2 उत्तरे
2
answers
कलियुगाला कलियुग का म्हणतात?
6
Answer link
पुराणानुसार पृथ्वीचे वय हे ४ युगात विभागले आहे. सर्व युगांना मिळून महायुग म्हणतात. महायुगात ४ युगे येतात. ते सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग असे आहेत.

भगवान श्रीकृष्णाचा मृत्यू झाल्यानंतर द्वापारयुग संपले आणि कलियुग सुरु झाले असा पुराणात पुरावा आहे.
कली नावामागे बऱ्याच गोष्टी पुराणात आहे. प्रामुख्याने कली हा एक महाकाय राक्षस आहे. जो अधर्म, अराजकता, अत्याचार, लूट या सगळ्या गोष्टी समाजात पसरवेल. आणि हाच कली या चौथ्या युगात संपूर्ण जगावर राज्य करेल असा पुराणात उल्लेख आहे.

तसेच काही पुराव्यानुसार कली हा विष्णूचा १० वा अवतार असणार आहे आणि तो देखील राक्षशीच वृत्तीचा असणार आहे. कलियुगाच्या शेवटी पृथी नष्ट होणार आहे असेही पुराणात म्हणले आहे.
या कली नावाच्या वाईट वृत्तीच्या राक्षसावरूनच चौथ्या युगाला कलियुग असे म्हणतात. म्हणूनच काही वाईट बातमी ऐकायला आल्यावर लोक सहसा "काय घोर कलियुग आहे" असे म्हणतात.
संदर्भ: कलियुग
0
Answer link
कलियुगाला कलियुग का म्हणतात याची काही कारणे खालीलप्रमाणे आहेत:
- कलीचा प्रभाव: 'कली' म्हणजे वाईट, नकारात्मक किंवा अंधकार. कलियुगात या नकारात्मक गोष्टींचा प्रभाव वाढतो, ज्यामुळे लोकांना सत्य, धर्म आणि चांगल्या गोष्टींपासून दूर राहावे लागते.
- धर्माचरणाची कमतरता: कलियुगात लोक धर्माचे पालन कमी करतात. लोकांचा नैतिकतेवरील विश्वास कमी होतो आणि ते पापांकडे आकर्षित होतात.
- अधर्माचे राज्य: या युगात अधर्म वाढतो आणि अन्याय सर्वत्र दिसतो. वाईट गोष्टी समाजात सहजपणे स्वीकारल्या जातात.
- आयुष्याची कमी: कलियुगात मनुष्याची आयु मर्यादा कमी होते. शारीरिक आणि मानसिक त्रास वाढतात, ज्यामुळे लोकांचे जीवन कष्टमय होते.
- संबंधांमध्ये कटुता: कलियुगात कुटुंबातील आणि समाजातील संबंधांमध्ये प्रेम आणि आपुलकी कमी होते. स्वार्थ आणि हेवेदावे वाढतात.
या कारणांमुळे कलियुगाला 'कलियुग' म्हटले जाते, कारण यात नकारात्मक गोष्टींचा प्रभाव अधिक असतो.
अधिक माहितीसाठी, आपण खालील लिंकवर क्लिक करू शकता: