कायदा सामाजिक सुधारणा इतिहास

१८२९ मध्ये सती प्रथा बंदीचा कायदा कोणी केला?

2 उत्तरे
2 answers

१८२९ मध्ये सती प्रथा बंदीचा कायदा कोणी केला?

3

सती प्रथा म्हणजे पतीच्या निधनानंतर पतीवरील निस्सीम प्रेमाचे द्योतक म्हणून पत्नीने स्वतःला जाळून घेणे किंवा चितेत उडी टाकणे होय. 
ऋग्वेदात सती प्रथा प्रचलित नसल्याचे दिसून येते. महाकाव्याच्या काळात सती प्रथा होती, पण सक्ती नव्हती. 
इसा या लढाऊ जमातीकडून भारतीयांना सती प्रथा स्विकारली असावी असे मानले जाते. 

नंतर पुराण ग्रंथात सती प्रथेला महत्त्व प्राप्त झाले. 
पतीनिधनानंतर पत्नीला अतिशय खडतर जीवन जगावे लागत असे, त्यामुळे सती जाणे पसंत केले जाई. 

काही स्त्रीयांना कुल प्रतिष्ठेसाठी , धर्मासाठी दबाव आणून पतीच्या चितेवर जाळले जायचे. 
ती चितेतून बाहेर येऊ नये म्हणून लोक बांबू घेऊन चितेभोवती उभे राहत असत. तिच्या किंकाळया ऐकू येऊ नयेत म्हणून वाद्ये वाजवली जात असत. 
ही प्रथा राजपुतांना, बंगाल, विजयनगर या भागात मोठ्या प्रमाणावर होती. 

काश्मीरचा राजा सिकंदर, मुघल सम्राट अकबर, जहांगीर, दुसरा बाजीराव पेशवा, गोव्याचे पोर्तुगीज, श्रीरामपूरचे डँनिश , चंद्रनगरचे फृैंच, चिन्सुरचे डच यांनी आपल्या राज्यात सती प्रथेवर बंदी घातली होती ,पण अपयश आले. 

इंग्रज राजवटीमध्ये लाँर्ड काँर्नवालिस, लाँर्डमिंटो ,लाँर्ड हेस्टिग्ज व अँमहसर्ट यांनी प्रयत्न केले. 

काही अटींवर सती पद्धतीला परवानगी देण्याची प्रथा लाँर्ड वेलस्लीने सुरु केली. 

सती कायद्यास सनातनी लोकांनी विरोध केला. 
1812 पासून राजा राममोहन रॉय यांनी प्रयत्न केल्याने लाँर्ड बेटिंक यांनी 4 डिसेंबर 1829 रोजी सती प्रथा बंदीचा कायदा मंजूर केला. 

1830 मध्ये मुंबई , मद्रास या पृांतात सती जाणे बाबत सक्ती करणे, सतीच्या वेळी हजर राहणे या गोष्टी गुन्हा ठरविण्यात आल्या. 



उत्तर लिहिले · 23/8/2021
कर्म · 25850
0
१८२९ मध्ये सती प्रथा बंदीचा कायदा लॉर्ड विलियम बेंटिंक यांनी केला. त्यांनी ४ डिसेंबर १८२९ रोजी बंगाल सती नियमन XVII कायदा पास केला, ज्यामुळे ब्रिटिश भारतातील सर्व प्रांतात सती प्रथा बेकायदेशीर ठरली.

संदर्भ:

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 2400

Related Questions

कालगणना करण्याची एकके कोणती? इतिहासाच्या अभ्यासाचे फायदे लिहा. स्वयंप्रकाशी साधने लिहा.
महाराष्ट्रातील कोणता सण राज्य सण म्हणून ओळखला जातो?
भारतातील पहिले महिला राष्ट्रपती कोण?
महाराष्ट्रातील कोणते शहर सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते?
क्विट इंडिया मूव्हमेंट कोणत्या वर्षी सुरू झाले?
जय जवान जय किसान हे घोष वाक्य कोणी दिले?
महाराष्ट्रातील पहिले मुख्यमंत्री कोण?