Topic icon

रूढी

0

कुंभविवाह ही एक प्रथा आहे जी काही विशिष्ट परिस्थितीत केली जाते. खाली काही माहिती दिली आहे जी तुम्हाला निर्णय घेण्यास मदत करू शकते:

  1. कुंभविवाह म्हणजे काय?

    जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत मंगळ दोष असतो किंवा इतर ग्रह योगांमुळे वैवाहिक जीवनात अडचणी येतात, तेव्हा कुंभविवाह केला जातो. यात व्यक्तीचा विवाह कुंभाशी (मातीच्या भांड्याशी) किंवा पिंपळाच्या झाडाशी लावला जातो.

  2. कुंभविवाह कधी करावा?

    ज्योतिषांच्या सल्ल्यानुसार, जेव्हा कुंडलीत विशिष्ट दोष आढळतात, तेव्हा ते दोष कमी करण्यासाठी कुंभविवाह करण्याची शिफारस केली जाते.

  3. कुंभविवाहाचा उद्देश काय असतो?

    या विवाहाचा उद्देश हा वैवाहिक जीवनातील संभाव्य अडचणी आणि दोष दूर करणे हा असतो. यामुळे वैवाहिक जीवन सुखमय आणि समृद्ध होण्यास मदत होते, अशी मान्यता आहे.

  4. कुंभविवाह कोणासाठी?

    ज्या व्यक्तींच्या कुंडलीत वैवाहिक जीवनात अडचणी येण्याची शक्यता असते, त्यांच्यासाठी हा विवाह केला जातो. विशेषतः मंगळ दोष असणाऱ्या व्यक्तींसाठी हा विवाह उपयुक्त मानला जातो.

कुंभविवाह करण्यापूर्वी, एखाद्या अनुभवी ज्योतिषाचा सल्ला घेणे आवश्यक आहे. ते तुमच्या कुंडलीचे विश्लेषण करून योग्य मार्गदर्शन करू शकतील.

अधिक माहितीसाठी, आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 1440
1


स्त्रिया का नाही फोडत नारळ


 हिंदू धर्मात पूजेसाठी श्रीफळाचे विशेष महत्त्व आहे. कोणत्‍याही देव-देवतांची पूजा नारळाविना अपूर्ण मानली जाते. असे मानले जाते की नारळ चढवल्याने धनसंबंधी समस्या दूर होते. पण आपण नेहमी मंदिराचे पंडित किंवा घरातील पुरुषांनाच नारळ फोडताना बघितले असतील. कारण हिंदू धर्मात स्त्रियांना नारळ फोडण्याचा हक्क मिळालेला नाही. शास्‍त्रामध्‍ये स्त्रियांनी नारळ फोडणे अशुभ असल्याचे सांगितले आहे.

 
हे ऐकून आश्चर्य वाटणे साहजिक आहे की यामागे काय कारण आहे ज्यासाठी स्त्रियांना या कामापासून वंचित करण्यात आले असावे. यामागे एक कथा अशी आहे की ब्रह्म ऋषी विश्वामित्र यांनी विश्‍व निर्मित करण्यापूर्वी नारळ निर्मित केले होते. याला मानवाचा प्रतीरूप मानले आहे. नारळ हे बीजरूपी असल्यामुळे प्रजनन क्षमतेशी जुळलेले आहे. स्त्रिया बीजरुपात बाळाला जन्माला घालते म्हणून स्त्रियांनी नारळ फोडणे अशुभ मानले आहे.

.
उत्तर लिहिले · 14/8/2023
कर्म · 53710
0

तुम्ही विचारलेल्या वाक्प्रचारांचा अर्थ आणि तो कसा वापरला जातो, याबद्दल माहिती खालीलप्रमाणे:

  1. वरवंटा फिरणे:

    • अर्थ: एखाद्या गोष्टीचा पूर्णपणे नाश होणे, पार धुव्वा उडणे.
    • उदाहरण: अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकावर वरवंटा फिरला.
  2. घर फिरणे:

    • अर्थ: एखाद्याच्या नशिबात दुर्भाग्य येणे, वाईट दिवस येणे.
    • उदाहरण: धंद्यात नुकसान झाल्यामुळे त्याचे घर फिरले.
  3. ती घराचे वासेही फिरतात:

    • अर्थ: एखाद्या कुटुंबाची परिस्थिती पूर्णपणे बदलणे, ज्यामुळे घराची आर्थिक आणि सामाजिक स्थिती पूर्णपणे कोलमडते.
    • उदाहरण: कर्जामुळे त्या कुटुंबाचे घरचे वासे फिरले.

हे वाक्प्रचार बहुतेक वेळा नकारात्मक अर्थाने वापरले जातात, जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात किंवा कुटुंबावर मोठे संकट येते.

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 1440
0
बहू असोत सुंदर
उत्तर लिहिले · 4/4/2023
कर्म · 0
0

स्त्रिया हनुमानाच्या मूर्तीला स्पर्श का नाही करत


हनुमान ब्रह्मचारी होते हे सर्वांना माहीत असले तरी शास्त्रांमध्ये त्यांच्या विवाहाचं वर्णन मिळतं. परंतू हा विवाह हनुमानाने वैवाहिक सुख प्राप्तीसाठी केले नव्हते. हे विवाह त्यांनी त्या 4 प्रमुख विद्या प्राप्त करण्यासाठी केले होते ज्यांचे ज्ञान केवळ विवाहित लोकांना दिले जात होते.
 
