
कारणे
0
Answer link
कोणत्या घटकांमुळे किंवा कारणांमुळे एखादी गोष्ट घडते, हे विचारणे म्हणजे 'कोणत्या कारकांचे कार्यामुळे?' असा प्रश्न विचारणे होय.
0
Answer link
महाराष्ट्रातील लोकसंख्या वाढीची कारणे खालीलप्रमाणे आहेत:
संदर्भ:
- जन्मदर: महाराष्ट्रात जन्मदर जास्त असल्यामुळे लोकसंख्या वाढते.
- मृत्युदर: आरोग्य सुविधा सुधारल्यामुळे मृत्युदर घटला आहे, त्यामुळे लोकसंख्या वाढली आहे.
- स्थलांतर: रोजगार आणि चांगल्या जीवनशैलीच्या शोधात इतर राज्यांमधून लोक महाराष्ट्रात येतात, ज्यामुळे लोकसंख्या वाढते.
- सामाजिक आणि सांस्कृतिक कारणे:
- लवकर विवाह करण्याची प्रथा
- मुलांना महत्व देणे
- कुटुंब नियोजन पद्धतींचा कमी वापर
- शैक्षणिक मागासलेपण: काही भागांमध्ये शिक्षणाचा अभाव असल्यामुळे लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम समजत नाहीत.
- महाराष्ट्र राज्याचे आर्थिक सर्वेक्षण अहवाल des.maharashtra.gov.in
2
Answer link
मृत्यू म्हणजे जीवित प्राण्याच्या शरीरातील त्या सर्व जैविक क्रियांचा अंत ज्या त्याला जिवंत राहण्यास मदत करतात. मृत्यूनंतर शरीराचे कार्य थांबते व प्राणी निष्क्रिय होतो. मृत्यूनंतर शरीराचे हळूहळू विघटन होण्यास सुरुवात होते. जन्म झालेल्या प्रत्येक जीवाला मृत्यू अपरिहार्य आहे.मृत्यू का येतो ,, ?
जे उपजे ते नाशे, नाशे ते पुनरपि दिसे.
_*संत ज्ञानेश्वर*_
या विश्वाचे काही नियम आहेत, जे सर्व विश्वाला पाळावे लागतात. अशा नियमां मधील हा एक नियम आहे. या विश्वात ज्या ज्या गोष्टी निर्माण झाल्या, होत आहेत व होतील त्या नाश पावल्या, नाश पावत आहेत व नाश पावतील. मानवी देह निर्माण होतो म्हणून त्याला शेवटही आहे. ज्याला आरंभ आहे त्याला शेवट आहे.
_*मृत्यू कधी येतो ?*_
मृत्यू कधीही लवकर येत नाही किंवा उशिराही येत नाही. मृत्यू नेहमीच, ज्यावेळी यायला पाहिजे त्यावेळीच येतो.
या जन्मीचे प्रारब्ध संपले की मृत्यू येतो. जे कर्म पक्व होऊन फळ देण्यास सिद्ध झालेले असते, त्याला 'प्रारब्ध' असे म्हणतात. 'प्रारब्ध' या शब्दाला एक नकारार्थी किंवा असहायतेची छटा आहे. पण तसे असण्याची काही गरज नाही. सद्गुरुंच्या कृपेचा आधार घेत विवेकाचा वापर करून, श्रेयस निवड करत आपले प्रारब्ध आपल्याला बदलता येते. हीच तर मानवी जन्माची सर्वात मोठी उपलब्धी आहे. मानवा व्यतिरिक्त इतर जीवांना मात्र ही उपलब्धी मिळालेली नाही.
हिंदु ज्ञान परंपरेतील एक मूलभूत सिद्धांत आहे - कर्म सिद्धांत. कर्म म्हणजे कृती. ही कृती स्थूल पातळी वरील कार्य, मानसिक पातळी वरील भावना किंवा वैचारिक पातळीवरील तरंग या स्वरूपात असेल. त्यालाच कर्म असे म्हटले जाते. प्रत्येक कर्माचे त्याच्या प्राप्त स्वरूपात फळ मिळतेच.
