3 उत्तरे
3
answers
तंतुमय पदार्थ कोणते आहेत?
4
Answer link
आहाराचा आरोग्याशी जवळचा संबंध आहे याची आता लोकांना जाणीव होऊ लागली आहे.वर्तमानपत्रातून ,साप्ताहिकातून आणि मासिकातून समतोल आहाराविषयी बरीच माहिती आता वाचायला मिळते.रोजच्या आहारामध्ये प्रथिने कर्बोदके आणि स्निग्ध पदार्थ जसे आवश्यक आहेत तसेच तंतुमय पदार्थही आवश्यक आहेत.त्याचे महत्व प्रत्येकाने जाणून घेणे गरजेचे आहे.
आपल्या अन्नामध्ये जी फळे पालेभाज्या आणि फोडभाज्या असतात त्यामध्ये काही घटक असे असतात की त्याचे पचन होण्यासाठी पचनसंस्थेमध्ये पाचक रस नसतात.हे न पचलेले घटक तसेच शौच्यावाटे बाहेर पडतात. याच घटकांना तंतुमय पदार्थ असे म्हणतात.
◆अन्नातील तंतुमय पदार्थाचे दोन प्रकार आहेत.
●न विरघळणारे – यामध्ये सेल्युलोज, हेमीसेल्युलोज आणि लिग्नीन असते.
●न विरघळणारे तंतुमय पदार्थ जवळजवळ सर्वच तृणधान्यामध्ये असतात.गव्हाच्या कोंडयामध्ये तंतुमय पदार्थ असतात.
◆विरघळणारे – यामध्ये डिंकासारखे चिकट किंवा गुळगुळीत किंवा पेक्टीनयुक्त पदार्थ असतात. विरघळणारे तंतुमय पदार्थ फळे,पालेभाज्या,सुक्या उसळी, वाटाणे, काही तृणधान्ये आणि ओट यामध्ये असतात.
तंतुमय पदार्थाची आवश्यकता
न विरघळणारे तंतुमय पदार्थ आतडयांमध्ये गेल्यावर त्यांचे पचन होत नाही.परंतु मळाची तयार करण्यात त्यांचा महत्वाचा सहभाग असतो.तंतुमय पदार्थामुळे मळाचं वजन आणि व्यापकपणा वाढतो. त्यामुळे मोठया आतडयातून मळ पुढे पुढे सरकण्यास त्याची मदत होते.न विरघळणारे तंतुमय पदार्थ आतडयातले पाणी शोषून घेतात आणि मळ तयार करतात.
तंतुमय पदार्थामुळे मोठया आतडयातला संपूर्ण मळ शौच्यावाटे बाहेर पडतो.त्यालाच आपण पोट साफ होणे असे म्हणतो.ज्यांना बध्दकोष्ठाचा म्हणजे नियमीतपणे पोट साफ न होण्याचा त्रास आहे तंयानी आहारामेध्य तंतुमय पदार्थ खायला हवे.बध्दकोष्ठाची समस्या नाहीशी होते.
न विरघळणाऱ्या तंतुमय पदार्थामुळे पोट भरल्यासारखे वाटते. ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यानी आहारात तंतुमय पदार्थ जास्त प्रमाणात खावे म्हणजे अनावश्यक कॅलरीज पोटात जाणार नाहीत. शिवाय तंतुमय पदार्थामध्ये कोणत्याच कॅलरीज नसतात हाही एक फायदाच आहे.
◆विरघळणारे तंतुमय पदार्थ फळे, पालेभाज्या, शेंगा, फोडभाज्या आणि ओट यामध्ये असतात. विरघळणारे पदार्थ आतडयांमध्ये अन्नाचे पचन होताना त्याचा जेलीसारखा गोळा तयार करतात. हा गोळा आतडयातून खूप सावकाश पुढे पुढे सरकत असतो.
त्यामुळे अन्नातील कर्बोदके म्हणजे साखर आणि कोलेस्टेरॉल या घटकांचे सावकाशपणे आतडयांतून शोषण होते.मिठाईसारखे साखरेचे पदार्थ खाल्ल्यावर रक्तामधल्या साखरेचे प्रमाण लगेच वाढते.मधुमेही लोकांना त्याचा त्रास होतो.म्हणून मधुमेही लोकांनी साखर सावकाशपणे आतडयातून रक्तात जावी आणि इन्सुलीनने त्याचे उर्जेत रुपांतर व्हावे यासाठी विरघळणारे तंतुमय पदार्थ खायला हवे.
★रोजच्या आहारामध्ये तंतुमय पदार्थाचे प्रमाण किती असावे?
रोजच्या आहारामध्ये तंतुमय पदार्थांचे प्रमाण 20 ते 30 ग्रॅम असावे असे आहारतज्ञांचे मत आहे. किंवा 35 ग्रॅमपेक्षा जास्त नसावे
काहीवेळा तंतुमय पदार्थ अत्यंत कमी खावे लागतात.आतडयांना काहीकारणाने सूज आली असेल तर तंतुमय पदार्थ अन्नातून वर्ज्य करावे लागतात.
अशा वेळेस कोंड्यासकट गव्हाचे पदार्थ, पूर्ण गव्हाचा ब्रेड खाऊ नये.सुकामेवा,शेंगदाणे,उसळी,आणि नारळ खाऊ नये. फक्त फळे आणि साले काढलेल्या भाज्या खाव्या.
याउलट कधीकधी आहारामध्ये तंतुमय पदार्थाचे प्रमाण वाढवावे लागते. बध्दकोष्ठाचा ज्यांना त्रास आहे त्यांनी रोजच्या रोज पाट साफ व्हावे म्हणून तंतुमयपदार्थाचे प्रमाण वाढवावे. रोज केवळ मांसाहार करणाऱ्यांनीसुध्दा तंतुमय पदार्थ खाणे आवश्यक आहे.
★आहारामध्ये 25 ते 35 ग्रॅम तंतुमय पदार्थ असायला हवे. रोज दिवसातून 10 किंवा12 ग्लास पाणी प्यायला हवे. त्यामुळे मळ जास्त प्रमाणात निर्माण होतो आणि त्याच्या वजनाने तो आतडयांमध्ये वेगाने सरकत जाऊन शौच्यावाटे सहजपणे बाहेर पडतो.
आहारामध्ये काही पदार्थामध्ये केवळ कॅलरीज असतात पण तंतुमय पदार्थ नसतात. तर काही पदार्थामध्ये अगदीच कमी प्रमाणात तंतुमय पदार्थ असतात. म्हणून कोणत्या पदार्थामध्ये तंतुमय पदार्थ आहेत आणि कोणत्यामध्ये नाहीत हे जाणून घेणे आवश्यक आहे.
◆खालील पदार्थामध्ये तंतुमय पदार्थ अजिबात नसतात
व्हाइटब्रेड, बिस्कीट, केक, पफ, समोसा, नुडल्स, मांस, मासे, प्रॉन, खेकडा, अंडी, चिकन, पोर्क, दूध आणि दुधाचे पदार्थ,कॉफी चहा,साखर,तूप आणि तेल यामध्ये तंतुमय पदार्थ नसतात.
◆●खालील पदार्थात तंतुमय पदार्थाचे प्रमाण अगदी कमी असते.
पॉलीश केलेला तांदुळ, डाळी आणि उसळी,पूर्ण गव्हाचा ब्रेड, पॉपकॉर्न, इडली डोसा, उपमा, सॅलड, खोबरे, सफरचंद, केळी, द्राक्षे, टोमॅटो मटार, बटाटे, कांदा.
खालील पदार्थात तंतुमय
पदार्थाचे प्रमाण जास्त असते
©सर्वप्रकारची तृणधान्ये, कोंड्या सकट धान्ये, ब्रान, पूर्ण गव्हाचा ब्रेड, मिश्र धान्याचा ब्रेड, मूग, मटकी, हरभरा, मटार, चवळी.
फळांमध्ये सालासकट सफरचंद, बोर, जांभुळ, सुके अंजीर, संत्री, स्ट्रॉबेरी, आणि पेअर.
भाज्यांमध्ये बीट, ब्राकोली, कोबी, गाजर, हिरवे वाटाणे, पालक, सालासकट बटाटे, हिरवे टोमॅटो, मोहरीचा पाला.
