समाजशास्त्र अंधश्रद्धा अध्यात्म

"करणी करणे" असा काही प्रकार असतो का? असेल तर उपाय काय करायचा, नसेल तर त्या माणसांचा मनातून तो विचार कसा काढायचा?

4 उत्तरे
4 answers

"करणी करणे" असा काही प्रकार असतो का? असेल तर उपाय काय करायचा, नसेल तर त्या माणसांचा मनातून तो विचार कसा काढायचा?

10
सर्वसामान्य गुणापेक्षा जास्त सदृण दिसल्यावर ती व्यक्ती आपल्यापेक्षा वरचढ़ होऊ नये म्हणून ,या इर्षेने काही दुष्ट दुबळी माणसे करणी सारख्या अदृश्य अघोरी उपायांचा आश्रय घेऊन इतर सज्जनांना त्रास देतात. हां त्यांचा अत्यंत आवडीचा छंद असतो. यासाठी मैली विद्या जाणणाऱ्या व्यक्तिकडून श्रम व पैसा खर्च करुन ही विद्या अशा लोकांवर करीत असतात. अर्थात यात फायदा न होता लोकांचे शिव्याशाप बाधतात...इतकेच नव्हे तर त्या कुटुंबाची पिढी दारिद्र्य, दुखाने नष्ट होते...जर तुमचा जवळील व्यक्ती एखाद्यावर करणी करवयास जात असल्यास त्याला समजविण्याचे कार्य तुम्ही हातात घ्या...त्या व्यक्तीला तुम्ही सांगू शकता की हा मार्ग चुकीचा आहे...यात फक्त नुकसान आहे ...स्वताचे आणि इतरांचे पण...अश्या मार्गाला जाणारे व्यक्ती नेहमी अहंकारी होऊन बसतात...मग त्यांच्याकडे कितीही पैसा श्रीमंती आली तरी त्यांना कोणाचे प्रेम माया आणि समाधान तर अजिबातच मिळत नाही...सुख पदरात असूनही त्यांना त्या सुखाची जाणीवच मुळात होत नाही...कष्ट करा...चार पैसे मेहनतीने कमवून आपले व आपल्या माणसांचे पोट भरण्यात एक गोड आनंद असतो हे त्यांना पटवून द्या...संतांचा महिमा त्यांच्या नजरेत भरा...चांगल्या गोष्टी अमलात आणायला शिकवा...ईर्ष्या, जळण, राग,द्वेष, अहंकार, वासना,संशयी याने फक्त दुखी, निराशा, चिड़चिड, असमाधानीच होऊ शकतो...पण प्रेम दया माया संयम आणि हुशारीपणा याने माणूस समाधानी असतो आणि त्याला दुःख तरी वाटेवर मिळाले तरी तो भयभीत न होता त्याचा सामना करण्यास तत्पर असतो.... मन निर्मळ आणि स्वच्छ तर माणूस आनंदीच असतो...काळजी घ्या...
उत्तर लिहिले · 15/8/2017
कर्म · 458560
7
अर्थातच करणी जादूटोणा असं काहीही नसतं. मला एक सांगा अस काही खर असतं तर करणी जादूटोणा करणारे १०००/ ५०० रुपये घेऊन तुमचं का काम करतील. त्यापेक्षा बँकेतील लोकांवर करणी करून पैसे काढतील. पोलिसांचा बंदोबस्त करतील.
तुमच्या प्रश्नाचा दुसरा भाग: तुम्हाला काही अशा व्यक्ती आढळतील कि त्यांच्या म्हणण्यानुसार त्याच्यावर करणी केल्याने त्यांना विविध आजार होतात त्याची लक्षणे हि दिसतील. अस का होत? होमिओपॅथीनुसार साथीचे रोग सोडले तर इतर आजार बऱ्याचदा रुग्णच्या मानसिक स्तिथीवर अवलंबून असतात. निराशा ,भय, क्रोध , ताणतणाव इ नकारात्मक भावना मुके असे आजार होऊ शकतात आणि त्याची लक्षणे हि शरीरावर दिसू शकतात. आयुर्वेदानुसार हि जर शरीर, आत्मा आणि मन या तिन्ही मध्ये समतोल असेल तरच उत्तम आरोग्याची प्राप्ती होवू शकते.
त्यामुळे मुख्य आहे कि अशी व्यक्ती आणि तिच्या भोवतीचे  सर्व आनंदी राहणे. तिला आधार देणे समजावून घेणे. तिचा गैरसमज दूर करणे निश्चितच कठीण आहे.  अशावेळी तुम्ही तिला अध्यात्माकडे वळवू शकता. नामजप  किंवा तत्सम मार्गाने तिला विश्वास बसला पाहिजे कि एक मोठी शक्ती तिच्या बरोबर आहे जेणे करून इतर कुठलाही नकारात्मक परिणाम तिच्यावर होणार नाही.
आणि हे सर्व वैद्यकीय उपचारबरोबरच करावेत.
उत्तर लिहिले · 15/8/2017
कर्म · 99520
0
मला माफ करा, मला या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी पुरेसा अनुभव नाही.
उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 1200

Related Questions

विभूती ही नेहमीच प्रतिमारूप असते म्हणजे काय?
भगवान शंकर यांना भोळा सांब का म्हणतात?
माळकरी माणसाने नॉनव्हेज हॉटेल मध्ये जॉब करावा का?
आपल्याला गौतम बुद्ध आणि स्वामी विवेकानंद यांच्यात काय साम्य आढळते?
गोसावी लागणे म्हणजे काय?
आपले शरीर पंचतत्त्वांनी बनले असेल, तर आपली ओळख काय? आपण कोण आहोत?
ब्रह्मचर्य पालन केल्यावर नेमके काय फायदे होतात?