2 उत्तरे
2
answers
भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला?
1
Answer link
भावार्थ दिपिका हा ग्रंथ संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वरांनी सांगितला आणि श्री सच्चिदानंद बाबांनी लिहिला ज्ञानेश्वर महाराजांची गुरुभक्ती अवर्णनीय आहे त्यांचे मोठे बंधू श्री निवृत्तीनाथांच्या समोर त्यांच्या आज्ञेने हा ग्रंथ नेवासा येथे सांगितलेला आहे.
वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी त्यांनी हा ग्रंथ सांगितला ज्यांनी हा ग्रंथ लिहिला त्या सच्चिदानंद बाबां बद्दल एक कथा आहे ज्ञानेश्वर महाराज जेव्हा नेवाशात आले तेव्हा एक स्री एका शवा भोवती आक्रोश करीत होती .तो तिचा मृत् पती होता त्याचे नाव सचिदानंद. ज्ञानेश्वर महाराजांनी तिला सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिल्यामुळे सच्चिदानंद बाबांना ज्ञानेश्वर महाराजांनी जीवदान दिले आणि पुढे तेच सच्चिदानंद बाबा हा ग्रंथ त्यांच्या सांगण्यावरून लिहित होते.
ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांची भावंडे नेहमी आपेगाव आळंदी नेवासे पैठण याठिकाणी जात येत असत निवृत्तीनाथांच्या सांगण्यावरून त्यांनी गीतेवर भाष्य केले आणि तीच भावर्थ दीपिका आहे परंतु पुढे एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वरी चे संशोधन केले तेव्हापासून ज्ञानेश्वरी म्हणण्याचा प्रघात पडला.
0
Answer link
भावार्थ दीपिका हा ग्रंथ संत ज्ञानेश्वरांनी लिहिला आहे. या ग्रंथाला 'ज्ञानेश्वरी' या नावाने देखील ओळखले जाते.
भावार्थ दीपिका हा ग्रंथ संत ज्ञानेश्वरांनी लिहिला आहे.
या ग्रंथाला 'ज्ञानेश्वरी' या नावाने देखील ओळखले जाते.