काही कर्माचे फळ लगेच मिळते त्याला "क्रियमाण कर्म" म्हणतात. काही कर्माचे फळ काही काळा नंतर मिळते, त्याला "संचित कर्म" म्हणतात. या दुसऱ्या प्रकारच्या संचित कर्मातील जे कर्मफळ भोगाच्या दृष्टीने देण्यायोग्य झालेले असते, त्याला प्रारब्ध म्हणतात. प्रारब्ध म्हणजे कोणी कोणावर लादलेले ओझे नसते, तर ते या जन्मात किंवा या पूर्वीच्या जन्मात स्थूल, भावनिक, वैचारिक पातळीवर आपण जे कर्म केले त्या कृतीचा परिणाम असतो. ते या जन्मात आपल्याला अनुभवायचे असते. त्यालाच 'प्रारब्ध भोग' असेही म्हणतात.
_*माझे कर्म कुठे साठवलेले असते ?*_
प्रत्येकाच्या कर्माचा हिशोब त्यांच्या चित्तावर लिहिलेला असतो. चित्त म्हणजे अंतर्मन. याच अंतर्मनामध्ये सर्व कर्मे साठवली जातात. ज्याला आपण आठवणी किंवा संस्कार म्हणतो.
ज्यांची ध्यानात गती आहे ते मात्र त्यांच्या चित्तावरील आठवणी किंवा संस्कार पाहून, त्यांच्या आयुष्यात जे काही घडत आहे, त्याविषयीची कर्मगती जाणू शकतात.
_*प्रारब्ध कोण ठरवतो ?*_
स्वतःचे प्रारब्ध प्रत्येक जीव स्वतः ठरवतो. पुढील जन्म घेण्या अगोदर प्रत्येक जीव कुठल्या कर्माची फळे पुढील जन्मात भोगायची ते स्वतः ठरवतो. त्याप्रमाणे तो जीव त्याच्या कर्मास साजेसे योग्य ते आई-वडील, इतर नातेवाईक, मित्र मंडळी व इतरांची निवड करतो. यालाच 'जीवन नियोजन' असेही म्हणतात.
प्रारब्धा कडे "घ्यायचे अनुभव" किंवा "शिकायचे धडे" या दृष्टिकोनातूनही पाहता येते. प्रारब्धा विषयीच्या या अर्थाने 'प्रारब्ध हे भोगूनच संपवावे लागते, असे समजते. यामध्ये असहायतेची भावना नसते, तर आत्म्याच्या उत्क्रांती साठीचा हा अनुभव असतो, अशा अनुभवांनाच 'तीव्र प्रारब्ध' असेही म्हणतात. परंतु प्रारब्धा मध्येही बदल करणे शक्य असते. प्रारब्धा मधील बदलाच्या शक्यते मुळेच आध्यात्मिक साधनेलाही महत्व प्राप्त होते.
_*मृत्यूची भिती का वाटते ?*_
१. जर जन्माला आल्या पासून मृत्यूचा अनुभवच नाही, तर त्याची भिती वाटण्याचे कारण म्हणजे पूर्वजन्मांमध्ये मनुष्य कितीतरी वेळा मृत्यू पावला आहे आणि त्यामुळेच मृत्यूचे भय त्याच्याठायी स्मृतीमध्ये साठले आहे. मरण येताना शेवटी जी स्मृती राहते, तीच गती मृत्यू पावलेल्याच्या ठायी प्राप्त होते. मृत जीवाने जीवीत असताना शरीरावर अत्यंत प्रेम केलेले असते. त्यामुळे ते शरीर सोडताना त्याला जे दुःख होते, ती स्मृती त्याच्याबरोबर पुढील जन्मात येते आणि त्यामुळेच त्या जीवाला मृत्यूची भिती वाटते. याचाच अर्थ जीवाच्या चित्तावर पूर्व जन्मातील मृत्यूच्या आठवणी साठवलेल्या असतात आणि त्या आठवणीं मुळेच त्याला मृत्यूची भिती वाटत असते.
२. या जन्मात जीवास मृत्यू कधी व कसा येणार ? हे माहीत नसते. या अनिश्चितते मुळेही त्यास मृत्यूची भिती वाटते.
३. मृत्यूची भिती ही बऱ्याचदा मृत्यूच्या समयी होणाऱ्या वेदनांचे भय, असहायता, दुसऱ्यावरच्या अवलंबनत्वाची भिती, आप्तस्वकीयांच्या वियोगाचे दुःख, जीवनाचा मोह वगैरे अशा अनेक कारणां मुळे निर्माण झालेली असते.
_*"मृत्यू" म्हणजे काय ?*_
हे जर आपण नीट समजून घेतले तर मृत्यू विषयीची अनायास वाटणारी भीति निर्माण होणार नाही.
