शिक्षण लेखन कौशल्ये

लेखन करताना येणाऱ्या अडचणी?

2 उत्तरे
2 answers

लेखन करताना येणाऱ्या अडचणी?

1


* लेखनातील अडचणी

लेखनकौशल्य आत्मसात करण्यासाठी त्याची तंत्रे जशी
माहिती करून घेणे आवश्यक आहे तसे कोणत्या अडचणी येतात
तेही पाहणे आवश्यक आहे.

(०१) लेखनासाठी आवश्यक ती मानसिक तयारी नसणे.
(०२) आत्मविश्वास नसणे किंवा दुसरा कोणी तरी तो सतत
        खच्ची करीत असतो.
(०३) न्यूनगंड वाटणे.
(०४) लिहिण्यायोग्य विषयच स्वतःजवळ नसणे.
(०६) लिहिण्याची निकड / गरज वाटत नसणे, लिहिण्यास पुरेसे
        / योग्य निमित्त न भावणे,
(०७) लिहिण्यापूर्वीच विषय नीरस / अनावश्यक वाटू लागणे.
(०८) स्वतंत्र लेखनाचा संस्कार बालपणापासून कधीही झालेला
       नसणे.
(०९) लिहून ठेवलेला मजकूर इतर वाचतील या जाणिवेमुळे
        लिहिण्याविषयी संकोच वाटणे. लिहिलेल्या मजकुराला कायदेशीरत्व
         प्राप्त होत असल्याने लिहून ठेवण्यासंबंधी सतत भीती वाटणे.
(१०) लिहायचे ते स्वतःसाठी का इतरांसाठी याविषयी संभ्रम वाटणे.
       लिहिण्याइतका पुरेसा वेळ नसणे.
(१२) लिहिण्याचे फार मोठे कष्ट वाटणे.
(१४) लिहिण्यासाठी आवश्यक ते परिश्रम करण्याची तयारी नसणे.
(१५) लिहिण्यासाठी पूर्वतयारी (विचार, पुरावे,उदाहरणे, आराखडा)
        केलेली नसणे.
(१७) लिहिण्याचे तंत्र / पद्धती परिचित नसणे.
(१८) लिहिण्यासाठी योग्य वातावरण, पुरेसे लेखनसाहित्य,जागा नसणे.

*अडचणी दूर करण्याचे उपाय

       वरील अडचणी लेखनकौशल्यास मारक ठरतात, म्हणून
त्या दूर करण्याचा प्रयत्न करा. लिहिण्यासाठी मनाची नेहेमी
होकारात्मक भूमिका ठेवा. पराभूत विचार मनात आणू नका.
अडचणी दूर केल्याच पाहिजेत, असा मनाशी ठरवून टाका.

आपल्या बाबतीत वरीलपैकी कोणत्या अडचणी आहेत
त्याचा शोध घ्या. त्या लिहन काढा. आपण लिहिलेल्या अडचणी
दुसऱ्या मित्रास दाखवा. त्याच्या अडचणीशी
आपल्या अडचणींची तुलना करा. त्यावर सामूहिक चर्चा करा.
अडचण दूर झाली आहे किंवा नाही ते पाहा. चर्चेतून मानसिक नैराश्य
होते व आत्मविश्वास वाढतो, मात्र कधी कधी याउलटही होण्याची
शक्यता असते. पण खचून न जाता मनोबल वाढवा. मनोबल बाह्य
प्रयत्नांपेक्षा स्वप्रयत्नानेच वाढते. यातील ९९% अडचणी मानसिक
व स्वप्रयत्नाने दूर होणाऱ्या आहेत हे लक्षात घ्या.जागा, वातावरण
ही तशी फार महत्त्वाची गोष्ट आहे. पण त्या बाबतीत तडजोड करून
घ्यावी. मनाला तशी सवय लावावी हे उत्तम.

*अजून काही उपाय

(१) मनोबल वाढवा..
(२) लिहिण्यापूर्वी मनाची होकारात्मक भूमिका ठेवा, मोकळ्या
      मनाने लिहा.
(३) लिहिण्याचा हेतू नक्की करून पुरेशी संदर्भसामग्री जमा करा.
     लिहिण्याचे तंत्र परिचित करून घ्या.लेखनाचे लक्ष्य निश्चित करून
     आराखडा तयार करा.
(६) पुरेसा वेळ द्या व आवश्यक ते परिश्रम करण्याची तयारी ठेवा.
(७) लिहिण्यासाठी सतत विषय शोधत रहा.
(८) स्वतःच्या अडचणी लिहून काढा. त्या इतरांस दाखवा. चर्चा
     करा. स्पर्धेचे वातावरण ठेवा व कामाला लागा.

