संबंध नाती कौटुंबिक नाती तत्वज्ञान

सानिध्याने प्राप्त होणारी नाती कोणती?

2 उत्तरे
2 answers

सानिध्याने प्राप्त होणारी नाती कोणती?

2




जन्माने प्राप्त नाती सान्निध्याने प्राप्त नाती
1. आई 1. गुरू
2. वडील 2. मित्र
3. बहीण 3. मैत्रीण
4. भाऊ 4. शेजारी
5. आजी 5. हितचिंतक


नात्याची घट्ट वीण


माणसाच्या जडणघडणीत असलेलं नात्याचं महत्त्व सोदाहरण स्पष्ट करा.
उत्तर:
लहानपणी बाळाला स्वत:चे पालनपोषण करता येणे, संरक्षण करता येणे शक्यच नसते. तेवढी क्षमता त्याच्याकडे नसते. त्या काळात आई-बाबा व आजी-आजोबा त्याला मदत करतात. म्हणजे बालवयात ही नाती खूप महत्त्वाची असतात. तरुण वयात अनेक उपक्रम करावे लागतात, अनेक कार्ये पार पाडावी लागतात.

त्या काळात मित्र, शेजारी व तत्सम नाती उपयोगी पडतात. मार्गदर्शन करण्यासाठी गुरूची गरज असते. वृद्धपणी माणूस कमकुवत बनत जातो. त्या काळात त्याची तरुण मुले त्याची देखभाल करतात. अशा प्रकारे जीवन चालू राहण्यासाठी वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळी नाती मदत करतात. नाती नसतील, तर मानवी समाज अस्तित्वात येऊ शकणार नाही.


उचित नातेसंबंध माणसाचे जीवन सुसह्य करतात. संबंधातूनच नाती निर्माण होतात. त्याला पर्याय नसतो. म्हणून ती तोडायची नसतात तर जोडायची असतात. नात्यात दुरावा निर्माण होऊ न देता त्यात गोडवा कसा आणता येईल, याचा विचार करावा. नात्याचे पदर नाजूक असतात ते हळुवारपणेच हाताळले पाहिजेत. नात्यांची वीण घट्ट असली पाहिजे. ती कधीच सैलसर होता कामा नये. मानवी नातेसंबंध कसे जपावेत त्याचा इस्लामने तर वस्तुपाठच ठेवला आहे. नातेवाइकांना कधीच कमी लेखू नका, त्यांना नाराज करू नका. नाती-गोती, सगेसोरे, पै-पाहुणे यांचे सतत भान ठेवा.
 
आपल्या घरी आल्यानंतर हसतुखाने त्यांचे स्वागत करा, त्यांना खाऊ, पिऊ घालूनच त्यांची सन्मानाने पाठवणी करा. त्यांच्याविषयी मनात कटुता बाळगू नका. रमजानमध्ये जकात प्रदान करताना नात्यातील दुर्बलांना, निर्धनांना अग्रक्रम देण्याचा सल्ला कुरआनच्या माध्यमातून देण्यात आला आहे. आपसातील भांडणतंटे, वाद हे निरर्थक असल्याचे सांगून क्षुल्लक गोष्टींवरून रक्तपात करणार्यांना माणुसकीची शिकवण दिली. सुख-दुःख, हमदर्दी यांची नवी संकल्पना त्यांनी मांडली. यावरून नात्यांचे महत्व लक्षात येते. 
 
आपल्या जगण्याला नात्यांचा मोठा आधार असतो. संकटाच्या काळात कळते की त्यांची साथ किती मोलाची आहे. एरवी ही गोष्ट माणसांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे ती गोत्यात येतात. रमजान तर शत्रूशीही न्रमतेने बोलण्याचा संदेश देतो. नाती केवळ रक्ताची असतात असे नाही मानलेली नातीही तितकीच महत्त्वाची असतात. ईश्वरभक्ती केल्याने मनाला प्राप्त होणारी शांती हेच जीवनाचे सार आहे, हे स्पष्ट केले. स्वतःसाठी न जगता समाजासाठी जगा. समाजाच्याप्रतिही तुमची काही कर्तव्ये आहेत, हे त्यांनी स्पष्टपणे मांडले. आता रमजान महिन्याचेच पाहाना, सगळेच उपवासधारक नमाज पढण्यासाठी दिवसातून पाच वेळा मशिदीत एकत्र येतात. संध्याकाळी कोणी फळे आणतो, कोणी खजूर आणतो, कोणी आणखीन काही. एकमेकांची देवाणघेवाण होते. सामुदायिकरीत्या उपवास सोडतात. रोजच्या सहवासाने, सानिध्याने ओळख वाढत जाते. ओळखीचे रूपांतर मैत्रीत होते. यातूनच मित्रत्वाचे नाते निर्माण होते. बंदे परस्परांना स्मरणात ठेवतात. भेट झाली की शुद्ध अंतःकरणाने आपुलकीने बोलतात. याचा अर्थ असा की, रमजान महिना आपल्याला इबादती बरोबर मैत्रीच्या नात्यांचे दालन खुले करून देतो. मना-मनांना जोडण्याचे, नाते निर्माण करण्याचे कार्य रमजान करत असतो. म्हणूनच नात्यात कधीच अंतर येऊ द्यायचे नसते. खंड पडू द्यायचा नसतो. वागण-बोलण्यात तफावत नसावी. त्यात स्वच्छता आणि पारदर्शकता असावी. शब्दातील आश्वासकता प्रत्येक नात्याला सुखावणारी असते. प्रत्येकाने नात्याचा सन्मान केला पाहिजे, हा रमजानचा संदेश आहे. पण उपवास सोडणसाठी अथवा नमाज पढण्याकरिता कुणीही मशिदीत जाऊ नये. या गोष्टी वैयक्तिक पातळीवर घरातल्या घरात कराव्यात.



उत्तर लिहिले · 21/10/2021
कर्म · 121765
0

सानिध्याने प्राप्त होणारी नाती:

ज्या नात्यांमध्ये प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकी असते, ती नाती सानिध्याने अधिक दृढ होतात. काही नाती जन्मजात मिळतात, तर काही आपण निवडतो.

उदाहरणार्थ:

  • मित्र: मित्र हे सहवासातून तयार झालेले नाते आहे.
  • शेजारी: शेजारी हे आपल्या आजूबाजूला सतत असणारे लोक असल्यामुळे त्यांच्याशी आपले संबंध जुळतात.
  • सहकारी: ऑफिसमध्ये काम करणारे सहकारी देखील आपल्या सोबत काम करत असल्यामुळे त्यांच्याशी मैत्रीचे संबंध निर्माण होतात.
उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 1040

Related Questions

तुमच्या आयुष्यात नकळत जोडल्या गेलेल्या एखाद्या नात्याबद्दल तुमच्या शब्दात माहिती द्या?
जगात निःस्वार्थ नातं कोणतं आहे?
सासऱ्यांचे अनुभव कथन कसे करावे?
दीर म्हणजे काय?
आई या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे?
माझ्या बहिणीचा भाचा तर माझा कोण लागेल?
मामाची मुलगी नक्की कोण?