2 उत्तरे
2
answers
युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास: प्रस्तावना?
2
Answer link
•युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास
प्रस्तावना:-
युरोप खंडामध्ये मध्ययुगाच्या अखेरच्या (शेवटच्या) टप्प्यात प्रबोधन, भौगोलिक शोध व धर्मसुधारणेच्या चळवळी अशा विविध घटनांमुळे युरोपात अधुनिक युगाचा पाया घातला गेला. या मध्ययुगाच्या अखेरच्या टप्प्यालाच प्रबोधन युग असे म्हणतात. या प्रबोधन काळात कला, स्थापत्य व तत्त्वज्ञान या क्षेत्रामध्ये प्राचीन ग्रीक व रोमन परंपरांचे पुनरूज्जीवन घडून आले. प्रबोधनाने सर्वांगीन प्रगतीला चालना दिली आणि नवयुगाची सुरूवात झाली.
युरोपातील धर्मयुध्दे (क्रुसेडस):-
जेरूसलेम आणि बेथेलहॅम ही शहरे ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम (मुस्लीम) धर्मांच्या अनुयायांसाठी पवित्र आहेत. परंतु अकराव्या शतकात जेरूसलेम व बेथेलहॅम शहरे इस्लामी सत्ताधीशांच्या ताब्यात होती. हि शहरे परत मिळवण्यासाठी ख्रिश्चन धर्माच्या अनुयायांनी वेळोवेळी केलेल्या लढ्यांना धर्मयुध्दे म्हणजेच क्रुसेडस् असे म्हणतात त्या धर्मयुध्दांची कारणे पुढीलप्रमाणे आहेत.
धर्मयुध्दांची (क्रुसेडस्) कारणे:
ख्रिश्चन धर्माच्या अनुयायांनी वेळोवेळी केलेल्या लढायांना धर्मयुध्दे (क्रुसेडस्) म्हणतात. त्या धर्मयुध्दांची कारणे पुढील प्रमाणे आहेत.
धर्मगुरूद्वारे सवलती:-मध्ययुगात धमयुध्दाच्या कल्पनेने युरोपमधील जनता, सर्वसामान्य व्यक्ती भारावून गेली होती. या काळातील ख्रिस्ती धर्माचे प्रमुख धर्मगुरू पोप यांनी जे लोक धर्मयुध्दामध्ये सामील होतील त्यांना पापक्षालनासंदर्भात विशेष सवलती जाहीर केल्या. त्यामुळे जनतेने या युध्दामध्ये मनापासून सहभाग घेतला. म्हणूनच येरोपामध्ये धर्मयुध्दे घडून आली.
रोमन सम्राटांची इच्छा:- रोमन सम्राटांना धर्मयुध्दांच्या आधारे सीरिया आणि आशिया मायनर येथे स्वत:ची सत्ता प्रस्थापीत करायची होती. या कारणाने युरोपमधील सत्ताधारी आणि व्यापारी यांनी धर्मयुध्दांना पाठींबा दिला. यातुनच युरोपमध्ये धर्मयुध्दे घडून आली.
बाजारपेठांची निर्मिती:- इटली या देशातील व्हेनिस आणि जेनोवा या व्यापारी शहरांमधील धनिकांना मध्य आशियात बाजारपेठा प्रस्थापीत करायच्या होत्या. यासारख्या विविध कारणांनी युरोपमधील सत्ताधारी आणि व्यापारी यांनी धर्मयुध्दांना पाठींबा दिला. यातूनच युरोपमध्ये धर्मयुध्दे घडून आली.
