकांवर त्यांच्याच इराणी वंशाच्या राजांची तर कधी परकीय राजघराण्यांची सत्ता चालली. इ.स. पूर्व ३३०मध्ये अलेक्झांडरने इराणीसम्राट दारीउश याचा पराभव करून इराणी साम्राज्याचा पाडाव केला. या वेळी त्याने राजधानी पर्सेपोलीस येथील राजवाडा व इतर अनेक महत्त्वाच्या इमारतींना आगी लावल्या. त्यांत प्राचीन ग्रंथ व साहित्याचे अपरिमित नुकसान झाले. मूळ अवेस्ताचा बराच भाग याच आगीत जळून कायमचा नष्ट झाला. आज आपल्याला दिसतात त्या गाथा व अवेस्ता हे नंतरच्या काळार्त संकलित व लेखन केलेला फार थोडा भाग होय. यानंतर काही काळ इराणी सासानिड घराण्याने इराणवर राज्य केले.
मात्र मुसलमानी रानटी धर्मांध टोळ्यांच्या आक्रमणापुढे अंतर्गत कलहाने खिळखिळ्या झालेल्या यझ्देझार्द च्या राज्याचा इ.स. ६३३मध्ये पाडाव झाला आणि सुरू झाले पारसी संस्कृतीचे निर्दालन. खरोखर मुसलमानी आक्रमणापासून म्हणजे सुमारे इ.स.६३३पासून ते १८व्या शतकापर्यंतचा काळ म्हणजे पारसी धर्म, संस्कृती व समाजाच्या सर्वंकष अवनतीचा नव्हे, सर्वनाशाचा काळ होय. स्वराज्य गेले त्याबरोबरच धर्माला असलेला राजाश्रयही गेला. उलट मुसलमानी धर्मांध जेत्यांनी पारसी समाजापुढे तीन पर्याय ठेवले. इस्लाम स्वीकारा, अथवा काफिरांना द्यावा लागतो जिझिया कर भरा व हे दोन्ही मंजूर नसेल तर (मरेपर्यंत) लढायला तयार व्हा.
पारसी समाजापुढे हा एकप्रकारे त्यांच्या अस्तित्वाचाच प्रश्न होता. नुसता त्यांच्याच अस्तित्वाचा नाही तर जी उदात्त, उच्च जीवनप्रणाली व मूल्ये त्यांनी व त्यांच्या पूर्वजांनी स्वीकारली होती त्यांच्यादेखील. अखेर आपल्याच देशात हतबल झालेल्या पारसी समाजाने धर्मरक्षणासाठी देशांतर करायचे ठरवले. मोठय़ा प्रमाणावर पारसी समाज देशाबाहेर पडला. जो पारसी समाज स्वदेशातच राहिला, त्याला प्रचंड धार्मिक छळ, अवास्तव कर याचा सामना करावा लागला. परिणामी, पुढच्या एक दोन शतकांच्या काळात छळाला कंटाळून, करमुक्तीच्या आशेने इ. विविध कारणांनी बहुसंख्य समाजाने इस्लाम स्वीकारला. सध्याच्या इराणमध्ये सुमारे ७५ लाख लोकसंख्येपैकी केवळ सुमारे ३०००० (०.४ टक्के) लोक पारसी आहेत!
देश सोडून निघालेला पारसी समुदाय मुख्यत: पश्चिमेस युरोप व पूर्वेस भारतात आला. पूर्वेला भारत सगळ्यात जवळ म्हणून किंवा भारताशी पूर्वापार संबंध असल्याने परिचित प्रदेश म्हणून असेल म्हणून किंवा त्यांना येथील सहिष्णु व उदार हिंदू संस्कृतीची माहिती असेल म्हणून कदाचित, पण स्थलांतरित पारसी लोकांचा सगळ्यात मोठा समुदाय हा भारतात आला व पश्चिम किनाऱ्यावरील कराची, भरूच, सुरत, ठाणे, मुंबई इ. बंदरांमध्ये उतरला व आसपासच्या परिसरात स्थायिक झाला.
वेद व अवेस्तामध्ये देवदेवतांविषयक दुवेही पुष्कळ प्रमाणात आहेत. अनेक वैदिक नावांचे उल्लेख अवेस्तामध्ये सापडतात. उदा. (कंसातील अपभ्रंशित/रूपांतरित नावे अवेस्तामधील): देव (दैव), असुर (अहुर), मित्र (मिथ्र), वरुण (वरेण), विवस्वान (विवहवंत), यम (यिम), सोम (होम, हओम), मास (माह), सप्तसिंधू (हप्तहिंदू), सरस्वती (हरहवैती), वसिष्ट (वहिष्ट) हे अजून काही, वेदांतील नद्या (सरस्वती), वनस्पती (सोम), कालगणना (मास), प्रदेश (सप्तसिंधू) यांचे अवेस्तातील उल्लेख.
यज्ञ : पारसी धर्मात प्राचीन यज्ञ संस्कृतीचा अंतर्भाव होतो. परंतु यज्ञातील पशुबळी इ. प्रथा मात्र त्यातून वगळल्या आहेत. वैदिक परंपरेप्रमाणेच पारसी यज्ञात - त्यांना यस्न म्हणतात - एक मुख्य पुरोहित व इतर सहाय्यक पुरोहित असतात. वैदिक यज्ञात १६ पुरोहित असत. पारसी यस्नमध्ये आठ पुरोहित असत. मुख्य पुरोहितास झओतर (होतार (सं.)) म्हणतात. वैदिक ब्राह्मण ग्रंथांप्रमाणेच यस्नाचे विधी व त्यांचे तपशीलवार वर्णन यस्न ग्रंथात आहे.
नौरोझ (नवरोझ) : पारसी नववर्षांदिन पूर्वी नवरोझ म्हणून उत्तर वसंतसंपात दिनी (म्हणजे सूर्य मेष राशीत प्रवेश करतो तेव्हा) साजरा होत असे.वैदिक कालगणनादेखील वसंत संपात बिंदूपासून सुरू होत असे. आजही भारतीय सौर (निरयन) कालगणनेप्रमाणे नवीन वर्ष (चैत्र १) वसंत संपात दिनी (साधारणपणे २१-मार्च ला) सुरू होते.
३. यज्ञ-संस्कृतीचे महत्त्वाचे भाग - सोमाहुती व सोमप्राशन हे अवेस्तामध्येदेखील वर्णन केलेले आहेत. (अवेस्तात त्याला हओम/होम म्हणले आहे)
४. विदैवोदात (ज्याला चुकीने वेन्दिदाद म्हटले जाते) त्या अवेस्ताचा भाग असलेल्या ग्रंथाच्या नवव्या फ्राकार्त मध्ये मृताच्या संपर्कात येऊन अशुद्ध झालेल्या व्यक्तीच्या शुद्धिकरणाचा विधी दिलेला आहे. त्यात पवित्र बैलाच्या मूत्राने (गोमूत्र) शुद्धिकरण करण्याची पद्धती दिलेली आहे. भारतीय हिंदूंत गोमूत्राचे पावित्र्य सर्वश्रुत आहे. फक्त आपल्याकडे गायीचे मूत्र वापरले जाते.
मूळ लेख
प्राचीन काळी म्हणजे ७००० ते ८०००० वर्षांपूर्वी इराणी लोक व वैदिक आर्य एकत्र राहत होते. या वेळी दोन्ही समाजाच आचरण सारखच असाव. या हा काळ वेदांचा रचनाकाल होय. याच काळात कधीतरी झरतुष्ट्र या आजच्या पारसी धर्माचा संस्थापक, प्रेषिताचा जन्म झाला. त्याला परमेश्वराने (याला पारसी लोक अहुर मज्दा म्हणतात) दशर्न देऊन नवीन धर्माची मूलतत्त्वे सांगितली व उपदेश केला. त्या नंतर झरतुष्ट्राने नवीन झरतुष्ट्रीय (पारसी) धर्माचा प्रचार आणि प्रसार केला. या धर्माचा उपदेश त्यांनी गाथांमध्ये लिहून ठेवला. गाथांची मूळ भाषा व वेदकालीन संस्कृत यांत अतिशय साम्य आहे. या नंतर हजारो वर्षे इराणी लोकांवर त्यांच्याच इराणी वंशाच्या राजांची तर कधी परकीय राजघराण्यांची सत्ता चालली. इ.स. पूर्व ३३०मध्ये अलेक्झांडरने इराणीसम्राट दारीउश याचा पराभव करून इराणी साम्राज्याचा पाडाव केला. या वेळी त्याने राजधानी पर्सेपोलीस येथील राजवाडा व इतर अनेक महत्त्वाच्या इमारतींना आगी लावल्या. त्यांत प्राचीन ग्रंथ व साहित्याचे अपरिमित नुकसान झाले. मूळ अवेस्ताचा बराच भाग याच आगीत जळून कायमचा नष्ट झाला. आज आपल्याला दिसतात त्या गाथा व अवेस्ता हे नंतरच्या काळार्त संकलित व लेखन केलेला फार थोडा भाग होय. यानंतर काही काळ इराणी सासानिड घराण्याने इराणवर राज्य केले.
