4 उत्तरे
4
answers
मासिक पाळी म्हणजे नेमकं काय?
26
Answer link
📙 *मासिक पाळी* 📙
**********************
मुलीच्या शरीरातील स्त्रीत्वाचे अवयव जेव्हा पूर्ण वाढतात, तेव्हा मासिक पाळीला सुरुवात होते, यालाच रज:स्राव असे म्हणतात. रज:स्राव म्हणजे गर्भाशयाच्या अंतर्भागातील पापुद्रा वा अंतस्त्वचा सुटते, तिचे लहान लहान तुकडे व यामुळे होणारा रक्तस्राव हा योनीमार्गाद्वारे बाहेर टाकला जातो. स्त्रीच्या शरीरात दर अठ्ठावीस दिवसांनी बीजांडांची निर्मिती होत असते. हे बीजांड जर फलित झाले नाही तर गर्भाशयात बदल होत जातात व रज:स्राव सुरू होतो. बीजांड फलित झाल्यास गर्भावस्था सुरू होते. याचाच दुसरा अर्थ असा की, वयात आल्यापासून ते गर्भधारणा होऊ शकेल अशा काळात गर्भावस्था नसेल तर दर महिन्याला एकदा रज:स्राव होतो. म्हणूनच याला सोप्या भाषेत मासिक पाळी असे म्हटले जाते.
मुलगी वयात येण्याचे वय म्हणजे दहा ते अठरा. या दरम्यान रज:स्रावाला कधीही सुरुवात होऊ शकते. स्त्रीचा गर्भधारणा होऊ शकण्याचा काळ हा पंचेचाळीस ते पन्नास या वयापर्यंत असतो. त्यानंतर रज:स्राव होणे बंद होते. मासिक पाळीचा काळ हा तीन ते सहा दिवसांचा असतो. या दरम्यान गर्भाशयातील सर्व अंतस्त्वचा बदलली जाऊन नवीन तयार होत जाते. हा स्राव शोषून घेणाऱ्या नॅपकिन्सचा वापर सुरू झाल्यापासून स्वच्छता सोयीची झाली आहे. पूर्वी या पद्धतीच्या सोयी नसल्याने स्त्रियांना विश्रांती घ्यायला सांगितले जाई.
या काळात भरपूर पाणी पिणे, मोजका पण सकस आहार घेणे व कोठा साफ ठेवणे हे आवश्यक असते. याही काळात रोज स्वच्छ आंघोळ करून वैयक्तिक स्वच्छता राखणे उत्तम. मोकळे सैलसर कपडे वापरले तर मासिक पाळीचा त्रास कमी होतो. कारण नको त्या ठिकाणी कपड्यांचा ताण पडत नाही.
क्वचित काही मुलींना सुरुवातीला अंगावर स्त्राव जास्त जाणे, पोट दुखणे, कंबर दुखणे असा त्रास होऊ शकतो. पण त्याचा फार बाऊ न करता रोजचे व्यवहार चालू ठेवले व गरजेनुसार क्वचित वेदनाशामक घेतले, तर हा त्रास कमी होऊ शकतो. याउलट या कारणास्तव समाजात मिसळणे बंद ठेवून विश्रांतीचा बडेजाव केल्यास या तक्रारी वाढत जाऊ शकतात.
याच काळात स्त्रीच्या सर्व स्त्रीविषयक अवयवांची वाढ होऊ लागते. या वाढीसाठी व रज:स्राव दर महिन्याला नव्याने सुरू होत असल्याने सकस अन्न व आहारातून खनिजे, लोह, कॅल्शियम, जास्त जाण्याची गरज असते. नेमक्या याच वयात खाण्याच्या बाबतीत चोखंदळपणा वाढतो व आवश्यक तो आहार घेतला जात नाही. हिरव्या गडद रंगाच्या भाज्या व पालेभाज्या, केळी, दूध, अंडी, मोड आलेली धान्ये व कोशिंबिरी यांचा वापर केल्यास कोणतीही बाह्य औषधे न घेताही वाढीला पोषक अशी द्रव्ये या काळात मिळतात.
स्त्री पुरुष संबंधांबाबत योग्य ती जाण याच वयात मिळवून देणेही आवश्यक ठरते.
*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*
**********************
मुलीच्या शरीरातील स्त्रीत्वाचे अवयव जेव्हा पूर्ण वाढतात, तेव्हा मासिक पाळीला सुरुवात होते, यालाच रज:स्राव असे म्हणतात. रज:स्राव म्हणजे गर्भाशयाच्या अंतर्भागातील पापुद्रा वा अंतस्त्वचा सुटते, तिचे लहान लहान तुकडे व यामुळे होणारा रक्तस्राव हा योनीमार्गाद्वारे बाहेर टाकला जातो. स्त्रीच्या शरीरात दर अठ्ठावीस दिवसांनी बीजांडांची निर्मिती होत असते. हे बीजांड जर फलित झाले नाही तर गर्भाशयात बदल होत जातात व रज:स्राव सुरू होतो. बीजांड फलित झाल्यास गर्भावस्था सुरू होते. याचाच दुसरा अर्थ असा की, वयात आल्यापासून ते गर्भधारणा होऊ शकेल अशा काळात गर्भावस्था नसेल तर दर महिन्याला एकदा रज:स्राव होतो. म्हणूनच याला सोप्या भाषेत मासिक पाळी असे म्हटले जाते.