पोप युजिनिअस:- सन १०९६ मध्ये पहिले धर्मयुध्द झाले. दुसऱ्या धर्मयुध्दाच्या दरम्यान पोप युजिनिअस (तिसरा) याने फ्रेंच राजा सातवा लुई आणि जर्मन सत्ताधीश तीसरा कॉनरॅड यांना मदतीस घेतले पण तुर्कांनी यांचा पराभव केला. इजिप्तचा प्रमुख सलादिन याने सन ११८७ मध्ये जेरूसलेम जिंकून घेतले. एकुण नऊ धर्मयुध्दे झाली. या धर्मयुध्दांचा शेवट झाला तरीही जेरूसलेम आणि त्याच्या परिसरातील प्रदेश हा इस्लामी सत्तांच्याच ताब्यात राहीला होता.
अशाप्रकारे सन १०९६ ते ११८७ या कालावधीत घडून आलेल्या युरोपमधील नऊ धर्मयुध्दांची कारणे दिसून येतात.
ब) धर्मयुध्दांच्या अपयशाची कारणे:-
ख्रिश्चन धर्माच्या अनुयायांनी सन १०९६ ते ११८७ या कालावधीत इस्लामी सत्तेच्या विरोधात एकूण नऊ धर्मयुध्दे घडून आली. पण युरोपातील धर्मयुध्दांना अपयश आले. या धर्मयुध्दांच्या अपयशाची कारणे पुढीलप्रमाणे आहेत.
पोप आणि युरोपातील सत्ताधीश यांनी या धर्मयुध्दांकडे संकुचित हेतूंनी पाहीले म्हणून धर्मयुध्दांना अपयश आले.
युरोपातील ख्रिस्ती मध्ये धर्मावरील श्रध्दा कमी झाल्यामुळे धर्मयुध्दांना अपयश आले.
युरोप खंडातील विविध देशांच्या राजामध्ये एकीचा अभाव असल्या कारणाने युरोपातील धर्मयुध्दांना अपयश आले.
धर्मगुरू पोप व जर्मन सम्राटातील वितुष्ट या कारणाने युरोपातील धर्मयुध्दांना अपयश आले.
धर्मयुध्दात बायझॅन्टाईन देशाच्या सम्राटाच्या सहकार्याच्या अभावाने धर्मयुध्दांना अपयश आले.
अशा प्रकारे वरील कारणे धर्मयुध्दांच्या अपयशास कारणीभूत ठरले.
क) धर्मयुध्दांचे परिणाम:-
सन १०९६ ते ११८७ या कालावधीत घडून आलेल्या युरोपातील धर्मयुध्दांचे विविध परिणाम घडून आले ते पुढीलप्रमाणे आहेत.
सरंजामशाहीचा अस्त:- काही इतिहासकारांच्या मते युरोपातील धर्मयुध्दांमुळे सरंजामशाहीचा अस्त झाला. तसेच लोकांची धर्मगुरू पोप वरील श्रध्दा कमी झाली.
नव व्यापारी वर्गाचा उदय:- युरोप आणि मध्य आशिया यांच्यात वाढलेल्या व्यापारामुळे इटली आणि जर्मनीतील शहरांना नवी क्षेत्रे खुली झाली. त्यामुळे नवा व्यापारी वर्ग उदयास आला.
युध्द तंत्रात बदल:- युरोपमधील धर्मयुध्दांत युरोपीय युध्दतंत्रात अनेक बदल घडून आले. किल्ले बांधणी, किल्ल्यांचा लढाईचे ठाणे म्हणून उपयोग, लष्कराच्या वाहतुकीसाठी पुलबांधणी, शत्रुचे मार्ग उध्वस्त करणे इत्यादी युध्दतंत्रात बदल घडवून आणले.
नवीन कर लागू:- धर्मयुध्दात लढाईचा खर्च भागवण्यासाठी युरोपमधील राजांनी नवीन कर लागू केले. हे नवीन कर थेट राजाच्या तिजोरीत जमा होऊ लागले.
अपरिचित गोष्टी परिचित:- युरोपीय लोकांना अपरिचित असलेल्या वनस्पती, फळे, अत्तरे, पोषाखाचे वेगवेगळे प्रकार, साखर, सुती व रेशमी कापड, मसाल्याचे पदार्थ, औषधे इत्यादी गोष्टी परिचित झाल्या.
