संस्कृती वारकरी धार्मिक आचरण

वारकरी संप्रदायात अष्टगंधाचे काय महत्त्व आहे?

2 उत्तरे
2 answers

वारकरी संप्रदायात अष्टगंधाचे काय महत्त्व आहे?

1
आठ सुवासिक द्रव्यांनी बनवण्यात आलेले गंध म्हणून त्याला ‘अष्टगंध’ म्हटले जाते.

या अष्टगंधामध्ये देवाला आवडणारी आठही द्रव्ये असल्यामुळे कोणत्याही पूजेत अष्टगंध वापरण्याची परंपरा आहे.

गंधाष्टक किंवा अष्टगंधामध्ये श्रीगणेश, विष्णू, शिव, दुर्गा आणि सूर्य या पाच देवतांना संतुष्ट करणारी द्रव्ये असतात. त्यामुळे पुजेमध्ये ते वापरणे खूपच शुभ मानले जाते.

शक्तीसाठी यात चंदन, अगर, कपूर, चोर, कुंकुम, रोचन, जटामासी, कपी ही द्रव्ये असतात, तर विष्णूसाठी यात चंदन, अगर, ह्रीकेर, कुट, कुंकुम, उशीर, जटामासी और मुर यांचा समावेश असतो.

शिवशंकराला प्रिय असलेले चंदन, अगर, कपूर, तमाल, जल, कुंकुम, कुशीद, कुष्ट यात असतातच, पण श्रीगणेशाला प्रसन्न करून घेण्यासाठी लागणारे चंदन, अगर, कपूर, रोचन, कुंकुम, मद, रक्तचंदन, ह्रीकेर यांचा समावेश असतो. सूर्यासाठी यात जल, केसर, कुष्ठ, रक्तचंदन, चंदन, उशीर, अगर, कपूर असतात.

धर्मशास्त्रात अष्टगन्ध तीन प्रकारचे सांगितले आहे. त्यात चंदन, अगर, कर्पूर, तमाल, जल, कंकुम, कुशीत, कुष्ठ ही आठ द्रव्ये असतात. अष्टगंध शैक समाजाला प्रिय आहे.

प्रत्येक राशीचा ग्रहस्वामी वेगळा असतो. त्या त्या ग्रहाच्या प्रकृतीनुसार त्यांचा रंग आणि गंध असतो. या वेगवेगळ्या राशींनुसार गंधाचा टिळा कपाळाला लावला तर आपल्या इच्छा पूर्ण होतात असं म्हटलं जातं. सर्व समस्या दूर होतात.
उत्तर लिहिले · 30/12/2021
कर्म · 121765
0
वारकरी संप्रदायात अष्टगंधाला खूप महत्त्व आहे. अष्टगंध म्हणजे आठ सुगंधी वस्तूंचे मिश्रण. हे मिश्रण देवाला आणि भक्तांना लावण्यासाठी वापरले जाते. अष्टगंधाचे महत्त्व: * पवित्रता आणि शुद्धता: अष्टगंध हे पवित्र मानले जाते आणि ते लावल्याने मन आणि शरीर शुद्ध होते, असे मानले जाते. * एकाग्रता: अष्टगंधाचा सुगंध मनाला शांत करतो आणि एकाग्रता वाढवतो, ज्यामुळे भक्तीभावात लक्ष केंद्रित करणे सोपे होते. * सकारात्मकता: अष्टगंध लावल्याने नकारात्मक विचार दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. * आरोग्य: अष्टगंधात वापरल्या जाणाऱ्या अनेक वस्तू औषधी गुणधर्म असलेल्या असतात, ज्यामुळे ते त्वचेसाठी आणि आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. अष्टगंधामध्ये साधारणतः चंदन, केशर, कापूर, अगरू, कस्तुरी, गोरोचन, जटामांसी, आणि रक्तचंदन यांसारख्या वस्तू वापरल्या जातात.
उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 1440

Related Questions

धर्माचा सार्वजनिक आविष्कार कसा होतो ते स्पष्ट करा?
बजरंग बाण पाठ केव्हा करावे?
सूर्याला अर्घ्य देण्याची प्रथा अनेक शतकांपासून का सुरू आहे?
शिवलिंगाची अर्धवर्तुळाकार फेरी का मारली जाते?
बालाजीला केस का अर्पण करतात?
अग्निहोत्र दररोज एकाच व्यक्तीने करावे की घरातील कुणीही केले तरी चालते? तसेच घरातील सर्व जण बाहेरगावी गेल्याने अथवा सुतक वगैरे मध्ये अग्निहोत्र करण्यात खंड पडला तर चालते का, कृपया मार्गदर्शन करावे.
जेव्हा आपल्या भावकीतील कोणाचा मृत्यू होतो, म्हणजेच आपल्याला सुतक होते, तेव्हा देवघरातील देवपूजा करावी का? आणि मंदिरात जावे की नाही? किती दिवस?