या कथेप्रमाणे हनुमानाने सूर्य देवतेला आपले गुरू मानले होते. सूर्य दैवताने नऊ प्रमुख विद्यांमधून पाच विद्या आपल्या शिष्ट हनुमानाला शिवल्या परंतू इतर चार विद्या देण्यापूर्वी त्यांनी हनुमानाला विवाहाचा आदेश दिला. तेव्हा हनुमानाने विवाह करण्याचा निश्चय केला. विवाहासाठी कन्येच्या निवड करण्याची समस्या उद्भवली. तेव्हा सूर्य दैवताने आपली परम तेजस्वी पुत्री सुवर्चला हिच्यासोबत हनुमानाचे लग्नाचा प्रस्ताव मांडला. हनुमान आणि सुवर्चला यांचा विवाह झाला. सुवर्चला परम तपस्वी होती आणि विवाहानंतर ती तपस्येत मग्न झाली. इकडे हनुमान इतर चार विद्या प्राप्त करण्यात लीन झाले. अशा प्रकारे विवाहित असूनही हनुमानाचे ब्रह्मचर्य व्रत मोडले गेले नाही.
 
हनुमानाने प्रत्येक स्त्रीला आई समान दर्जा दिला आहे. या कारणामुळे ते कोणत्याही स्त्रीला स्वत:ला नमस्कार करू पाहणे योग्य समजत नाही. ते स्वत: ‍स्त्री शक्तीला नमन करतात. मनात श्रद्धा असल्यास ‍महिला हनुमानाला दीप अर्पित करू शकते, स्तुती करू शकते, प्रसाद अर्पित करू शकते. परंतु 16 उपचारांमध्ये ज्यात चरण स्पर्श, मुख्य स्नान, वस्त्र, चोला चढवणे व इतर, या सर्व सेवा महिलांद्वारे करवणे हनुमानाला स्वीकार नाही.


उत्तर लिहिले · 7/2/2023
कर्म · 53710
0
भारतीयांनी खूप चांगल्या विचारांनी नियम तयार केले आहेत.

हळद का लावली जाते? हळदीचे त्वचा विकारावरील फायदे लक्षात घेतल्यास वरील प्रश्नांचे उत्तर मिळते. त्वचेवर हळद लावल्यावर त्यावर सूर्यप्रकाश पडू नये हा साधा नियम आहे. म्हणुन हळद लावल्यावर हळदीच्या अंगाने बाहेर जाऊ नये हे त्यातीलच एक. हळद लावून बाहेर पडल्यास ती व्यक्ती लवकर काळी पडते आणि हळदीच्या अंगाने घरात राहिल्यास त्वचेला वेगळेच तेज येते हे झाले बऱ्याच जणांना आवडणारे कारण.

भरपूर वेळा एखादे दुसरे काम करण्यासाठी शेवटी नवरदेवाला, नवरीला बाहेर पडावे लागत असे. काही वेळेस यातून अपघात झाल्यास जी शोककळा पसरते ती शब्दात सांगता येणारी नसते. हळदीच्या अंगाने बाहेर पडल्यास भरपूर जणांच्या नजरा त्या व्यक्ती वरच खीळल्या जातील. त्यामुळे तो/ती इतरांपेक्षा वेगळा व सर्वांच्या नजरेत भरणार ठरेल.

नवरदेव नवरी ने कमीत कमी काही दिवस हळदी नंतर तरी स्वतःच्याच लग्नाचे काम करू नये, आराम करावा , स्वतःच्या लग्न प्रसंगाचा आनंद घेता यावा हा पण एक चांगला भाव त्यात आहे. बऱ्याच जणांच्या लग्नकार्यत नवरदेव नवरीला लग्नातील एव्हढे कार्यक्रम करावे लागतात की त्यातच ते थकून जातात आणि त्याच सोबत जर बाहेरील काम करावे लागले तर? इतरांची पण काहीतरी जबाबदारी ठरते, पाहुणे, नातेवाईक यांनी हातभार लावून ते लग्नकार्य, प्रसंग पूर्ण करावे. यातून इतरांच्या घरी काम करणे, मदत करणे हा भाव निर्माण होतो, आपुलकी वाढते.
उत्तर लिहिले · 24/5/2022
कर्म · 53710
1
तुम्हाला उत्तर हवं आहे  टिकली पेक्षा कुंकू लावणे फायद्याचे आहे स्त्रियांसाठी  पण कुंकवाची जागा टिकलीने घेतली आहे तुमचा प्रश्न आहे जगातील स्त्रिया कुंकू टिकली लावतात का    तर फॅशन म्हणून टिकली लावतात चेहरा सुंदर दिसण्यासाठी रंगीबेरंगी टिकल्या स्त्रिया लावतात   काही स्त्रिया फॅशन म्हणून टिकली कुंकू  हि लावत नाहीत कुंकू लावण्याचे फायदे आहेत  काही पुरुष ही कुंकवाचा टिळा लावतात  कुंकू लावल्याने चेहरा सुंदर दिसतोच पण नेहमी लावल्याने चेहरऱ्यावर सुरूकुत्या येत नाहीत दोन भुवयांच्या मध्ये लावल्याने मन एकाग्र राहतं. 
कुंकू टिकली लावण काही कुणावर सक्ती नाही पण आपल्या कडे लहानपणापासून आजीने आईनेच संस्कार केलेले असतात.बाई ग कपाळ उघड ठेवू नये बाईने  बाईच्या कपाळाला कुंकवा शिवाय शोभा नाही हे असं बोललं जातं  
म्हणून म्हणेन जगातील स्त्रिया टिकली फॅशन म्हणून वापरतात आणि थोडंसं भांगेत कुंकू भरतात.
उत्तर लिहिले · 6/5/2022
कर्म · 53710