★ "मृत्यू" म्हणजे मृत होणे नसून पुढील जीवन प्राप्त होणे, असे आहे आणि ही जन्म जन्मांतरीची प्रक्रिया आहे.
★ जीवन व मृत्यू या भिन्न अवस्था नसून एका पाठोपाठ येणाऱ्या जीवन चक्राच्या जीवन गती विषयक क्रिया आहेत. या जीवन क्रिया कर्माच्या शून्य अवस्थे पर्यंत अविरत चालू राहतात. जीवन - मरणाच्या चक्रातून मुक्त होण्यासाठी सद्गुरु ची आवश्यकता आहे.
गुरु भक्त शिष्या कडून वेगवेगळ्या सेवा व दान रूपाने पुण्य कर्म करून घेतात _*मंत्र मूलम् गुरुवाक्य*_ समजून जो भक्त शिष्य सदैव गुरूच्या हाकेला सेवा व दान यासाठी तत्पर असतो त्याला गुरु दानाच्या काही पटीत परत तर देतातच. परंतु त्यांच्या संसार रथाची दोरी आपल्या हातात घेतात त्याहीपेक्षा अशा भक्त शिष्य *मोक्षमूलम् गुरुकृपा*
यास पात्र होतो.
तात्पर्य -: _*गुरु कार्यात मिळणारी सेवा ही पूर्व प्रारब्ध शिवाय मिळत नाही मिळणारी गुरु सेवा ही ईश्वरी कार्य समजून काम करीत राहिल्यास जन्म मृत्युच्या चक्रातून मुक्ती मिळवून देणारच असते, तोच भक्त शिष्य मोक्ष प्राप्त करू शकतो.*_
0
Answer link
मला तुमच्या प्रश्नाचा अर्थ समजला नाही. कृपया तुमचा प्रश्न अधिक स्पष्ट करा जेणेकरून मी तुम्हाला मदत करू शकेन.
1
Answer link
भीतीमुळे तोंडाला तात्पुरती कोरड पडते. तशीच कोरड परंतु कायम स्वरूपाची तोंडाने श्वासोच्छ्वास करणाऱ्यांमध्ये आणि नाकात अडथळा उत्पन्न झाल्यास पडते; उदा., नासागिलायूंची (नाकाच्या पोकळीकडील घशातील टॉन्सिलांची) वाढ. अतिशय श्रमाचे काम करणाऱ्यांमध्ये व ताप आलेल्या रोग्यांमध्येही शरीरातील पाणी घटते.
‘
प्यायलेल्या पाण्याच्या प्रमाणापेक्षा शरीरातून अधिक पाणी गमावणे या स्थितीला शरीरातील पाणी कमी होणे किंवा 'डिहायड्रेशन' असे म्हणतात. लघवी, मल, घाम; तसेच उच्छवासावाटेही रोज शरीरातून पाणी बाहेर जात असते. पाण्याबरोबरच शरीर काही प्रमाणात क्षारही गमावते. शरीरातून पाणी गमावणे ही सामान्य प्रक्रिया आहे; परंतु हे प्रमाण वाढले, तर 'डिहायड्रेशन'चा त्रास होतो.
'डिहायड्रेशन'ची लक्षणे
- घशाला कोरड पडणे, सतत तहान लागणे, डोके किंवा अंग दुखणे, लघवी कमी प्रमाणात आणि पिवळी होणे, त्वचा कोरडी पडणे, मलावरोध होणे, डोकेदुखी, चक्कर येणे अशक्तपणा ही काही 'डिहायड्रेशन'ची लक्षणे आहेत.
- मेंदूला रक्तपुरवठा न झाल्यामुळे स्मरणशक्ती कमी होणे, हृदयाचे ठोके वाढणे, रक्तदाब कमी होणे, वजन झपाट्याने कमी होणे ही 'डिहायड्रेशन'ची आणखी काही लक्षणे आहेत.
- ताप, उलटी, जुलाब झाल्यामुळे शरीरातून पाण्याचे प्रमाण कमी होऊनही 'डिहायड्रेशन' होऊ शकते.
- उन्हाळ्यात जास्त काम, व्यायाम केल्यामुळे, पाणी कमी प्यायल्यामुळे 'डिहायड्रेशन'चा त्रास होतो.
