मानसशास्त्र विचार प्रक्रिया

माणसाला दोन मने नसती तर नेमकं वर्तमान समोर उभे कसे राहिले असते?

2 उत्तरे
2 answers

माणसाला दोन मने नसती तर नेमकं वर्तमान समोर उभे कसे राहिले असते?

2
विचार पक्का झाला की निर्णय ठाम विश्वासाने दृढतेने घेता येतो ...
यासाठी मन मेंदू मनगट मजबूत हवे.
विवेक वृत्ती हवी.
प्रेम नम्रतेने हसतमुख राहणं व सतत सक्रीय सहभाग असणं आवश्यक आहे.
हे सत्कृत्य आचरण कधी घडतं जर तुम्ही संवेदनशील समाजमन बांधिलकी म्हणून काम करत असाल आणि जन हेचि जनार्दन एका जनार्दनी भजन करत रहात असाल तर...
यासाठी समर्पित भावना हवी.
भाव तोचि देव भावेविण देव न कळे निःसंदेह..
माणसं माणसात मिसळून एकजीवी एकरसी एकनिष्ठ रहावीत.
हे सगळं मनन चिंतन अभ्यास करून सहजतेने विशालतेकडे झेपावत रहायला मन नम्र झालं पाहिजे.
करू या ना करू यांचे द्वंद्व सुरू होते तेव्हा विचार हे तत्वावर म्हणजे एक तत्व दृढ धरी मना हा विश्वास पक्का झाला पाहिजे.
यामुळे चांगलं वंगाळ त्याज्य काय ? हे समजून उमजून प्रेम प्रेरणा घेऊन आपली संस्कृती खरी ओळख खरी मैत्री खरी भक्ती खरी शक्ती खरी कृती ही माणसाला माणूस प्रिय करते ... आणि समाज मोठा होतो .
माणसाला विचारातून विवेकी वृत्ती लाभते आणि ती मिळावी म्हणून सत्संग हवा त्यातून  प्रेम हे सर्वोत्तम कामगिरी विश्वासाने करते .
यासाठी मन मोकळं खुलं करून सहजतेने विशालतेकडे झेपावत रहावे म्हणून माणसाला दोन मने दिली आहेत.
 एकच मन असते तर त्यांने तत्व सोडून भुईसपाट असं काम करीत सगळी वासलात लावली असती आणि जीवन चक्राला अडथळा निर्माण केला असता व  समतोल बिघडवला असता... ... 
माया वस्तु यावरून कलह निर्माण झाले असते. कारण मन मानेल तसं वागणं झालं असते.
भावना नियंत्रण कोलमडले असते.
प्रत्येकाला हवी हवीशी वाटणारी गोष्ट जी आहे ती मिळविण्यासाठी युद्ध रणांगण माजून हिंसाचार वाढला असता ...  कारण अट्टाहास वाढला जाऊन चंचलतेने सौंदर्य भकास केले जाते, अशी  विघ्ने घेऊन उभी ठाकली असती .

दोन मने दिलीत त्याबद्दल प्रभु परमात्मांचं आभार !
मन मनास उमगत नाही आधार कोणाचा शोधावा..
यासाठी मनांचा खल दंन्द्व सुरू आहे की, योग्य काय   ?त्यासाठी अंतर्मन व बहिर्मन आहे. यांच्या विचारविमर्शाने पक्का रस्ता मिळतो,  वाट सापडते ती विवेक वृत्ती होय ...आणि जीवनाला अर्थ प्राप्त होतो. चांगली निरिक्षणे नोंदवली जातात . एकमुखी निर्णय होतात. सर्वानुमते ठराव होतात . हे सद्गुण अंगी आले की नीती कृतीने माणुस चालतो.
याकरितां प्रेम नम्रता एकत्व सत्य अबाधित ठेवण्यासाठी सेवा समर्पित भावनेने केली जाते.
सहमती दर्शवली जाते. दिशा प्रकाश मिळतो ... सत्संग मिळते . हे सत्कृत्य आचरण नीतीत उतरणारा जीवभाव सर्वांठायीं असावा असे सुकृत कर्म उभे राहते म्हणून मनन चिंतन अभ्यास असला पाहिजे.
एक तत्व दृढ धरी मना हरिसी करुणा येईल तुझी...अशी निर्मल सेवा अमृता सारखी गोड कार्यपद्धती कार्यप्रणाली विकसित होते....ती विवेकी विचार वृत्ती सर्वोत्तम प्रेम कामगिरी करत एकनिष्ठ राहण्याची किमया साधली जाते.

मन हे न म न झाले पाहिजे. यासाठी दोन मनांचे द्वंद्व सुरू असतं. त्यामुळे जगण्याला अर्थ शिल्लक आहे..
.जेथे एक नजर एक ध्यान एक ध्यास बनते व एक प्यास एकाचे  दर्शन मिळते...एक लगन एक मिलवर्तन एक सद्भाव एख सद्विचार बनतो...  तोच माणुसकी धर्म वाढवतो.. मी पणा व अहंकार निर्मूलन होतं जाण्याने खरा माणूस उभा राहतो व माणसाला माणसासारखा वागवितो . 




 



 

उत्तर लिहिले · 29/7/2024
कर्म · 475
0

माणसाला दोन मने नसती, तर वर्तमान अनेक प्रकारे वेगळे राहिले असते. काही शक्यता:

  • निर्णय घेणे सोपे: दोन मने असल्यामुळे माणूस अनेकदा द्विधा मनःस्थितीत असतो. एकच मन असते तर निर्णय घेणे अधिक सोपे झाले असते.
  • भावनांवर नियंत्रण: दुसरे मन अनेकदा नकारात्मक विचार आणि भावना निर्माण करते. ते नसल्यामुळे भावनांवर अधिक नियंत्रण ठेवता आले असते.
  • एकाग्रता: दोन मने विचलन निर्माण करतात, त्यामुळे एकाग्रता कमी होते. एकच मन असते तर अधिक एकाग्रतेने काम करता आले असते.
  • वर्तमान अधिक स्पष्ट: दुसरे मन भूतकाळातील आठवणी आणि भविष्यातील चिंता निर्माण करते, ज्यामुळे वर्तमान धुसर होतो. एकच मन असते तर वर्तमान अधिक स्पष्टपणे अनुभवता आला असता.

Disclaimer: हे केवळ एक काल्पनिक विश्लेषण आहे.

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 1440

Related Questions

तंटा हा नेहमी माणसातच का होतो, व्यवहारात का होत नाही?
व्यक्तिमत्व मानसशास्त्र या शाखेविषयी थोडक्यात स्पष्टीकरण लिहा?
प्राथमिक संबंधाचे स्वरूप निर्धारित करणाऱ्या आवश्यक अटी कोणत्या ते स्पष्ट करा?
सामाजिक बुद्धिमत्तेचे घटक सविस्तर लिहा?
शालेय मानसशास्त्रामध्ये कोणत्या बाबींचा अभ्यास केला जातो ते स्पष्ट करा?
मी माझ्या आयुष्याचे निर्णय स्वतः न घेता सारखं सारखं दुसर्‍यांना विचारत असतो आणि त्यामुळे मी काय करावे मला काही कळत नाही?
मनातून भीती कशी घालवावी?