क्रीडा भारत खेळाडू खो-खो

भारतात खो-खो ची सुरुवात कुठे झाली?

3 उत्तरे
3 answers

भारतात खो-खो ची सुरुवात कुठे झाली?

3
खो – खो खेळाचा इतिहास | History of Kho Kho Game

खो खो या खेळाचा उगम महाराष्ट्राच्या मातीतच झाला.
१९१४ साली पुणे जिमखाना येथे खो-खोचे नियम बनवण्यासाठी एका समितीची स्थापना झाली.
१९२४ साली बडोदा जिमखान्याने खो-खोची नियमावली प्रसिद्ध केली.
१९५९-६० साली भारत सरकारने आंध्रप्रदेशातील विजयवाडा येथे खो-खोची पहिली राष्ट्रीय स्पर्धा आयोजित केली.

आधिक माहिती साठी व सर्व  खेळांची आपल्या मातृभाषेत माहिती साठी गुगल सर्च करा -Sportkhelo.co.in

Thanks
उत्तर लिहिले · 3/8/2021
कर्म · 1690
2
खो खो या खेळाचा उगम महाराष्ट्राच्या या मातीतच खऱ्या अर्थाने झाला. ... विसाव्या शतकाच्या सुरुवातीला ह्या खेळात सुसूत्रता आणण्यास सुरुवात झाली. १९१४ साली पुणे जिमखाना येथे खो-खोचे नियम बनवण्यासाठी एका समितीची स्थापना झाली. १९२४ साली बडोदा जिमखान्याने खो-खोची नियमावली प्रसिद्ध केली. 

 खो-खो हा एक भारतीय मैदानी खेळ असून ह्या खेळासाठी मैदानाच्या दोन टोकांना रोवलेले खांब सोडल्यास कोणत्याही साधनांची आवश्यकता नसते. हा खेळ खेळण्यासाठी अतिशय सोपा आहे आणि लोकप्रियही आहे; तरीही हा खेळ गतिमान असल्यामुळे ह्या खेळात चपळतेचा, गतीचा कस लागतो व हा खेळ उत्कंठावर्धक होतो. खो खो वर इंग्रजी विकिपीडियातला लेख .खो खो हा पाठशिवणी ह्या प्रकारातला खेळ आहे. हा खेळ प्रत्येकी १२ खेळाडू असलेल्या दोन संघांत खेळतात. मैदानात मात्र प्रत्येक संघाचे ९च खेळाडू उतरतात. प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंना आपल्याला शिवू न देणे असा यात मुख्य प्रयत्न असतो. भारतीय उपखंडातले दोन पारंपरिक आणि लोकप्रिय पाठशिवणी खेळ म्हणजे खो खो व [[कबड्डी]. दक्षिण आशिया (मुख्यत: भारत व पाकिस्तान) शिवाय हा खेळ दक्षिण आफ्रिकेतही खेळला जातो.[१]

खो - खो खेेेेळाचा इतिहास संपादन करा
खो-खोची सुरुवात नेमकी कधी झाली हे कळणे कठीण आहे. खो खो या खेळाचा उगम महाराष्ट्राच्या या मातीतच खऱ्या अर्थाने झाला. पकडापकडीच्या खेळातून उत्क्रांती होत ह्या खेळाचा जन्म झाला असावा. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला ह्या खेळात सुसूत्रता आणण्यास सुरुवात झाली. १९१४ साली पुणे जिमखाना येथे खो-खोचे नियम बनवण्यासाठी एका समितीची स्थापना झाली. १९२४ साली बडोदा जिमखान्याने खो-खोची नियमावली प्रसिद्ध केली. १९५९-६० साली भारत सरकारने आंध्रप्रदेशातील विजयवाडा येथे खो-खोची पहिली राष्ट्रीय स्पर्धा आयोजित केली. खो-खोच्या प्रतिभावंत खेळाडूंना भारत सरकारकडून पुढील पुरस्कार मिळतात.

अर्जुन पुरस्कार
एकलव्य पुरस्कार (पुरुषांसाठी)
राणी लक्ष्मीबाई पुरस्कार (महिंलांसाठी)
अभिमन्यू पुरस्कार (१८ वर्षे वयोगटाखालील मुलांसाठी)
जानकी पुरस्कार (१६ वर्षे वयोगटाखालील मुलींसाठी)
खेळााचे नियम संपादन करा
खो-खोमध्ये दोन संघ असतात. प्रत्येक संघात १२ खेळाडू असतात. परंतु एका वेळेस ९ खेळाडू खेळतात. खेळ दोन भागांमध्ये विभागला जातो. दोन भागांमध्ये ५ मिनिटे विश्रांतीचा कालावधी असतो. प्रत्येक भागात पुन्हा दोन उपभाग असतात. त्यातील पहिल्या उपभागात पहिला संघ पाठलाग करतो व दुसरा संघ बचाव करतो. दुसऱ्या उपभागात पहिला संघ बचाव करतो तर दुसरा पाठलाग करतो. दोन्ही उपभगांमध्ये २ मिनिटे विश्रांतीचा काळ असतो. थोडक्यात, संपूर्ण खेळ साधारणतः ३७ मिनिटे (७+२+७+५+७+२+७) चालतो.

