Topic icon

मंदिरे

1
नरसिंग वर्मा यांच्या काळात महाबलीपुरम येथील रथमंदिरे अखंड पाषाणात खोदावली गेली.

संदर्भ:

उत्तर लिहिले · 16/4/2025
कर्म · 1440
0

दक्षिण भारतातील मंदिरांविषयी माहिती

दक्षिण भारतात अनेक प्राचीन आणि सुंदर मंदिरे आहेत. या मंदिरांचा इतिहास खूप मोठा आहे आणि त्यांची वास्तुकला अद्वितीय आहे.

प्रसिद्ध मंदिरे

  • मीनाक्षी मंदिर, मदुराई: हे मंदिर देवी मीनाक्षी (पार्वती) आणि भगवान सुंदरेश्वर (शिव) यांना समर्पित आहे. हे तामिळनाडूतील सर्वात महत्वाचे मंदिर आहे.
  • रामनाथस्वामी मंदिर, रामेश्वरम: हे मंदिर भारतातील चार धामपैकी एक आहे. हे मंदिर भगवान शंकराला समर्पित आहे आणि त्यात लांब कॉरिडॉर आहेत.
  • तिरुपती बालाजी मंदिर, तिरुमला: हे मंदिर भगवान विष्णूला समर्पित आहे आणि जगातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे. येथे दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात.
  • बृहदेश्वर मंदिर, तंजावर: हे मंदिर चोल राजघराण्याने बांधले असून ते भगवान शंकराला समर्पित आहे. या मंदिराची वास्तुकला खूप सुंदर आहे.
  • विरुपाक्ष मंदिर, हंपी: हे मंदिर भगवान शंकराला समर्पित आहे आणि ते विजयनगर साम्राज्याच्या काळात बांधले गेले.

मंदिरांची वास्तुकला

दक्षिण भारतीय मंदिरांची वास्तुकला 'द्रविड शैली' म्हणून ओळखली जाते. या शैलीत उंच गोपुरे (प्रवेशद्वार), मोठे प्रांगण आणि सुंदर कोरीव काम केलेले खांब असतात. मंदिरांमध्ये अनेक लहान-मोठ्या मूर्ती असतात, ज्या पौराणिक कथांमधील दृश्ये दर्शवतात.

मंदिरांचे महत्त्व

दक्षिण भारतीय मंदिरे केवळ धार्मिक स्थळे नाहीत, तर ती सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनाचा भाग आहेत. मंदिरांमध्ये अनेक उत्सव आणि कार्यक्रम आयोजित केले जातात, ज्यात संगीत, नृत्य आणि नाटकांचा समावेश असतो. ही मंदिरे शिक्षण आणि कला यांचा प्रसार centers आहेत.

निष्कर्ष

दक्षिण भारतातील मंदिरे भारताच्या इतिहासाचा आणि संस्कृतीचा एक महत्त्वपूर्ण भाग आहेत. ही मंदिरे आपल्या समृद्ध परंपरेची साक्ष देतात.

उत्तर लिहिले · 26/3/2025
कर्म · 1440
2
रामेश्वरम् , भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर आहे. या शहराला मुख्यत्वेकरून दोन गोष्टींसाठी ओळखले जाते, पहिले म्हणजे श्री. रामनाथ स्वामी मंदिर, जे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे आणि दुसरे श्री. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या सारख्या एका उत्कृष्ट वैज्ञानिकाची जन्मभूमी म्हणून प्रसिद्ध आहे.
उत्तर लिहिले · 5/9/2022
कर्म · 2530
0
महागणपती (रांजणगाव) हे पुणे जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे. अष्टविनायकातील चौथा गणपती म्हणून रांजणगावचा महागणपती ओळखला जातो.
उत्तर लिहिले · 31/1/2022
कर्म · 1160
1
तिरुपती बालाजी मंदिराचा इतिहास ……….