नवीन विषयांशी संपर्क:- धर्मयुध्दांच्या काळात अरबांशी आलेल्या संपर्कातून युरोपीय राष्ट्रांचा अनेक नविन विषयांशी संपर्क आला. रसायन, संगीत, व्यापार या क्षेत्रांतील अनेक अरबी शब्द युरोपीय लोकांनी आत्मसात केले.
अशाप्रकारे युरोपातील धर्मयुध्दांचे परिणाम दिसून येतात.
युरोपातील प्रबोधनकाळ:-
१४ वे शतक हा प्रबोधनाचा आरंभीचा (सुरूवातीचा) काळ समजला जातो, तर १५ वे ते १६ वे शतक हा प्रबोधनाचा उत्कर्ष काळ समजला जातो. १४ वे ते १६ वे शतक या तीनशे वर्षात बुध्दिवाद आणि वैज्ञानिक विचार सरणीवर आधारीत असलेल्या संस्कृतीचा पाया घातला गेला. या युरोपातील प्रबोधन काळाची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे आहे.
युरोपच्या इतिहासाची स्थुलमानाने प्राचीन युग, मध्य युग व अधुनिक युग अशा तीन कालखंडात विभागणी करतात.
(१) ग्रीक आणि रोमन संस्कृतीचा कालखंड म्हणजे प्राचीन युग होय.
(२) युरोपमध्ये रोमन बादशहा कॉन्स्टंटीन याने ख्रिस्ती धर्माची दिक्षा घेतल्यापासून प्रबोधन काळापर्यंत म्हणजे तेराव्या शतकापर्यंतचा कालखंड म्हणजे मध्ययुग होय.
(३) आधुनिक युगाचा प्रारंभ चौदाव्या शतकापासून होतो. १४ वे शतक हा प्रबोधन काळाचा प्रारंभ आणि १५ वे व १६ वे शतक अशी दोन शतके प्रबोधनाचा उत्कर्ष काळ समजतात.
वैज्ञानिक पध्दत:- प्रबोधन काळात मानसाच्या बुध्दीला प्रतिभेला आणि जीवन पध्दतीला नवी दिशा मिळाली. विश्वाची रहस्ये समजून घेण्यात लोकांना रस निर्माण झाला. काव्य, नाटक, साहित्य या क्षेत्रांमध्ये आजवर दुर्लक्षित विषय हाताळण्यात येऊ लागले व विज्ञानात नवे – नवे प्रयोग करण्यास सुरूवात झाली.
मानवतावाद:- विश्वाच्या अस्तित्वाचा विचार करताना पूर्वी ईश्वर हा केंद्रबिंदू होता. आता मात्र मानव हा या विचाराचा केंद्र बिंदू बनला. यालाच मानवतावाद असे म्हणतात.
धाडसी प्रदेश शोध मोहीम:- या काळात धाडसी दर्यावर्दींना दूरवरचे प्रदेश शोधण्यासाठी युरोपीय राज्यकर्त्यांकडून प्रोत्साहन मिळाले. शोधलेल्या देशातील वनस्पती, फळे, फुले, झाडे, नवनवे प्राणी, विविध शस्त्रास्त्रे यांची माहिती या दर्यावर्दींनी मायदेशी आणली.
दुर्बिणीचा शोध:- सन १५४३ मध्ये निकोलस कोपर्निकस याने ग्रहमाला पृथ्वीकेंद्रात नसून सूर्यकेंद्रित आहे असे स्पष्ट केले. सन १६०९ मध्ये गॅलिलिओ ने अधिक सुधारीत दुर्बिण तयार केली. या दुर्बिणीमुळे खगोल संशोधनाला गती मिळाली. यामुळे भौतिक विज्ञानाच्या क्षेत्रातील संशोधनास चालना मिळाली.
