राजकारण सामाजिक मुद्दे

फोडाफोडीचे राजकारण थांबवा, अन्यथा माणूस माणसांत कसा राहील...एक तत्त्व दृढ धरी मना...असे राजकारण, समाजकारण, अर्थकारण, जनाधार शोधणारे नेतृत्व हवे आहे. आपले मत मांडा आणि येत्या विधानसभेत 'जन हेचि जनार्दन' सिद्ध व्हावे...मत मांडा?

2 उत्तरे
2 answers

फोडाफोडीचे राजकारण थांबवा, अन्यथा माणूस माणसांत कसा राहील...एक तत्त्व दृढ धरी मना...असे राजकारण, समाजकारण, अर्थकारण, जनाधार शोधणारे नेतृत्व हवे आहे. आपले मत मांडा आणि येत्या विधानसभेत 'जन हेचि जनार्दन' सिद्ध व्हावे...मत मांडा?

0
माझं माझं उगाच म्हणसी काहीही नाही नरा तुझं...

आणि म्हणूनच जनजागृती करण्यासाठी स्थिर विश्वासाची भावना हवी.

आपलीच माणसं आमची संस्कृती सुसंगत रहावी.

विधीची विधाने जर सत्यं शिवं सुंदरम् आहेत तर आपण आपली ओळख ही सत्यं शिवं सुंदरच ठेवावी .


विधायक कार्यक्रम आणि विकास गती योग्य जाणीवेतून व्हावी 

निसर्गापुढे आपण पालापाचोळा असू तर मग अहंकारी वृत्ती व निंदानालस्ती , द्वैषवैर हा मनी का बाळगावा ..

सद् गुरूंचे एक वचन आहे,
क्या कहती है आत्मा, करें कूडेकरकटका खात्मा...

आपण संवेदनशील विवेकी विचार सत्कर्म सत्संग करतो ,
मग माणसाला माणूस प्रिय असावा...

हे विश्वचि माझे घर,ऐंसी मति जयाचि स्थिर, किंबहुना चराचरी एकचि झाला.. हे सत्कृत्य आचरण नीतीत उतरणारा जीवभाव सर्वांठायीं असावा.

आणि मग फोडाफोडीचे राजकारण थांबवा..
माणूस , संघटना,पक्ष ही एक वैचारीक बैठक आहे .
माणसाला मोडता येत नाही , काटकीला मोडता येते ,मग माणसाला मोडायचे कसे  ? शेवटी माणूस टिकला पाहिजे,जगला पाहिजे...
शेवटी सर्व उत्पादने ही जर अखिल मानव जातीसाठी आहेत आणि मानव निर्मित ही आहेत...तर मग मानवी सेवा सुद्धा महान आहे , ती सर्वांसाठी समर्पित असावी

आपण संवेदनशील समाजमन बांधिलकी जोडत जायचं आहे तर मग माझं घर माझा परिवार माझी गल्ली  ,माझा मोहल्ला,माझा इलाखा ,प्रांत , राज्य व माझा देश वतन एकच आहे.. सेवा सत्तेत सहभागी झाल्यानेच होते असं नाही, मत मांडा, विरोधात ही रहा , हां ते मत तम अंधार नष्ट करणारे हवे . 

आपली संस्कृती खरी मैत्री,खरी ओळख, खरी भक्ती,  खरी शक्ती आहे .
कशाला उद्याची बात... आजचा वर्तमान समोर आहे.. वर्तमान सुच्चारूपणे शिस्तीत नियमित कार्यप्रवण करणारा ठेवावा ..आपणचं आपली ओळख समाजपटलावर ठेवावी...

आणि विधायक कार्य अगर  सहकारात सहकार्य करावे असे सुकृत कर्म उभे राहिले पाहिजे

धन्यवाद... आपली लोकशाही, संविधान ही घटना अत्यंत अभ्यासपूर्ण लिहीली आहे ..विवेकी पालकत्व करणारी सेवाभावी वृत्ती सर्वोत्तम प्रेम कामगिरीची दखल घेणारी घटना  सर्वोत्तम आहे ,आपला आवाज,आपला विश्वास स्थिरमन ठेवून माणुसकी धर्म वाढवत जाणारी विचारबद्ध मार्ग दिशा प्रकाश सामर्थ्य ताकद शक्ति ऊर्जा बळ देणारी अशी घटना संविधान आहे .  कोणीही अंतर्मुख होऊन विवेकी विचारातून मतदान करायला उत्सुक असावे असे विधान सुरक्षित रहावे व तसे बोलावे , बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले  !!

सबका सबविधी हो कल्याण !! 

उत्तर लिहिले · 8/6/2024
कर्म · 475
0

नमस्कार,

तुमचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. फोडाफोडीचे राजकारण, समाजातील तेढ आणि मानवी संबंधांमध्ये निर्माण होणारी कटुता यावर तुम्ही चिंता व्यक्त केली आहे, हे स्तुत्य आहे. 'जन हेचि जनार्दन' ही भावना प्रत्यक्षात यावी, यासाठी एक सक्षम आणि समाजाभिमुख नेतृत्व असणे आवश्यक आहे, याबद्दल दुमत नाही.

राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणातील सद्यःस्थिती:

  • राजकारण: आजकाल राजकारणामध्ये नैतिकता आणि मूल्यांचा अभाव दिसतो. सत्ता मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची तयारी अनेक नेते दाखवतात. यामुळे जनतेचा राजकारणावरील विश्वास उडत चालला आहे.
  • समाजकारण: समाजात जाती, धर्म आणि वर्गांमध्ये तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सामाजिक सलोखा आणि एकोपा टिकवणे हे मोठे आव्हान आहे.
  • अर्थकारण: आर्थिक विषमता वाढत आहे. गरीब अधिक गरीब होत आहेत, तर श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहेत. यामुळे समाजात असंतोष निर्माण होत आहे.

'जन हेचि जनार्दन' कसे सिद्ध होईल?

  1. नेतृत्व: प्रामाणिक, निस्वार्थी आणि समाजासाठी समर्पित नेतृत्व पुढे आले पाहिजे. ज्या नेत्यांमध्ये दूरदृष्टी आहे आणि जे समाजाला एकत्र बांधून ठेवू शकतात, असे नेतृत्व हवे.
  2. विचारधारा: 'सर्वधर्म समभाव' आणि 'वसुधैव कुटुंबकम्' यांसारख्या उदात्त विचारधारांचा स्वीकार करणे आवश्यक आहे.
  3. सहभाग: नागरिकांनी राजकारणात सक्रिय सहभाग घेतला पाहिजे. आपल्या समस्या व अपेक्षा सरकारपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे.
  4. शिक्षण: लोकांना योग्य शिक्षण मिळायला हवे, ज्यामुळे ते चांगले नागरिक बनू शकतील आणि समाजात सकारात्मक बदल घडवू शकतील.

येत्या विधानसभा निवडणुकीत 'जन हेचि जनार्दन' हे सिद्ध करण्यासाठी जनतेने जागरूकपणे मतदान केले पाहिजे.

धन्यवाद!

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 2220

Related Questions

लिंगायत धर्म स्वीकारणारे मराठा मांस मच्छी खातात काय?
आदिवासी व वनवासी या शब्दांमध्ये राजकीय संदर्भ स्पष्ट करा?
मध्ययुगीन कालखंडात मुलीच्या जन्मांमुळे नाराजी का व्यक्त होते असे?
भैयाजी जोशी यांनी मराठीविरोधात काय वक्तव्य केले?
राजकारण्यांची भाषा आणि विधाने संघर्षाची, गलिच्छ शब्दांनाही लाज आणेल अशा खालच्या स्तराची, संस्कृतीला काळीमा फासणारी आहेत. काटकीला मोडता येते, कीटकांना कुचलता येते, मग माणसाला मोडायचे कसे? विवेकी पालकत्व करणाऱ्यांनी महाराष्ट्र उभा केला आहे, उत्तर आवश्यक आहे.
मध्ययुगीन कालखंडात मुलीच्या जन्मामुळे नाराजी का व्यक्त होत असे? स्पष्ट करा.
भारतीय स्त्रियांचे सामाजिक स्थान कोणते आहे?