तिरुपती बालाजी हे बौद्धांचे तीर्थक्षेत्र होते! भारतातील बौद्ध धम्माच्या ऱ्हासानंतर बोद्धांच्या अनेक विहारांवर वैदिकांनी कब्जा करून विहारे आपल्या ताब्यात घेतली, हे हि मंदिर त्यापैकी एक आहे! सुमारे ८ व्या शतकापासून शंकराचार्य यांनी बौद्ध विहारांना शैव पंथांची मंदिरे बनविले, ११ व्या शतकात रामानुजाचार्यानी विहारांना वैष्णव मंदिरात रूपांतरित केली, उरलेसुरले विहार शक्ति पंथाने काबीज केली. तिरुपती बालाजीच्या मूर्तीचे निरीक्षण करा तुम्हाला कळून चुकेल कि मथुरा शिल्प शैलीतील ती मूर्ती मार्गदाता गौतम बुध्दाची आहे, कपडे आणि आभूषणे तसेच फुलांच्या हारांच्यामागे मूर्ती अशी लपविले जाते कि मूर्तीची मूळ शैली समजणे अवघड होऊन बसते. बौद्ध भिक्खुंप्रमाणे केस कापण्याची परंपरा पूर्ण भारतात फ़क्त येथेच जपली जाते. यावर भरपूर संशोधन झालेले आहे, मात्र वैदिक मंदिरांवरील आपला ताबा सोडण्यास तयार नाहीत. बुद्धांना जेथे बोधि प्राप्त झाली ते बोद्धगयेचे मंदिर अजूनही वैदिकांच्या ताब्यात आहे, आज भारतातील जी मंदिरे प्राचीन आहेत असे सांगितले जाते त्या सर्वांची गत अशीच झालेली आहे. संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर 'तिरुपती बालाजी एक प्राचीन तीर्थक्षेत्र', डॉ. के. जमनादास पुस्तक सुज्ञानीं जरूर वाचले पाहिजे!

1.


2.


3.


4


उत्तर लिहिले · 6/1/2022
कर्म · 121765
1
विष्णूच्या १०८ मंदिरांपैकी एक असलेल्या महत्वाच्या अश्या पद्मनाभास्वामी मंदिराचा (Padmanabha Swami Temple) उल्लेख ६ व्या शतकापासून इतिहासात आढळतो. १६ व्या शतकात ह्या मंदिराचं पुन्हा निर्माण केल्याची नोंद आहे. पद्मनाभा ह्याचा अर्थ “ज्याच्या नाभीतून कमळ प्रकट होते” ह्यावर आधारित अशी विष्णू ची प्रचंड अशी मूर्ती ह्या मंदिरात आहे. ह्या मंदिराची देखरेख करण्याची जबाबदारी त्रावणकोर इथल्या राजाच्या कुटुंबाकडे आहे. १७२९ ह्या मंदिराच्या ट्रस्ट ची स्थापना झाल्यावर ह्या मंदिराची सर्व जबाबदारी ह्या कुटुंबांचे वंशज बघत आले आहेत.
  

२०११ मध्ये सुंदर राजन ह्यांनी सुप्रीम कोर्टात एक याचिका टाकली होती कि त्रावणकोर येथील राजाचे कुटुंब ह्या मंदिराची योग्य देखभाल करत नाहीत. सुप्रीम कोर्टाने ह्यावर ७ मेंबर असलेल्या टीम ला ह्या मंदिराची पहाणी करून तिथल्या गोष्टींची नोंद करण्याची सूचना केली. त्यानुसार झालेल्या पाहणीत जी रहस्य समोर आली त्याने ह्या मंदिराच नाव जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहचल.

ह्या पाहणीत त्यांना ६ असे लॉकर किंवा खण मिळाले ज्याचे दरवाजे लोखंडाचे होते. ज्यात कोणतीही लॉक नव्हते किंवा उघडण्याची काही जागा. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाखाली जेव्हा हे लॉकर उघडले गेले तेव्हा जे रहस्य समोर आले अवाक करणारे होते. ह्या लॉकर मध्ये होते सोने, चांदी, हिरे, पाचू, माणिक, अनेक रत्ने ह्यांचा खजिना. ह्या खजिन्याची नोंद जेव्हा करण्यात आली तेव्हा त्यांची नुसती किंमत होती १.२ लाख कोटी भारतीय रुपये किंवा २२ बिलियन अमेरिकन डॉलर. ह्यात ह्या खजिन्याचं ऐतिहासिक मूल्य लक्षात घेतलं आणि जगात अभावाने मिळणाऱ्या रत्नांचा समावेश केला तर हि किंमत अजून कैक पट वाढणारी आहे.

ह्या लॉकर ना इंग्रजी A ते इंग्रजी F अशी नावं देण्यात आली. पण ह्यातील B नाव असलेला लॉकर आजही उघडण्यात आलेला नाही. ह्या लॉकर मध्ये असं काय आहे कि ज्यामुळे आजही ह्याच्या आत जाण्याची कोणाची हिंमत झालेली नाही. हा रहस्यमयी लॉकर आजही आपल्यासोबत अनेक गोष्टी आत दडपून आहे. ह्या लॉकर च्या बाहेर दोन प्रचंड अश्या मोठ्या कोब्रा नागांच चित्र कोरलेल असून हा लॉकर तीन गेट नी सुरक्षित केलेला आहे. पहिला गेट धातू च्या जाळ्यांचा असून तो बाकीच्या लॉकरच्या दरवाज्या सारखा आहे. तो उघडल्यावर अजून एक दरवाजा असून तो लाकडी आहे. त्यातून आत गेल्यावर जो तिसरा दरवाजा आहे तो पूर्ण धातूचा असून त्याला उघडण्याची कोणतीच रचना तिकडे अस्तित्वात नाही. अस म्हंटल जाते कि हा दरवाजा फक्त एकाच पद्धतीने उघडला जाऊ शकतो तो म्हणजे “गरुड मंत्र” चा जप एखाद्या सिद्ध पुरुषाने केल्यास ध्वनी तंत्रज्ञानावर हा दरवाजा उघडेल अशी मान्यता आहे. विज्ञान आणि तंत्राज्ञानाचा उपयोग करून हा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केल्यास ह्या मंदिरावर, देशावर आणि पूर्ण जगावर संकट कोसळेल अशी लोक भावना आहे. त्यामुळे ह्या लॉकर च्या मागे काय आहे? हे आजही रहस्य आहे.

सध्या तरी असा सिद्धहस्त साधू किंवा पुरुष आणि गरुड मंत्राची पूर्ण कल्पना असलेला कोणी अस्तित्वात नाही. त्यामुळेच लोकभावनेचा आदर करून सुप्रीम कोर्टाने आजही लॉकर ‘बी’ न उघडण्याचा निर्णय राखून ठेवला आहे. ह्या लॉकर बी च्या मागे दरवाज्यावर असलेल्या दोन महाकाय कोब्रा प्रमाणे आत सापांच राज्य असेल व दरवाजा उघडताच ते सर्व बाहेर निघतील असे अनेकांना वाटते. पण ह्या लॉकरच बांधकाम लक्षात घेता इतके वर्ष ह्या सापांना हवा, पाणी, खाणं कुठून मिळत असेल हे प्रश्न अनुत्तरीत आहेत. तसेच अनेकांना असे हि वाटते कि ह्यात आत भुयार असून त्यातून ये जा करता येत असेल. हे भुयार शहरापासून लांब कुठे उघडत असेल. पण आजची लोकसंख्या आणि मनुष्य वावर लक्षात घेता हे हि अशक्य वाटते.

लॉकर बी हि एक ट्रिक सुद्धा असेल असं अनेकांना वाटते. लोकांना भय दाखवून आपल्या खजिन्याची रक्षा करण्याचा एक मार्ग हा असू शकेल. मिळालेल्या कागदपत्रांच्या नोंदीनुसार १८८० मध्ये त्रावणकोर राजाच्या वंशजांनी आपल्या खजिन्याची मोजमाप केली होती तेव्हा लॉकर ‘बी’ मधल्या खजिन्याची किंमत त्याकाळी जवळपास १२,००० कोटी (१.८ बिलियन अमेरिकन डॉलर ) इतकी प्रचंड केली होती. लॉकर बी सगळ्या लॉकर पेक्षा आकाराने मोठ असल्याने १८८० सालची किंमत लक्षात घेऊन सोन्याचे वाढलेले भाव आणि तिकडे असलेल्या जवाहीर, रत्न ह्याचं मूल्य लक्षात घेता लॉकर बी मध्ये असलेल्या खजिन्याची आजमितीला किंमत होते ५० ट्रिलीयन भारतीय रुपये ( ५०,०००,०००,०००,००० भारतीय रुपये अथवा ७७० बिलियन अमेरिकन डॉलर ) ह्यात त्याचं ऐतिहासिक मूल्य लक्षात घेतलेलं नाही. म्हणजे ते जर लक्षात घेतल तर अजून किती तरी पट ह्या खजिन्याची किंमत जाईल.

लॉकर बी च्या आतल्या दरवाजाच्या मध्ये सोन्याची भिंत ते साप असं काही असण्याच्या शक्यता आज मांडल्या जातात. लॉकर ‘बी’ न उघडता सुद्धा उरलेल्या लॉकर मध्ये मिळालेला खजिना हा आजतागायत मिळालेला जगातील सर्वात मोठा असा खजिना मानला जातो. त्यात सोन्याच्या विष्णू मूर्तीची नुसती किंमत ७० मिलियन डॉलर पेक्षा जास्त आहे. तर १८ फुट लांब असलेल्या हिऱ्यांच्या हाराची किंमत कित्येक मिलियन डॉलर मध्ये आहे. २०११ च्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशावरून केलेल्या पाहणीत मिळालेल्या खजिन्याने ह्या मंदिराला जगातील सगळ्यात श्रीमंत मंदिराच स्थान मिळवून दिल आहे. पण आजही त्याच्या लॉकर ‘बी’ मधल रहस्य जगासमोर यायचं बाकी आहे.

पद्मनाभास्वामी मंदिरापर्यंत पोहोचण्याचे पर्याय..

हिंदूंची आस्था असलेल्या या प्राचीन पद्मनाभस्वामी मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी रेल्वे, बस तसेच हवाईमार्गे सुद्धा जात येते. देशातल्या सर्वच एअरपोर्ट पासून तिरुअनंतपुरम पर्यंत विमानसेवा आहे. तसेच रेल्वेप्रवास आपण करणार असाल तर सर्व मोठ्या शहरांपासून तिरुअनंतपुरम रेल्वेमार्गाने जोडले गेलेले आहे. तिरुवंदरम सेंट्रल, वर्कला शिवगिरी, तिरुवेंद्रम कोचुवेली, तिरुवनंतपुरम पेट्टा, कज्जाकुट्टम आणि त्रिवेंद्रम वेली या स्टेशनवरून कुठल्याही परिवहन मार्गाने पद्मनाभास्वामी मंदिरापर्यंत पोहोचता येते.

(स्त्रोत : गुगल)













उत्तर लिहिले · 18/8/2021
कर्म · 121765
1
जलदुर्गाची निर्मिती करण्याच्या हेतूने छत्रपती शिवाजी महाराज मालवणमध्ये आले होते. मालवणमधील कुरटे बेटाची पाहणी करीत जलदुर्गासाठी यापेक्षा चांगली जागा नाही, असे म्हणत याच ठिकाणी जलदुर्ग उभारण्याचे पक्के केले. यानुसार २५ नोव्हेंबर १६६४ रोजी मोरयाचा धोंडा येथे गणेश पूजन करीत किल्ल्याच्या बांधकामाला सुरुवात केली. परंतु बांधकामावर दगड टिकत नव्हता. त्यामुळे चिंतेत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांना कांदळगांवच्या श्री देव रामेश्वराने दृष्टांत दिला. त्यानंतर शिवाजी महाराजांनी कांदळगांव येथे जात रामेश्वर मंदिरामध्ये स्वत: घुमटी बांधली. तसेच मंदिरासमोर स्वत: वटवृक्ष लावला. तो वटवृक्ष आजही जिवंत आहे. यानंतर किल्ल्याचे काम भरभरून पूर्ण झाले. शिवकालीन इतिहास लाभलेला कांदळगांव समग्र इतिहासाचा साक्षीदार आहे. श्रीरामेश्वर सर्वाथाने सर्वावर कृपादृष्टी ठेवून आहे.
कांदळगावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वराचा वार्षिक जत्रोत्सव आज संपन्न होत आहे. या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी पूजन, ओटी भरणे, रात्री पालखी मिरवणूक व नंतर दशावतारी नाटय़प्रयोग होणार आहे. उपस्थिती दर्शविण्याचे आवाहन देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.
श्री देव रामेश्वर ही गावची प्रमुख ग्रामदेवतेबरोबरच श्री देवी सातेरी, श्री देवी भावई, श्री देवी कमरादेवी, श्री देव सिमेश्वर अशा अन्य ग्रामदेवता आहेत. शिवाजी महाराजांनी १६६४ साली मालवणात सिंधुदुर्ग किल्ला उभारला. त्यावेळी त्यांच्यासमोर अनेक बिकट समस्या उभ्या राहिल्या. समस्यांवर उपाय शोधत असताना महाराजांना दृष्टांत झाला, की येथून आठ किमी अंतरावरील मालवण तालुक्यातील कांदळगाव येथे जाऊन तेथील स्वयंभू श्री रामेश्वराचा जीर्णोद्धार कर.
शिवाजी महाराजांनी या दृष्टांताला अनुसरून कांदळगावी जाऊन तेथील श्री देव रामेश्वराच्या शिविलंगाची यथासांग पूजा करून त्याचा जीर्णोद्धार केला व समोरच वटवृक्षाचे रोपण केले. (जो आजही या ऐतिहासिक घटनेची साक्ष देत उभा आहे) त्यानंतरच सिंधुदुर्ग किल्ल्याचे बांधकाम यशस्वीरित्या पूर्ण झाले.
या ऐतिहासिक घटनेनंतर दृढ झालेले शिवाजी महाराज, भवानी माता, देव रामेश्वराचे ऋणानुबंध जोपासण्यासाठी देव रामेश्वर आपल्या पंचतत्व व रयतेसह त्रवार्षिक भेट किल्ले सिंधुदुर्गला देतात.
या भेटीला ऐतिहासिक भेटीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. श्री देव रामेश्वराच्या या भेटीची प्रतीक्षा कोंळबसह मालवण शहराला लागून राहिलेली असते. मार्गात रांगोळी काढत ग्रामदैवतेचे स्वागत केले जाते. यानंतर दुस-या वर्षी श्री देव रामेश्वर कोळंब, महान गावच्या वेशीभेटीला जातो.
http://bit.ly/2P81Z9d
कांदळगाव गावची एकी वाखाणण्याजोगी आहे. शिवकालीन बरोबरच पांडवकालीनही वारसा या गावाला लाभला असल्याचे स्पष्ट होते. कांदळगाव गावाला निसर्गाचे वरदान लाभलेले आहे. या गावामध्ये पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचे प्रमाण मुबलक आहेत. दसरोत्सव, रामनवमी, हरिनाम सप्ताह, श्री देव रामेश्वर मंदिर वर्धापन दिन, लक्ष्मीपूजन, राखणीचा नारळ आणणे आदी धार्मिक कार्यक्रम गावामध्ये मोठय़ा उत्साहात साजरे केले जातात.
विशेष म्हणजे रामेश्वर आपल्या भक्तांवर कृपादृष्टी ठेवून आहे.
निर्मळ मनाने त्याला साद घातली की त्याचा आशीर्वाद लगेच मिळतो अशी भक्तांची श्रद्धा आहे. रामेश्वराच्या आशीर्वादाने या गावाला पर्यटनदृष्टय़ा खास दर्जा प्राप्त झाला आहे. देश विदेशातील असंख्य भाविक रामेश्वराच्या दर्शनासाठी येत असतात. या मंदिराची रचना, येथील निसर्गरम्य वातावरण, गावातील ऐतिहासिक पाऊलखुणा, येथील प्रथा-परंपरा हे सारेच अनुभवण्याजोगे आहे. रामेश्वर मंदिरातील विविध उत्सव आणि या उत्सवांचा थाटमाट आपल्याला श्रद्धेची प्रचिती देत असतो.♏