- 'डिहायड्रेशन'मुळे शरीरातील खनिजे आणि इलेक्ट्रोलाइट्स, सोडियम, पोटॅशिअम क्लोराइड यांच्या पातळीत असमतोल किंवा कमतरता होते. त्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते.
डिहायड्रेशनची कारणे
डिहायड्रेशनचे प्रमुख कारण घामच्या रूपात शरीरातून पाण्याची पातळी अति प्रमाणात कमी होणे होय. उन्हाळ्यात जास्त वेळ उन्हात राहणे, पाणी कमी प्रमाणात पिणे, सतत उन्हात खेळणे इत्यादी डिहायड्रेशनची प्रमुख कारणे आहेत.
डिहायड्रेशनपासून वाचण्याचे उपाय
१. जास्त वेळ उन्हात न फिरणे.
२. पाणी जास्त प्रमाणात पिणे.
३. उन्हात जाताना डोक्यावर टोपी किंवा छत्री घेऊन जाणे.
बालकांना धोका जास्त!
नवजात बालके आणि लहान मुलांमध्ये डिहायड्रेशनची शक्यता अधिक असते आणि त्याकडे दुर्लक्ष केल्यास ते घातक ठरू शकते. लहान मुले लघवी कमी करत असतील किंवा रडताना त्यांच्या डोळ्यांतून कमी पाणी येत असेल, प्रमाणापेक्षा जास्त झोप येत असेल, तर या लक्षणांवर लक्ष ठेवावे. मोठ्या व्यक्तींमध्ये इतर संसर्गजन्य आजारांचे प्रमाण अधिक असेल, तर डिहायड्रेशन होऊ शकते.
तोंडाला कोरडेपणा येण्याची कारणे आणि घरगुती उपाय
तोंडाला कोरडेपणा येण्याची करणे आणि घरगुती उपाय वाचा या लेखात
तुम्हाला तोंडात वारंवार कोरडेपणा जाणवत असेल तर त्यामागची कारणे जाणून घेऊन त्याच्यावरचे घरगुती उपाय माहीत करून घेण्यासाठी हा लेख वाचा.
बऱ्याच वेळा पाणी कमी प्यायल्याने, खूप वेळ झोप घेतल्याने, बाहेर फिरून आल्यानंतर किंवा खूप वेळ बोलल्यानंतर आपले तोंड कोरडे पडते.
हा अनुभव कमी जास्त प्रमाणात आपल्यापैकी सगळ्यांनाच आला असेल.
अशा वेळेला आपण पटकन पाणी पिऊन ओठ आणि तोंड ओले करतो आणि तोंडाचा कोरडेपणा काही वेळासाठी दूर होतो.
पण तोंड कोरडे पडण्यासाठी यापेक्षा सुद्धा वेगळी अशी काही कारणे आहेत.
बऱ्याचदा अनेकांना हा त्रास जाणवतो आणि मग पाणी मिळेपर्यंत एकदम बैचैन व्हायला होते.
यासाठी जास्त करून डॉक्टरांची आवशक्यता भासत नाही, पण जर हा त्रास सारखा होत असेल आणि मुख्य म्हणजे घरगुती उपायांनी तो बरा होत नसेल तर मात्र वैद्यकीय सल्ल्याची गरज असते.
आपण आपल्या आरोग्याबद्दल सतर्क राहायला हवे.
या तक्रारी जरी लहान वाटत असल्या तरी त्यांच्या आपल्या जगण्यावर, वागण्यावर आणि एकंदरीत वावरण्यावर परिणाम होत असतो.
म्हणून अशा किरकोळ वाटणाऱ्या समस्यांकडे सुद्धा दुर्लक्ष न करता त्यापासून सुटका मिळवायचा प्रयत्न केला पाहिजे.
आपण आपल्या आरोग्याशी निगडीत अनेक लहान मोठ्या समस्यांची माहिती आणि त्यावरचे घरगुती उपाय अनेक लेखातून बघत असतो.
आज या लेखात सुद्धा हे तोंड कोरडे पडते म्हणजे नेमके काय होते?
कशामुळे होते आणि त्यावर घरगुती उपाय काय आहेत हे आपण बघणार आहोत.
तोंड कोरडे पडणे याला वैद्यकीय भाषेत झिरोस्टोमीया असे म्हणतात.
झिरोस्टोमीया ही स्वतः एक समस्या असली तरी ती इतर काही व्याधींमुळे उत्भवण्याची शक्यता असते.