◆आहारामध्ये तंतुमय पदार्थ योग्य प्रमाणात असतील तर आतडयाचा कॅन्सर होत नाही. अर्थात आतडयाचा कॅन्सर होण्यासाठी इतरही कारणे बरीच आहेत. अन्नामध्ये कॅन्सर निर्माण करणारे घटक असतील तर तंतुमय पदार्थामुळे आतडयांमध्ये शोषले न जाता ते वेगाने खाली सरकत सरकत शौच्यावाटे बाहेर पडतात. ज्या देशांमध्ये आहारात तंतुमय पदार्थ खाण्याचे प्रमाण जास्त आहे तिथे आतड्याच्या कॅन्सरचे प्रमाण अगदी कमी आहे.
◆ओटमध्ये जे विरघळणारे तंतुमय पदार्थ असतात ते रक्तामधले एडीएल म्हणजे वाईट कोलेस्टेरॉल कमी करते. म्हणून कोलेस्टेरॉल कमी करायचं असेल तर तेल तूप कमी खा, कोलेस्टेरॉलयुक्त पदार्थ कमी खा पण तंतुमय पदार्थ जास्त खा. रोज ओट खा. म्हणजे ह्रदयविकाराचा धोका टळतो. इतरांना वाटते तसे तंतुमय पदार्थ खाणे हे केवळ एक फॅड नाही.ते सारक आहे. पोट साफ करणारे आहे आणि ह्रदयविकाराला रोखणारे आहे. कोलेस्टेरॉल कमी करणारे आहे.
{संकलित}
आपल्या अन्नामध्ये जी फळे पालेभाज्या आणि फोडभाज्या असतात त्यामध्ये काही घटक असे असतात की त्याचे पचन होण्यासाठी पचनसंस्थेमध्ये पाचक रस नसतात.हे न पचलेले घटक तसेच शौच्यावाटे बाहेर पडतात. याच घटकांना तंतुमय पदार्थ असे म्हणतात.
◆अन्नातील तंतुमय पदार्थाचे दोन प्रकार आहेत.
●न विरघळणारे – यामध्ये सेल्युलोज, हेमीसेल्युलोज आणि लिग्नीन असते.
●न विरघळणारे तंतुमय पदार्थ जवळजवळ सर्वच तृणधान्यामध्ये असतात.गव्हाच्या कोंडयामध्ये तंतुमय पदार्थ असतात.
◆विरघळणारे – यामध्ये डिंकासारखे चिकट किंवा गुळगुळीत किंवा पेक्टीनयुक्त पदार्थ असतात. विरघळणारे तंतुमय पदार्थ फळे,पालेभाज्या,सुक्या उसळी, वाटाणे, काही तृणधान्ये आणि ओट यामध्ये असतात.
तंतुमय पदार्थाची आवश्यकता
न विरघळणारे तंतुमय पदार्थ आतडयांमध्ये गेल्यावर त्यांचे पचन होत नाही.परंतु मळाची तयार करण्यात त्यांचा महत्वाचा सहभाग असतो.तंतुमय पदार्थामुळे मळाचं वजन आणि व्यापकपणा वाढतो. त्यामुळे मोठया आतडयातून मळ पुढे पुढे सरकण्यास त्याची मदत होते.न विरघळणारे तंतुमय पदार्थ आतडयातले पाणी शोषून घेतात आणि मळ तयार करतात.
तंतुमय पदार्थामुळे मोठया आतडयातला संपूर्ण मळ शौच्यावाटे बाहेर पडतो.त्यालाच आपण पोट साफ होणे असे म्हणतो.ज्यांना बध्दकोष्ठाचा म्हणजे नियमीतपणे पोट साफ न होण्याचा त्रास आहे तंयानी आहारामेध्य तंतुमय पदार्थ खायला हवे.बध्दकोष्ठाची समस्या नाहीशी होते.
न विरघळणाऱ्या तंतुमय पदार्थामुळे पोट भरल्यासारखे वाटते. ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यानी आहारात तंतुमय पदार्थ जास्त प्रमाणात खावे म्हणजे अनावश्यक कॅलरीज पोटात जाणार नाहीत. शिवाय तंतुमय पदार्थामध्ये कोणत्याच कॅलरीज नसतात हाही एक फायदाच आहे.
