सरकार माहिती अधिकार सरकारी योजना अर्थशास्त्र

दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांची निवड कशी केली जाते? कोण करते? त्याचे निकष काय आहेत आणि याची माहिती अधिकार कायद्यानुसार कुटुंबाची माहिती आपण कुठे/कोणाकडे मागू शकतो?

3 उत्तरे
3 answers

दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांची निवड कशी केली जाते? कोण करते? त्याचे निकष काय आहेत आणि याची माहिती अधिकार कायद्यानुसार कुटुंबाची माहिती आपण कुठे/कोणाकडे मागू शकतो?

4
देशातील उच्चतम 5 किंवा 10 टक्के लोकसंख्येच्या संपत्ती, उत्पन्न किंवा उपभोगाच्या तुलनेत देशातील न्यूनतम 5 किंवा 10 टक्के लोकसंख्येच्या संपत्ती, उत्पन्न किंवा उपभोगाचे मोजमाप केल्यास त्यास सापेक्ष दारिद्रय असे सापेक्ष दारिद्र्यामार्फत देशातील संपत्ती, उत्पन्न किंवा उपभोगाच्या वितरणातील विषमतेचे चित्र स्पष्ट होते.
HomeSubjects (विषय)Economics (अर्थशास्त्र)
दारिद्रय बद्दल संपूर्ण माहिती
By Shital Burkule  Last updated Jun 22, 2018  670 0
दारिद्रय बद्दल संपूर्ण माहिती


Must Read (नक्की वाचा):
व्यापार तोल व व्यवहार तोल बद्दल संपूर्ण माहिती

अर्थ: जीवनाच्या मूलभूत किमान गरजा भागविता येण्याची अक्षमता म्हणजे दारिद्रय होय.

दारिद्रय ही एक अशी सामाजिक समस्या आहे, ज्यामध्ये समाजाचा एक मोठा गट जीवनाच्या मूलभूत गरजांपासून वंचित राहतो.
दारिद्रयाची संकल्पना एक सापेक्ष संकल्पना आहे, ज्यामध्ये चांगल्या जीवन स्तराच्या ऐवजी निम्न जीवन स्तराच्या आधारावर दारिद्राची कल्पना करण्यात येते.
भारतातही दारिद्रयाच्या व्याख्येचा आधार उच्च जीवन स्तराऐवजी निम्न जीवन स्तरच मानण्यात येतो.
सापेक्ष दारिद्रय (Relative Poverty) :

देशातील उच्चतम 5 किंवा 10 टक्के लोकसंख्येच्या संपत्ती, उत्पन्न किंवा उपभोगाच्या तुलनेत देशातील न्यूनतम 5 किंवा 10 टक्के लोकसंख्येच्या संपत्ती, उत्पन्न किंवा उपभोगाचे मोजमाप केल्यास त्यास सापेक्ष दारिद्रय असे सापेक्ष दारिद्र्यामार्फत देशातील संपत्ती, उत्पन्न किंवा उपभोगाच्या वितरणातील विषमतेचे चित्र स्पष्ट होते.
निरपेक्ष दारिद्रय  (Absolute Poverty) :



दारिद्रयाच्या प्रमाणाचे निरपेक्ष मोजमाप करण्यासाठी देशातील जीवनमान खर्चाचा विचार कारण त्या आधारावर एक न्यूनतम उपभोग स्तर निर्धारित केला जातो. भारतात या न्यूनतम उपभोग स्तरालाच दारिद्रय रेषा असे म्हणतात.
राष्ट्र व राज्य पातळीवरील दारिद्रयाचे प्रमाण निश्चित करण्यासाठी नियोजन आयोग नोडल एजन्सी म्हणून कार्य करते.
त्यासाठी NSSO मार्फत साधारणत: दर पाच वर्षांनी हाती घेण्यात आलेल्या घरगुती उपभोग खर्चावरील नमूना सर्वेक्षणाचा आधार घेतला जातो.
दारिद्रय रेषा :

गरिबीची प्रमाण मोजण्यासाठी दारिद्रय रेषा (Pov-erty Line) या संकल्पनेचा वापर केला जातो.
1973-74 पासून नियोजन आयोग दारिद्रय रेषा ठरविण्यासाठी पुढील दोन निकषांचा वापर करीत आहे.
1दरडोई प्रतिदिन उष्मांक उपभोग (Per Capita per day calorie intake) –

या निकषानुसार ग्रामीण भागात दरडोई प्रतिदिन किमान उष्मांक उपभोग 2400 कॅलरी, तर शहरी भागात तो किमान 2100 कॅलरी एवढा ठरविण्यात आला आहे.
अर्थात दारिद्र्य रेषा मोजण्यासाठी कॅलरी मूल्याचे रूपांतर पैशात (equivalent मनी value) केले जाते.
दरडोई प्रतिमाह उपभोग खर्च (Per Capita Per Month Consumption Expenditure) –