आपल्या तोंडात नेहमी ओलसरपणा असतो तो तोंडात असलेल्या लाळेमुळे.
आपल्या तोंडात असलेल्या लाळेच्या ग्रंथी जेव्हा योग्य प्रमाणात लाळ तयार करत नाहीत तेव्हा तोंडाच्या कोरडेपणाचा त्रास होतो.
हे होण्यामागे अनेक कारणे असू शकतात जसे की पाणी कमी प्यायल्याने डीहायड्रेशन, स्ट्रेस, झोपेत तोंडाने श्वास घेतल्यामुळे, मधुमेह, काही औषधांचे दुष्परिणाम, तंबाखू किंवा सिगारेटचा अतिरेक.
आजारपणात, विशेषतः ताप आलेला असताना सुद्धा तोंडाचा कोरडेपणा जाणवतो.
कारण काहीही असो या तोंडाच्या कोरडेपणामुळे आपल्याला प्रचंड अस्वस्थता वाटते.
पण त्यातल्यात्यात चांगली गोष्ट अशी आहे की ही समस्या काही सोप्या घरगुती उपायांने आणि काही सवयी बदलल्याने दूर होऊ शकते.
तोंडाचा कोरडेपणा घालवण्यासाठी घरगुती उपाय.
१. दिवसभर घोट घोट पाणी पीत राहा
अनेक समस्यांवर भरपूर पाणी पिणे हा उपाय असतोच.
आपल्याला दिवसभरात ८ ते १० ग्लास पाण्याची गरज असते.
डीहायड्रेशन म्हणजेच शरीरात पाण्याची कमतरता असली की तोंड कोरडे पडते.
म्हणूनच आपले दिवसभराचे ८ ते १० ग्लास पाणी पिताना आपण ते हळूहळू एकेक घोट असे प्यायले तर तोंड ओलसर राहते, डीहायड्रेशन होत नाही.
यासाठी काम करताना आपल्याजवळ पाण्याची बाटली बाळगली आणि साधारण दर अर्धा तासाने त्यातून थोडे थोडे पाणी पीत राहता येते.
असे केल्याने आपण दिवसभरात योग्य प्रमाणात पाणी पीत आहोत ना? हे देखील कळते.
२. चुईंग गम खा
चुईंग गम खाताना तोंडाच्या हालचालींमुळे आपल्या लाळेच्या ग्रंथी सक्रीय होतात.
यामुळे लाळेचे प्रमाण वाढते. चुईग गममध्ये असणाऱ्या झायलीटाॅल या रसायनामुळे सुद्धा लाळ निर्माण व्हायचे प्रमाण वाढते.
चुईंग गमची निवड करताना शुगर फ्री चुईंग गम निवडावे.
३. तोंडाची स्वच्छता ठेवा
तोंडाची म्हणजेच दातांची, जिभेची आणि हिरड्यांची नीट स्वच्छता ठेवली नाही तर त्याचा परिणाम म्हणजे तोंडाचा कोरडेपणा.
म्हणूनच रोज दोनदा दात घासणे, दात घासताना जीभ सुद्धा साफ करणे.
जेवणानंतर तसेच काहीही खाल्ल्यानंतर चूळ भरणे या चांगल्या सवयी अंगी बाळगल्या तर त्याचा फायदा होतो.
४. अल्कोहोल फ्री माऊथ वाॅशची निवड करा
तोंडाची स्वच्छता ठेवताना माऊथ वाॅश वापरताना तो अल्कोहोल फ्री आहे ना याची खात्री करून घ्या कारण अशा माऊथ वाॅशमुळे तोंड कोरडे पडण्याची शक्यता अधिक असते.
झायलीटाॅल असणाऱ्या माऊथ वाॅशची निवड केल्याने लाळेचे प्रमाण वाढण्यासाठी मदत होईल.
५. तोंडाने श्वास घेणे टाळावे
तोंडाद्वारे श्वास घेतला तर तोंड जास्त प्रमाणात कोरडे पडायला लागते.
आपल्या नकळतपणे आपण कामात असताना बऱ्याचदा तोंडाने श्वास घेतो.
मात्र आपल्याला जर तोंड कोरडे पडण्याचा त्रास असेल तर हे जाणीवपूर्वक टाळले पाहिजे.
रात्री झोपेत असताना विशेषतः तोंडाने श्वास घेतला जातो.
तोंडाचा कोरडेपणा घालवायचा असेल तर ही सवय लक्ष देऊन बदलायला हवी.
वातावरण कोरडे असेल तर तोंडाचा कोरडेपणा वाढतो.
हवेतील आर्द्रता वाढवण्यासाठी ह्युमीडीफायरचा वापर केला जाऊ शकतो.
आपल्या खोलीत रात्री ह्युमीडीफायर लावल्याने तोंडाने श्वास घ्यायचे प्रमाण कमी होते.
६. कोरफड
कोरफडीचे अनेक उपयोग आहेत. कोरफडीच्या गरात पाण्याचे प्रमाण जास्त असते.
कोरफडीचा ज्युस प्यायल्याने आपले तोंड ओलसर राहून कोरडेपणा दूर होतो.
७. आले/काळी मिरी
आले किंवा काळी मिरी चावून खाल्ल्याने आपल्या तोंडातील लाळ निर्माण करणाऱ्या ग्रंथी सक्रीय होतात.
तोंडातील लाळेचे प्रमाण वाढल्याने तोंडाच्या कोरडेपणाचा त्रास दूर होतो.
८. डीहायड्रेशन होणार नाही याची काळजी घ्या
केवळ पाणी योग्य प्रमाणात प्यायले तर डीहायड्रेशन होत नाही असे नसते.
डीहायड्रेशन होण्यामागे इतरही अनेक करणे आहेत.
चहा, कॉफी किंवा कार्बोनेटेड पेये, ज्यात कॅफीन जास्त प्रमाणात असतात यांच्या प्रमाणाबाहेर सेवनाने तोंडात कोरडेपणा जाणवू शकतो.
त्यामुळे या पेयांचा अतिरेक टाळावा.
तसेच अल्कोहोलमुळे सुद्धा तोंड कोरडे पडण्याचा धोका जास्त असतो.
तंबाखू किंवा सिगारेटमुळे सुद्धा डीहायड्रेशन होते.
तसेच खूप प्रमाणात साखर खाल्ल्याने सुद्धा तोंड कोरडे पडून त्रास होऊ शकतो. यासाठी गोड पदार्थ, साखर असलेली चुईंग गम, सरबते इत्यादी टाळली पाहिजेत.
म्हणून दिवसभरात योग्य प्रमाणात पाणी पिण्यारोबरच ही काळजी सुद्धा घेतली पाहिजे आणि तोंडाच्या कोरडेपणाचा त्रास दूर करायचा असेल तर या सवयी कटाक्षाने बदलल्या पाहिजेत.
सहसा या सोप्या घरगुती उपायांचा फायदा होतो.
पण हे उपाय करून सुद्धा तोंडाचा कोरडेपणा जात नसल्यास त्याचे कारण काही वेगळे, जसे की मधुमेहाचे लक्षण असू शकते यासाठी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा जेणेकरून त्या आजारावर उपचार घेऊन त्यामुळे तोंडाला येणारा कोरडेपणा कमी होईल.
तोंडाचा कोरडेपणा एखाद्या औषधांचा परिणाम सुद्धा असू शकतो.
त्यामुळे तुमची काही औषधे बदलली असतील आणि तुम्हाला हा त्रास सुरु झाला असेल तर त्याबद्दल सुद्धा तुमच्या डॉक्टरांशी बोलले पाहिजे.
: घसा कोरडा पडणे उपाय, घसा कोरडा पडण्याची कारणे व उपाय, तोंड कडू पडणे उपाय, तोंड कोरडे पडणे उपाय, तोंड कोरडे पडणे घरगुती उपाय, तोंडाला कोरडेपणा येण्याची करणे
कोमट पाणी अथवा द्रवपदार्थ प्या-
कोमट पाण्यामुळे घशाचा दाह कमी होतो. तुम्हाला कोमट पाणी पिण्याचा कंटाळा येत असेल तर तुम्ही गरम सूप अथवा एक कप आल्याचा चहा घेऊ शकता. त्याचप्रमाणे भरपूर पाणी प्यायल्यामुळे देखील तुमचा घसा कोरडा न रहाता ओलसर राहील व तुम्हाला अधिक आराम मिळेल.
घशाचे इनफेक्शन झाल्यास करा हे उपाय
घसा खवखवत असेल तर घशामध्ये खरखर,वेदना होतात.
: घसा खवखवत असेल तर घशामध्ये खरखर,वेदना होतात.
