गुढीपाडवा हा सण का साजरा केला जातो? आणि या दिवशी काय काय घडले?
गुढीपाडवा म्हणजेच वर्ष प्रतिपदा !
१. तिथी
युगादी तिथी, चैत्र शुद्ध प्रतिपदा
२. वर्षारंभ : चैत्र शुद्ध प्रतिपदाच का ?
याचा प्रथम उद्गाता ‘वेद’ आहे. वेद हे अतीप्राचीन वाङ्मय आहे, याबद्दल दुमत नाही. ‘द्वादशमासैः संवत्सरः ।’ असे वेदात म्हटले आहे. वेदांनी सांगितले म्हणून ते जगाने मान्य केले. वर्षारंभाचा प्रारंभदिवस ‘चैत्र शुद्ध प्रतिपदा’ हा आहे. आच सर्वजण साजरा करत असलेल्या १ जानेवारीला वर्षारंभ का, याला शास्त्रीय आधार नाही.
याउलट चैत्र शुद्ध प्रतिपदेस वर्षारंभ करण्यास अर्थात गुढीपाडवा साजरा करण्यास नैसर्गिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक कारणे आहेत.
अ. गुढीपाडवा : नैसर्गिक महत्त्व
– वसंत ऋतूच्या प्रारंभाचा दिवस
ज्योतिषशास्त्रानुसार पाडव्याच्या आसपासच सूर्य वसंतसंपातावर येतो (संपात बिंदू म्हणजे क्रांतीवृत्त आणि विषुववृत्त ही दोन वर्तुळे ज्या बिंदूत परस्परांस छेदतात तो बिंदू होय.) आणि वसंत ऋतू चालू होतो. सर्व ऋतूंत ‘कुसुमाकरी वसंत ऋतू ही माझी विभूती आहे’, असे भगवंतांनी श्रीमद्भगवद्गीतेत (१०:३५) म्हटले आहे. या वेळी हवामान समशीतोष्ण आणि उत्साहवर्धक असते. शिशिर ऋतूत झाडांची पाने गळून गेलेली असतात, तर पाडव्याच्या सुमारास झाडांना नवी पालवी येत असते. वृक्षवल्ली टवटवीत दिसतात.
आ. गुढीपाडवा : ऐतिहासिक महत्त्व
१. रामाने वालीचा वध केल्याचा दिवस
रामाने वालीचा वध या दिवशी केला.
ज्या दिवशी राम रावणवधानंतर आयोध्येला परत आला, त्या दिवशी रामाच्या विजयाचे आणि आनंदाचे प्रतीक म्हणून घरोघरी गुढी (ब्रह्मध्वज) उभारली होती. विजयाचे प्रतीक हे उंच असते, म्हणून गुढी उंच उभी केली जाते.
२. शालिवाहन शक चालू झाल्याचा दिवस !
शकांनी हुणांचा पराभव करून विजय मिळविला तोही हाच दिवस अर्थात् गुढीपाडवा. या दिवसापासूनच शालिवाहन शक सुरू झाले; कारण या दिवशी शालिवाहनाने शत्रूवर विजय मिळविला.
ही गुढीपाडवा हा वर्षारंभ साजरा करण्यामागील ऐतिहासिक कारणे आहेत.
इ. गुढीपाडवा : आध्यात्मिक महत्त्व
१. सृष्टीची निर्मिती म्हणजेच सत्ययुगाच्या प्रारंभाचा दिवस
ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, म्हणजे सत्ययुगाला सुरुवात झाली, तो हा दिवस असल्याने या दिवशी वर्षारंभ केला जातो.
२. १ जानेवारी नव्हे, तर गुढीपाडवा हाच पृथ्वीचा खरा वर्षारंभदिन
गुढीपाडवा हा पृथ्वीचा खरा वर्षारंभदिन
‘गुढीपाडव्याला सुरू होणारे नवीन वर्षाचे कालचक्र हे विश्वाच्या उत्पत्तीकाळाशी निगडित असल्याने सृष्टी नवचेतनेने भारित झालेली असते. याउलट ३१ डिसेंबरला रात्री १२ वाजता सुरू होणारे नवीन वर्षाचे कालचक्र हे विश्वाच्या लयकाळाशी निगडित असते.
गुढीपाडवा या दिवशी सुरू होणार्या नववर्षाची तुलना सूर्योदयाला उगवणार्या तेजोमयी दिवसाशी करता येईल, तर ३१ डिसेंबरला रात्री १२ वाजता सुरू होणार्या नववर्षाची तुलना सूर्यास्तानंतर सुरू होणार्या तमोगुणी रात्रीशी करता येईल. निसर्गनियमाला अनुसरून केलेल्या गोष्टी मानवाला पूरक असतात, तर विरुद्ध केलेल्या गोष्टी मानवाला हानीकारक असतात. यास्तव पाश्चात्त्य संस्कृतीनुसार १ जानेवारी हा नव्हे, तर गुढीपाडवा हाच नववर्षारंभ साजरा करण्यात आपले खरे हित आहे.’ – (सनातनच्या साधकाला ईश्वरी कृपेमुळे मिळालेले ज्ञान)
३. गुढीपाडवा : साडेतीन मुहूर्तांपैकी एक
गुढीपाडवा, अक्षय्य तृतीया आणि दसरा म्हणजे प्रत्येकी एक अन् कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे अर्धा, असे साडेतीन मुहूर्त आहेत. या साडेतीन मुहूर्तांचे वैशिष्ट्य असे की, इतर दिवशी कोणत्याही शुभकार्यासाठी मुहूर्त पहावा लागतो; या दिवशी मात्र मुहूर्त पहावा लागत नाही. या दिवसांतील कोणतीही घटिका शुभमुहूर्तच असते.
गुढीपाडवा हा सण अनेक कारणांसाठी साजरा केला जातो, त्यापैकी काही प्रमुख कारणे आणि या दिवशी घडलेल्या घटना खालीलप्रमाणे आहेत:
गुढीपाडवा साजरा करण्याची कारणे:
-
नवीन वर्षाची सुरुवात: गुढीपाडवा हा दिवस चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी येतो आणि हा दिवस हिंदू नववर्षाची सुरुवात मानला जातो.
-
शालिवाहन शक सुरू: याच दिवसापासून शालिवाहन शक सुरू झाले, त्यामुळे हा दिवस विशेष महत्त्वाचा आहे.
-
रामाचा विजय: प्रभू रामचंद्रांनी रावणाचा पराभव करून याच दिवशी अयोध्या नगरीत प्रवेश केला, त्यामुळे हा दिवस विजयाचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो.
-
ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली: असे मानले जाते की याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली. त्यामुळे या दिवसाला सृजनाचा दिवस म्हणूनही महत्त्व आहे.
-
वसंत ऋतूची सुरुवात: गुढीपाडवा हा वसंत ऋतूच्या आगमनाचे प्रतीक आहे, ज्यामुळे निसर्गात नवचैतन्य निर्माण होते.
या दिवशी काय काय घडले:
- शालिवाहन शक सुरू: शालिवाहन राजाने शक सुरू केले.
- रामाचा विजय: राम रावणाचा वध करून परत आले.
- ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली: ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली.
गुढीपाडव्याच्या दिवशी लोक घराला तोरणे लावतात, गुढी उभारतात आणि पारंपरिक पद्धतीने पूजा करतात. हा सण नवीन सुरुवात आणि समृद्धीचा संदेश देतो.