2 उत्तरे
2
answers
महात्मा गांधींनी चंपारण्य सत्याग्रह का केला?
1
Answer link
चंपारण व खेडा सत्याग्रह
गांधीजीना पहिले यश चंपारण आणि खेडामधील सत्यग्रहात मिळाले. चंपारण, बिहारमधील जमीनदार, जे प्रामुख्याने ब्रिटिश होते, स्थानिक शेतकऱ्यांना सक्तीने नीळ उत्पादन करावयास लावत असत. त्यांना योग्य मोबदला पण मिळत नसे, यांमुळे ते सतत गरिबीत राहत. शेतकऱ्यांची गावे अत्यंत धाणेरडी आणि आरोग्य हानिकारक ठेवली जात. तसेच दारू, अस्पृश्यता, परदा पद्धत अशा अनेक समस्या या गावांमध्ये होत्या. यावर भर म्हणजे तेथील दुष्काळ, पण इंग्रजानी तरीही अनेक जाचक कर लादले होते आणि ते वाढतच होते. गुजरातमधील खेडा मध्ये सुद्धा स्थिती काही वेगळी नव्हती. गांधीजींनी तिथे एक आश्रम उभारला ज्याद्वारे त्यांनी त्यांच्या लहान-मोठ्या सर्व अनुयायांना एकत्र केले. त्यांनी त्या भागातील परिस्थितीची माहिती गोळा केली व सखोल अभ्यास केला. गावकऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांनी गावाच्या स्वच्छतेचे तसेच शाळा, रुग्णालयाच्या बांधकामचे काम हाती घेतले. याचसोबत गावातील प्रमुखांना वर उल्लेखलेल्या प्रथा नष्ट करण्यास प्रवृत्त केले.
महात्मा गांधी खेडा येथे १९१८
पण त्यांचा मुख्य प्रभाव तेव्हा जाणवून आला जेव्हा पोलिसांनी त्यांना प्रदेशात अशांतता निर्माण करण्याच्या गुन्ह्याखाली अटक केली व तो भाग सोडून जाण्यास सांगितले. हजारो लोकांनी या अटकेचा विरोध केला. त्यांनी गांधीजींच्या सुटकेसाठी तुरूंगाबाहेर, पोलीस स्थानकासमोर आणि न्यायालयासमोर मोर्चे काढले. न्यायालयाने शेवटी नाइलाजाने त्यांची मागणी मान्य केली. गांधीजींनी जमीनदारांविरुद्ध सुसंघटित आंदोलने चालू केली. याचा परिणाम म्हणजे तेथील जमीनदारांनी ब्रिटिश सरकारच्या मार्गदर्शनाखाली एक ठराव मंजूर केला ज्याद्वारे शेतकऱ्यांना जास्त मोबदला आणि स्वतःच्या मतानुसार पीक घेण्याची मोकळिक मिळाली. तसेच करवाढ रद्द झाली आणि दुष्काळ असेपर्यंत कर भरण्यापासून सूट मिळाली. या आंदोलनादरम्यानच गांधीजींचा उल्लेख लोक ”’बापू”’ आणि ”’महात्मा”’ म्हणून करू लागले. खेडामध्ये सरदार पटेलांनी शेतकऱ्यांच्या बाजूने इंग्रजांसोबत वाटाघाटी केल्या. याद्वारे कर रद्द करण्यात आला आणि सर्वांची तुरूंगातून सुटका करण्यात आली. या आंदोलनामुळे गांधीजींची प्रसिद्धी सर्व भारतभर पोहोचली.
0
Answer link
महात्मा गांधींनी चंपारण्य सत्याग्रह (१९१७) खालील कारणांसाठी केला:
- गरजूंना मदत: बिहारमधील चंपारण्य जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर ब्रिटीश जमीनदारांकडून अन्यायकारक 'तीन-कठिया' पद्धत लादली गेली होती. या पद्धतीत शेतकऱ्यांच्या जमिनीच्या ३/२० भागावर नीळ पिकवणे सक्तीचे होते.
- शोषणाला वाचा फोडणे: नीळ उत्पादक जमीनदार शेतकऱ्यांकडून जबरदस्तीने नीळ पिकवून घेत होते आणि त्यांना त्याचे योग्य पैसे देत नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण होत होते.
- अन्यायाविरुद्ध लढा: गांधीजींनी शेतकऱ्यांची दु:खं दूर करण्यासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी चंपारण्य सत्याग्रह सुरू केला.
- सत्याग्रहाचा वापर: या सत्याग्रहाच्या माध्यमातून गांधीजींनी ब्रिटिशांविरुद्ध अहिंसक विरोध दर्शवला आणि लोकांना एकत्र आणून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण केला.
या सत्याग्रहामुळे शेतकऱ्यांच्या समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधले गेले आणि अखेर 'तीन-कठिया' पद्धत रद्द करण्यात आली.
संदर्भ: