कारणे आरोग्य

घशाला कोरड का पडते?

2 उत्तरे
2 answers

घशाला कोरड का पडते?

1
भीतीमुळे तोंडाला तात्पुरती कोरड पडते. तशीच कोरड परंतु कायम स्वरूपाची तोंडाने श्वासोच्छ्‌वास करणाऱ्यांमध्ये आणि नाकात अडथळा उत्पन्न झाल्यास पडते; उदा., नासागिलायूंची (नाकाच्या पोकळीकडील घशातील टॉन्सिलांची) वाढ. अतिशय श्रमाचे काम करणाऱ्यांमध्ये व ताप आलेल्या रोग्यांमध्येही शरीरातील पाणी घटते.


प्यायलेल्या पाण्याच्या प्रमाणापेक्षा शरीरातून अधिक पाणी गमावणे या स्थितीला शरीरातील पाणी कमी होणे किंवा 'डिहायड्रेशन' असे म्हणतात. लघवी, मल, घाम; तसेच उच्छवासावाटेही रोज शरीरातून पाणी बाहेर जात असते. पाण्याबरोबरच शरीर काही प्रमाणात क्षारही गमावते. शरीरातून पाणी गमावणे ही सामान्य प्रक्रिया आहे; परंतु हे प्रमाण वाढले, तर 'डिहायड्रेशन'चा त्रास होतो.

'डिहायड्रेशन'ची लक्षणे

- घशाला कोरड पडणे, सतत तहान लागणे, डोके किंवा अंग दुखणे, लघवी कमी प्रमाणात आणि पिवळी होणे, त्वचा कोरडी पडणे, मलावरोध होणे, डोकेदुखी, चक्कर येणे अशक्तपणा ही काही 'डिहायड्रेशन'ची लक्षणे आहेत.

- मेंदूला रक्तपुरवठा न झाल्यामुळे स्मरणशक्ती कमी होणे, हृदयाचे ठोके वाढणे, रक्तदाब कमी होणे, वजन झपाट्याने कमी होणे ही 'डिहायड्रेशन'ची आणखी काही लक्षणे आहेत.

- ताप, उलटी, जुलाब झाल्यामुळे शरीरातून पाण्याचे प्रमाण कमी होऊनही 'डिहायड्रेशन' होऊ शकते.

- उन्हाळ्यात जास्त काम, व्यायाम केल्यामुळे, पाणी कमी प्यायल्यामुळे 'डिहायड्रेशन'चा त्रास होतो.

- 'डिहायड्रेशन'मुळे शरीरातील खनिजे आणि इलेक्ट्रोलाइट्स, सोडियम, पोटॅशिअम क्लोराइड यांच्या पातळीत असमतोल किंवा कमतरता होते. त्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते.

डिहायड्रेशनची कारणे

डिहायड्रेशनचे प्रमुख कारण घामच्या रूपात शरीरातून पाण्याची पातळी अति प्रमाणात कमी होणे होय. उन्हाळ्यात जास्त वेळ उन्हात राहणे, पाणी कमी प्रमाणात पिणे, सतत उन्हात खेळणे इत्यादी डिहायड्रेशनची प्रमुख कारणे आहेत.

डिहायड्रेशनपासून वाचण्याचे उपाय

१. जास्त वेळ उन्हात न फिरणे.

२. पाणी जास्त प्रमाणात पिणे.

३. उन्हात जाताना डोक्यावर टोपी किंवा छत्री घेऊन जाणे.

बालकांना धोका जास्त!

नवजात बालके आणि लहान मुलांमध्ये डिहायड्रेशनची शक्यता अधिक असते आणि त्याकडे दुर्लक्ष केल्यास ते घातक ठरू शकते. लहान मुले लघवी कमी करत असतील किंवा रडताना त्यांच्या डोळ्यांतून कमी पाणी येत असेल, प्रमाणापेक्षा जास्त झोप येत असेल, तर या लक्षणांवर लक्ष ठेवावे. मोठ्या व्यक्तींमध्ये इतर संसर्गजन्य आजारांचे प्रमाण अधिक असेल, तर डिहायड्रेशन होऊ शकते.











तोंडाला कोरडेपणा येण्याची कारणे आणि घरगुती उपाय 

तोंडाला कोरडेपणा येण्याची करणे आणि घरगुती उपाय वाचा या लेखात
तुम्हाला तोंडात वारंवार कोरडेपणा जाणवत असेल तर त्यामागची कारणे जाणून घेऊन त्याच्यावरचे घरगुती उपाय माहीत करून घेण्यासाठी हा लेख वाचा.

बऱ्याच वेळा पाणी कमी प्यायल्याने, खूप वेळ झोप घेतल्याने, बाहेर फिरून आल्यानंतर किंवा खूप वेळ बोलल्यानंतर आपले तोंड कोरडे पडते.

हा अनुभव कमी जास्त प्रमाणात आपल्यापैकी सगळ्यांनाच आला असेल.

अशा वेळेला आपण पटकन पाणी पिऊन ओठ आणि तोंड ओले करतो आणि तोंडाचा कोरडेपणा काही वेळासाठी दूर होतो.

पण तोंड कोरडे पडण्यासाठी यापेक्षा सुद्धा वेगळी अशी काही कारणे आहेत.

बऱ्याचदा अनेकांना हा त्रास जाणवतो आणि मग पाणी मिळेपर्यंत एकदम बैचैन व्हायला होते.

यासाठी जास्त करून डॉक्टरांची आवशक्यता भासत नाही, पण जर हा त्रास सारखा होत असेल आणि मुख्य म्हणजे घरगुती उपायांनी तो बरा होत नसेल तर मात्र वैद्यकीय सल्ल्याची गरज असते.

आपण आपल्या आरोग्याबद्दल सतर्क राहायला हवे.

या तक्रारी जरी लहान वाटत असल्या तरी त्यांच्या आपल्या जगण्यावर, वागण्यावर आणि एकंदरीत वावरण्यावर परिणाम होत असतो.

म्हणून अशा किरकोळ वाटणाऱ्या समस्यांकडे सुद्धा दुर्लक्ष न करता त्यापासून सुटका मिळवायचा प्रयत्न केला पाहिजे.

आपण आपल्या आरोग्याशी निगडीत अनेक लहान मोठ्या समस्यांची माहिती आणि त्यावरचे घरगुती उपाय अनेक लेखातून बघत असतो.

आज या लेखात सुद्धा हे तोंड कोरडे पडते म्हणजे नेमके काय होते?

कशामुळे होते आणि त्यावर घरगुती उपाय काय आहेत हे आपण बघणार आहोत.

तोंड कोरडे पडणे याला वैद्यकीय भाषेत झिरोस्टोमीया असे म्हणतात.

झिरोस्टोमीया ही स्वतः एक समस्या असली तरी ती इतर काही व्याधींमुळे उत्भवण्याची शक्यता असते.

आपल्या तोंडात नेहमी ओलसरपणा असतो तो तोंडात असलेल्या लाळेमुळे.

आपल्या तोंडात असलेल्या लाळेच्या ग्रंथी जेव्हा योग्य प्रमाणात लाळ तयार करत नाहीत तेव्हा तोंडाच्या कोरडेपणाचा त्रास होतो.

हे होण्यामागे अनेक कारणे असू शकतात जसे की पाणी कमी प्यायल्याने डीहायड्रेशन, स्ट्रेस, झोपेत तोंडाने श्वास घेतल्यामुळे, मधुमेह, काही औषधांचे दुष्परिणाम, तंबाखू किंवा सिगारेटचा अतिरेक.

आजारपणात, विशेषतः ताप आलेला असताना सुद्धा तोंडाचा कोरडेपणा जाणवतो.

कारण काहीही असो या तोंडाच्या कोरडेपणामुळे आपल्याला प्रचंड अस्वस्थता वाटते.

पण त्यातल्यात्यात चांगली गोष्ट अशी आहे की ही समस्या काही सोप्या घरगुती उपायांने आणि काही सवयी बदलल्याने दूर होऊ शकते.

तोंडाचा कोरडेपणा घालवण्यासाठी घरगुती उपाय.
१. दिवसभर घोट घोट पाणी पीत राहा

अनेक समस्यांवर भरपूर पाणी पिणे हा उपाय असतोच.

आपल्याला दिवसभरात ८ ते १० ग्लास पाण्याची गरज असते.

डीहायड्रेशन म्हणजेच शरीरात पाण्याची कमतरता असली की तोंड कोरडे पडते.

म्हणूनच आपले दिवसभराचे ८ ते १० ग्लास पाणी पिताना आपण ते हळूहळू एकेक घोट असे प्यायले तर तोंड ओलसर राहते, डीहायड्रेशन होत नाही.

यासाठी काम करताना आपल्याजवळ पाण्याची बाटली बाळगली आणि साधारण दर अर्धा तासाने त्यातून थोडे थोडे पाणी पीत राहता येते.

असे केल्याने आपण दिवसभरात योग्य प्रमाणात पाणी पीत आहोत ना? हे देखील कळते.

