जीवशास्त्र वनस्पती

निवडुंगाला काटे का असतात?

2 उत्तरे
2 answers

निवडुंगाला काटे का असतात?

2

निवडुंग ही कॅक्टस या जातीत मोडणारी वनस्पती आहे. वैज्ञानिक भाषेत तिचं वर्गीकरण सक्युलन्ट' या प्रकारात केलं गेलं आहे. या प्रकारातल्या वनस्पतींमध्ये पाणी साठवून ठेवण्याची क्षमता असते. कारण अशा वनस्पती बहुधा अतिशय कोरडवाहू प्रदेशातच वाढतात. त्या ठिकाणी कधीतरी पाणी उपलब्ध होतं. त्या वेळी ते शोषून घेत आपल्या अंगात साठवून ठेवण्याची किमया या वनस्पतींनी साध्य केलेली आहे. त्यामुळे नंतर दीर्घ काळ जरी कोरडा गेला तरी त्यांच्यात गरज भागण्याइतकं पाणी नेहमीच उपलब्ध असतं. हे पाणी जरी या वनस्पतींच्या मधल्या फुगीर भागात म्हणजे त्यांच्या खोडात साठवलं जात असलं, तरी त्यांचे इतर अवयवही यात सहभागी असतात. 'कॅक्टस' या नावाचं मूळ ग्रीक भाषेतील 'काक्टोस' या शब्दात सापडतं. त्याचा अर्थच मुळी काटे असा आहे. म्हणजेच अंगावरचे काटे हे या वनस्पतींचं व्यवच्छेदक लक्षण आहे. हे काटे म्हणजे या वनस्पतींची पानंच असतात. विशिष्ट पर्यावरणात या वनस्पतींची वाढ होत असल्यामुळे या पानांच्या रचनेत असा बदल झालेला असतो. वनस्पतींची पानं प्रकाशसंश्लेषणाची कळीची भूमिका बजावत असतात. त्यासाठी ती हवेतील कार्बन डाय ऑक्साईडची पाण्याशी प्रक्रिया करून कर्बोदकांची निर्मिती करतात; पण हीच पानं पाण्याची उधळपट्टीही करत असतात. म कारण ट्रान्सिरेशनच्या दुसऱ्या एका प्रक्रितयेतून ती पाणी हवेत सोडून देतात. तसंच उच्च तापमान पानांना सहन होत नाही. ज्या वाळवंटी प्रदेशात निवडुंगांची जास्त वाढ होते तिथं एक तर पाण्याची कमतरता असते. त्यामुळे मोठ्या मुश्किलीनं मिळालेल्या पाण्याची जेवढी बचत करता येईल तितकी करणं अत्यावश्यक बनतं. शिवाय तिथं तापमानही जास्तच असतं. त्यामुळे मग या पानांचा पृष्ठभाग जितका कमी करता येईल तितका केला जातो. त्यातूनच पसरट पानाऐवजी टोकदार आणि निमुळते होत जाणारे काटे या वनस्पतींच्या अंगावर वाढतात. तसं झाल्यानं अर्थात पानांच्या प्रकाशसंश्लेषणाच्या क्षमतेत घट होते. ती भरून काढण्यासाठी मग खोडच हरितद्रव्य धारण करून हिरवं बनतं. प्रकाशसंश्लेषणाची प्रक्रिया स्वतःच मोठ्या प्रमाणावर पार पाडतं.
निवडुंगावरचे काटे अशा रीतीनं पानांची भूमिका पार पाडत असले, तरी त्यांचे इतरही काही फायदे या वनस्पतींना होतात. वाळवंटातल्या जनावरांपासून त्यांचं संरक्षण करण्याचं कामही हे काटे करतात. कारण त्या काट्यांच्या धारदार टोकांमुळे त्यांना तोंड लावायला सहसा ही जनावरं धजत नाहीत. निवडुगांची वाढ संथ गतीनं होत असल्यामुळे अशा संरक्षणाची त्यांना गरज असते. हे काटे वाळवंटातल्या जोरानं वाहणाऱ्या वाऱ्याला तटवण्याचं कामही करतात. त्यामुळे अंगच्या पाण्याचं बाष्पीभवन होऊन ते उडून जाण्याचं प्रमाण घटतं. शिवाय रात्रीच्या वेळी जेव्हा तापमान उतरतं तेव्हा हवेतला ओलावा द्रवीभूत होऊन त्यातून दवाचे थेंब तयार होतात. ते या काट्यांच्या टोकावर अलगद उतरतात आणि सहज शोषले जातात.
बाभूळ किंवा गुलाब यांच्या फांद्यांवरही काटे असतात; पण ते आणि निवडुंगावरचे काटे यांच्या केवळ रंगातच नाही, तर त्यांच्या विवक्षित जागेमध्ये आणि त्या काट्यांच्या मुळांमध्येही मूलभूत फरक आहेत..
उत्तर लिहिले · 15/11/2020
कर्म · 39105
0

निवडुंगाला काटे असण्याची काही कारणे खालीलप्रमाणे आहेत:

  1. पाण्याचे संरक्षण: वाळवंटी प्रदेशात पाणी अत्यंत दुर्मिळ असते. त्यामुळे, निवडुंगातील काटे पाण्याचे बाष्पीभवन कमी करतात. पानांच्या ऐवजी काटे असल्यामुळे, त्यांची पृष्ठभागाची क्षेत्रफळ कमी होते आणि त्यामुळे कमी पाणी वाया जाते.
  2. प्राण्यांपासून संरक्षण: काटे असल्यामुळे प्राणी त्यांना खाण्याचा प्रयत्न करत नाहीत. त्यामुळे निवडुंगाचे प्राण्यांपासून संरक्षण होते.
  3. सूर्यप्रकाशापासून बचाव: अधिक सूर्यप्रकाशामुळे निवडुंगातील पाणी झपाट्याने कमी होऊ शकते. काटेFunction with different return types.

याव्यतिरिक्त, काही निवडुंगाचे काटे हे प्रकाश संश्लेषण (photosynthesis) करण्यास देखील मदत करतात.

अधिक माहितीसाठी, आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 1440

Related Questions

वंश उत्पत्तीच्या कारणांनुसार माशांचे पाच घटक स्पष्ट करा?
शरीरांतर्गत होणाऱ्या जैविक बदलात रक्ताभिसरण संस्थेचे महत्त्व स्पष्ट करा?
डॉ. सन एम. सेल यांचे कार्य 20 ते 25 ओळीत लिहा?
अतिनील किरणांना बघून डास आकर्षित होतात का?
"बांडगुळ" म्हणजे काय? त्याच्या किती जाती असतात?
जंगलात सापडणारी नरभक्षक झुडपे?
मानवी शरीर मानवाचे नाही म्हणतात ते कितपत खरे आहे?