मंदिर मंदिरे इतिहास

तिरुपती बालाजी मंदिराचा इतिहास काय आहे?

2 उत्तरे
2 answers

तिरुपती बालाजी मंदिराचा इतिहास काय आहे?

1
तिरुपती बालाजी मंदिराचा इतिहास ……….

तिरुपती बालाजी हे बौद्धांचे तीर्थक्षेत्र होते! भारतातील बौद्ध धम्माच्या ऱ्हासानंतर बोद्धांच्या अनेक विहारांवर वैदिकांनी कब्जा करून विहारे आपल्या ताब्यात घेतली, हे हि मंदिर त्यापैकी एक आहे! सुमारे ८ व्या शतकापासून शंकराचार्य यांनी बौद्ध विहारांना शैव पंथांची मंदिरे बनविले, ११ व्या शतकात रामानुजाचार्यानी विहारांना वैष्णव मंदिरात रूपांतरित केली, उरलेसुरले विहार शक्ति पंथाने काबीज केली. तिरुपती बालाजीच्या मूर्तीचे निरीक्षण करा तुम्हाला कळून चुकेल कि मथुरा शिल्प शैलीतील ती मूर्ती मार्गदाता गौतम बुध्दाची आहे, कपडे आणि आभूषणे तसेच फुलांच्या हारांच्यामागे मूर्ती अशी लपविले जाते कि मूर्तीची मूळ शैली समजणे अवघड होऊन बसते. बौद्ध भिक्खुंप्रमाणे केस कापण्याची परंपरा पूर्ण भारतात फ़क्त येथेच जपली जाते. यावर भरपूर संशोधन झालेले आहे, मात्र वैदिक मंदिरांवरील आपला ताबा सोडण्यास तयार नाहीत. बुद्धांना जेथे बोधि प्राप्त झाली ते बोद्धगयेचे मंदिर अजूनही वैदिकांच्या ताब्यात आहे, आज भारतातील जी मंदिरे प्राचीन आहेत असे सांगितले जाते त्या सर्वांची गत अशीच झालेली आहे. संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर 'तिरुपती बालाजी एक प्राचीन तीर्थक्षेत्र', डॉ. के. जमनादास पुस्तक सुज्ञानीं जरूर वाचले पाहिजे!

1.


2.


3.


4


उत्तर लिहिले · 6/1/2022
कर्म · 121765
0

तिरुपती बालाजी मंदिराचा इतिहास अनेक शतके जुना आहे. या मंदिराला भारतातील सर्वात महत्वाचे आणि पवित्र तीर्थक्षेत्र मानले जाते.

मंदिराची उत्पत्ती:

  • तिरुपती मंदिराचा उल्लेख प्राचीन हिंदू धर्मग्रंथांमध्ये आढळतो.
  • असे मानले जाते की हे मंदिर नवव्या शतकात चोल राजवंशाने बांधले.
  • मंदिराच्या बांधकामात विविध राजघराण्यांनी वेळोवेळी योगदान दिले, ज्यात विजयनगर साम्राज्य आणि इतर शासकांचा समावेश आहे.

पौराणिक कथा:

  • मंदिराच्या स्थापनेमागे एक लोकप्रिय आख्यायिका आहे. असे मानले जाते की भगवान विष्णू पद्मावती नावाच्या देवीवर मोहित झाले आणि त्यांनी तिच्याशी विवाह केला.
  • विवाहासाठी त्यांनी कुबेराकडून कर्ज घेतले, जे आजही फेडले जात आहे. त्यामुळे भाविक देवाला धन अर्पण करतात.

ऐतिहासिक नोंदी:

  • 15 व्या शतकात, विजयनगर साम्राज्याचे शासक कृष्णदेवराय यांनी मंदिराला मोठे योगदान दिले.
  • त्यांनी मंदिराच्या विकासासाठी अनेक देणग्या दिल्या.

आधुनिक काळ:

  • आज, तिरुपती बालाजी मंदिर हे जगातील सर्वात श्रीमंत आणि सर्वाधिक भेट दिले जाणारे धार्मिक स्थळ आहे.
  • तिरुपती तिरुमला देवस्थानम (TTD) नावाचे मंडळ मंदिराचे व्यवस्थापन पाहते.

अधिक माहितीसाठी, आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 1440

Related Questions

नरसिंग वर्मा यांच्या काळात _______येथील रथमंदिरे अखंड पाषाणात खोदावली गेली?
दक्षिण भारतातील मंदिरांविषयी माहिती लिहा?
रामेश्वरम् हे कशासाठी प्रसिद्ध आहे?
अष्टविनायकातील महागणपती मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे?
भारतीय मंदिरांमध्ये सर्वात रहस्यमय मंदिर कोणते?
कांदळगांवच्या रामेश्वर मंदिराची माहिती द्या?
जलकंठेश्वर मंदिर वेल्लोर बद्दल माहिती द्यावी?