२. चुईंग गम खा

चुईंग गम खाताना तोंडाच्या हालचालींमुळे आपल्या लाळेच्या ग्रंथी सक्रीय होतात.

यामुळे लाळेचे प्रमाण वाढते. चुईग गममध्ये असणाऱ्या झायलीटाॅल या रसायनामुळे सुद्धा लाळ निर्माण व्हायचे प्रमाण वाढते.

चुईंग गमची निवड करताना शुगर फ्री चुईंग गम निवडावे.

३. तोंडाची स्वच्छता ठेवा

तोंडाची म्हणजेच दातांची, जिभेची आणि हिरड्यांची नीट स्वच्छता ठेवली नाही तर त्याचा परिणाम म्हणजे तोंडाचा कोरडेपणा.

म्हणूनच रोज दोनदा दात घासणे, दात घासताना जीभ सुद्धा साफ करणे.

जेवणानंतर तसेच काहीही खाल्ल्यानंतर चूळ भरणे या चांगल्या सवयी अंगी बाळगल्या तर त्याचा फायदा होतो.

४. अल्कोहोल फ्री माऊथ वाॅशची निवड करा

तोंडाची स्वच्छता ठेवताना माऊथ वाॅश वापरताना तो अल्कोहोल फ्री आहे ना याची खात्री करून घ्या कारण अशा माऊथ वाॅशमुळे तोंड कोरडे पडण्याची शक्यता अधिक असते.

झायलीटाॅल असणाऱ्या माऊथ वाॅशची निवड केल्याने लाळेचे प्रमाण वाढण्यासाठी मदत होईल.

५. तोंडाने श्वास घेणे टाळावे

तोंडाद्वारे श्वास घेतला तर तोंड जास्त प्रमाणात कोरडे पडायला लागते.

आपल्या नकळतपणे आपण कामात असताना बऱ्याचदा तोंडाने श्वास घेतो.

मात्र आपल्याला जर तोंड कोरडे पडण्याचा त्रास असेल तर हे जाणीवपूर्वक टाळले पाहिजे.

रात्री झोपेत असताना विशेषतः तोंडाने श्वास घेतला जातो.

तोंडाचा कोरडेपणा घालवायचा असेल तर ही सवय लक्ष देऊन बदलायला हवी.

वातावरण कोरडे असेल तर तोंडाचा कोरडेपणा वाढतो.

हवेतील आर्द्रता वाढवण्यासाठी ह्युमीडीफायरचा वापर केला जाऊ शकतो.

आपल्या खोलीत रात्री ह्युमीडीफायर लावल्याने तोंडाने श्वास घ्यायचे प्रमाण कमी होते.

६. कोरफड

कोरफडीचे अनेक उपयोग आहेत. कोरफडीच्या गरात पाण्याचे प्रमाण जास्त असते.

कोरफडीचा ज्युस प्यायल्याने आपले तोंड ओलसर राहून कोरडेपणा दूर होतो.

७. आले/काळी मिरी

आले किंवा काळी मिरी चावून खाल्ल्याने आपल्या तोंडातील लाळ निर्माण करणाऱ्या ग्रंथी सक्रीय होतात.

तोंडातील लाळेचे प्रमाण वाढल्याने तोंडाच्या कोरडेपणाचा त्रास दूर होतो.

८. डीहायड्रेशन होणार नाही याची काळजी घ्या

केवळ पाणी योग्य प्रमाणात प्यायले तर डीहायड्रेशन होत नाही असे नसते.

डीहायड्रेशन होण्यामागे इतरही अनेक करणे आहेत.

चहा, कॉफी किंवा कार्बोनेटेड पेये, ज्यात कॅफीन जास्त प्रमाणात असतात यांच्या प्रमाणाबाहेर सेवनाने तोंडात कोरडेपणा जाणवू शकतो.

त्यामुळे या पेयांचा अतिरेक टाळावा.

तसेच अल्कोहोलमुळे सुद्धा तोंड कोरडे पडण्याचा धोका जास्त असतो.

तंबाखू किंवा सिगारेटमुळे सुद्धा डीहायड्रेशन होते.

तसेच खूप प्रमाणात साखर खाल्ल्याने सुद्धा तोंड कोरडे पडून त्रास होऊ शकतो. यासाठी गोड पदार्थ, साखर असलेली चुईंग गम, सरबते इत्यादी टाळली पाहिजेत.

म्हणून दिवसभरात योग्य प्रमाणात पाणी पिण्यारोबरच ही काळजी सुद्धा घेतली पाहिजे आणि तोंडाच्या कोरडेपणाचा त्रास दूर करायचा असेल तर या सवयी कटाक्षाने बदलल्या पाहिजेत.

सहसा या सोप्या घरगुती उपायांचा फायदा होतो.

पण हे उपाय करून सुद्धा तोंडाचा कोरडेपणा जात नसल्यास त्याचे कारण काही वेगळे, जसे की मधुमेहाचे लक्षण असू शकते यासाठी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा जेणेकरून त्या आजारावर उपचार घेऊन त्यामुळे तोंडाला येणारा कोरडेपणा कमी होईल.

तोंडाचा कोरडेपणा एखाद्या औषधांचा परिणाम सुद्धा असू शकतो.

त्यामुळे तुमची काही औषधे बदलली असतील आणि तुम्हाला हा त्रास सुरु झाला असेल तर त्याबद्दल सुद्धा तुमच्या डॉक्टरांशी बोलले पाहिजे.





: घसा कोरडा पडणे उपाय, घसा कोरडा पडण्याची कारणे व उपाय, तोंड कडू पडणे उपाय, तोंड कोरडे पडणे उपाय, तोंड कोरडे पडणे घरगुती उपाय, तोंडाला कोरडेपणा येण्याची करणे
कोमट पाणी अथवा द्रवपदार्थ प्या-
कोमट पाण्यामुळे घशाचा दाह कमी होतो. तुम्हाला कोमट पाणी पिण्याचा कंटाळा येत असेल तर तुम्ही गरम सूप अथवा एक कप आल्याचा चहा घेऊ शकता. त्याचप्रमाणे भरपूर पाणी प्यायल्यामुळे देखील तुमचा घसा कोरडा न रहाता ओलसर राहील व तुम्हाला अधिक आराम मिळेल.
घशाचे इनफेक्शन झाल्यास करा हे उपाय
   
घसा खवखवत असेल तर घशामध्ये खरखर,वेदना होतात.

 : घसा खवखवत असेल तर घशामध्ये खरखर,वेदना होतात.



नाक व तोंडावाटे शरीरीला जीवजंतूंचा संसर्ग होऊ शकतो.घश्याचे इनफेक्शन होण्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत असू शकतात.वातावरणातील बदलामुळे अथवा थंड पदार्थ खाल्यामुळे घसा दुखू शकतो.थंड पदार्थामुळे घशातील नाजूक भागाला जीवाणूंचा संसर्ग होतो.इनफेक्शनमुळे घसा दुखत असेल तर नेहमीप्रमाणे काम करणे देखील कठीण होते.घसा दुखत असल्यास या गोष्टी केल्यामुळे तुम्हाला आराम मिळू शकतो. 


कोमट पाणी अथवा द्रवपदार्थ प्या-


कोमट पाण्यामुळे घशाचा दाह कमी होतो.तुम्हाला कोमट पाणी पिण्याचा कंटाळा येत असेल तर तुम्ही गरम सूप अथवा एक कप आल्याचा चहा घेऊ शकता.त्याचप्रमाणे भरपूर पाणी प्यायल्यामुळे देखील तुमचा घसा कोरडा न रहाता ओलसर राहील व तुम्हाला अधिक आराम मिळेल.
कोमट की थंड पाणी ? निरोगी स्वास्थ्यासाठी कोणता पर्याय निवडाल


गुळण्या करा-



घशामध्ये खवखवण्याचा त्रास होत असेल तर कोमट पाण्यामध्ये मीठ घालून गुळण्या करा.यामुळे तुम्हाला चांगला आराम मिळू शकेल.या मीठाच्या पाण्यामध्ये तुम्ही अर्धा चमचा हळद देखील घालू शकता.मीठाच्या पाण्याच्या गुळण्या केल्यामुळे घशामधील कफचा अडथळा कमी होतो व गरम पाण्यामुळे कफ पातळ झाल्यामुळे बाहेर टाकणे सोपे होते सहाजिकच त्यामुळे घशाचा दाह कमी होतो. एक मध्यम आकाराच्या ग्लासभर पाण्यात तीन कडीलिंबाची पाने घेऊन ते पाणी उकळा.पाणी थंड झाल्यावर त्यामध्ये एक चमचा मध टाका व त्या पाण्याच्या गुळण्या करा तुम्हाला त्वरीत आराम मिळेल.


गरम पाण्याचे वाफारे घ्या-


गरम पाण्याच्या वाफा घेतल्याने घशातील श्वसनमार्गाला आराम मिळतो.कधीकधी यावर कोमट पाण्याने अंघोळ केल्यास देखील बरे वाटते.अशा वेळी पाण्यात निलगिरीच्या तेलाचे काही थेंब टाकल्याने देखील पटकन बरे वाटू शकते.