मात्र मुसलमानी रानटी धर्मांध टोळ्यांच्या आक्रमणापुढे अंतर्गत कलहाने खिळखिळ्या झालेल्या यझ्देझार्द च्या राज्याचा इ.स. ६३३मध्ये पाडाव झाला आणि सुरू झाले पारसी संस्कृतीचे निर्दालन. खरोखर मुसलमानी आक्रमणापासून म्हणजे सुमारे इ.स.६३३पासून ते १८व्या शतकापर्यंतचा काळ म्हणजे पारसी धर्म, संस्कृती व समाजाच्या सर्वंकष अवनतीचा नव्हे, सर्वनाशाचा काळ होय. स्वराज्य गेले त्याबरोबरच धर्माला असलेला राजाश्रयही गेला. उलट मुसलमानी धर्मांध जेत्यांनी पारसी समाजापुढे तीन पर्याय ठेवले. इस्लाम स्वीकारा, अथवा काफिरांना द्यावा लागतो जिझिया कर भरा व हे दोन्ही मंजूर नसेल तर (मरेपर्यंत) लढायला तयार व्हा.
पारसी समाजापुढे हा एकप्रकारे त्यांच्या अस्तित्वाचाच प्रश्न होता. नुसता त्यांच्याच अस्तित्वाचा नाही तर जी उदात्त, उच्च जीवनप्रणाली व मूल्ये त्यांनी व त्यांच्या पूर्वजांनी स्वीकारली होती त्यांच्यादेखील. अखेर आपल्याच देशात हतबल झालेल्या पारसी समाजाने धर्मरक्षणासाठी देशांतर करायचे ठरवले. मोठय़ा प्रमाणावर पारसी समाज देशाबाहेर पडला. जो पारसी समाज स्वदेशातच राहिला, त्याला प्रचंड धार्मिक छळ, अवास्तव कर याचा सामना करावा लागला. परिणामी, पुढच्या एक दोन शतकांच्या काळात छळाला कंटाळून, करमुक्तीच्या आशेने इ. विविध कारणांनी बहुसंख्य समाजाने इस्लाम स्वीकारला. सध्याच्या इराणमध्ये सुमारे ७५ लाख लोकसंख्येपैकी केवळ सुमारे ३०००० (०.४ टक्के) लोक पारसी आहेत!
देश सोडून निघालेला पारसी समुदाय मुख्यत: पश्चिमेस युरोप व पूर्वेस भारतात आला. पूर्वेला भारत सगळ्यात जवळ म्हणून किंवा भारताशी पूर्वापार संबंध असल्याने परिचित प्रदेश म्हणून असेल म्हणून किंवा त्यांना येथील सहिष्णु व उदार हिंदू संस्कृतीची माहिती असेल म्हणून कदाचित, पण स्थलांतरित पारसी लोकांचा सगळ्यात मोठा समुदाय हा भारतात आला व पश्चिम किनाऱ्यावरील कराची, भरूच, सुरत, ठाणे, मुंबई इ. बंदरांमध्ये उतरला व आसपासच्या परिसरात स्थायिक झाला.