नाक व तोंडावाटे शरीरीला जीवजंतूंचा संसर्ग होऊ शकतो.घश्याचे इनफेक्शन होण्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत असू शकतात.वातावरणातील बदलामुळे अथवा थंड पदार्थ खाल्यामुळे घसा दुखू शकतो.थंड पदार्थामुळे घशातील नाजूक भागाला जीवाणूंचा संसर्ग होतो.इनफेक्शनमुळे घसा दुखत असेल तर नेहमीप्रमाणे काम करणे देखील कठीण होते.घसा दुखत असल्यास या गोष्टी केल्यामुळे तुम्हाला आराम मिळू शकतो.
कोमट पाणी अथवा द्रवपदार्थ प्या-
कोमट पाण्यामुळे घशाचा दाह कमी होतो.तुम्हाला कोमट पाणी पिण्याचा कंटाळा येत असेल तर तुम्ही गरम सूप अथवा एक कप आल्याचा चहा घेऊ शकता.त्याचप्रमाणे भरपूर पाणी प्यायल्यामुळे देखील तुमचा घसा कोरडा न रहाता ओलसर राहील व तुम्हाला अधिक आराम मिळेल.
कोमट की थंड पाणी ? निरोगी स्वास्थ्यासाठी कोणता पर्याय निवडाल
गुळण्या करा-
घशामध्ये खवखवण्याचा त्रास होत असेल तर कोमट पाण्यामध्ये मीठ घालून गुळण्या करा.यामुळे तुम्हाला चांगला आराम मिळू शकेल.या मीठाच्या पाण्यामध्ये तुम्ही अर्धा चमचा हळद देखील घालू शकता.मीठाच्या पाण्याच्या गुळण्या केल्यामुळे घशामधील कफचा अडथळा कमी होतो व गरम पाण्यामुळे कफ पातळ झाल्यामुळे बाहेर टाकणे सोपे होते सहाजिकच त्यामुळे घशाचा दाह कमी होतो. एक मध्यम आकाराच्या ग्लासभर पाण्यात तीन कडीलिंबाची पाने घेऊन ते पाणी उकळा.पाणी थंड झाल्यावर त्यामध्ये एक चमचा मध टाका व त्या पाण्याच्या गुळण्या करा तुम्हाला त्वरीत आराम मिळेल.
गरम पाण्याचे वाफारे घ्या-
गरम पाण्याच्या वाफा घेतल्याने घशातील श्वसनमार्गाला आराम मिळतो.कधीकधी यावर कोमट पाण्याने अंघोळ केल्यास देखील बरे वाटते.अशा वेळी पाण्यात निलगिरीच्या तेलाचे काही थेंब टाकल्याने देखील पटकन बरे वाटू शकते.
दमट वातावरणात रहा-
कोरड्या हवेमुळे घश्याला त्रास होतो.ह्यूमीडीफायर मुळे तुमच्या खोलीतील वातावरण दमट होईल व तुमच्या घश्याला आराम मिळेल.
खोकल्यावर गुणकारी पदार्थ तोंडात ठेवा-
घसा दुखत असल्यास बाजारात मिळणा-या खोकल्यावरच्या गोळ्या तोंडात ठेवा.त्यातील थंडाव्यामुळे तुम्हाला आराम मिळेल.मिंथॉल व मधासारख्या अॅन्टीसेफ्टिक घटकांमुळे तुमच्या घसा कमी खवखवेेल.अशा गोळ्या बाजारात सहज उपलब्ध असतात. मऊ पदार्थ खा व तिखट,आंबट,तळलेले पदार्थ खाणे टाळा.
घसा दुखत असल्यास अन्नपदार्थ गिळणे कठीण जाते.त्यामुळे घशाला वेदना न होता गिळता येतील असे मऊ अन्नपदार्थ खा.तिखट व अॅसिडीक अन्नपदार्थांमुळे घशाला त्रास होतो त्यामुळे घसा दुखत असल्यास हे पदार्थ खाणे टाळा.त्याचप्रमाणे तेलकट पदार्थ देखील खाणे टाळा कारण ते कडक व क्रिस्पी असल्याने ते गिळताना तुम्हाला वेदना होऊ शकतात.