◆विरघळणारे तंतुमय पदार्थ फळे, पालेभाज्या, शेंगा, फोडभाज्या आणि ओट यामध्ये असतात. विरघळणारे पदार्थ आतडयांमध्ये अन्नाचे पचन होताना त्याचा जेलीसारखा गोळा तयार करतात. हा गोळा आतडयातून खूप सावकाश पुढे पुढे सरकत असतो.
त्यामुळे अन्नातील कर्बोदके म्हणजे साखर आणि कोलेस्टेरॉल या घटकांचे सावकाशपणे आतडयांतून शोषण होते.मिठाईसारखे साखरेचे पदार्थ खाल्ल्यावर रक्तामधल्या साखरेचे प्रमाण लगेच वाढते.मधुमेही लोकांना त्याचा त्रास होतो.म्हणून मधुमेही लोकांनी साखर सावकाशपणे आतडयातून रक्तात जावी आणि इन्सुलीनने त्याचे उर्जेत रुपांतर व्हावे यासाठी विरघळणारे तंतुमय पदार्थ खायला हवे.
★रोजच्या आहारामध्ये तंतुमय पदार्थाचे प्रमाण किती असावे?
रोजच्या आहारामध्ये तंतुमय पदार्थांचे प्रमाण 20 ते 30 ग्रॅम असावे असे आहारतज्ञांचे मत आहे. किंवा 35 ग्रॅमपेक्षा जास्त नसावे
काहीवेळा तंतुमय पदार्थ अत्यंत कमी खावे लागतात.आतडयांना काहीकारणाने सूज आली असेल तर तंतुमय पदार्थ अन्नातून वर्ज्य करावे लागतात.
अशा वेळेस कोंड्यासकट गव्हाचे पदार्थ, पूर्ण गव्हाचा ब्रेड खाऊ नये.सुकामेवा,शेंगदाणे,उसळी,आणि नारळ खाऊ नये. फक्त फळे आणि साले काढलेल्या भाज्या खाव्या.
याउलट कधीकधी आहारामध्ये तंतुमय पदार्थाचे प्रमाण वाढवावे लागते. बध्दकोष्ठाचा ज्यांना त्रास आहे त्यांनी रोजच्या रोज पाट साफ व्हावे म्हणून तंतुमयपदार्थाचे प्रमाण वाढवावे. रोज केवळ मांसाहार करणाऱ्यांनीसुध्दा तंतुमय पदार्थ खाणे आवश्यक आहे.
★आहारामध्ये 25 ते 35 ग्रॅम तंतुमय पदार्थ असायला हवे. रोज दिवसातून 10 किंवा12 ग्लास पाणी प्यायला हवे. त्यामुळे मळ जास्त प्रमाणात निर्माण होतो आणि त्याच्या वजनाने तो आतडयांमध्ये वेगाने सरकत जाऊन शौच्यावाटे सहजपणे बाहेर पडतो.
आहारामध्ये काही पदार्थामध्ये केवळ कॅलरीज असतात पण तंतुमय पदार्थ नसतात. तर काही पदार्थामध्ये अगदीच कमी प्रमाणात तंतुमय पदार्थ असतात. म्हणून कोणत्या पदार्थामध्ये तंतुमय पदार्थ आहेत आणि कोणत्यामध्ये नाहीत हे जाणून घेणे आवश्यक आहे.
◆खालील पदार्थामध्ये तंतुमय पदार्थ अजिबात नसतात
व्हाइटब्रेड, बिस्कीट, केक, पफ, समोसा, नुडल्स, मांस, मासे, प्रॉन, खेकडा, अंडी, चिकन, पोर्क, दूध आणि दुधाचे पदार्थ,कॉफी चहा,साखर,तूप आणि तेल यामध्ये तंतुमय पदार्थ नसतात.
◆●खालील पदार्थात तंतुमय पदार्थाचे प्रमाण अगदी कमी असते.
पॉलीश केलेला तांदुळ, डाळी आणि उसळी,पूर्ण गव्हाचा ब्रेड, पॉपकॉर्न, इडली डोसा, उपमा, सॅलड, खोबरे, सफरचंद, केळी, द्राक्षे, टोमॅटो मटार, बटाटे, कांदा.