वेद व अवेस्तामध्ये देवदेवतांविषयक दुवेही पुष्कळ प्रमाणात आहेत. अनेक वैदिक नावांचे उल्लेख अवेस्तामध्ये सापडतात. उदा. (कंसातील अपभ्रंशित/रूपांतरित नावे अवेस्तामधील): देव (दैव), असुर (अहुर), मित्र (मिथ्र), वरुण (वरेण), विवस्वान (विवहवंत), यम (यिम), सोम (होम, हओम), मास (माह), सप्तसिंधू (हप्तहिंदू), सरस्वती (हरहवैती), वसिष्ट (वहिष्ट) हे अजून काही, वेदांतील नद्या (सरस्वती), वनस्पती (सोम), कालगणना (मास), प्रदेश (सप्तसिंधू) यांचे अवेस्तातील उल्लेख.
यज्ञ : पारसी धर्मात प्राचीन यज्ञ संस्कृतीचा अंतर्भाव होतो. परंतु यज्ञातील पशुबळी इ. प्रथा मात्र त्यातून वगळल्या आहेत. वैदिक परंपरेप्रमाणेच पारसी यज्ञात - त्यांना यस्न म्हणतात - एक मुख्य पुरोहित व इतर सहाय्यक पुरोहित असतात. वैदिक यज्ञात १६ पुरोहित असत. पारसी यस्नमध्ये आठ पुरोहित असत. मुख्य पुरोहितास झओतर (होतार (सं.)) म्हणतात. वैदिक ब्राह्मण ग्रंथांप्रमाणेच यस्नाचे विधी व त्यांचे तपशीलवार वर्णन यस्न ग्रंथात आहे.
नौरोझ (नवरोझ) : पारसी नववर्षांदिन पूर्वी नवरोझ म्हणून उत्तर वसंतसंपात दिनी (म्हणजे सूर्य मेष राशीत प्रवेश करतो तेव्हा) साजरा होत असे.वैदिक कालगणनादेखील वसंत संपात बिंदूपासून सुरू होत असे. आजही भारतीय सौर (निरयन) कालगणनेप्रमाणे नवीन वर्ष (चैत्र १) वसंत संपात दिनी (साधारणपणे २१-मार्च ला) सुरू होते.
३. यज्ञ-संस्कृतीचे महत्त्वाचे भाग - सोमाहुती व सोमप्राशन हे अवेस्तामध्येदेखील वर्णन केलेले आहेत. (अवेस्तात त्याला हओम/होम म्हणले आहे)
४. विदैवोदात (ज्याला चुकीने वेन्दिदाद म्हटले जाते) त्या अवेस्ताचा भाग असलेल्या ग्रंथाच्या नवव्या फ्राकार्त मध्ये मृताच्या संपर्कात येऊन अशुद्ध झालेल्या व्यक्तीच्या शुद्धिकरणाचा विधी दिलेला आहे. त्यात पवित्र बैलाच्या मूत्राने (गोमूत्र) शुद्धिकरण करण्याची पद्धती दिलेली आहे. भारतीय हिंदूंत गोमूत्राचे पावित्र्य सर्वश्रुत आहे. फक्त आपल्याकडे गायीचे मूत्र वापरले जाते.
मूळ लेख
0
Answer link
पारशी धर्माचा धर्मग्रंथ जেন্দ अवेस्ता आहे.
जेंद अवेस्ता म्हणजे काय?
जेंद अवेस्ता हाcollection असलेल्या अनेक धार्मिक ग्रंथांचा समूह आहे. ह्यामध्ये पारशी धर्माच्या प्रार्थना, स्तोत्रे, ritual विधि आणि कायदे दिलेले आहेत.
जेंद अवेस्ताचे भाग:
- यस्न: ह्यामध्ये प्रार्थना आणि स्तोत्रे आहेत.
- विस्पेरद: ह्यामध्ये विशेष प्रार्थना आहेत.
- वेंदिदाद: ह्यामध्ये शुद्धता आणि वाईट गोष्टींपासून दूर राहण्याचे नियम आहेत.
- यश्त: ह्यामध्ये देव आणि नायकांची स्तोत्रे आहेत.
- खुर्दा अवेस्ता: ह्यामध्ये रोजच्या वापरात येणाऱ्या प्रार्थना आहेत.
जेंद अवेस्ता हा धर्मग्रंथ पारशी लोकांसाठी खूप महत्त्वाचा आहे.