रूढी धर्म

स्त्रिया हनुमानाच्या मूर्तीला स्पर्श का नाही करत?

2 उत्तरे
2 answers

स्त्रिया हनुमानाच्या मूर्तीला स्पर्श का नाही करत?

0

स्त्रिया हनुमानाच्या मूर्तीला स्पर्श का नाही करत


हनुमान ब्रह्मचारी होते हे सर्वांना माहीत असले तरी शास्त्रांमध्ये त्यांच्या विवाहाचं वर्णन मिळतं. परंतू हा विवाह हनुमानाने वैवाहिक सुख प्राप्तीसाठी केले नव्हते. हे विवाह त्यांनी त्या 4 प्रमुख विद्या प्राप्त करण्यासाठी केले होते ज्यांचे ज्ञान केवळ विवाहित लोकांना दिले जात होते.
 
या कथेप्रमाणे हनुमानाने सूर्य देवतेला आपले गुरू मानले होते. सूर्य दैवताने नऊ प्रमुख विद्यांमधून पाच विद्या आपल्या शिष्ट हनुमानाला शिवल्या परंतू इतर चार विद्या देण्यापूर्वी त्यांनी हनुमानाला विवाहाचा आदेश दिला. तेव्हा हनुमानाने विवाह करण्याचा निश्चय केला. विवाहासाठी कन्येच्या निवड करण्याची समस्या उद्भवली. तेव्हा सूर्य दैवताने आपली परम तेजस्वी पुत्री सुवर्चला हिच्यासोबत हनुमानाचे लग्नाचा प्रस्ताव मांडला. हनुमान आणि सुवर्चला यांचा विवाह झाला. सुवर्चला परम तपस्वी होती आणि विवाहानंतर ती तपस्येत मग्न झाली. इकडे हनुमान इतर चार विद्या प्राप्त करण्यात लीन झाले. अशा प्रकारे विवाहित असूनही हनुमानाचे ब्रह्मचर्य व्रत मोडले गेले नाही.
 
हनुमानाने प्रत्येक स्त्रीला आई समान दर्जा दिला आहे. या कारणामुळे ते कोणत्याही स्त्रीला स्वत:ला नमस्कार करू पाहणे योग्य समजत नाही. ते स्वत: ‍स्त्री शक्तीला नमन करतात. मनात श्रद्धा असल्यास ‍महिला हनुमानाला दीप अर्पित करू शकते, स्तुती करू शकते, प्रसाद अर्पित करू शकते. परंतु 16 उपचारांमध्ये ज्यात चरण स्पर्श, मुख्य स्नान, वस्त्र, चोला चढवणे व इतर, या सर्व सेवा महिलांद्वारे करवणे हनुमानाला स्वीकार नाही.


उत्तर लिहिले · 7/2/2023
कर्म · 53710
0
स्त्रिया हनुमानाच्या मूर्तीला स्पर्श का करत नाहीत याबद्दल अनेक कारणं दिली जातात, त्यापैकी काही खालीलप्रमाणे आहेत:
  • ब्रह्मचर्य व्रत: हनुमान ब्रह्मचारी होते आणि त्यांनी आजीवन ब्रह्मचर्य व्रत पाळले. त्यामुळे स्त्रिया त्यांच्या मूर्तीला स्पर्श करत नाहीत, कारण यामुळे त्यांच्या व्रताचा भंग होऊ नये अशी मान्यता आहे.
  • स्त्रियांबद्दल आदर: हनुमानाला स्त्रियांबद्दल खूप आदर होता. ते नेहमीच स्त्रियांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करत असत. त्यामुळे स्त्रिया त्यांच्या मूर्तीला स्पर्श करणे टाळतात.
  • धार्मिक मान्यता: काही धार्मिक मान्यतांनुसार, स्त्रिया मासिक पाळीच्या दरम्यान अपवित्र मानल्या जातात. त्यामुळे त्या काळात स्त्रिया हनुमानाच्या मूर्तीला स्पर्श करत नाहीत.
  • परंपरा: अनेक वर्षांपासून चालत आलेल्या परंपरेनुसार, स्त्रिया हनुमानाच्या मूर्तीला स्पर्श करत नाहीत.

याव्यतिरिक्त, काही स्त्रिया हनुमानाच्या मूर्तीला स्पर्श करतात कारण त्यांना या नियमांमुळे काही फरक पडत नाही. हा ज्याचा त्याचा श्रद्धेचा भाग आहे.

टीप: ही माहिती धार्मिक मान्यता आणि परंपरांवर आधारित आहे.

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 1440

Related Questions

कुंभविवाह करावा का?
स्त्रिया नारळ का फोडत नाहीत?
घर आणि कुटुंब वरवंटा फिरणे, घर फिरणे, ती घराचे वासेही फिरतात?
बहू असोत सुंदर?
लग्नानंतर हळदीच्या अंगाने बाहेर का जाऊ नये?
कुंकू टिकली लावण्याचे अनेक फायदे आहेत, मग जगातील सर्व स्त्रिया कुंकू टिकली लावतात का?
बाळ जन्माला आल्यावर घरात विटाळ का पाळतात?