संस्कृती हिंदु धर्म रूढी धर्म

बाळ जन्माला आल्यावर घरात विटाळ का पाळतात?

2 उत्तरे
2 answers

बाळ जन्माला आल्यावर घरात विटाळ का पाळतात?

1
वीटाळं हा शब्द जाणकार पूर्वजांनी सोयीने दिलाय पण जन्मलेल्या बाळाला व त्याच्या आईला निदान घरात शांतता मिळावी म्हणून काही कर्मे जी मुखातून आवाज काढून आरती , घन्टी ची किणकिण , उदबत्ती चा धूर आदी नकॊ कारण नवीन शरीर आईच्या गर्भात सुरक्षित असते आणि या वातावरणात त्यास सगळं नवीन घ्यायचं असतं मग जे मिळणार ते नैसर्गीक असावं अगदी हवा, सुगंध वातावरण त्यामुळे देह पहिले बारा दिवस ताकत मिळवतो व आईला तीची शारीरिक झीज भरून नीघण्यास मदत होते त्यामुळे हा पायंडा असावा तसे सांगितले तर काही लोकं ऐकून न ऐकल्यासारखं करतील पण तेव्हा लोकं देवभोळे होते त्यामुळे देवाच्या नावाने सारं करायला तयार होतात जसे आता dr रांनी सांगितले की लगेच पथ्य पाळायला सुरुवात करतात तसे,

ज्या त्या काळात ज्या त्या गोष्टी चे महत्व वाटतं होते तेव्हा नऊवारी ला महत्व होते नंतर सहावारी आणि पंजाबी म्हणता म्हणता प्रगती झाली तसेच देवाच्या बाबतीत झाले आहे देवघरात तेला च्या दिव्याने मंदिर काळे होते उदबत्ती च्या धुराने घराचा रंग डल होतो श्वास घेण्यास त्रास होतो तसे बारा दिवस पाळणे गरजेचं वाटतं नाही यात नवल वाटतं नाही तर आजच्या काळाची गरज वाटते ,

तर वीटाळं पाळत होते कारण पहिले सव्वा महिना व त्यातले पहिले बारा दिवस अतिशय महत्वाचे मानले जातात त्याचे कारण घरात शांतता व नवीन शरीराला त्याच्या परिवाराच्या आवाजाची ओळख , मायेचं जवळ घेणं हे महत्वाचं बाकी कोणतीच गोष्ट महत्वाची वाटतं नव्हती तर फक्त मनाला आनंद विश्रांती असे माझे म्हणणे आहे
उत्तर लिहिले · 1/5/2022
कर्म · 53710
0

बाळ जन्माला आल्यावर घरात विटाळ पाळण्याची प्रथा अनेक वर्षांपासून चालत आलेली आहे. त्यामागे काही सामाजिक, धार्मिक आणि आरोग्यविषयक कारणे आहेत. ती खालीलप्रमाणे:

  1. स्वच्छता आणि आरोग्य: पूर्वीच्या काळी, जेव्हा वैद्यकीय सुविधा आणि स्वच्छतेची साधने कमी होती, तेव्हा प्रसूती घरीच व्हायची. त्यामुळे माता आणि नवजात शिशुला संसर्गाचा धोका अधिक असायचा. विटाळ पाळल्याने काही दिवस इतरांचा संपर्क कमी येत असे, ज्यामुळे संसर्ग टाळता येई.
  2. मातेला विश्रांती: प्रसूतीनंतर मातेला शारीरिक आणि मानसिक विश्रांतीची नितांत गरज असते. विटाळ पाळल्याने तिला आराम मिळतो आणि ती लवकर बरी होते. घरातील इतर सदस्य तिची आणि बाळाची काळजी घेतात, ज्यामुळे तिला आराम मिळतो.
  3. धार्मिक कारणे: काही धार्मिक ग्रंथांमध्ये असे मानले जाते की बाळंतपणानंतर काही दिवसांपर्यंत वातावरण शुद्ध नसते. त्यामुळे नकारात्मक ऊर्जा घरात राहू नये, यासाठी विटाळ पाळला जातो.
  4. सामाजिक प्रथा: विटाळ ही एक सामाजिक प्रथा आहे, जी पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे. आजही अनेक कुटुंबांमध्ये ही प्रथा पाळली जाते, कारण ती त्यांच्या संस्कृतीचा आणि परंपरेचा भाग आहे.

आजकाल वैद्यकीय सुविधा सुधारल्या आहेत, त्यामुळे विटाळ पाळण्याची गरज कमी झाली आहे. तरीही, अनेक लोक आजही ही प्रथा पाळतात.

अधिक माहितीसाठी आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 1440

Related Questions

ग्रामीण देवळांचे महत्त्व थोडक्यात लिहा?
कोरकू जमातीच्या कुल संघटनावर थोडक्यात माहिती लिहा?
चार आश्रमा विषयी माहिती द्या?
धर्म आणि संस्कृती यांचे परस्पर संबंध सांगा?
वैदिक लोकांच्या देवदेवता स्पष्ट करा?
भारतीय संस्कृतीतील विविधतेतील स्वरूप स्पष्ट करा?
भारतीय संस्कृतीतील विविधतेतील सर्व स्पष्ट करा?