* लेखनासाठी एकाग्रता महत्वाची असते.

       लेखन करावयाचे हे निश्चित केल्यावर त्यासाठी मानसिक
पूर्वतयारी करावी लागते. यासाठी आपले लक्ष सतत लेखनध्येयावर
ठेवणे आवश्यक आहे. लेखन करताना अनेक अडथळे येण्याची
शक्यता असते. लिहायला बसल्यावर अचानकपणे काही लोक येऊन
बसतात.गप्पांच्या ओघात लेखनविषय विसरला जातो. कधी अचानक
कोणाशीतरी वाद होतो. चित्त उडते. न्यूनगंड वाटू लागतो. नको
तेव्हा पेन बंद पडतो, रिफील संपते. याचा राग आपण लेखनावर
काढून लेखन थांबवितो. एका विषयावर लेखन चालू असताना
दुसऱ्या विषयावर लेखन करण्याचा मोह होतो, कधी सक्ती होते.
अचानक गरज वाटेनाशी होते. मन भरकटते. दुसऱ्याच उपविषयावर /
कमी महत्त्वाच्या विषयावर लिहिण्यासाठी मन धडपडू लागते. इतरांचा
मजकूर पाहून कधी स्वतःचेच विचार मध्येच घुसडावेत असे वाटते. लेखनात
सदोष हस्ताक्षर, छपाई यामुळेही लेखनावरचे लक्ष उडते. भावनिक विचारांची
कालवा काळवं होते त्यामुळे निश्चित विचारांच्या अभावामुळे सतत खाडाखोड
होऊ लागते. व्यक्तींचे लिहिण्यावर दडपण येते. वरिष्ठ किंवा अन्य व्यक्तींसमोर
लिहिण्याचा संकोच वाटतो. अशी मनाची एकाग्रता नाहीशी करणारी अनेक कारणे
आहेत.


उत्तर लिहिले · 18/2/2023
कर्म · 53710
0
लेखन करताना येणाऱ्या काही सामान्य अडचणी:
  • विषयाची निवड: काय लिहायचं आहे हेच लवकर ठरत नाही. कोणता विषय निवडायचा, याबद्दल मनात गोंधळ निर्माण होतो.

  • विचारांची जुळवाजुळव: डोक्यात विचार भरपूर असतात, पण त्यांना योग्य प्रकारे मांडता येत नाही. कोणता विचार आधी मांडावा आणि कोणता नंतर, हे समजत नाही.

  • भाषेची अडचण: योग्य शब्द आणि वाक्यं मिळत नाहीत. व्याकरण आणि शब्दरचना जमत नाही.

  • एकाग्रता: लिहायला बसल्यावर लक्ष विचलित होतं. आजूबाजूच्या गोष्टींमुळे লেখারमध्ये अडथळा येतो.

  • वेळेची कमतरता: वेळेअभावी लेखन पूर्ण होत नाही. इतर कामांमुळे लिहायला वेळ मिळत नाही.

  • आत्मविश्वास नसणे: आपलं লেখা चांगलं होईल की नाही, याबाबत शंका असते. त्यामुळे लिहायला उत्साह वाटत नाही.

  • सुरुवात कशी करावी: লেখারची सुरुवात नेमकी कशी करायची, हे कळत नाही. त्यामुळे लिहिणं सुरू करायलाच खूप वेळ लागतो.

या अडचणींवर मात करण्यासाठी नियमित लेखन सराव, विषयाची चांगली माहिती, आणि आत्मविश्वास महत्त्वाचा आहे.

टीप: अधिक माहितीसाठी तुम्ही भाषा आणि लेखन संबंधित पुस्तके आणि तज्ञांची मदत घेऊ शकता.

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 1440

Related Questions

लेखणाचि पाथमिक कौशले नमूद करा?
विशिष्ट क्षमता असलेल्या मुलांना लेखन कौशल्याच्या सरावासाठी कोणती गोष्ट आवश्यक आहे?
लेखन गतिमान न होण्याची कारणे लिहा?
लेखनाची प्राथमिक कौशल्ये नमूद करा, शंभर ते दीडशे शब्दांमध्ये?
लेखनची प्राथमिक कौष्यल्या नमूद करा?
लेखनाची प्राथमिक कौशल्य नमुद करा.?
लेखनाचे प्राथमिक कौशल्ये नमूद करा?