कायदा
सामाजिक सुधारणा
इतिहास
1829 मध्ये सतीप्रथा बंदीचा कायदा कोणी केला?
मूळ प्रश्न: १८२९ मध्ये सती प्रथा बंदीचा कायदा कोणी केला?
सती प्रथा म्हणजे पतीच्या निधनानंतर पतीवरील निस्सीम प्रेमाचे द्योतक म्हणून पत्नीने स्वतःला जाळून घेणे किंवा चितेत उडी टाकणे होय.
ऋग्वेदात सती प्रथा प्रचलित नसल्याचे दिसून येते. महाकाव्याच्या काळात सती प्रथा होती, पण सक्ती नव्हती.
इसा या लढाऊ जमातीकडून भारतीयांना सती प्रथा स्विकारली असावी असे मानले जाते.
नंतर पुराण ग्रंथात सती प्रथेला महत्त्व प्राप्त झाले.
पतीनिधनानंतर पत्नीला अतिशय खडतर जीवन जगावे लागत असे, त्यामुळे सती जाणे पसंत केले जाई.
काही स्त्रीयांना कुल प्रतिष्ठेसाठी , धर्मासाठी दबाव आणून पतीच्या चितेवर जाळले जायचे.
ती चितेतून बाहेर येऊ नये म्हणून लोक बांबू घेऊन चितेभोवती उभे राहत असत. तिच्या किंकाळया ऐकू येऊ नयेत म्हणून वाद्ये वाजवली जात असत.
ही प्रथा राजपुतांना, बंगाल, विजयनगर या भागात मोठ्या प्रमाणावर होती.
काश्मीरचा राजा सिकंदर, मुघल सम्राट अकबर, जहांगीर, दुसरा बाजीराव पेशवा, गोव्याचे पोर्तुगीज, श्रीरामपूरचे डँनिश , चंद्रनगरचे फृैंच, चिन्सुरचे डच यांनी आपल्या राज्यात सती प्रथेवर बंदी घातली होती ,पण अपयश आले.
इंग्रज राजवटीमध्ये लाँर्ड काँर्नवालिस, लाँर्डमिंटो ,लाँर्ड हेस्टिग्ज व अँमहसर्ट यांनी प्रयत्न केले.
काही अटींवर सती पद्धतीला परवानगी देण्याची प्रथा लाँर्ड वेलस्लीने सुरु केली.
सती कायद्यास सनातनी लोकांनी विरोध केला.
1812 पासून राजा राममोहन रॉय यांनी प्रयत्न केल्याने लाँर्ड बेटिंक यांनी 4 डिसेंबर 1829 रोजी सती प्रथा बंदीचा कायदा मंजूर केला.
1830 मध्ये मुंबई , मद्रास या पृांतात सती जाणे बाबत सक्ती करणे, सतीच्या वेळी हजर राहणे या गोष्टी गुन्हा ठरविण्यात आल्या.
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0
answers