
भांडी
1
Answer link
पितळी भांडी म्हणजे स्वयंपाक घरचा दागिना आरोग्य आठवणी अभिमान आणि हो प्रॉपर्टी जिची किंमत दिवस गणिक वाढत जाते स्वस्त प्लास्टिक सारखी कमी होत नाही तेव्हा आजच स्मार्ट बना पण


पितळी भांडी वापरा पण पितळेच्या भांड्याना कल ई
लावुन घ्यावी आणि नंतर त्यात स्वयंपाक करावा
बिना कल ई न लावलेली पितळी भांडी वापरू नये तसेच कढी टाऌमेटो असलेल्या भाज्या आंबट पदार्थ बनवू नये कारण ते तसं केल्याने तब्येतीला घातक आहे म्हणून कल ई लावलेल्या भांड्यात स्वयंपाक करावा. पण कढी टाॅमेटोच्या भाज्या व आबंट असणाऱ्या भाज्या पितळेच्या भांड्यात आबंट पदार्थ कढी किंवा टाॅमेटो असलेल्या भाज्या लगेग तयार झाल्या कि दुसऱ्या भांड्यात काढून घ्यावे
पितळ:

बऱ्याच जणांच्या घरात आजीच्या काळातील काही पितळी भांडी असतीलच. ताट, वाट्या, तांब्या,परात,पितळी डबे असतील.
ह्या सगळ्या भांड्यांचा मुख्यतः कंटाळा येतो ते केवळ त्याला स्वच्छ करण्यासाठी लागणारा वेळ यामुळे. ही भांडी लिंबू वगैरे लावून स्वच्छ करता येतात अन्यथा काळी पडतात.
पितळेच्या भांड्यांचा सगळ्यात जास्त तोटा म्हणजे जर त्याला कल्हई केली नसेल तर त्यामध्ये अन्न शिजवणे किंवा पितळी ताटामध्ये जेवण करणे महागात पडू शकते. अगदी जेवण होईपर्यंत देखील ताटातील भाजीला हिरवा रंग येतो.
अशाप्रकारच्या ताटा मध्ये आम्लयुक्त पदार्थ खाणे देखील रोगाला आमंत्रण देण्यासारखेच आहे. ही भांडी शक्यतो धार्मिक कार्यासाठी वापरतात.
पितळी भांडी वापरताना घ्यायची काळजी:

पितळी भांडे वापरतानाही त्यांना आतून कल्हई केलेली असावी. या भांड्यामध्ये अन्न शिजवणे शक्यतो टाळावे. कारण मीठ आणि आंबट पदार्थ जसे, टोमॅटो आणि लिंबू यामुळे त्यात रासायनिक प्रक्रिया होते व त्यातून निघणारे द्रव्य मानवी शरीरास घातक असते.
म्हणूनच शिजवलेले अन्नदेखील पितळी भांड्यात साठवून ठेवू नये.
2
Answer link
तस पहिला तर स्टील किंवा लोखंड दोन्ही आयुर्वेद प्रमाणे अयोग्य आहे .. कारण यांचा अग्नी शी संपर्क आला कि ते रिऍक्ट होतात आणि अन्न दूषित करण्याचा धोका निर्माण होतो.. असा म्हणू शकतो कि हळू हळू विष बनत जात.. आणि शरीरात विकार निर्माण होऊ लागत..
सर्वात चांगल धांतू आहे तांबं किंवा पितळ. अग्नीशी संपर्क झालं कि यातून निघणारे रसायन आपल्या शरीराकरता उपयुक्त असतात. मोठ्या मोठ्या हॉटेल्स मध्ये आजही पितळी पासून बनवलेल्या भांड्यांमध्येच अन्न तयार केले जाते.. त्याची छावाच वेगळी लागते. आपल्या घरी पण २५-३०वर्ष पूर्वी पितळेच्या भांड्यात मधेच जेवण तयार केल्या जायचं..पण आता आपण स्टील, लोखंड, नॉन स्टिक किंवा जर्मन च्या भांड्यात अन्न शिजवतो.
जर्मन चे भांडे सर्वात खराब आहेत पण सर्वात जास्त हेच वापरत आहे ..स्पेसिअली कॅटरिंग व्यवसायात
लोखंडाची भांडी
लोखंडाच्या भांड्यात बनवलेलं जेवण खाल्ल्याने आपल्या शरीराची शक्ती वाढते. लोह तत्त्व शरीरातील आवश्यक पोषक तत्त्व वाढवतात. याशिवाय लोह अनेक रोगांचा नाशही करतं. आपल्या शरीराला सूज आणि पिवळेपण येऊ देत नाही, काविळीला दूर ठेवते. पण लोखंडाच्या भांड्यात जेवण जेऊ नये. लोखंडाच्या भांड्यात दूध पिणं चांगलं असतं असं म्हणतात. पण या भांड्यांची देखभाल करणे थोडे जिकीरीचे आणि व्याप वाढवणारे असते. त्यामुळे शक्यतो या भांड्यात जेवण बनवून नंतर दुसऱ्या भांड्यांमध्ये काढून ठेवावं.
स्टीलची भांडी
हा एक असा धातू आहे, जो आपल्या प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात भांड्याच्या रूपात असतोच. आजकाल बाजारात भांड्याच्या नावावर सर्वात अधिक स्टीलची भांडीच मिळतात. पण स्टीलबाबत असं म्हटलं जातं की, त्यात जेवण बनवणं नुकसानदायक असतं. पण हे खरं नाही. स्टीलची भांडी ही नुकसानकारक नसतात. पण या भांड्यांमध्ये जेवण बनवून शरीराला ना कोणता फायदा होत ना कोणतं नुकसान होतं.
त्यामुळे आपल्या शक्य असेल आणि जे आरोग्यदायी असेल अशा भांड्यांमध्ये जेवण बनवा. मनापासून बनवलेलं जेवण मग ते चांदीच्या भांड्यात असो वा लोखंडाच्या भांड्यात असो रूचकर आणि आरोग्यदायीच ठरते.
1
Answer link
बालाथल येथे मोठ्या प्रमाणावर मातीच्या भांड्यांचे उत्पादन होत होते.
त्याचा पुरवठा आहाड संस्कृतीच्या इतर गाव- वसाहतींना केला जात होता.
आहाड संस्कृतीच्या मातीच्या भांड्यांमध्ये काळी आणि तांबडी भांडी महत्वाची आहेत.ती चाकावर घडवलेली असत.त्यांचा आतील भाग आणि तोंडाजवळचा भाग काळा आणि उरलेला भाग तांबडा असे.
मातीच्या भांड्याबरोबरच मातीचे बैल, शंखांच्या वस्तू, दगडी पाती, छिन्न्या, बाणाची अग्रे, तांब्याची हत्यारे यासारख्या वस्तू मोठ्या प्रमाणात मिळाल्या.
बालाथल येथील घरे पक्क्या विटांची (इंग्लिश बॉण्ड पद्धत) बांधली होती.
बालाथलभोवती तटबंदी होती. हडप्पा संस्कृतीशी असलेल्या संबंधाचा पुरावा आहे.
हडप्पा संस्कृतीचे लोक आहाड संस्कृतीच्या लोकांकडूनच तांबे आणि तांब्याच्या वस्तू आयात करत असावेत,असे दिसते.
तांबे वितळवून ते शुद्ध करण्याचे ज्ञान त्यांच्याकडे होते.
राजस्थानातील खेत्री येथील तांब्याच्या खाणींमधून हे लोक तांबे मिळवत होते.
6
Answer link
स्टील चे प्लेट्स आणि चमचे
ह्या गोष्टींचा आपण खाण्यासाठी वापर करतो पण ह्या गोष्टींच्या साहाय्याने आपण आपले जेवण मुखाने खातो. तर चमचे व ताट आपल्याला जेवण वाढण्यासाठी मदत करतात. चमचे वेगवेगळ्या रूपात आढळतात उदाहरणार्थ लाकडी चमचे, प्लास्टिकचे चमचे इत्यादी.
स्वयंपाकगृहात चमचे व प्लेट्स आढळून येतात. जेवताना दुपारी व रात्री आपण त्याचा वापर करतो.
धन्यवाद
ह्या गोष्टींचा आपण खाण्यासाठी वापर करतो पण ह्या गोष्टींच्या साहाय्याने आपण आपले जेवण मुखाने खातो. तर चमचे व ताट आपल्याला जेवण वाढण्यासाठी मदत करतात. चमचे वेगवेगळ्या रूपात आढळतात उदाहरणार्थ लाकडी चमचे, प्लास्टिकचे चमचे इत्यादी.
स्वयंपाकगृहात चमचे व प्लेट्स आढळून येतात. जेवताना दुपारी व रात्री आपण त्याचा वापर करतो.
धन्यवाद
3
Answer link
लोखंडी कढईतली बासुंदी अतिशय खमंग आणि छान रंगाची होते, पण नवीन शिकताना सवय नसेल तर हमखास दूध खाली लागते. नॉनस्टिक पसरट भांड्यात दूध लागण्याची शक्यता खूप कमी असते त्यामुळे एकाच वेळी दोन भांड्यांत दूध आटवणे सोपे होते. थोडे- थोडे आटवायलाही वेळ तेवढाच लागतो, पण दोन भांड्यामुळे एकूण दूध निम्म्या वेळात आटवून होते. ही बासुंदी देखील चवदार खमंग लागते.
थोडे थोडे आटवण्याचा फायदा हा की एखाद्या वेळी चुकून दूध खाली जळले तरी तेवढा घाणा काढून टाकता येतो. सर्व दुधाला जळका वास लागत नाही. ( सर्व दूध एकदम आटवताना जर खाली लागले तर बहुतेक वेळा तो वास संपूर्ण दुधाला लागतो. जळकी खरवड काढून टाकली, वरून कितीही केशर घातले तरी तो जळकट वास खाताना डोके वर काढतोच).
मात्र भांड्यांचे नॉनस्टिक आवरण झिजलेले, चरे इ. पडलेले नसावे. जर रोजच्या वापरातले भांडे असेल तर त्यात आधी केलेल्या उग्र चवीच्या पदार्थाचा वास शिल्लक राहिला नाही ना हे बघावे. दुधात वास सहज शोषले जातात.
लोखंडी कढई वापरायची असेल तर ती पांढरट दिसेपर्यंत घासावी अन्यथा बासुंदी बिघडू शकते.
दूध आटवता आटवता अखेरीस अगदीच कंटाळा आला तर एक लीटरला एक चमचा ह्या प्रमाणात तांदळाची बारीक पिठी गार दुधातून लावावी म्हणजे पटकन दाटपणा येतो.
थोडे थोडे आटवण्याचा फायदा हा की एखाद्या वेळी चुकून दूध खाली जळले तरी तेवढा घाणा काढून टाकता येतो. सर्व दुधाला जळका वास लागत नाही. ( सर्व दूध एकदम आटवताना जर खाली लागले तर बहुतेक वेळा तो वास संपूर्ण दुधाला लागतो. जळकी खरवड काढून टाकली, वरून कितीही केशर घातले तरी तो जळकट वास खाताना डोके वर काढतोच).
मात्र भांड्यांचे नॉनस्टिक आवरण झिजलेले, चरे इ. पडलेले नसावे. जर रोजच्या वापरातले भांडे असेल तर त्यात आधी केलेल्या उग्र चवीच्या पदार्थाचा वास शिल्लक राहिला नाही ना हे बघावे. दुधात वास सहज शोषले जातात.
लोखंडी कढई वापरायची असेल तर ती पांढरट दिसेपर्यंत घासावी अन्यथा बासुंदी बिघडू शकते.
दूध आटवता आटवता अखेरीस अगदीच कंटाळा आला तर एक लीटरला एक चमचा ह्या प्रमाणात तांदळाची बारीक पिठी गार दुधातून लावावी म्हणजे पटकन दाटपणा येतो.
2
Answer link
नॉन-स्टीक भांडी वापरण्यापूर्वी एकदा विचार जरूर करा! ⭕
साधारण दोन-एक दशकांपूर्वी ’नॉन-स्टीक’या विशिष्ट प्रकारचे तवे उपलब्ध झाले. दिसायला आकर्षक, वापरण्यास-धुण्यास सोपे असे हे तवे गृहिणींना खूप आवडले.त्यानंतर नॉन-स्टीक पद्धतीची भांडी बाजारात आली. उपरोक्त फायद्यांबरोबरच अन्न शिजवताना कमी तेल लागणे व इंधनाची बचत होणे हे फायदे ह्या नॉन-स्टीक भांड्यांचे होते. ही भांडीसुद्धा आरंभी खूप महाग होती. त्यामुळे नॉन-स्टीक भांडी वापरणे, ही काही काळ तरी श्रीमंतांची मिजास होती. एखाद्या मध्यमवर्गीय गृहिणीने नॉन-स्टीक भांडी घरी आणली की तिची शेजार-पाजारच्या स्त्रियांमध्ये कॉलर टाईट होत असे, यावरुन त्यांच्या किमतीचा अंदाज यावा. पण नंतर काय झाले कोणास ठाऊक, ही नॉन-स्टीक भांडी स्वस्त झाली. इतकी स्वस्त की एका भांड्यावर दुसरे भांडे मोफत मिळू लागले.
मुळात पाश्चात्त्यांकडून आलेल्या वस्तू स्वस्त झाल्या की यामागे काहीतरी काळेबेरे आहे, अशी शंका येऊ लागते. काय आहे, या नॉन-स्टीक भांड्यांमागचे गौडबंगाल?नॉन-स्टिक भांडी तयार करताना एका विशिष्ट केमिकलचा वापर केलाजातो, ते म्हणजे परफ्लोरो ओक्टॅनॉइक ॲसिड(पीएफओए). पीएफओए हे आरोग्यासाठी घातक असे केमिकलआहे. वास्तवात नॉन-स्टीक भांड्यामधील ही केमिकल्स स्थिर अवस्थेमध्ये शरीराला तशी घातक नाहीत. मात्र जेव्हा तुम्हीं या नॉन-स्टीक भांड्यांना अन्न शिजवण्यासाठी म्हणून अति-उष्णता देता व जेव्हा त्या भांड्याचे तापमान साधारण २६० अंश सेल्सिअस (५०० अंश फरनहाईट) एवढ्या उष्णतेपर्यंत पोहोचते तेव्हा त्यामधील केमिकल्सचे विघटन सुरू होते व ते भांडे विषारी वायू फेकू लागते. दुर्दैवाने हे विषारी घटक नॉन-स्टिक भांड्यांच्या प्रेमात पडलेल्या घरातल्या गृहिणीच्या शरीरामध्ये सर्वाधिक प्रमाणात शिरतात. नॉन-स्टिकच्या केमिकल्समधून निघणारे विषारी घटक कोणत्या आजारांना आमंत्रण देऊ शकतात?
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
पीएफओए चे आरोग्याला घातक गुणधर्म पुढीलप्रमाणे – कार्सिनोजेनिक अर्थात कॅन्सरलाआमंत्रण देऊ शकते, गर्भिणीने शोषल्यास गर्भाच्या वाढीवर परिणाम करू शकते; जसे जन्मतः बाळाचा आकार तुलनेने लहान असणे-नंतरच्या वाढीच्या टप्प्यांमध्ये उशिर होणे-वगैरे,त्याचप्रमाणे लहान मुलांच्या वाढीवरही परिणाम करू शकते, थायरॉइड ग्रंथीच्या कार्यात बाधा आणून थायरॉइड हार्मोनच्या स्रवणामध्ये बिघाड निर्माण करू शकते, रक्तामधील चरबीचा चयापचय बिघडवू शकते(जे पुढे जाऊन अनेक आजारांना कारणीभूत होऊ शकते). उंदरांमध्ये केलेल्या संशोधनामध्ये पीएफओए हे लिव्हर(यकृत), पॅन्क्रीआ(स्वादुपिंड) किंवा टेस्टीज(वृषण) या अवयवांच्या कॅन्सरला कारणीभूत होऊ शकते, माशांमध्ये केल्या गेलेल्या संशोधनामध्ये पीएफओए हे ऑक्सिडेटिव स्ट्रेसला कारणीभूतहोते: अर्थात शरीरामध्ये ऑक्सिडेशनचे प्रमाण वाढवून रक्तामध्ये घातक फ्री-रॅडिकल्सचे प्रमाण वाढवते (फ्री-रॅडिकल्स हाय ब्लडप्रेशर, हार्ट अटॅक-डायबिटीस,कॅन्सर एवढंच नव्हे तर वार्धक्यालाही आमंत्रण देतात), स्त्री-उंदरांवर केलेल्या एका संशोधनामध्ये पीएफओए रक्तामधीलइन्शुलिनचे प्रमाण वाढवते. (आता लक्षात आले असेल तुमच्या, नॉन-स्टिक भांडी इतकी स्वस्तात किंवा अन्य खरेदीवर मोफत सुद्धाका मिळू लागली ते!)