दमट वातावरणात रहा-


कोरड्या हवेमुळे घश्याला त्रास होतो.ह्यूमीडीफायर मुळे तुमच्या खोलीतील वातावरण दमट होईल व तुमच्या घश्याला आराम मिळेल.


खोकल्यावर गुणकारी पदार्थ तोंडात ठेवा-


घसा दुखत असल्यास बाजारात मिळणा-या खोकल्यावरच्या गोळ्या तोंडात ठेवा.त्यातील थंडाव्यामुळे तुम्हाला आराम मिळेल.मिंथॉल व मधासारख्या अॅन्टीसेफ्टिक घटकांमुळे तुमच्या घसा कमी खवखवेेल.अशा गोळ्या बाजारात सहज उपलब्ध असतात. मऊ पदार्थ खा व तिखट,आंबट,तळलेले पदार्थ खाणे टाळा.
घसा दुखत असल्यास अन्नपदार्थ गिळणे कठीण जाते.त्यामुळे घशाला वेदना न होता गिळता येतील असे मऊ अन्नपदार्थ खा.तिखट व अॅसिडीक अन्नपदार्थांमुळे घशाला त्रास होतो त्यामुळे घसा दुखत असल्यास हे पदार्थ खाणे टाळा.त्याचप्रमाणे तेलकट पदार्थ देखील खाणे टाळा कारण ते कडक व क्रिस्पी असल्याने ते गिळताना तुम्हाला वेदना होऊ शकतात.


ओटीसी औषधे घ्या-
कफ सुकल्यामुळे किंवा इनफेक्शनमुळे घसा खवखवू लागतो.अशा वेळी ओटीसी औषधे घेतल्याने आराम मिळू शकतो.कफ सुकल्यामुळे तो प्रवाहीत होत नाही व घशामध्ये अडथळा निर्माण होतो.पण या औषधांमुळे कफ पातळ झाल्यामुळे बाहेर टाकता येतो व बरे वाटू लागते.



घरगुती उपाय करा-
घसा दुखत असल्यास घरगुती उपायांचा देखील चांगला फायदा होऊ शकतो.स्वयंपाकासाठी वापरण्यात येणा-या मधात अॅन्टी-वायरल व अॅन्टी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात.त्यामुळे घसा दुखत असल्यास त्याचा तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो.त्याचप्रमाणे आले,काळीमिरी,मध,लसूण,तुळस आणि हळद यामुळे देखील तुम्हाला आराम मिळू शकतो.त्यामुळे हे पदार्थ वापरुन तयार केलेली चहा किंवा पेय घ्या.

इतर काही घरगुती उपाय-


घसा दुखत असल्यास आल्याचा तुकडा तोंडात ठेऊन चावा.त्यामुळे तुम्हाला लवकरआराम मिळेल.किंवा आल्याचे चार तुकडे,दोन टोमॅटो,मध यांचा रस करुन प्या.


पाण्यात मध व कांदा टाकून उकळा व गाळून ते पाणी थोडयाथोड्या वेळाने प्या.


मधात काही लवंगा टाका.काही तासांनी लवंगा काढून त्याचे चाटण खा.लवंगामुळे वेदना कमी होतील व मधाने घशाला आराम मिळेल. 


पाण्यात बडीसोप टाकून ते काही मिनीटे उकळा त्यानंतर पाणी गाळून घ्या व त्यात मध टाकून थोड्या थोड्या वेळाने प्या.


लिंबाचा रस व एक चमचा मध टाकलेले गरम पाणी प्या.


भरपूर आराम करा.व्यवस्थित आराम केल्यामुळे शरीर इनफेक्शनला प्रतिकार करु शकते.


 




उत्तर लिहिले · 18/8/2021
कर्म · 121765
0

घशाला कोरड पडण्याची अनेक कारणे असू शकतात, त्यापैकी काही खालीलप्रमाणे आहेत:

जर तुम्हाला सतत घशाला कोरड पडत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे उचित आहे.

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 1100

Related Questions

कोणत्या कारकांचे कार्यामुळे?
महाराष्ट्रातील लोकसंख्या वाढीची कारणे कोणती आहेत?
मृत्यू का येतो?
1857 च्या उठावाचे तत्कालीन कारण कोणते?
का होत असेल?
ᮨᱶ च ᮓांतीची राजकᳱय, सामािजकआिण आᳶथक कारणेथोड᭍यात ᭭प᳥ करा?
१८५७ च्या उठावाचे तत्कालीन कारण काय होते?