या निकषानुसार दारिद्रय रेषा 2004-2005 मध्ये (आधारभूत वर्ष: 1973-74) ग्रामीण भागात दरडोई प्रतिमाह उपभोग खर्च रु. 356.30 तर शहरी भागात तो रु. 538.60 एवढी ठरविण्यात आली आहे.
यावरून जी कुटुंबे दारिद्रय रेषेपेक्षा कमी खर्च करतात त्यांना ‘दारिद्रय रेषेखालील कुटुंबे’ (Below Poverty Line: BPL) तर जी कुटुंबे दारिद्रय रेषेपेक्षा जास्त खर्च करतात त्यांना ‘दारिद्रय रेषेवरील कुटुंबे’ (Above Poverty Line:APL) असे संबोधले जाते.

नवीन पद्धतीचा वापर (New Methodology) :

1997 पासून नियोजन आयोगामार्फत दारिद्रय रेषा व दारिद्रयाचे प्रमाण मोजण्यासाठी नवीन पद्धतींचा वापर केला जात आहे.

या पद्धतीची शिफारस ‘गरीब व्यक्तींची संख्या व संरक्षणाच्या मोजमापासाठी तज्ज्ञ गटा’ ने (लकडावाला समिती अहवाल) केली होती.

या पद्धतीमध्ये पुढील दोन पद्धतींचा स्विकार करण्यात आला आहे.

युनिफॉर्म रिकॉल पिरीयड (Uniform Recall Period: URP) –

यामध्ये सर्व उपभोग्य वस्तूंच्या 30 दिवसांच्या रिकॉल/रीफरन्स कालावधीतील उपभोगाच्या आकडेवारीचा समावेश होतो.

मिक्स्ड रिकॉल पिरीयड (Mixed Recall Period: MRP) –

यामध्ये 5 प्रकारच्या अधूनमधून खरेदी करण्यात येणार्‍या गैर-खाध वस्तूंसाठी (उदा. कपडे, चपला, टिकाऊ वस्तु, शिक्षण, आरोग्य खर्च) 365 दिवसांच्या रिकॉल कालावधीच्या, तर इतर सर्व वस्तुंसाठी 30 दिवसांच्या रिकॉल पिरीयडचा समावेश होतो.

दारिद्रयाच्या मोजमापाच्या पद्धतीमध्ये सुधारणा – सरकारच्या दारिद्रय रेषेच्या गणन पद्धतीवर बरीच टिका केली जाते. या गणन पद्धतीमध्ये सुधारणा करण्यासाठी सरकारने अलिकडे दोन समित्य केल्या होत्या.

 एन.सी.सक्सेना समिती :

केंद्र सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाने ही एन.सी.सक्सेना यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती (Committee for Estimation of BPL Families in Rural Areas) स्थापन केली होती.

या समितीने सप्टेंबर 2009 मध्ये अहवाल सादर केली होती.

या समितीने सदध्याची दारिद्रय रेषा अपूर्ण असून त्यात वाढ सुचविली, जेणे करून आवश्यक कॅलरीज उपलब्ध होऊ शकतील. तसेच समितीच्या मते दारिद्रय रेषेखालील लोकसंख्या 50 टक्के इतकी उच्च आहे.

मात्र या शिफारशी नियोजन मंडळाने फेटाळून लावल्या.

सुरेश तेंडुलकर समिती :

केंद्रीय नियोजन मंडळाने या समितीची स्थापना नोव्हेंबर 2009 मध्ये केली, व तिने आपला अहवाल 8 डिसेंबर, 2009 रोजी सादर केला.

या समितीच्या महत्वाच्या शिफारसी पुढीलप्रमाणे-

समितीने दारिद्रय रेषा मोजण्यासाठी कॅलरीच्या निकषाचा वापर सोडून देण्याची शिफारस केली आहे, कारण समितीच्या मते कॅलरी उपभोग व पोषण यांमध्ये कमी परस्परसंबंध आहे.

समितीने दारिद्रय रेषेच्या मोजमापासाठी नवीन पद्धत सुचविली आहे, ज्यामधे आरोग्य व शिक्षणावरील खर्चाचाही समावेश करण्यात आला आहे. तसेच शहरी दारिद्रय रेषेलाच इतर दारिद्रय रेषांचा आधार मानण्याचीहि शिफारस समितीने केली आहे.

नियोजन मंडळाने सध्या ग्राह्य मानलेल्या दारिद्रय रेषेच्या (356.3 रु. ग्रामीण भागात, व 538.60 रु. शहरी भागात) जागी तेंडुलकर समितीने नवीन निकषांच्या आधारावर 2004-05 साठी ग्रामीण भागासाठी 446.68 रु., तर शहरी भागासाठी 578.8 रु. अशी दारिद्रय रेषा सुचविली आहे.