हे वाचल्यावर मनात प्रश्न उभा राहतो की आपण एवढ्या उष्णतेपर्यंत नॉन-स्टिक भांडी तापवतो का? याचे ठाम उत्तर देणे कठीण आहे. मात्र कडधान्य-मांस यांसारख्या कठीण कवच असलेल्या पदार्थांना शिजवण्यास वेळ लागतो; त्यासाठी अधिक उष्णता लागते. खाद्य-तेल शिजवण्यासही अधिक उष्णता लागते, मात्र २६० हून कमी रिफाईन्ड करडईचे तेल तापवण्यास मात्र २६० अंश सेल्सिअसहून अधिक उष्णता लागते.अधिक वेळ अन्न शिजवण्याची सवय असणा-या गृहिणी नॉन-स्टिक भांडे अधिक उष्णतेपर्यंत तापवत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. साधारण २ ते ५ मिनिटे तापवलेले नॉनस्टिक भांडेसुद्धाविषारी वायू फेकायला सुरुवात करते, असा संशोधकांचा अंदाज आहे. रिकामे भांडे नुसतेच तापवणेही घातक होऊ शकते. २०० अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान पोहोचल्यावर पीएफओमधील विषारी वायुंमुळे पक्षी मरतात, असे संशोधन सांगते. मानवास होणा-या एका फ्लूच्या लक्षणांमागे पीएफओए कारणीभूत असावा, अशीही शास्त्रद्न्यांना शंका आहे.वाचकहो, भाज्या शिजवण्यासाठी शरीराला लोह पुरवणार्या लोखंडाच्या कढया, आपल्या कुंभारांना अर्थार्जन करुन देणारे मातीचे तवे ( मातीचे पॅन्ससुद्धा आता उपलब्ध आहेत), किंवा स्टेनलेस स्टीलची भांडी असे सुरक्षित पर्याय स्वयंपाकासाठी वापरणे योग्य होईल. “आमची नॉन-स्टिक भांडी पीएफओए पासून बनवलेली नाहीत”,असा प्रचार काही निर्माते आता करताहेत. जे निर्माते या केमिकलचा वापर करत नसतील, त्यांना हा लेख लागू होत नाही. पण यापूर्वी आपण वापरलेली (किंवा आजही वापरत असलेली) नॉन स्टीक भांडी या घातक केमिकल्सपासून बनवलेली होती वा आहेत, याचा हा अप्रत्यक्ष पुरावानाही का!कोणतीही स्वयंपाकोपयोगी खरेदी करताना त्यामधून नेमकी कोणती केमिकल्स शरीरामध्ये जाणार आहेत, याची माहिती घेण्याची सवय लावा वाचकहो!
साधारण दोन-एक दशकांपूर्वी ’नॉन-स्टीक’या विशिष्ट प्रकारचे तवे उपलब्ध झाले. दिसायला आकर्षक, वापरण्यास-धुण्यास सोपे असे हे तवे गृहिणींना खूप आवडले.त्यानंतर नॉन-स्टीक पद्धतीची भांडी बाजारात आली. उपरोक्त फायद्यांबरोबरच अन्न शिजवताना कमी तेल लागणे व इंधनाची बचत होणे हे फायदे ह्या नॉन-स्टीक भांड्यांचे होते. ही भांडीसुद्धा आरंभी खूप महाग होती. त्यामुळे नॉन-स्टीक भांडी वापरणे, ही काही काळ तरी श्रीमंतांची मिजास होती. एखाद्या मध्यमवर्गीय गृहिणीने नॉन-स्टीक भांडी घरी आणली की तिची शेजार-पाजारच्या स्त्रियांमध्ये कॉलर टाईट होत असे, यावरुन त्यांच्या किमतीचा अंदाज यावा. पण नंतर काय झाले कोणास ठाऊक, ही नॉन-स्टीक भांडी स्वस्त झाली. इतकी स्वस्त की एका भांड्यावर दुसरे भांडे मोफत मिळू लागले.