मुलगी वयात येण्याचे वय म्हणजे दहा ते अठरा. या दरम्यान रज:स्रावाला कधीही सुरुवात होऊ शकते. स्त्रीचा गर्भधारणा होऊ शकण्याचा काळ हा पंचेचाळीस ते पन्नास या वयापर्यंत असतो. त्यानंतर रज:स्राव होणे बंद होते. मासिक पाळीचा काळ हा तीन ते सहा दिवसांचा असतो. या दरम्यान गर्भाशयातील सर्व अंतस्त्वचा बदलली जाऊन नवीन तयार होत जाते. हा स्राव शोषून घेणाऱ्या नॅपकिन्सचा वापर सुरू झाल्यापासून स्वच्छता सोयीची झाली आहे. पूर्वी या पद्धतीच्या सोयी नसल्याने स्त्रियांना विश्रांती घ्यायला सांगितले जाई.
या काळात भरपूर पाणी पिणे, मोजका पण सकस आहार घेणे व कोठा साफ ठेवणे हे आवश्यक असते. याही काळात रोज स्वच्छ आंघोळ करून वैयक्तिक स्वच्छता राखणे उत्तम. मोकळे सैलसर कपडे वापरले तर मासिक पाळीचा त्रास कमी होतो. कारण नको त्या ठिकाणी कपड्यांचा ताण पडत नाही.
क्वचित काही मुलींना सुरुवातीला अंगावर स्त्राव जास्त जाणे, पोट दुखणे, कंबर दुखणे असा त्रास होऊ शकतो. पण त्याचा फार बाऊ न करता रोजचे व्यवहार चालू ठेवले व गरजेनुसार क्वचित वेदनाशामक घेतले, तर हा त्रास कमी होऊ शकतो. याउलट या कारणास्तव समाजात मिसळणे बंद ठेवून विश्रांतीचा बडेजाव केल्यास या तक्रारी वाढत जाऊ शकतात.
याच काळात स्त्रीच्या सर्व स्त्रीविषयक अवयवांची वाढ होऊ लागते. या वाढीसाठी व रज:स्राव दर महिन्याला नव्याने सुरू होत असल्याने सकस अन्न व आहारातून खनिजे, लोह, कॅल्शियम, जास्त जाण्याची गरज असते. नेमक्या याच वयात खाण्याच्या बाबतीत चोखंदळपणा वाढतो व आवश्यक तो आहार घेतला जात नाही. हिरव्या गडद रंगाच्या भाज्या व पालेभाज्या, केळी, दूध, अंडी, मोड आलेली धान्ये व कोशिंबिरी यांचा वापर केल्यास कोणतीही बाह्य औषधे न घेताही वाढीला पोषक अशी द्रव्ये या काळात मिळतात.
स्त्री पुरुष संबंधांबाबत योग्य ती जाण याच वयात मिळवून देणेही आवश्यक ठरते.
*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*
0
Answer link
मासिक पाळी (Menstruation) म्हणजे काय ते सोप्या भाषेत खालीलप्रमाणे:
मासिक पाळी:
- मासिक पाळी ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे जी स्त्रीच्या शरीरात दर महिन्याला होते.
- यात गर्भाशयाच्या अस्तराचा (lining) रक्तस्त्राव होतो, जो योनीमार्गातून बाहेर येतो.
- पहिला रक्तस्त्राव साधारणपणे १२ ते १५ वर्षांच्या दरम्यान होतो, ज्याला Menarche म्हणतात.
- मासिक पाळी साधारणपणे दर २८ दिवसांनी येते, परंतु ती २१ ते ३५ दिवसांच्या दरम्यान कधीही येऊ शकते.
- ती साधारणपणे ४५ ते ५५ वयापर्यंत नियमित असते, त्यानंतर हळूहळू कमी होऊन बंद होते, ज्याला Menopause म्हणतात.
मासिक पाळी का येते?
- स्त्रीच्या शरीरात दर महिन्याला गर्भधारणेसाठी तयारी होते.
- गर्भाशयाचे अस्तर (lining) जाड होते, जेणेकरून fertilized egg तिथे रुजू शकेल.
- जर गर्भधारणा झाली नाही, तर ते जाड झालेले अस्तर तुटून योनीमार्गातून रक्ताच्या स्वरूपात बाहेर येते. ह्यालाच मासिक पाळी म्हणतात.
मासिक पाळीचे महत्व:
- मासिक पाळी हे स्त्रीच्या प्रजननक्षमतेचे लक्षण आहे.
- नियमित मासिक पाळी चांगले आरोग्य दर्शवते.
मासिक पाळी दरम्यान घ्यावयाची काळजी:
- स्वच्छता राखा.
- पुरेसा आराम करा.
- पौष्टिक आहार घ्या.