छपाईचा शोध:- छपाईच्या शोधामुळे ज्ञानाच्या प्रसारात अमुलाग्र बदल घडून आले. जर्मनीतील जोहान्स गुटेनबर्ग याने सन १४४० मध्ये छापखाना सुरू केला. सन १४५१ मध्ये इटलीत पहिला छापखाना सुरू झाला. छपाईचा शोध जगाला प्रबोधन काळातील सर्वोच्च देणगी होय. यामुळे विविध प्रकारची माहिती व ज्ञान सर्वसामान्यापर्यंत पोहोचणे शक्य झाले.
कॅथॉलिक चर्च:- प्रबोधनपूर्व काळात चर्च ही लोकांच्या व्यक्तीगत जीवनाचे नियंत्रण करणारी संस्था होती. धर्मगुरूंनी चर्चच्या नावाने आज्ञापत्रे काढून सामान्य लोकांची आर्थीक पिळवणूक केली. तसेच स्वतंत्र विचार मांडण्यास बंदी घातली. बायबल ग्रंथावर चर्चच्या परंपरेपेक्षा भिन्न भाष्य करणाऱ्याला मृत्यूदंड दिला जाई. या सर्वांच्या विरोधात आवाज उठविण्यासाठी प्रबोधनकाळातील मनवतावादी विचारसरणीने पार्श्वभूमी तयार केली.
कला:- प्रबोधनकाळात विज्ञानाचा प्रभाव कलाक्षेत्रावरही पडला. याच काळात ‘किमया’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या शास्त्रातील गुढवाद कमी होऊन ते वैज्ञानिक पायावर उभे राहीले. त्याचे रूपांतर रसायनशास्त्र या वैज्ञानिक शाखेत झाले. प्रबोधन कालखंडात किमया शास्त्रातील प्रगतीमुळे खनिजांचे स्त्रोत आणि मुलद्रव्ये यांच्यासंबंधीच्या ज्ञानात भर पडली.
अशाप्रकारे युरोपातील प्रबोधनाच्या काळाची माहिती दिसून येते.
0
Answer link
युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास: प्रस्तावना
युरोपामध्ये मध्ययुगाच्या उत्तरार्धात प्रबोधन (Renaissance) आणि वैज्ञानिक क्रांती (Scientific Revolution) झाली. या दोन घटनांमुळे युरोप आणि जगाच्या इतिहासाला एक नवीन दिशा मिळाली.
प्रबोधन:
- प्रबोधन म्हणजे 'पुनर्जन्म'. हे एक सांस्कृतिक आंदोलन होते.
- या काळात कला, साहित्य, तत्त्वज्ञान आणि विज्ञान यांसारख्या क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण बदल झाले.
- ग्रीक आणि रोमन संस्कृतीचा अभ्यास करून त्यातून प्रेरणा घेण्यात आली.
- मानवतावादाला महत्त्व देण्यात आले, ज्यामुळे मनुष्य आणि त्याच्या क्षमतांवर अधिक लक्ष केंद्रित केले गेले.
वैज्ञानिक क्रांती:
- वैज्ञानिक क्रांती 16 व्या शतकात सुरू झाली.
- या काळात निकोलस कोपर्निकस, गॅलिलिओ गॅलिली, आयझॅक न्यूटन यांसारख्या वैज्ञानिकांनी महत्त्वपूर्ण शोध लावले.
- वैज्ञानिक पद्धतीचा वापर वाढला, ज्यात निरीक्षण, प्रयोग आणि अनुमान यांचा समावेश होता.
- या क्रांतीमुळे विज्ञानाने निसर्गाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला.
हे दोन्ही बदल एकमेकांशी जोडलेले होते. प्रबोधनामुळे लोकांमध्ये जिज्ञासा वाढली आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित झाला, ज्यामुळे वैज्ञानिक क्रांतीला चालना मिळाली.