मुळात पाश्चात्त्यांकडून आलेल्या वस्तू स्वस्त झाल्या की यामागे काहीतरी काळेबेरे आहे, अशी शंका येऊ लागते. काय आहे, या नॉन-स्टीक भांड्यांमागचे गौडबंगाल?नॉन-स्टिक भांडी तयार करताना एका विशिष्ट केमिकलचा वापर केलाजातो, ते म्हणजे परफ्लोरो ओक्टॅनॉइक ॲसिड(पीएफओए). पीएफओए हे आरोग्यासाठी घातक असे केमिकलआहे. वास्तवात नॉन-स्टीक भांड्यामधील ही केमिकल्स स्थिर अवस्थेमध्ये शरीराला तशी घातक नाहीत. मात्र जेव्हा तुम्हीं या नॉन-स्टीक भांड्यांना अन्न शिजवण्यासाठी म्हणून अति-उष्णता देता व जेव्हा त्या भांड्याचे तापमान साधारण २६० अंश सेल्सिअस (५०० अंश फरनहाईट) एवढ्या उष्णतेपर्यंत पोहोचते तेव्हा त्यामधील केमिकल्सचे विघटन सुरू होते व ते भांडे विषारी वायू फेकू लागते. दुर्दैवाने हे विषारी घटक नॉन-स्टिक भांड्यांच्या प्रेमात पडलेल्या घरातल्या गृहिणीच्या शरीरामध्ये सर्वाधिक प्रमाणात शिरतात. नॉन-स्टिकच्या केमिकल्समधून निघणारे विषारी घटक कोणत्या आजारांना आमंत्रण देऊ शकतात?
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
पीएफओए चे आरोग्याला घातक गुणधर्म पुढीलप्रमाणे – कार्सिनोजेनिक अर्थात कॅन्सरलाआमंत्रण देऊ शकते, गर्भिणीने शोषल्यास गर्भाच्या वाढीवर परिणाम करू शकते; जसे जन्मतः बाळाचा आकार तुलनेने लहान असणे-नंतरच्या वाढीच्या टप्प्यांमध्ये उशिर होणे-वगैरे,त्याचप्रमाणे लहान मुलांच्या वाढीवरही परिणाम करू शकते, थायरॉइड ग्रंथीच्या कार्यात बाधा आणून थायरॉइड हार्मोनच्या स्रवणामध्ये बिघाड निर्माण करू शकते, रक्तामधील चरबीचा चयापचय बिघडवू शकते(जे पुढे जाऊन अनेक आजारांना कारणीभूत होऊ शकते). उंदरांमध्ये केलेल्या संशोधनामध्ये पीएफओए हे लिव्हर(यकृत), पॅन्क्रीआ(स्वादुपिंड) किंवा टेस्टीज(वृषण) या अवयवांच्या कॅन्सरला कारणीभूत होऊ शकते, माशांमध्ये केल्या गेलेल्या संशोधनामध्ये पीएफओए हे ऑक्सिडेटिव स्ट्रेसला कारणीभूतहोते: अर्थात शरीरामध्ये ऑक्सिडेशनचे प्रमाण वाढवून रक्तामध्ये घातक फ्री-रॅडिकल्सचे प्रमाण वाढवते (फ्री-रॅडिकल्स हाय ब्लडप्रेशर, हार्ट अटॅक-डायबिटीस,कॅन्सर एवढंच नव्हे तर वार्धक्यालाही आमंत्रण देतात), स्त्री-उंदरांवर केलेल्या एका संशोधनामध्ये पीएफओए रक्तामधीलइन्शुलिनचे प्रमाण वाढवते. (आता लक्षात आले असेल तुमच्या, नॉन-स्टिक भांडी इतकी स्वस्तात किंवा अन्य खरेदीवर मोफत सुद्धाका मिळू लागली ते!)हे वाचल्यावर मनात प्रश्न उभा राहतो की आपण एवढ्या उष्णतेपर्यंत नॉन-स्टिक भांडी तापवतो का? याचे ठाम उत्तर देणे कठीण आहे. मात्र कडधान्य-मांस यांसारख्या कठीण कवच असलेल्या पदार्थांना शिजवण्यास वेळ लागतो; त्यासाठी अधिक उष्णता लागते. खाद्य-तेल शिजवण्यासही अधिक उष्णता लागते, मात्र २६० हून कमी रिफाईन्ड करडईचे तेल तापवण्यास मात्र २६० अंश सेल्सिअसहून अधिक उष्णता लागते.अधिक वेळ अन्न शिजवण्याची सवय असणा-या गृहिणी नॉन-स्टिक भांडे अधिक उष्णतेपर्यंत तापवत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. साधारण २ ते ५ मिनिटे तापवलेले नॉनस्टिक भांडेसुद्धाविषारी वायू फेकायला सुरुवात करते, असा संशोधकांचा अंदाज आहे. रिकामे भांडे नुसतेच तापवणेही घातक होऊ शकते. २०० अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान पोहोचल्यावर पीएफओमधील विषारी वायुंमुळे पक्षी मरतात, असे संशोधन सांगते. मानवास होणा-या एका फ्लूच्या लक्षणांमागे पीएफओए कारणीभूत असावा, अशीही शास्त्रद्न्यांना शंका आहे.वाचकहो, भाज्या शिजवण्यासाठी शरीराला लोह पुरवणार्या लोखंडाच्या कढया, आपल्या कुंभारांना अर्थार्जन करुन देणारे मातीचे तवे ( मातीचे पॅन्ससुद्धा आता उपलब्ध आहेत), किंवा स्टेनलेस स्टीलची भांडी असे सुरक्षित पर्याय स्वयंपाकासाठी वापरणे योग्य होईल. “आमची नॉन-स्टिक भांडी पीएफओए पासून बनवलेली नाहीत”,असा प्रचार काही निर्माते आता करताहेत. जे निर्माते या केमिकलचा वापर करत नसतील, त्यांना हा लेख लागू होत नाही. पण यापूर्वी आपण वापरलेली (किंवा आजही वापरत असलेली) नॉन स्टीक भांडी या घातक केमिकल्सपासून बनवलेली होती वा आहेत, याचा हा अप्रत्यक्ष पुरावानाही का!कोणतीही स्वयंपाकोपयोगी खरेदी करताना त्यामधून नेमकी कोणती केमिकल्स शरीरामध्ये जाणार आहेत, याची माहिती घेण्याची सवय लावा वाचकहो!
0
Answer link
फिरकीचा पितळी तांब्या (ফিরকিছা পিতালি তাম্বিয়া) खरेदी करण्यासाठी तुम्ही खालील ठिकाणी प्रयत्न करू शकता:
- तुमच्या शहरातील भांडी दुकाने: तुमच्या शहरातील प्रसिद्ध भांडी दुकानांमध्ये फिरकीचा पितळी तांब्या मिळण्याची शक्यता आहे.
- ॲमेझॉन (Amazon): ॲमेझॉनवर तुम्हाला विविध प्रकारचे पितळी तांबे मिळू शकतात. खालील लिंकवर तुम्ही फिरकीच्या पितळी तांब्या शोधू शकता: ॲमेझॉन
- महाराष्ट्र एम्पोरियम (Maharashtra Emporium): महाराष्ट्र एम्पोरियममध्ये पारंपरिक वस्तू मिळण्याची शक्यता असते.
- ग्रामोद्योग दुकाने: ग्रामोद्योग दुकानांमध्ये पारंपरिक आणि हस्तकला वस्तू मिळतात, तिथे तुम्ही विचारणा करू शकता.
ऑनलाईन खरेदी करताना, उत्पादन आणि विक्रेत्याची माहिती तसेच वाचकांची प्रतिक्रिया (reviews) तपासा.