खालील पदार्थात तंतुमय
पदार्थाचे प्रमाण जास्त असते
©सर्वप्रकारची तृणधान्ये, कोंड्या सकट धान्ये, ब्रान, पूर्ण गव्हाचा ब्रेड, मिश्र धान्याचा ब्रेड, मूग, मटकी, हरभरा, मटार, चवळी.
फळांमध्ये सालासकट सफरचंद, बोर, जांभुळ, सुके अंजीर, संत्री, स्ट्रॉबेरी, आणि पेअर.
भाज्यांमध्ये बीट, ब्राकोली, कोबी, गाजर, हिरवे वाटाणे, पालक, सालासकट बटाटे, हिरवे टोमॅटो, मोहरीचा पाला.
◆आहारामध्ये तंतुमय पदार्थ योग्य प्रमाणात असतील तर आतडयाचा कॅन्सर होत नाही. अर्थात आतडयाचा कॅन्सर होण्यासाठी इतरही कारणे बरीच आहेत. अन्नामध्ये कॅन्सर निर्माण करणारे घटक असतील तर तंतुमय पदार्थामुळे आतडयांमध्ये शोषले न जाता ते वेगाने खाली सरकत सरकत शौच्यावाटे बाहेर पडतात. ज्या देशांमध्ये आहारात तंतुमय पदार्थ खाण्याचे प्रमाण जास्त आहे तिथे आतड्याच्या कॅन्सरचे प्रमाण अगदी कमी आहे.
◆ओटमध्ये जे विरघळणारे तंतुमय पदार्थ असतात ते रक्तामधले एडीएल म्हणजे वाईट कोलेस्टेरॉल कमी करते. म्हणून कोलेस्टेरॉल कमी करायचं असेल तर तेल तूप कमी खा, कोलेस्टेरॉलयुक्त पदार्थ कमी खा पण तंतुमय पदार्थ जास्त खा. रोज ओट खा. म्हणजे ह्रदयविकाराचा धोका टळतो. इतरांना वाटते तसे तंतुमय पदार्थ खाणे हे केवळ एक फॅड नाही.ते सारक आहे. पोट साफ करणारे आहे आणि ह्रदयविकाराला रोखणारे आहे. कोलेस्टेरॉल कमी करणारे आहे.
{संकलित}
1
Answer link
तंतुमय पदार्थ आपणास पुढील अन्नघटकांपासून मिळतात: विविध प्रकारची धान्ये व त्यांचा कोंडा, कडधान्ये किंवा मोड आलेली कडधान्ये, सर्व प्रकारच्या भाज्या, विशेषत: हिरव्या पालेभाज्या इत्यादी.
0
Answer link
तंतुमय पदार्थ (Fiber) हे आपल्या आहारात महत्वाचे पोषक तत्व आहे. ते प्रामुख्याने वनस्पतींमध्ये आढळतात आणि ते आपल्या शरीराच्या पचनक्रियेत मदत करतात.
तंतुमय पदार्थांचे मुख्य स्रोत:
- फळे: सफरचंद, केळी, संत्री, स्ट्रॉबेरी
- भाज्या: ब्रोकोली, गाजर, पालक, टोमॅटो
- धान्ये: ओट्स, ब्राऊन राईस, गहू, ज्वारी, बाजरी
- कडधान्ये: मसूर, चवळी, वाटाणा, बीन्स
- बिया आणि नट्स: चिया सीड्स, फ्लेक्स सीड्स, बदाम, अक्रोड
तंतुमय पदार्थ दोन प्रकारचे असतात:
- विद्राव्य तंतुमय पदार्थ (Soluble Fiber): हे पाण्यात विरघळतात आणि रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करतात.
- अविद्राव्य तंतुमय पदार्थ (Insoluble Fiber): हे पाण्यात विरघळत नाहीत आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात.
तंतुमय पदार्थ आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहेत. ते बद्धकोष्ठता टाळण्यास, रक्तातील शर्करा नियंत्रित ठेवण्यास आणि हृदयविकारांपासून बचाव करण्यास मदत करतात.