या दारिद्रय रेषेच्या आधारावर समितीने देशातील दारिद्रयाचे प्रमाण 37.2 टक्के, ग्रामीण भागात 41.8 टक्के तर 25.7 टक्के इतके असल्याचे संगितले आहे.

नियोजन मंडळाने तेंडुलकर समितीने शिफारस केलेल्या दारिद्रय रेषेच्या मोजमाप पद्धतीचा स्विकार केला. या पद्धतीनुसार, दारिद्रय रेषा शहरासाठी 28.65 रु. प्रति दिन उपभोग खर्च, तर ग्रामीण भागासाठी 22.42 रु. प्रति दिन उपभोग खर्च, इतकी ठरविण्यात आली.
++++++++++++++
सदर माहिती साठी खालील माहिती अधिकारी आहेत 
1 जनमाहिती अधिकारी- अव्वल कारकून,पुरवठा विभाग 
2 प्रथम अपिलीय अधिकारी- नायब तहसीलदार,पुरवठा विभाग 
उत्तर लिहिले · 21/7/2018
कर्म · 29340
3
दारिद्र रेषेखालील कुटुंबाची माहिती 2005 च्या माहिती अधिकारात मिळवण्यासाठी आपण जिथे राहता तेथील तहसील कार्यालयात अर्ज करून माहिती मिळवू शकता

सदर माहिती साठी खालील माहिती अधिकारी आहेत
1 जनमाहिती अधिकारी- अव्वल कारकून,पुरवठा विभाग
2 प्रथम अपिलीय अधिकारी- नायब तहसीलदार,पुरवठा विभाग
उत्तर लिहिले · 20/7/2018
कर्म · 1475
0
दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांची निवड प्रक्रिया, निकष आणि माहिती अधिकार:

निवड प्रक्रिया:

  1. सर्वेक्षण: दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांची निवड करण्यासाठी सरकार वेळोवेळी सर्वेक्षण करते. हे सर्वेक्षण सामान्यतः राज्य सरकार किंवा केंद्र सरकारद्वारे नियुक्त केलेल्या संस्थांद्वारे केले जाते.
  2. निकष: सर्वेक्षणात कुटुंबांची सामाजिक, आर्थिक स्थिती आणि मालमत्तेची माहिती गोळा केली जाते. या माहितीच्या आधारावर, सरकार दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांची यादी तयार करते.

निवड कोण करते:

  • राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांची निवड केली जाते.
  • ग्राम स्तरावर ग्रामसभा महत्त्वाची भूमिका बजावते.

निकष: दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांची निवड करण्यासाठी खालील निकष वापरले जातात:

  • उत्পন্ন: कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न खूप कमी असावे.
  • जमीन: कुटुंबाकडे शेतीयोग्य जमीन नसावी किंवा खूप कमी असावी.
  • घर: कुटुंबाकडे पक्के घर नसावे.
  • शैक्षणिक पात्रता: कुटुंबातील सदस्यांची शैक्षणिक पात्रता कमी असावी.
  • सामाजिक स्थिती: कुटुंब सामाजिकदृष्ट्या मागासलेले असावे.

माहिती अधिकार (RTI) अंतर्गत माहिती कशी मिळवावी:

  1. अर्ज कोठे करावा:
    • ग्रामपंचायत कार्यालय (Gram Panchayat Office)
    • तालुका कार्यालय (Taluka Office)
    • जिल्हाधिकारी कार्यालय (Collector Office)
    • राज्य सरकारचे ग्रामीण विकास विभाग (Rural Development Department)
  2. अर्ज कसा करावा:
    • अर्ज लेखी स्वरूपात सादर करा: तुमच्या अर्जात तुम्हाला नेमकी कोणती माहिती हवी आहे, हे स्पष्टपणे नमूद करा. जसे की, दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांची यादी, निवड प्रक्रिया, निकष इत्यादी.
    • अर्ज सादर करा: अर्ज संबंधित कार्यालयात जमा करा आणि पोहोच पावती घ्या.
    • शुल्क: माहिती अधिकार कायद्यानुसार, अर्ज करण्यासाठी नाममात्र शुल्क लागू शकते.

महत्वाचे दुवे:

उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 1620

Related Questions

विश्वकर्मा योजनेच्या परीक्षेत्रात येणारे प्रश्न उत्तर कोणते व कशा प्रकारे विचारले जातात?
जल जीवन मिशनच्या इस्टिमेटनुसार कामे कशी असतात?
गाय, म्हैस, शेळी, बकरी जर खूप कमी झाले तर भारत देशाला फरक पडेल का?
६ लाख रुपये bhetle आहेत FD kru ki काय करू?
पैमास काय असतो?
सोने घेणे किती फायद्याचे असते?
Current transfer manje kay?