ओटीसी औषधे घ्या-
कफ सुकल्यामुळे किंवा इनफेक्शनमुळे घसा खवखवू लागतो.अशा वेळी ओटीसी औषधे घेतल्याने आराम मिळू शकतो.कफ सुकल्यामुळे तो प्रवाहीत होत नाही व घशामध्ये अडथळा निर्माण होतो.पण या औषधांमुळे कफ पातळ झाल्यामुळे बाहेर टाकता येतो व बरे वाटू लागते.
घरगुती उपाय करा-
घसा दुखत असल्यास घरगुती उपायांचा देखील चांगला फायदा होऊ शकतो.स्वयंपाकासाठी वापरण्यात येणा-या मधात अॅन्टी-वायरल व अॅन्टी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात.त्यामुळे घसा दुखत असल्यास त्याचा तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो.त्याचप्रमाणे आले,काळीमिरी,मध,लसूण,तुळस आणि हळद यामुळे देखील तुम्हाला आराम मिळू शकतो.त्यामुळे हे पदार्थ वापरुन तयार केलेली चहा किंवा पेय घ्या.
इतर काही घरगुती उपाय-
घसा दुखत असल्यास आल्याचा तुकडा तोंडात ठेऊन चावा.त्यामुळे तुम्हाला लवकरआराम मिळेल.किंवा आल्याचे चार तुकडे,दोन टोमॅटो,मध यांचा रस करुन प्या.
पाण्यात मध व कांदा टाकून उकळा व गाळून ते पाणी थोडयाथोड्या वेळाने प्या.
मधात काही लवंगा टाका.काही तासांनी लवंगा काढून त्याचे चाटण खा.लवंगामुळे वेदना कमी होतील व मधाने घशाला आराम मिळेल.
पाण्यात बडीसोप टाकून ते काही मिनीटे उकळा त्यानंतर पाणी गाळून घ्या व त्यात मध टाकून थोड्या थोड्या वेळाने प्या.
लिंबाचा रस व एक चमचा मध टाकलेले गरम पाणी प्या.
भरपूर आराम करा.व्यवस्थित आराम केल्यामुळे शरीर इनफेक्शनला प्रतिकार करु शकते.
0
Answer link
फ्रेंच राज्यक्रांती (1789-1799) ही युरोप आणि जगाच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण घटना होती. या क्रांतीची राजकीय, सामाजिक आणि आर्थिक कारणे खालीलप्रमाणे आहेत:
राजकीय कारणे:
- निरंकुश राजेशाही: फ्रान्समध्ये लुई सोळावा (Louis XVI) हा निरंकुश राजा होता. त्याला कोणावरही अंकुश नव्हता. तो स्वतःच्या मर्जीप्रमाणे निर्णय घेत असे.
- अकार्यक्षम प्रशासन: प्रशासकीय व्यवस्था भ्रष्ट आणि অकार्यक्षम होती. त्यामुळे सामान्य लोकांना त्रास सहन करावा लागत होता.
- प्रतिनिधित्व नसणे: लोकांना सरकारमध्ये कोणताही सहभाग नव्हता. त्यामुळे त्यांना आपल्या समस्या मांडण्याची संधी मिळत नव्हती.
सामाजिक कारणे:
- वर्गाधारित समाज: फ्रेंच समाजात तीन वर्ग होते - पाद्री, सरदार आणि सामान्य नागरिक. पाद्री आणि सरदार यांना विशेष अधिकार होते, तर सामान्य नागरिकांवर अन्याय होत होता.
- असमानता: समाजात मोठ्या प्रमाणावर विषमता होती. सामान्य नागरिकांना कर भरावे लागत होते, तर पाद्री आणि सरदार कर भरत नव्हते.
- विचारवंतांचा प्रभाव: व्हॉल्टेअर (Voltaire), रूसो (Rousseau) आणि मॉंटेस्क्यू (Montesquieu) यांसारख्या विचारवंतांनी लोकांमध्ये जागृती निर्माण केली.
आर्थिक कारणे:
- आर्थिक संकट: फ्रान्स दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर होता. लुई सोळाव्याच्या काळात अनेक युद्धे झाली, त्यामुळे राज्याचा खजिना रिकामा झाला होता.
- करांचा भार: सामान्य नागरिकांवर करांचा मोठा भार होता. गरीब लोक कर भरून त्रस्त झाले होते.
- महागाई: जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्या होत्या. त्यामुळे लोकांना जीवन जगणे कठीण झाले होते.
या सर्व कारणांमुळे फ्रेंच समाजात असंतोष निर्माण झाला आणि फ्रेंच राज्यक्रांती झाली.