राजकारण करार ऐतिहासिक करार

नागपूर करार कोणामध्ये झाला?

2 उत्तरे
2 answers

नागपूर करार कोणामध्ये झाला?

6
महाराष्ट्रामध्ये सामील होण्यासाठी २८ सप्टेंबर १९५३ रोजी नागपूर येथे महाराष्ट्र व विदर्भातील नेत्यांमध्ये करार झाला होता. याला नागपूर करार म्हणून मान्यता आहे. या करारानुसार मध्यप्रदेशात असलेल्या विदर्भाने महाराष्ट्रात सामील होण्याची संमती दिली होती. या करारावर यशवंतराव चव्हाण, भाऊसाहेब हिरे, नाना कुंटे यांच्यासह विदर्भातील रा. कृ. पाटील, रामराव देशमुख, लक्ष्मणराव भटकर यांच्या स्वाक्षऱ्या होत्या.
उत्तर लिहिले · 12/8/2018
कर्म · 2825
0

नागपूर करार हा महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र यांच्यात १९५३ साली झाला.

या कराराचा उद्देश:

  • राज्यातील सर्व भागांचा समान विकास करणे.
  • शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक संधी सर्वांना समान देणे.
  • सरकारी नोकऱ्यांमध्ये प्रादेशिक संतुलन राखणे.

हा करार महाराष्ट्राच्या विकासासाठी एक महत्त्वाचा टप्पा होता.

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 3600

Related Questions

एखाद्या व्यक्तीला 3 मुले आणि दोन पत्नी असल्यास त्याला निवडणूक लढवण्यासाठी तिकीट मिळेल का?
आज पर्यंत किती पंतप्रधान भारतात होऊन गेलेत?
जर एखाद्या व्यक्तीला तीन मुले असतील आणि त्याला नगरसेवक बनायचे असेल, तर त्यासाठी काय पर्याय आहे का?
निवडणूक घेणारी यंत्रणा कोणती?
उपराष्ट्रपतीची निवड कोणत्या कलमानुसार होते?
उपराष्ट्रपती कलम ७०?
उपराष्ट्रपतीला शपथ कोण देतात?