भूगोल समाज सामाजिक मुद्दे

भारतीय स्त्रियांचे सामाजिक स्थान कोणते आहे?

2 उत्तरे
2 answers

भारतीय स्त्रियांचे सामाजिक स्थान कोणते आहे?

0
समाजात वावरताना आर्थिक व सामाजिक जीवन सुकर करण्यासाठी स्त्रिया कितपत मदत करतात यावर हे अवलंबून असते. आदिवासी संस्कृतीने, परंपरेने महिलांना समान हक्क दिले आहेत. सगळीकडे स्त्रियांचा वावर मुक्त असतो. श्रमशक्तीमुळे ती दैनंदिन घरकाम व अर्थोत्पादनाच्या कार्यात कुटुंबाचा आधार असते.




.
भारतीय समाज मुख्यत: पुरुषप्रधान राहिला आहे. अर्थात, केरळमधील नायर, मंगळूरमधील शेट्टी, बंगाली समाज व काही भटक्या जमातींमध्ये स्त्रीप्रधानतेचे प्रमाण दिसते. परंतु, सर्वसामान्यपणे विचार करता, भारतीय समाजामध्ये स्त्रियांना दुय्यम स्थान असल्याचे प्रकर्षांने जाणवते. तद्वतच, अनेक रूढी, परंपरा (अनेक धर्मातील) यांमुळे स्त्रियांवर अन्याय, शोषण, सामाजिक विभक्तीकरण झाल्याचे दिसते. स्त्रियांना सार्वजनिक जीवनातील सहभाग नाकारण्यात आला. या पाश्र्वभूमीवर भारतात स्त्रियांची भूमिका, त्यांचे शोषण, न्याय्य अधिकार यावर आधारित चळवळी व संघटना उभ्या राहिल्या. भारतातील स्त्री-चळवळीचे तीन टप्पे करता येतील- पहिला टप्पा (१८३०-१९१५); दुसरा टप्पा (१९१५-१९४७) तिसरा टप्पा (१९४७ पासून पुढे).
पहिल्या टप्प्यामध्ये मुख्यत: काही पुरोगामी पुरुषांच्या पुढाकारामुळे महत्त्वाचे बदल घडताना दिसतात. यामध्ये सती-बंदी (१८२९), विधवा पुनर्विवाह कायदेशीर मान्यता (१८५६), स्त्रीभ्रूणहत्या प्रतिबंध (१८७०), आंतरजमातीय विवाहास मान्यता (१८७२) संमतीवयामध्ये वाढ (१८९१) यांचा समावेश होतो. यासंदर्भात ईश्वरचंद्र विद्यासागर, वीरेशलिंगम पंतुलू, पंडिता रमाबाई, राजा राममोहन रॉय, धोंडो केशव कर्वे, सुब्बलक्ष्मी, जोतिबा- सावित्रीबाई फुले यांचे कार्य महत्त्वाचे ठरते.
दुसऱ्या टप्प्यामध्ये भारत महिला परिषद, भारत स्त्री महामंडळ, विमेन्स इंडियन असोसिएशन (WIA), नॅशनल कौन्सिल ऑफ विमेन फॉर इंडिया, ऑल इंडिया विमेन्स कॉन्फरन्स (AIWC) या संघटनांचा उदय होतो. या संघटित चळवळीद्वारे प्रांतामध्ये स्त्रियांना मतदानाचा अधिकार (१९२१), बालविवाह प्रतिबंधक कायदा (१९२९), स्त्रियांना मर्यादित प्रमाणात मालमत्तेचा हक्क (१९३७) यांसारखे महत्त्वपूर्ण बदल झाले.
स्वातंत्र्योत्तर काळातील स्त्री-चळवळीचे पुन्हा तीन टप्पे करता येतील. १९४७ पासून ते १९७० च्या दशकापर्यंत राष्ट्र बांधणीच्या कार्याला प्राधान्य दिले गेले. अर्थात संविधानात अंतर्भूत मूलभूत हक्क व राज्याची मार्गदर्शक तत्त्वे यांमध्ये स्त्रियांचे हक्क व अधिकार यांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केला गेला. पण, या तरतुदींच्या अंमलबजावणीतील अपयशामुळे १९७० च्या दशकात स्त्री-चळवळीचा स्वातंत्र्योत्तर कालखंडातील दुसरा टप्पा सुरू झाला. या टप्प्यामध्ये असमान वेतन, स्त्रियांचे ‘अकुशल’ कामगारांत वर्गीकरण, विनामोबदला श्रम, सामाजिक संस्थांमधील (जात, धर्म, वर्ग, कुटुंब इत्यादी) सत्तेच्या संरचनेतली पुरुषी वर्चस्व या समस्यावर भर होता. स्वातंत्र्योत्तर कालखंडातील २१ व्या शतकातील टप्प्यामध्ये स्त्री-चळवळ स्त्री-पुरुष समानतेच्या पलीकडे जाऊन स्त्रियांची वैयक्तिक जीवन ठरवण्याची सत्ता व त्यांचे सक्षमीकरण यांसारख्या मुद्दय़ावर प्रकाश टाकते.
उत्तर लिहिले · 21/1/2023
कर्म · 7460
0

भारतीय स्त्रियांचे सामाजिक स्थान:

भारतीय स्त्रियांचे सामाजिक स्थान हेdynmic आहे आणि ते इतिहास, संस्कृती आणि भौगोलिक प्रदेशानुसार बदलते. प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत भारतीय स्त्रियांच्या स्थितीत अनेक बदल झाले आहेत.

प्राचीन आणि मध्ययुगीन काळ:

  • प्राचीन भारतात स्त्रियांचा आदर केला जात असे, परंतु काही सामाजिक बंधने होती.
  • मध्ययुगीन काळात स्त्रियांच्याStatus मध्ये घट झाली, कारण बालविवाह आणि सती प्रथा यांसारख्या प्रथा रूढ झाल्या.

आधुनिक काळ:

  • १९व्या आणि २०व्या शतकात समाजसुधारकांनी स्त्रियांच्या हक्कांसाठी लढा दिला.
  • आज भारतीय स्त्रिया शिक्षण, राजकारण, अर्थकारण आणि समाजकारण अशा विविध क्षेत्रांमध्ये सक्रिय आहेत.
  • तरीही, काही ठिकाणी त्यांना असमानता आणि भेदभावाचा सामना करावा लागतो.

सद्यस्थिती:

  • शिक्षण आणि जागरूकता वाढल्यामुळे स्त्रिया आता अधिक सक्षम झाल्या आहेत.
  • पंचायत राजInstitutions मध्ये महिलांसाठी आरक्षणामुळे त्यांचे राजकीय प्रतिनिधित्व वाढले आहे.
  • परंतु, लैंगिक समानता, सुरक्षितता आणि समान संधी मिळवणे अजूनही एक आव्हान आहे.

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 1440

Related Questions

एस.सी. समाजात कोण येतं?
संयुक्त कुटुंब म्हणजे काय? संयुक्त कुटुंबाचे चार फायदे लिहा.
संयुक्त कुटुंब म्हणजे काय? संयुक्त कुटुंबाचे फायदे लिहा.
एकत्र कुटुंब पद्धतीची वैशिष्ट्ये कोणती?
विवाहासाठी आवश्यक असलेले गुणधर्म कोणते?
आदिवासी प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाने काय करायला हवे?
आदिवासी विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या योजना स्पष्ट करा?