खेळाच्या सुरुवातीला पाठलाग करणाऱ्या संघाचे आठ खेळाडू दोन खांबांमधील आठ चौकोनांत आळीपाळीने विरुद्ध दिशांना तोंड करून बसतात. नववा खेळाडू कोणत्याही एका खांबाजवळ उभा राहतो.बचाव करणाऱ्या संघाचे तीन खेळाडू मैदानात असतात. खेळ सुरू झाल्यावर पाठलाग करणाऱ्या सघाचा नववा खेळाडू बचाव करणाऱ्या संघाच्या तीन खेळाडूंना बाद करण्याचा प्रयत्न करतो. पाठलाग करणाऱ्या खेळाडूवर खालील बंधने असतात.

एकदा एका खांबाकडील दिशा पकडल्यावर तो आपली दिशा बदलू शकत नाही (खांबाला स्पर्श करून तो आपली दिशा बदलू शकतो)
तो दोन खांबाना जोडणारी रेषा ओलांडू शकत नाही पळण्याची दिशा बदलण्यासाठी पकडणारा खेळाडू इतर खेळाडूंना खो देऊ शकतो. खो देण्याची प्रक्रिया पुढीलप्रमाणे घडते.
पळणारा खेळाडू मैदानाच्या ज्या बाजूस असेल, त्या बाजूस तोंड करून बसलेल्या खेळाडूलाच तो खो देऊ शकतो
खो देताना पळणारा खेळाडू खो दिल्या जाणाऱ्या खेळाडूच्या पाठीवर थाप मारुन 'खो' असा आवाज करतो.
खो घेतलेला खेळाडू मग, त्याचे तोंड असलेल्या बाजूस उजव्या किंवा डाव्या दिशेस (पकडण्यासाठी) पळण्यास सुरुवात करतो.
ज्याने खो दिलेला आहे तो खेळाडु, खो घेतलेल्या खेळाडुची जागा घेतो.
वरील प्रकारे खो-खोची साखळी सुरू रहाते.

बचाव करणाऱ्या खेळाडूवर मैदानात पळताना कोणतेही निर्बंध नसतात. कोणताही बचाव करणारा खेळाडू खालील प्रकारांनी बाद होऊ शकतो

पकडणाऱ्या खेळाडूने (बचाव करणाऱ्या खेळाडूस) तळ्हाताने स्पर्श केल्यावर
बचाव करणारा खेळाडू मैदानाबाहेर गेल्यास
बचाव करणारा खेळाडूने मैदानात उशीरा प्रवेश केल्यास
बचाव करणाऱ्या संघाचे तीनही खेळाडू बाद झाल्यावर पुढचे तीन खेळाडू मैदानात प्रवेश करतात. नवीन खेळाडूंनी पुढचा खो देण्याआधी मैदानात उतरणे आवश्यक असते. अन्यथा त्यांना बाद धरण्यात येते.

बाद केलेल्या प्रत्येक खेळाडूया बदली प्रतिस्पर्धी संघाला एक गुण मिळतो. पहिल्या भागाच्या अखेरीस प्रत्येक संघाचे गुण बघितले जातात. ज्या संघाचे गुण जास्त, त्या संघाची विरुद्ध संघावर दोन्ही संघांमधील गुणांच्या फरकाइतकी आघाडी धरली जाते. दुसऱ्या भागाच्या अखेरीस, जो संघ आघाडी मिळवितो तो संघ त्या आघाडीने विरुद्ध संघावर मात करतो. हा खेळ चांगला आहे.


उत्तर लिहिले · 3/8/2021
कर्म · 121765
0

भारतामध्ये खो-खो या खेळाची सुरुवात महाराष्ट्रामध्ये झाली.

१९१४ साली या खेळाला नियम आणि आकार मिळाला.

डेक्कन जिमखाना, पुणे येथे सर्वात पहिला अधिकृत खो-खो चा खेळ आयोजित करण्यात आला होता.

१९२४ मध्ये खो-खोचे नियम बनवण्यासाठी अखिल महाराष्ट्र शारीरिक शिक्षण मंडळाची स्थापना करण्यात आली.

त्यानंतर, १९३५ मध्ये या मंडळाने खो-खोच्या नियमावलीचे प्रकाशन केले.

स्त्रोत:

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 1040

Related Questions

खो-खो चा डाम किती उंचीचा असावा?
खो-खो खेळाचा जन्म कोणत्या देशात झाला?
इ.स. मध्ये खो-खो फेडरेशन ऑफ इंडियाची स्थापना झाली?
खो-खो खेळाबद्दल माहिती मिळेल का?
खो-खो खेळ कसा खेळला जातो?
खो-खो खेळ विषयी माहिती?